इथे प्रेसिडेंट डेची सुट्टी असल्याने आणि बाहेर वातावरण थोडे थंडच असल्याने सद्ध्या घरीच थोडा आराम. तर आज लिहीणार आहे मी एका चांगल्या कार्यक्रमाविषयी.
इथे डॆलास मध्ये पहिले २४X७ देसी एफ एम प्रसारण केंद्र (रेडीओ सलाम नमस्ते, १०४.९ एफ. एम.) आहे. खरं तर मी त्याच्या अतिशय प्रेमात असण्याची बरीच कारणं आहेत पण त्यातल्या त्यात काही प्रमुख म्हणजे वैविध्यपूर्ण कार्यक्रम, नवीन तसेच जुनी तुम्हाला आवडतील अशी गाणी, तदनुषंगे समालोचन आणि खिळवून ठेवतील असे कॊल इन प्रॊग्राम्स. जुनी फर्माईशी गाणी ऐकण्याव्यतिरीक्त नवीन टॊप टेन तसच ऐशी नव्वदच्या दशकातली उत्तम गाणी सुद्धा सहज जाता जाता कानी पडतात आणि आपण कधी शाळा कॊलेजच्या त्या दिवसात हरवून जातो कळत देखील नाही. त्याचबरोबर एखाद्या गायकाचा, गीतकाराचा, संगीतकाराचा, अभिनेत्याचा , अभिनेत्रीचा, निर्मात्याचा, दिग्दर्शकाचा वाढदिवस असेल तर काहीवेळा त्याचा स्पेशल प्रोग्राम ऐकायलाही तितकीच मजा येते. शिवाय मधून मधून बॊलीवूड ट्रीव्हीया क्वीझेस असतातच तुमचं बॊलीवूड्च अगाध द्न्यान तपासायला. त्याशिवाय बयाच आध्यत्मिक कार्यक्रमांची सुद्धा रेलचेल असते. शनिवारी संध्याकाळची हिंदू देवळातली आरती सुद्धा प्रसारीत करण्यात येते. ह्या प्रसारणाचा मुख्य श्रोतृवर्ग देसी म्हणजे डॆलसस्थित भारतीय, पाकिस्तानी, नेपाळी आणि बांगलादेशी असा असल्याने कार्यक्रम बहुढंगी होतात. शिवाय देसी डॊक्टर्स, सी.पी.एज, विमा एंजंट्स, हॊटेल्स ह्यांची माहिती सुद्धा मिळते. एकंदरच देसी कम्युनिटीच्या वाढीस आणि एकत्रिकरणास चांगलाच हातभार लागतोय ह्या प्रसारण केंद्रामुळे. तर आज मी मला ह्या केंद्रावरून प्रसारीत होणाया अशाच एका कार्यक्रमाविषयी लिहिणार आहे.
सदाफ म्हणून एक आर.जे (रेडीओ जॊकी) दर शुक्रवारी दुपारी बारा ते एक च्या दरम्यान हा कार्यक्रम सादर करते. एखादा राजकीय किंवा सामाजिक विषय घेऊन आणि त्याच सूत्र संचालन स्वतःकडे ठेवून सदाफ लोकांना त्यावर आपली मत प्रदर्शित करायचं आव्हान करते आणि मग वेगवेगळे लोक आपली मत मांडण्यासाठी ऒन एअर फोन करतात आणि मग एकावेळी एक एक कॊलरशी संभाषण करीत सदाफ कार्यक्रम छान रंगवते. म्हटलं तर तसं सोप्प आहे आणि म्हटलं तर हे काम कठीण सुद्धा. लोक बरेचदा भावूक होतात फॊन वर, शिवाय सगळ्यांना बोलायला संधी देता यावी म्हणून तिला बोलताना काटेकोरपणे वेळ द्यावी लागते प्रत्येकाला. मला ह्यात सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या देशातल्या लोकांची माहिती मिळते तसच वेगवेगळ्या शैक्षणिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या माणसांचे विचार, अनुभव ऐकायला मिळतात. अगदी मायबोलीवरच्या व्ही ऎण्ड सी (म्हणजे व्ह्यूज ऎण्ड कमेंट्स) सारखं.
दोन आठवड्यांपूर्वी सदाफने अमेरीकेतल्या प्रायमरी विषयी प्रश्न मांडला होतात त्यातून स्त्रीवर्गाचा पाठींबा हिलरीला का आणि किती आहे शिवाय ओबामालाही मिळणारा पाठींबा ह्याची झलक मिळाली. विशेषतः डॆलास मधे तरी बरेच देसी अमेरीकन्स आहेत ज्यांचा डेमोक्रेटीक पार्टीला पाठींबा आहे.
मागच्या वेळी सदाफने पाकिस्तानातले सद्य राजकारण हा विषय घेतला होता. बेनझीरची राजकीय हत्या आणि त्यानंतर आज होत असलेल्या निवडणूका ह्यावर बरीच चर्चा झाली. खूप पाकीस्तानी लोकांनी कॊल करून पाकिस्तानच्या सद्य परिस्थिती बद्दल चिंता तसेच विषाद व्यक्त केला. भारताशी तुलना करता पाकिस्तानची लोकशाहीतली अधोगती अर्थातच अधोरेखित झाली. गमतीची गोष्ट अशी की मुशर्रफ ह्यांना सगळ्याच थरातून वाढता पाठींबा दिसून आला. इथे असलेले पाकिस्तानी हे बरेचसे सुजाण आणि सुविद्य पाकिस्तानी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. एकंदरच पाकिस्तानात बोकाळलेली सरंजामशाही बेनझीर, नवाझ शरीफ ह्यांनी कमवलेली अफलातून संपत्ती, भ्रष्टाचाराचा कळस ह्यामुळे तेथील जनता इतकी जर्जर झाली आहे की विचारता सोय नाही. ह्या पार्श्चभूमीवर मुशर्रफांकडे दगडापेक्षा वीट मऊ ह्या न्यायाने बघत लोक पाठींबा देत आहे. मूलतत्त्ववाद्यांचा धोका, दह्शतवाद आणि राजकीय अस्थैर्य ह्यात पाकिस्तानी जनता अक्षरशः भरडली जातेय. दुर्दैवाने दूरदृष्टी असलेला नेता त्यांच्याकडे नाही. शिवाय लष्करशाहीने लोकशाहीचा खेळ करून टाकलाय आणि ह्याचेच सुविद्य पाकिस्तानींना जास्त दुःख आहे. स्त्रियांचे शिक्षण, पुढच्या पिढीत मूलतत्ववाद्यांचे वाढते धोकादायक आकर्षण आणि वाढती धार्मिक. सामाजिक विषमता ह्यामुळे प्रगतीच्या विरुद्ध दिशेने पाकिस्तान जात आहे असं दिसतय. शिवाय तालिबान तसेच अफगाणिस्तानचा काही प्रदेश ह्यांकडून त्यांना टॊळ्यांचा धोका आहेच. अत्तापर्यंतचे सगळेच राज्यकर्ते भारताचा द्वेष हे एकच धोरण मध्यभागी ठेवून जनतेची दिशाभूल करत राहीले परिणामतः साठ वर्षांनतरही पाकिस्तानातली सुंदोपसुंदी संपताना दिसत नाही, उलट अस्थैर्य आणि आर्थिक विषमता वाढतच आहे. मूठभर धनिकांच्या हातात अजूनही देशाच्या नाड्या आवळलेल्या आहेत आणि लष्कराच्या अकारण हस्तक्षेपामुळे बर्याच राजकीय, सामाजिक निर्णयांना वेगळे वळण लागून सामान्य नागरीकाची सुरक्षितता आणि स्वातंत्र्यच धोक्यात येत आहे. पाकिस्तानात रहाणाया अतिशय थोड्या हिंदूचे हाल तर कल्पनातीत आहेत. इतर अनेक विषमतांबरोबर धार्मिक विषमता त्यांना सहन करावी लागते आणि अर्थात पाकिस्तान तसेच त्यांचा इस्लाम हा काही सहिष्णू नव्हेच. एका पाकिस्तानी हिंदूने रेडीओवर सांगितलेली प्रतिक्रीया पुरेशी बोलकी होती. सद्ध्या पाकिस्तानात रोटीचा प्रश्न गाजतोय. तेथे गव्हाचे उत्पन्न खूप होते. गहू हेच मुख्य खाणे आणि नंतर भात. तर अचानक गहू आणि आटा बाजारातून गायब झालाय. इतका की काळ्याबाजाराला उत येतोय. मुशर्रफ सरकार म्हणते गहू आहे पण तो लोकांपर्यत पोहोचत नाहीये. मधले दलाल त्याला परस्पर बाहेर विकत आहेत. इतकं टोकाला गेलय हे की लष्कराचे सैनिक गव्हाच्या गोदामांना राखण्यासाठी ठेवावे लागत आहेत. ह्याच खरं कारण असं दिसतय की सरकार जरी म्हणत असलं की गव्हाच चांगलं उत्पन्न झालय तरी बराचसा गहू त्यांना निर्यात करावा लागलाय, नाहीतर देशाला पैसा मिळणार कुठून. एकंदर कठीण काळातून जात आहे पाकिस्तान. त्यातच ह्या निवडणूकांचे ओझे. लालमशीद प्रकरण, अमेरीकेचा दबाव, संरजामशाहीकडे झुकलेल्या आणि भ्रष्टाचाराने पोखरलेल्या सिस्टीमचा आडमुठेपणा ह्या सगळ्यांशी लढताना मुशर्रफना तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि त्यातूनच हाच एक माणूस पाकिस्तानासाठी निदान काहीतरी करू शकेल अशी भावना तेथे मूळ धरत आहे. जे असेल ते, पण भुकेने पेटलेल्या आणि बजबजपुरीने विटलेल्या जनतेचे लोंढे बांगलादेशासारखे पुन्हा इथे वळायला नकोत ह्यासाठी भारतीय लष्कराला मात्र डोळ्यात तेल घालून सीमांचं रक्षण करावं लागतय.
अजून एक विषय सदाफने चर्चेला घेतला होता तो म्हणजे जोधा अकबर आणि मतमतांतरे. त्याविषयी माझं मत. चित्रपट कितीही चांगला बनवला असला तरी तो करमणुकीसाठी आणि निव्वळ पैसे कमवण्यासाठी बनवलाय त्यामुळे हाच खरा इतिहास असं पुढच्या पिढीला सांगण्याचा मूर्खपणा कोणी करू नये. आपल्या अभ्यासक्रमातल्या इतिहासात सन सनावळ्या पाठ करण्यावरच भर असतो आणि त्याच्याव्यतिरीक्त काय आहे खरा इतिहास हे वाचावं हे शालेय जीवनानंतर सहसा वाटत नाही आणि वाटलं तरी वेळ मिळतोच असं नाही. त्यामुळे असं चित्रपटात दाखवलेलं खरं मानून तेच इतिहास म्हणून पुढं केलं जातं. ह्यामुळे खरच नुकसान होतय इतिहासाचं. आशुतोष गोवारीकरने तरी चित्रपटाच्या सुरुवातीला हा खरा इतिहास असेलच असं नाही असंं लिहायला हवं होतं. राजपूतांच्या भावना दुखावल्या जाणारच ह्यात. राणाप्रतापासारखे तुरळक अपवाद सोडले तर बयाच राजपूत नायकांनी मुघलांबरोबर रोटी बेटी व्यवहार करून मांडिलकी पत्करली. जर राजपूत स्त्रियांच्या ह्या असहाय्यतेला प्रेमाचं स्वरूप दिलं गेल असेल तर ते कोणालाही आवडणार नाहीच, शिवाय मुगलांच्या हाती लागू नये म्हणून जोहार करून प्राणार्पण करणाया कित्येक राजपूत स्त्रीयांचा तो अपमानही ठरेल. तुम्ही चित्रपटात अर्थात काहीही दाखवू शकता पण हाच इतिहास हे लादण्याचा अट्टाहास कशासाठी? ज्याला खरंच काय आहे खरं, ती जोधा होती की नव्हती, तिच शत्रूतुल्य अकबरावर प्रेम होतं की न्हवतं ह्याचा शोध घ्यायचाय तो संशोधन करेलही. शिवाय अकबर हा सम्राट असला आणि त्यातला त्यात बरा मुगल राजा असला तरी शेवटी परकीयच त्यामुळे स्थानिकांवर अत्याचार होतच असणार. बिरबल तसेच नवरत्नांमुळे आणि कलोपासनांमुळे तो चांगला प्रसिद्धिस पावला इतकेच. सांगायचा मुद्दा असा की जोधा अकबर जरुर पाहा पण एक निव्वळ करमणूक म्हणून, ऐश्वर्या छान दिसतेय म्हणून, लढाया चांगल्या चित्रीत केल्यात म्हणून, ह्रुतिक भरजरी कपड्यात उमदा दिसतोय म्हणून.. हा खरा इतिहास आहे असं समजून नको... उद्या अशुतोष गोवारीकरच्या लगान मधे जी मॆच झाली तशी खरोखरच झाली होती असं म्हटलं तर ते मान्य होईल का? शिवाय पुढे कोणत्या परराष्ट्रीय अभ्यासकाने ऐतिहासिक संदर्भ म्हणून हा चित्रपट घेतला तर योग्य होईल काय? आणि म्हणूनच शिवरायांविषयी किंवा आपल्या गणेशोत्सवाविषयी जेव्हा कोणी उद्दाम आणि सवंग लिहू पाहाते तेव्हा आपणास राग येत असेल तर तसाच राजपूतांना येणे शक्य नाही काय?
Sunday, February 17, 2008
Sunday, February 10, 2008
"राज"कारण
उपास, मार आणि उपासमार मधल्या मार विषयी थोडसं लिहीणार आहे आज.. आणि तदनुषंगाने राज-कारणाविषयीही.
गेले आठ दिवस मुंबईत जे काही चालू आहे त्याविषयी ऐकतोय आणि वाचतोय. सगळ्या थरातून संमिश्र प्रतिक्रीया आहेत आणि खरं काय चाल्लय ह्याचा नीट उलगडा व्हायला वेळ लागतोय. खरं तर हे मिडीयाचं अपयश म्हणावं लागेल. सगळेच सवंग पत्रकारीतेच्या मागे असल्याने एखाद्या लहानशा गोष्टीचं भांडवल करून त्याला भडक रूप देऊन breaking news बनवायचं आणि आपला TRP वाढवायचा पद्धतशीर प्रयत्न मिडीया कडून होताना दिसतोय. ह्याची परिणिती मिडीयावरचा विश्वास कमी होण्यात होतेय आणि हे चांगलं लक्षण नाही.
प्रांतीय वाद आणि प्रादेशिक अस्मिता हा विषय तसा नाजूक आहे. भारतीय घटनेने भारतीयास भारतात कुठेही जाऊन राहाण्याचा, घर थाटण्याचा (दुर्दैवाने काश्मीर वगळता - कलम ३७०) हक्क दिला आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही जिकडे स्थायिक व्हाल तिथे तुम्ही शांतता, स्थैर्य राखून स्थानिकांच्या भावनांचा, स्थनिक म्हणून त्यांच्या हक्कांचा विचार करायलाच हवा. सांस्कृतिक, भाषिक, राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक सगळ्या पातळ्यांवर समरसून एकत्र राहाण्याची तयारी असायलाच हवी. ह्या मुद्द्यांवर राज जे काही म्हणतोय त्यात तथ्य वाटतय. भारतातल्या इतर राज्यांशी तुलना करता मुंबईतला मराठी माणूस बराच सहिष्णू आहे, दिवसेंदिवस मुंबईत येणारा लोंढा बघून तो अजूनही शांत आहे. पण विशेषतः उत्तर प्रदेशातले, तेथे हरल्यामुळे रिकामटेकडे असलेले नेते पुनःपुनः मुंबईत येऊन इथले वातावरण विनाकारण कलुषित करत आहेत. तसं पाहाता तात्विक दृष्ट्या विचार केला तर केवळ भैय्या लोकांवर राग असण्याचे कारण नाही. जे जे मुंबईत राहून केवळ तिला ओरबाडतच नाहीत तर इथे येऊन हक्कांची आणि दादागिरीची भाषा करतात त्यांना मराठी माणूस म्हणून बाणा दाखवायलाच हवा. तुम्ही इकडे निष्ठा ठेवत असाल आणि इथल्या सांस्कृतिक आणि भाषिक वातावरणात जुळवून रहाणार असाल तर रहा नाहीतर चालते व्हा असं सांगण्यात काहीच गैर नाही. ह्या बाबतीत मला गुजराथी, जैन समाजाचे विशेष कौतुक वाटते. माझे कित्येक जैन, गुजराथी मित्र मराठी उत्तम बोलतातच शिवाय घरी गणपतीही बसवतात. ह्याला म्हणतात एकात्मता. अजून एक बातमी वाचून डोकं ठणकलं ती म्हणजे मुंबई महानगर पालिकेचा कारभार हिंदीतूनही चालवण्याचा प्रस्ताव. हा प्रस्ताव आणायची हिम्मत होते आणि कित्येकांना त्याबद्दल काही वाटत नाही हे मराठी माणसाच दुर्दैव आहे. हिंदी असेलही आमची राष्ट्रभाषा पण मराठीला ही मान्यताप्रत दर्जा आहे. भाषावार प्रांत रचनेत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून महाराष्ट्रीय माणसाने १०५ हुतात्म्यांचे मोल देऊन मुंबई मिळवलेय, तिचा कारभार मराठीशिवाय इतर भाषेत होऊ देताच कामा नये. बाहेरून येणायांना मराठीतला कारभार कळत नसेल तर मराठी शिकून या म्हणावं. चेन्नई, कोलकत्ता किंवा इतर कोणत्या ठिकाणी असा प्रस्ताव आणायची कोणी हिम्मत तरी करु शकेल काय? आज आपलं आयुष्य कमालीचं वेगवान झालय आनि सामाजिक मन प्रचंड निष्क्रिय. त्यामुळे मुंबईत मराठीचा टक्का घटण्याचे धोके काय आहेत ह्याचा विचार करायला वेळच नाहीये कोणाला. राज ते करतोय हे नक्कीच चांगलं आहे. शिवसेने सुद्धा मराठी माणसाची तळी उचलली काही वर्षांपूर्वी म्हणून मुंबई मराठी माणसाची अशी ओळख राहीली. पण मग राजकारण्यांनी रेशनीग कार्ड वाटली राजकीय स्वार्थासाठी आणि आता परप्रांतीयांचा टक्का इतका वाढलाय की त्यांचा राजकीय दबावगट तयार झालाय.
आता केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारातून आलेल्या भैय्यांच्या बाबतीत बोलायचं तर मला वैयक्तीक पातळीवर त्यांविषयी आदरच आहे. जे अनेक समूह मुंबईत आहेत त्यातल्या त्यात हा समाज मेहनत करून जगणारा आणी थोडासा पापभिरू. हातावर पोट असलेल्यांपैकी. राज ने ह्या समाजाला निषाण करायचं कारण अर्थात राजकीय जास्त आहे. पण मराठी माणसाच्या उद्योगातल्या उदासीनतुमुळे भैय्या लोकांनी अनेक धंदे काबीज केलेत. दूधवाला, पानवाला, इस्त्रीवाला, भेळवला, चणेवाला इतकच काय तर न्हावी, भाजीवाला अशा सगळीकडे आपल्याला भैय्येच दिसतात. जिथे तुमच्या कामातल्या कौशल्यापेक्षा ढोर मेहनत अधिक लागते तिथे भैय्ये लोक हमखास दिसतील. शिवाय एक भैय्या आला की तो थोडे दिवसानी रायबरेली किंवा तत्सम ठिकाणावरून दुसरा, तिसरा आणि मग त्यांची कुटुंब असं चालूच आहे. मुंबई कुणाला उपाशी ठेवत नाही, मेहनत करणायाला तर कधीच नाही. पाडगावकर एका बोलगाण्यात म्हणतात तसं, कधी कधी एखादा भैया दूर उत्तर प्रदेशातल्या बायकोची आठवण काढत एकसुरी जगत असेलेला दिसतो. एका खोलीत दहा दहा जण राहून पैसे वाचवून गावाला पाठवताना बरेचदा दिसून येतं. अजूनही स्त्रियांच्या शिक्षणाचा अभाव, लग्नावर ऐपतीबाहेर होणारे खर्च ह्यामुळे हा समाज तसा मागेच आहे. तिथल्या राजकरण्यांनी केलेल्या दिवाळखोरीमुळे आणि मुंबापुरीच्या आकर्षणामुळे भैय्ये लोक इथे येतात आणि दुय्यम दर्जाची कामे करून उरलेल्या वेळात भजन किर्तनात वेळ घालवतात. ढोबळ मानाने ह्या भैय्या लोकांच्या मेहनतीचा मुंबापुरीला उपयोगच होतोय. पण त्यांनी इथे समरसून जाणं आवश्यक आहे. रामलीला इतके वर्ष होत आहेच आणि होत राहीलही, पण आपल्या समूहाचा दबावगट तयार करून स्थानिकांवर कुरघोडी करू नये हे त्यांच्या नेत्यांना समजायला हवं.
राजचा मुद्दा तंतोतंत पटण्यासारखा आहे पण झुंडशाहीचा मार्ग बरोबर नाही असे वाटते. शिवाय हातावर पोट असलेल्या सामान्य भैय्याला मारुन काय होणार, आपली रेष मोठी कशी करायची ह्याचा मराठी मनाने विचार करायला हवा, दुसयाची रेष पुसायची गरज नाही, त्याचबरोबर भैय्याला दिली ओसरी भैय्या हात पाय पसरी हे ही होता कामा नये म्हणून स्थानिकांचा आवाज बुलंद असायलाच हवा.
ह्या ग्लोबल युगात संकुचित राहूनही अजिबात चालणार नाही त्यामुळे सहिष्णुता, सर्वसमावेशकता आणि प्रादेशिक अस्मिता ह्यांचा योग्य मेळ साधायला हवा. मराठी माणसानेही पोटापाण्यासाठी मुंबई सोडलेय तो देशा परदेशात रहातोय. त्यानेही महाराष्ट्र मंडळे चालवून ठिकठिकाणि मराठी संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे मुंबईतल्या आततायी पणाचा मुंबईबाहेरील मराठी माणसास त्रास होणार नाही हे ही बघणे महत्त्वाचे.
राजच्या मनसे कडून बर्याच अपेक्षा होत्या मला, विशेषतः त्याचा जाहीरनामा वाचला तेव्हा. अत्तापर्यंत त्याने काही ठोस केल्याचे जाणवले नाही आणि हे आंदोलन सुद्धा राजकीय जास्त वाटतय. झुंडशाहीचा त्याचा मार्ग पटत नाही पण मराठीचा मुद्दा बरोबरच आहे. शिवसेनेला काटशह देण्याचाही त्याचा हेतू स्पष्ट दिसतोच आहे. त्याने म टा मधे आपली भूमिका स्पष्ट मांडलेय ह्याचा त्याला नक्कीच उपयोग होतोय. शिवसेनेला मात्र आता थोडी भिती आहे की मराठी पणाच्या चलनी नाण्यात वाटेकरी झाला की काय? बाळासाहेबांना मराठी मक्तेदारी शिवसेनेकडेच हे ओरडून सांगण्यासाठी वेगळा अग्रलेख लिहावा लागला सामन्यात ह्यातच राजच्या करिष्म्याची झलक दिसतेय. बाळासाहेबांच्या बर्याच गुणांची छबी राज मध्ये तंतोतंत दिसतेय. बाळासाहेबांकडे पक्षाची भूमिका सामान्यांपर्यंत पोहोचवायला जसे मार्मिक आणि मग सामना ही पत्रे होती, तसं काहीतरी राजकडे असणं आवश्यक आहे. गुंडगिरी सोडून विधायक कामांवर राजने जास्त लक्ष दिलं तर एक चांगली लोकमान्यता त्याला नक्कीच मिळू शकेल.
जय हिंद, जय महाराष्ट्र!!
गेले आठ दिवस मुंबईत जे काही चालू आहे त्याविषयी ऐकतोय आणि वाचतोय. सगळ्या थरातून संमिश्र प्रतिक्रीया आहेत आणि खरं काय चाल्लय ह्याचा नीट उलगडा व्हायला वेळ लागतोय. खरं तर हे मिडीयाचं अपयश म्हणावं लागेल. सगळेच सवंग पत्रकारीतेच्या मागे असल्याने एखाद्या लहानशा गोष्टीचं भांडवल करून त्याला भडक रूप देऊन breaking news बनवायचं आणि आपला TRP वाढवायचा पद्धतशीर प्रयत्न मिडीया कडून होताना दिसतोय. ह्याची परिणिती मिडीयावरचा विश्वास कमी होण्यात होतेय आणि हे चांगलं लक्षण नाही.
प्रांतीय वाद आणि प्रादेशिक अस्मिता हा विषय तसा नाजूक आहे. भारतीय घटनेने भारतीयास भारतात कुठेही जाऊन राहाण्याचा, घर थाटण्याचा (दुर्दैवाने काश्मीर वगळता - कलम ३७०) हक्क दिला आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही जिकडे स्थायिक व्हाल तिथे तुम्ही शांतता, स्थैर्य राखून स्थानिकांच्या भावनांचा, स्थनिक म्हणून त्यांच्या हक्कांचा विचार करायलाच हवा. सांस्कृतिक, भाषिक, राजकीय, धार्मिक, ऐतिहासिक सगळ्या पातळ्यांवर समरसून एकत्र राहाण्याची तयारी असायलाच हवी. ह्या मुद्द्यांवर राज जे काही म्हणतोय त्यात तथ्य वाटतय. भारतातल्या इतर राज्यांशी तुलना करता मुंबईतला मराठी माणूस बराच सहिष्णू आहे, दिवसेंदिवस मुंबईत येणारा लोंढा बघून तो अजूनही शांत आहे. पण विशेषतः उत्तर प्रदेशातले, तेथे हरल्यामुळे रिकामटेकडे असलेले नेते पुनःपुनः मुंबईत येऊन इथले वातावरण विनाकारण कलुषित करत आहेत. तसं पाहाता तात्विक दृष्ट्या विचार केला तर केवळ भैय्या लोकांवर राग असण्याचे कारण नाही. जे जे मुंबईत राहून केवळ तिला ओरबाडतच नाहीत तर इथे येऊन हक्कांची आणि दादागिरीची भाषा करतात त्यांना मराठी माणूस म्हणून बाणा दाखवायलाच हवा. तुम्ही इकडे निष्ठा ठेवत असाल आणि इथल्या सांस्कृतिक आणि भाषिक वातावरणात जुळवून रहाणार असाल तर रहा नाहीतर चालते व्हा असं सांगण्यात काहीच गैर नाही. ह्या बाबतीत मला गुजराथी, जैन समाजाचे विशेष कौतुक वाटते. माझे कित्येक जैन, गुजराथी मित्र मराठी उत्तम बोलतातच शिवाय घरी गणपतीही बसवतात. ह्याला म्हणतात एकात्मता. अजून एक बातमी वाचून डोकं ठणकलं ती म्हणजे मुंबई महानगर पालिकेचा कारभार हिंदीतूनही चालवण्याचा प्रस्ताव. हा प्रस्ताव आणायची हिम्मत होते आणि कित्येकांना त्याबद्दल काही वाटत नाही हे मराठी माणसाच दुर्दैव आहे. हिंदी असेलही आमची राष्ट्रभाषा पण मराठीला ही मान्यताप्रत दर्जा आहे. भाषावार प्रांत रचनेत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून महाराष्ट्रीय माणसाने १०५ हुतात्म्यांचे मोल देऊन मुंबई मिळवलेय, तिचा कारभार मराठीशिवाय इतर भाषेत होऊ देताच कामा नये. बाहेरून येणायांना मराठीतला कारभार कळत नसेल तर मराठी शिकून या म्हणावं. चेन्नई, कोलकत्ता किंवा इतर कोणत्या ठिकाणी असा प्रस्ताव आणायची कोणी हिम्मत तरी करु शकेल काय? आज आपलं आयुष्य कमालीचं वेगवान झालय आनि सामाजिक मन प्रचंड निष्क्रिय. त्यामुळे मुंबईत मराठीचा टक्का घटण्याचे धोके काय आहेत ह्याचा विचार करायला वेळच नाहीये कोणाला. राज ते करतोय हे नक्कीच चांगलं आहे. शिवसेने सुद्धा मराठी माणसाची तळी उचलली काही वर्षांपूर्वी म्हणून मुंबई मराठी माणसाची अशी ओळख राहीली. पण मग राजकारण्यांनी रेशनीग कार्ड वाटली राजकीय स्वार्थासाठी आणि आता परप्रांतीयांचा टक्का इतका वाढलाय की त्यांचा राजकीय दबावगट तयार झालाय.
आता केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारातून आलेल्या भैय्यांच्या बाबतीत बोलायचं तर मला वैयक्तीक पातळीवर त्यांविषयी आदरच आहे. जे अनेक समूह मुंबईत आहेत त्यातल्या त्यात हा समाज मेहनत करून जगणारा आणी थोडासा पापभिरू. हातावर पोट असलेल्यांपैकी. राज ने ह्या समाजाला निषाण करायचं कारण अर्थात राजकीय जास्त आहे. पण मराठी माणसाच्या उद्योगातल्या उदासीनतुमुळे भैय्या लोकांनी अनेक धंदे काबीज केलेत. दूधवाला, पानवाला, इस्त्रीवाला, भेळवला, चणेवाला इतकच काय तर न्हावी, भाजीवाला अशा सगळीकडे आपल्याला भैय्येच दिसतात. जिथे तुमच्या कामातल्या कौशल्यापेक्षा ढोर मेहनत अधिक लागते तिथे भैय्ये लोक हमखास दिसतील. शिवाय एक भैय्या आला की तो थोडे दिवसानी रायबरेली किंवा तत्सम ठिकाणावरून दुसरा, तिसरा आणि मग त्यांची कुटुंब असं चालूच आहे. मुंबई कुणाला उपाशी ठेवत नाही, मेहनत करणायाला तर कधीच नाही. पाडगावकर एका बोलगाण्यात म्हणतात तसं, कधी कधी एखादा भैया दूर उत्तर प्रदेशातल्या बायकोची आठवण काढत एकसुरी जगत असेलेला दिसतो. एका खोलीत दहा दहा जण राहून पैसे वाचवून गावाला पाठवताना बरेचदा दिसून येतं. अजूनही स्त्रियांच्या शिक्षणाचा अभाव, लग्नावर ऐपतीबाहेर होणारे खर्च ह्यामुळे हा समाज तसा मागेच आहे. तिथल्या राजकरण्यांनी केलेल्या दिवाळखोरीमुळे आणि मुंबापुरीच्या आकर्षणामुळे भैय्ये लोक इथे येतात आणि दुय्यम दर्जाची कामे करून उरलेल्या वेळात भजन किर्तनात वेळ घालवतात. ढोबळ मानाने ह्या भैय्या लोकांच्या मेहनतीचा मुंबापुरीला उपयोगच होतोय. पण त्यांनी इथे समरसून जाणं आवश्यक आहे. रामलीला इतके वर्ष होत आहेच आणि होत राहीलही, पण आपल्या समूहाचा दबावगट तयार करून स्थानिकांवर कुरघोडी करू नये हे त्यांच्या नेत्यांना समजायला हवं.
राजचा मुद्दा तंतोतंत पटण्यासारखा आहे पण झुंडशाहीचा मार्ग बरोबर नाही असे वाटते. शिवाय हातावर पोट असलेल्या सामान्य भैय्याला मारुन काय होणार, आपली रेष मोठी कशी करायची ह्याचा मराठी मनाने विचार करायला हवा, दुसयाची रेष पुसायची गरज नाही, त्याचबरोबर भैय्याला दिली ओसरी भैय्या हात पाय पसरी हे ही होता कामा नये म्हणून स्थानिकांचा आवाज बुलंद असायलाच हवा.
ह्या ग्लोबल युगात संकुचित राहूनही अजिबात चालणार नाही त्यामुळे सहिष्णुता, सर्वसमावेशकता आणि प्रादेशिक अस्मिता ह्यांचा योग्य मेळ साधायला हवा. मराठी माणसानेही पोटापाण्यासाठी मुंबई सोडलेय तो देशा परदेशात रहातोय. त्यानेही महाराष्ट्र मंडळे चालवून ठिकठिकाणि मराठी संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे मुंबईतल्या आततायी पणाचा मुंबईबाहेरील मराठी माणसास त्रास होणार नाही हे ही बघणे महत्त्वाचे.
राजच्या मनसे कडून बर्याच अपेक्षा होत्या मला, विशेषतः त्याचा जाहीरनामा वाचला तेव्हा. अत्तापर्यंत त्याने काही ठोस केल्याचे जाणवले नाही आणि हे आंदोलन सुद्धा राजकीय जास्त वाटतय. झुंडशाहीचा त्याचा मार्ग पटत नाही पण मराठीचा मुद्दा बरोबरच आहे. शिवसेनेला काटशह देण्याचाही त्याचा हेतू स्पष्ट दिसतोच आहे. त्याने म टा मधे आपली भूमिका स्पष्ट मांडलेय ह्याचा त्याला नक्कीच उपयोग होतोय. शिवसेनेला मात्र आता थोडी भिती आहे की मराठी पणाच्या चलनी नाण्यात वाटेकरी झाला की काय? बाळासाहेबांना मराठी मक्तेदारी शिवसेनेकडेच हे ओरडून सांगण्यासाठी वेगळा अग्रलेख लिहावा लागला सामन्यात ह्यातच राजच्या करिष्म्याची झलक दिसतेय. बाळासाहेबांच्या बर्याच गुणांची छबी राज मध्ये तंतोतंत दिसतेय. बाळासाहेबांकडे पक्षाची भूमिका सामान्यांपर्यंत पोहोचवायला जसे मार्मिक आणि मग सामना ही पत्रे होती, तसं काहीतरी राजकडे असणं आवश्यक आहे. गुंडगिरी सोडून विधायक कामांवर राजने जास्त लक्ष दिलं तर एक चांगली लोकमान्यता त्याला नक्कीच मिळू शकेल.
जय हिंद, जय महाराष्ट्र!!
Saturday, January 26, 2008
आरोग्यंधनसंपदा..
मला आठवतय आकाशवाणीच्या मुंबई केद्रावर सकाळी बरोब्बर सात वाजता 'आरोग्यंधनसंपदा' हे शब्द आळवले जायचे आणि सुषमा हिप्पळगावकर कधी आजीचा बटवा सादर करायच्या तर कधी एखादे निष्णात डॊक्टर भेटीला घेऊन यायच्या. फक्त पाचच मिनिट असलेल्या कार्यक्रमाने घरातील सगळ्यांना वेड लावलं होतं ते सादरीकरण, जिव्हाळ्याचे आरोग्यविषयक सल्ले आणि विचार करायला लावणारे त्यातले मुद्दे यांमुळे. कित्येकदा रात्री सगळे एकत्र जेवताना आज 'आरोग्यं' मध्ये काय सांगितलं ह्यावर चर्चा घडत असे, तर हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे नुकतच अचानक हाती आलेलं डॊ. अभय बंग यांचं "माझा साक्षात्कारी हृदय रोग" हे पुस्तक.
मी बायपास सर्जरी म्हणजे काय हे कुटुंबातच अनुभवल्याने ह्या पुस्तकाविषयी उत्सुकता होतीच. लहाणपणापासून व्यायामाची आवड असली तरी सवड मिळायची नाही. पोहोणे, सायकल चालवणे ह्या गोष्टी त्यांची व्यायाम म्हणून उपयुक्तता कळण्या आधीच शिकल्या गेल्या, अंगवळणी पडल्या आणि मफतलाल बाथ मुळे, माझ्या सायकल मुळे माझं बालपण समृद्ध करून गेल्या. गिरगावातील ब्राह्मण सभेतील सोमण सर, सतीश सर, फेमस मधील राजू मास्तर, सदाशिव पेठेतील केळकर व्यायामशाळेतील मिलिंद सर ह्या सगळ्यांनी माझ्या मनात व्यायामाविषयी गोडी निर्माण केलीच पण मेहनत करून घेतली. घाम गाळण्यातून मिळणारा आनंद काय असतो त्याचा अनुभव यायला लागला तो त्यामुळेच. मी चेस्ट, आर्म्स, लेग्स असा संपूर्ण व्यायाम वेळापत्रकानुसार करू लागलो तरी त्यावेळी वेळेअभावी नियमितता नसायचीच, पण खूप काही शिकायला मिळालं त्या दिवसात. पुढे इथे आल्यावर बेली स्पोर्ट्स आणि २४ बाय ७ ह्या क्लब्सचाही उपयोग झाला. मग इथे पुस्तकं वाचून आणि इथल्या प्रशिक्षकांच्या मदतीने व्यायाम कसा करावा, तो करताना तुम्ही ठराविक ध्येय समोर ठेवणं किती आवश्यक आहे हे शिकवलं गेलं. तसच व्यायाम मोजावा कसा त्याची नोंद कशी ठेवावी ह्याची सुद्धा छान माहिती होत गेली. You can't manage, which you can't measure हे पक्क डोक्यात बसलं, डॊ अभय बंगांच हे पुस्तक वाचताना हे सगळं आठवलं आणि डोळ्यासमोर उभ राहीलं. व्यायाम करताना आपल्या कुठे चुका झाल्या आणि त्या कशा सुधारल्या हे ही आठवलं. शिकलेलं खूप काही पक्क झालं हे पुस्तक वाचून आणि अर्थात बरच नवीन काही कळलं सुद्धा.
एखादा शास्त्रद्न्य जसे प्रयोग करून आणि कुतुहलापोटी शास्त्रीय पद्धतीने तर्कशुद्ध माहिती साठवून निष्कर्ष काढेल तसं डॊ. अभय बंग यांनी त्यांना स्वतःला झालेल्या हृदयगोराबाबत केलं. मोठमोठ्या डॊक्टरांनाही ह्रुदयरोग झाल्याचे मी अनेकादा पाहिले आणि ऐकले होते. डॊक्टरीपेशातील व्यक्तीला हा रोग कसा काय फसवून बळी पाडू शकतो हे मला एक न उलगडलेले कोडे होते. डॊ. अभय बंगानी पुस्तकात त्याची समर्पक कारणमिमांसा दिली आहे. त्यांच सगळं लिखाण हे स्वानुभवातून असल्याने तसच वैद्यकीय क्षॆत्रातील त्यांच्या प्राविण्यामुळे पुस्तकातील सगळीच माहिती ही निःसंशय खात्रीदायक आहे. शारिरीक व्यायाम तसच कोलेस्टरॊलवरील नियंत्रणासाठी संतुलित आणि सुयोग्य आहार ह्याव्यतिरीक्त मनाच्या आरोग्याच्या अपरिहार्यतेचा त्यांनी छान उहापोह केला आहे. ध्यान, मनातील विचारांवर नियंत्रण असण्याची आवश्यकता, त्यासाठी केलेले प्रयत्न हे सगळं व्यवस्थित मांडलय. शेवटी पुस्तकात त्यांनी काही प्रश्नावल्या दिल्या आहेत जेणे करून तुमच्या राहाणीमानामुळे आणि आहाराच्या सवयींमुळे हृदयरोगाचा किती धोका आहे हे कळायला मदत होते. पुस्तक वाचताना ह्या रोगासंबंधीचे काही भ्रम निश्चितच दूर झाले. शिवाय भारतीयांमधे हे प्रमाण जास्त का आहे ह्याचा विचार करताना नकळतच आजूबाजूला heart attack ने अकाली आणि अचानक गेलेल्या माणसांची यादीच आठवायला लागली आणि मग कुठे काय चुकत असणार ह्याचा अंदाज यायला लागला. प्रत्येकाने किमान एकदा वाचावं असं हे पुस्तक. ह्यातील काही माहिती मी इथे लिहून ठेवणार आहे जेणेकरून संदर्भासाठी त्याचा कुणालाही उपयोग होऊ शकेल.
हृदयरोग नियंत्रणासाठी चांगल्या सवयी:
१. शाकाहार - आहारातील कोलेस्टरॊल शून्य ठेवणे. कच्च्या भाज्या म्हणजे सॆलड, फळे ह्यांवर भर. भरपूर पाणी पिणे आवश्यक. साय, लोणी, तूप, तेल स्निग्ध पदार्थांचा अत्यंत काळजीपूर्वक वापर. दूध सुद्धा लो फॆट वापरणे उत्तम. अमेरिकन हार्ट असोसिएशन च्या म्हणण्यानुसार V8 हे पेय तसेच ओटमीलच्या पदार्थांचा आहारात वापर उपयुक्त आहे.
२. धूम्रपान आणि अल्कोहोल पूर्णपणे वर्ज्य
३. शरीराला नियमित व्यायाम आणि योगासनांची सवय.
४. मानसिक ताणमुक्तीसाठी प्राणायाम, शवासन करणे, तसेच आशावादी मनोवृत्ती आणि आनंदी प्रवृत्तीची जाणीवपूर्वक जपणूक. आयुष्यातील विनाकारण स्पर्धात्मकता नष्टकरून संयमित आणि साध्या जीवनपद्धतीचा अवलंब.
५. आपल्या मनातील भावनांशी संपर्क साधणे व इतरांसोबत मोकळेपणाने संबंध जोडणे.
६. नियमित म्हणजे किमान दर सहा महिन्यातून एकदा संपूर्ण शारिरीक तपासणी आवश्यक आहे. मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा ह्या गोष्टी हृदयरोगाला निमंत्रण देणाया आहेत. रक्तातील साखर, रक्तदाब, वजन, कॊलेस्ट्रॊल, बीएमाय ह्या गोष्टींची लेखी नियमित नोंद असणे निरोगी आयुष्यासाठी अतिशय आवश्यक आहे.
नियमित व्यायाम का करावा?
१.उत्साह वाढतो, इच्छाशक्ती बळावते.
२.संरक्षक एच. डी. एल. वाढते. स्नायूंमधील ताण मुक्त होऊन हृदयास शुद्ध रक्त पुरवठा वाढतो.
३.अकाली मृत्युचं प्रमाण जवळपास निम्म होतं असं प्रयोगांनी सिद्ध झालय.
व्यायाम किती कराल आणि कोणता कराल?
१. प्रथम व्यायाम का करतो आहोत तो उद्देश ठरवा, म्हणजे चरबी कमी करण्यासाठी, फीटनेससाठी की स्टॆमिना वाढवण्यासाठी व्यायाम करायचा आहे हे नक्की असायला हवं. चरबी कमी करण्यासाठी चालण्याचा व्यायाम हा सगळ्यात सोप्पा, साधा, मूलभूत आणि बिनखर्चिक व्यायाम होय. व्यायाम जास्त दमछाक होईल असा करू नये. त्यासाठी हृदय गती मोजण्याची सोप्पी पद्धत खाली सांगितली आहे.
२. (२२०-तुमचे वय) ह्याच्या ६०% ते ६५% इतकी हृदयगती ठेवून चालल्यास चरबी जाळण्यास खूपच मदत होते. दमलो, घाम आला की खूप चरबी कमी होईल हा सगळ्यात मोठ्ठा गैरसमज आहे. तुम्ही जर चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करत असाल तर तुमची हृदयगती वर म्हटल्याप्रमाणे ६०% ते ६५% ह्या दरम्यान असावी, त्याहून अधिक हृदयगतीने व्यायाम केल्यास तुमचा स्टॆमिना वाढेल पण चरबी एक तसूभरही कमी होणार नाही. साधारण तिसाव्या वर्षी (२२०-३० = १९०) च्या ६० ते ६५% म्हणजे १२० ते १२५ च्या दरम्यान हृदयगती ठेवून चालावयास हवे. चालणे लयबद्ध असावे. ट्रेडमिलचा ह्यासाठी छान उपयोग होतो.
३. सुरुवातीस रोज किमान अर्धातास तरी चालावे आणि मग दर आठवड्याला १० मिनिटे वाढवून किमान ५० ते ६० मिनिटे सलग चालण्याचा सराव ठेवावा. आठवड्यातून किमान ५ ते ६ वेळा हा व्यायम ठेवावा.
४. रोज व्यायाम सुरु करण्यापुर्वी स्नायू ताणणे म्हणजे स्ट्रेचिंग आवश्यक आहे आणि शेवटी पोटातील स्नायू बळकट होण्यासाठी ऎब्स सुद्धा. तसच मनाच्या आरोग्यासाठी आणि श्वासावरील नियंत्रणासाठी योगासने करावीत.
आपलं आपल्या शरीरावर प्रेम असेल तर आपण त्याला रोज इतका वेळ नक्कीच द्यायला हवा, नाही का?
हृदयाची गती कशी मोजाल?
मनगटाच्या आतील बाजूस, हाताच्या सांध्याच्या साधारण दोन इंच खाली नाडी असते. तीची स्पंदन ऐकण्याची, जाणवण्याची सवय करा. मन शांत ठेवून ती ऐका. दहा सेकंदाला तिचे किती ठोके होत आहेत ते मोजून त्यास सहा ने गुणले तर जे उत्तर येईल ती तुमच्या हृदयाची गती. आहे की नाही सोप्पं!
मी फीट आहे का?
१. वेस्ट हीप गुणोत्तर म्हणजे कंबरेचा घेर / हीप्स्चा घेर
हे गुणोत्तर ०.८५ पेक्षा कमी असणं अतिशय आवश्यक आहे. थोडक्यात पोटाचा घेर कमी करायलाचं हवा. पोटावरची चरबी हटवायलाच हवी. आहारात बदल आणि नियमित व्यायामाने हे सहजसाध्य आहे.
२. बॊडी मास इंडेक्स (BMI) = किलोग्रॆम मध्ये वजन / मीटरमधील उंचीचा वर्ग
पूर्वी हा पुरुषांना २५ व स्त्रीयांना २८ सुरक्षित समजला जायचा पण ते खर नाहीये असं डॊ. अभय बंग सांगतात. तो पुरुषांनी २१ च्या आसपास ठेवणं जास्त हितावह आणि सुरक्षित आहे.
३. कॊलेस्ट्रॊलचे दोन भाग आहेत एल. डी. एल हा धोकादायक असतो आणि दुसरा एच. डी. एल हा संरक्षक असतो. पूर्वी डॊक्टरांचं म्हणणं असायचं की कॊलेस्ट्रॊल २४४ पेक्षा कमी असावं पण डॊ. अभय बंगाच्या मते ते १५० पेक्षा खाली असायला हवं तसच कॊलेस्ट्रॊल/ एच. डी. एल हे गुणोत्तर ३ च्या जवळपास असायला हवं.
नवीन सुरुवात करणार असाल तर सुरुवातीला थोडं जड जाईलही पण चिकाटी असेल तर अशक्य काहीच नाही. जिभेवर नियंत्रण आणि शरीराला वळण लावल्याचं जे मानसिक आणि अर्थातच दीर्घकालीन शारिरीक समाधान मिळतं तेच खर शरीरस्वास्थ्य!!
उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!
मी बायपास सर्जरी म्हणजे काय हे कुटुंबातच अनुभवल्याने ह्या पुस्तकाविषयी उत्सुकता होतीच. लहाणपणापासून व्यायामाची आवड असली तरी सवड मिळायची नाही. पोहोणे, सायकल चालवणे ह्या गोष्टी त्यांची व्यायाम म्हणून उपयुक्तता कळण्या आधीच शिकल्या गेल्या, अंगवळणी पडल्या आणि मफतलाल बाथ मुळे, माझ्या सायकल मुळे माझं बालपण समृद्ध करून गेल्या. गिरगावातील ब्राह्मण सभेतील सोमण सर, सतीश सर, फेमस मधील राजू मास्तर, सदाशिव पेठेतील केळकर व्यायामशाळेतील मिलिंद सर ह्या सगळ्यांनी माझ्या मनात व्यायामाविषयी गोडी निर्माण केलीच पण मेहनत करून घेतली. घाम गाळण्यातून मिळणारा आनंद काय असतो त्याचा अनुभव यायला लागला तो त्यामुळेच. मी चेस्ट, आर्म्स, लेग्स असा संपूर्ण व्यायाम वेळापत्रकानुसार करू लागलो तरी त्यावेळी वेळेअभावी नियमितता नसायचीच, पण खूप काही शिकायला मिळालं त्या दिवसात. पुढे इथे आल्यावर बेली स्पोर्ट्स आणि २४ बाय ७ ह्या क्लब्सचाही उपयोग झाला. मग इथे पुस्तकं वाचून आणि इथल्या प्रशिक्षकांच्या मदतीने व्यायाम कसा करावा, तो करताना तुम्ही ठराविक ध्येय समोर ठेवणं किती आवश्यक आहे हे शिकवलं गेलं. तसच व्यायाम मोजावा कसा त्याची नोंद कशी ठेवावी ह्याची सुद्धा छान माहिती होत गेली. You can't manage, which you can't measure हे पक्क डोक्यात बसलं, डॊ अभय बंगांच हे पुस्तक वाचताना हे सगळं आठवलं आणि डोळ्यासमोर उभ राहीलं. व्यायाम करताना आपल्या कुठे चुका झाल्या आणि त्या कशा सुधारल्या हे ही आठवलं. शिकलेलं खूप काही पक्क झालं हे पुस्तक वाचून आणि अर्थात बरच नवीन काही कळलं सुद्धा.
एखादा शास्त्रद्न्य जसे प्रयोग करून आणि कुतुहलापोटी शास्त्रीय पद्धतीने तर्कशुद्ध माहिती साठवून निष्कर्ष काढेल तसं डॊ. अभय बंग यांनी त्यांना स्वतःला झालेल्या हृदयगोराबाबत केलं. मोठमोठ्या डॊक्टरांनाही ह्रुदयरोग झाल्याचे मी अनेकादा पाहिले आणि ऐकले होते. डॊक्टरीपेशातील व्यक्तीला हा रोग कसा काय फसवून बळी पाडू शकतो हे मला एक न उलगडलेले कोडे होते. डॊ. अभय बंगानी पुस्तकात त्याची समर्पक कारणमिमांसा दिली आहे. त्यांच सगळं लिखाण हे स्वानुभवातून असल्याने तसच वैद्यकीय क्षॆत्रातील त्यांच्या प्राविण्यामुळे पुस्तकातील सगळीच माहिती ही निःसंशय खात्रीदायक आहे. शारिरीक व्यायाम तसच कोलेस्टरॊलवरील नियंत्रणासाठी संतुलित आणि सुयोग्य आहार ह्याव्यतिरीक्त मनाच्या आरोग्याच्या अपरिहार्यतेचा त्यांनी छान उहापोह केला आहे. ध्यान, मनातील विचारांवर नियंत्रण असण्याची आवश्यकता, त्यासाठी केलेले प्रयत्न हे सगळं व्यवस्थित मांडलय. शेवटी पुस्तकात त्यांनी काही प्रश्नावल्या दिल्या आहेत जेणे करून तुमच्या राहाणीमानामुळे आणि आहाराच्या सवयींमुळे हृदयरोगाचा किती धोका आहे हे कळायला मदत होते. पुस्तक वाचताना ह्या रोगासंबंधीचे काही भ्रम निश्चितच दूर झाले. शिवाय भारतीयांमधे हे प्रमाण जास्त का आहे ह्याचा विचार करताना नकळतच आजूबाजूला heart attack ने अकाली आणि अचानक गेलेल्या माणसांची यादीच आठवायला लागली आणि मग कुठे काय चुकत असणार ह्याचा अंदाज यायला लागला. प्रत्येकाने किमान एकदा वाचावं असं हे पुस्तक. ह्यातील काही माहिती मी इथे लिहून ठेवणार आहे जेणेकरून संदर्भासाठी त्याचा कुणालाही उपयोग होऊ शकेल.
हृदयरोग नियंत्रणासाठी चांगल्या सवयी:
१. शाकाहार - आहारातील कोलेस्टरॊल शून्य ठेवणे. कच्च्या भाज्या म्हणजे सॆलड, फळे ह्यांवर भर. भरपूर पाणी पिणे आवश्यक. साय, लोणी, तूप, तेल स्निग्ध पदार्थांचा अत्यंत काळजीपूर्वक वापर. दूध सुद्धा लो फॆट वापरणे उत्तम. अमेरिकन हार्ट असोसिएशन च्या म्हणण्यानुसार V8 हे पेय तसेच ओटमीलच्या पदार्थांचा आहारात वापर उपयुक्त आहे.
२. धूम्रपान आणि अल्कोहोल पूर्णपणे वर्ज्य
३. शरीराला नियमित व्यायाम आणि योगासनांची सवय.
४. मानसिक ताणमुक्तीसाठी प्राणायाम, शवासन करणे, तसेच आशावादी मनोवृत्ती आणि आनंदी प्रवृत्तीची जाणीवपूर्वक जपणूक. आयुष्यातील विनाकारण स्पर्धात्मकता नष्टकरून संयमित आणि साध्या जीवनपद्धतीचा अवलंब.
५. आपल्या मनातील भावनांशी संपर्क साधणे व इतरांसोबत मोकळेपणाने संबंध जोडणे.
६. नियमित म्हणजे किमान दर सहा महिन्यातून एकदा संपूर्ण शारिरीक तपासणी आवश्यक आहे. मधुमेह, रक्तदाब, लठ्ठपणा ह्या गोष्टी हृदयरोगाला निमंत्रण देणाया आहेत. रक्तातील साखर, रक्तदाब, वजन, कॊलेस्ट्रॊल, बीएमाय ह्या गोष्टींची लेखी नियमित नोंद असणे निरोगी आयुष्यासाठी अतिशय आवश्यक आहे.
नियमित व्यायाम का करावा?
१.उत्साह वाढतो, इच्छाशक्ती बळावते.
२.संरक्षक एच. डी. एल. वाढते. स्नायूंमधील ताण मुक्त होऊन हृदयास शुद्ध रक्त पुरवठा वाढतो.
३.अकाली मृत्युचं प्रमाण जवळपास निम्म होतं असं प्रयोगांनी सिद्ध झालय.
व्यायाम किती कराल आणि कोणता कराल?
१. प्रथम व्यायाम का करतो आहोत तो उद्देश ठरवा, म्हणजे चरबी कमी करण्यासाठी, फीटनेससाठी की स्टॆमिना वाढवण्यासाठी व्यायाम करायचा आहे हे नक्की असायला हवं. चरबी कमी करण्यासाठी चालण्याचा व्यायाम हा सगळ्यात सोप्पा, साधा, मूलभूत आणि बिनखर्चिक व्यायाम होय. व्यायाम जास्त दमछाक होईल असा करू नये. त्यासाठी हृदय गती मोजण्याची सोप्पी पद्धत खाली सांगितली आहे.
२. (२२०-तुमचे वय) ह्याच्या ६०% ते ६५% इतकी हृदयगती ठेवून चालल्यास चरबी जाळण्यास खूपच मदत होते. दमलो, घाम आला की खूप चरबी कमी होईल हा सगळ्यात मोठ्ठा गैरसमज आहे. तुम्ही जर चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करत असाल तर तुमची हृदयगती वर म्हटल्याप्रमाणे ६०% ते ६५% ह्या दरम्यान असावी, त्याहून अधिक हृदयगतीने व्यायाम केल्यास तुमचा स्टॆमिना वाढेल पण चरबी एक तसूभरही कमी होणार नाही. साधारण तिसाव्या वर्षी (२२०-३० = १९०) च्या ६० ते ६५% म्हणजे १२० ते १२५ च्या दरम्यान हृदयगती ठेवून चालावयास हवे. चालणे लयबद्ध असावे. ट्रेडमिलचा ह्यासाठी छान उपयोग होतो.
३. सुरुवातीस रोज किमान अर्धातास तरी चालावे आणि मग दर आठवड्याला १० मिनिटे वाढवून किमान ५० ते ६० मिनिटे सलग चालण्याचा सराव ठेवावा. आठवड्यातून किमान ५ ते ६ वेळा हा व्यायम ठेवावा.
४. रोज व्यायाम सुरु करण्यापुर्वी स्नायू ताणणे म्हणजे स्ट्रेचिंग आवश्यक आहे आणि शेवटी पोटातील स्नायू बळकट होण्यासाठी ऎब्स सुद्धा. तसच मनाच्या आरोग्यासाठी आणि श्वासावरील नियंत्रणासाठी योगासने करावीत.
आपलं आपल्या शरीरावर प्रेम असेल तर आपण त्याला रोज इतका वेळ नक्कीच द्यायला हवा, नाही का?
हृदयाची गती कशी मोजाल?
मनगटाच्या आतील बाजूस, हाताच्या सांध्याच्या साधारण दोन इंच खाली नाडी असते. तीची स्पंदन ऐकण्याची, जाणवण्याची सवय करा. मन शांत ठेवून ती ऐका. दहा सेकंदाला तिचे किती ठोके होत आहेत ते मोजून त्यास सहा ने गुणले तर जे उत्तर येईल ती तुमच्या हृदयाची गती. आहे की नाही सोप्पं!
मी फीट आहे का?
१. वेस्ट हीप गुणोत्तर म्हणजे कंबरेचा घेर / हीप्स्चा घेर
हे गुणोत्तर ०.८५ पेक्षा कमी असणं अतिशय आवश्यक आहे. थोडक्यात पोटाचा घेर कमी करायलाचं हवा. पोटावरची चरबी हटवायलाच हवी. आहारात बदल आणि नियमित व्यायामाने हे सहजसाध्य आहे.
२. बॊडी मास इंडेक्स (BMI) = किलोग्रॆम मध्ये वजन / मीटरमधील उंचीचा वर्ग
पूर्वी हा पुरुषांना २५ व स्त्रीयांना २८ सुरक्षित समजला जायचा पण ते खर नाहीये असं डॊ. अभय बंग सांगतात. तो पुरुषांनी २१ च्या आसपास ठेवणं जास्त हितावह आणि सुरक्षित आहे.
३. कॊलेस्ट्रॊलचे दोन भाग आहेत एल. डी. एल हा धोकादायक असतो आणि दुसरा एच. डी. एल हा संरक्षक असतो. पूर्वी डॊक्टरांचं म्हणणं असायचं की कॊलेस्ट्रॊल २४४ पेक्षा कमी असावं पण डॊ. अभय बंगाच्या मते ते १५० पेक्षा खाली असायला हवं तसच कॊलेस्ट्रॊल/ एच. डी. एल हे गुणोत्तर ३ च्या जवळपास असायला हवं.
नवीन सुरुवात करणार असाल तर सुरुवातीला थोडं जड जाईलही पण चिकाटी असेल तर अशक्य काहीच नाही. जिभेवर नियंत्रण आणि शरीराला वळण लावल्याचं जे मानसिक आणि अर्थातच दीर्घकालीन शारिरीक समाधान मिळतं तेच खर शरीरस्वास्थ्य!!
उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!
Sunday, December 30, 2007
For here or to go?
कालचक्र हे अविरत फिरे
कुणाचे कुणावाचूनी अडे
काळ चालला पुढे
पहा हा काळ चालला पुढे..
चालल्या वर्षातील कडू गोड आठवणींसह येत्या वर्षाला उत्साहाने सामोरे जाऊया! जो जे वांच्छील तो ते लाहो अशी वैश्विक प्रार्थना करत २००८ चे जोरदार स्वागत करुया. आता ह्या ब्लॊगला एक वर्ष पूर्ण होतय. मनात असलेलं खूप काही लिहायला जमलं नाही ह्याची थोडी खंत वाटली तरी अनियमितपणे का होईना, हा उपक्रम चालू ठेवू शकलो ह्यात ह्या क्षणी समाधान आहे! लोक वाचतील, त्यातून प्रतिकीया मिळतील, हुरुप येईल म्हणून लिहीणं हा काही माझा पिंड नाही. स्वान्त सुखाय लिहीण्यारातले आम्ही, शिवाय जे जे आपणासी ठावे ते ते दुसयासी द्यावे ह्या हेतूने चार शब्द लिहायला आवडतात इतकंच. त्यातच मला खूप समाधान मिळतय आणि ते बयाच अंशी साध्य झालय हे सुद्धा जाणवू लागलय.
नुकताच उत्तर अमेरिकेच्या पूर्व दक्षिणी किनायावर भटकून आलो. प्रत्यक्ष तिथे नाही तरी विमान प्रवासात छान वेळ मिळाला. असे लांब विमान प्रवास मला आवडतात ते ह्या कारणासाठी. स्वतःसाठी छान वेळ मिळू शकतो आणि तो मला गाण्यांसाठी, वाचनासाठी राखून ठेवता येतो. भारतातून येताना ह्यावेळी बरीच पुस्तक आणली आहेत, त्यातलं अपर्णा वेलणकरांचं "फॊर हिअर ऒर टू गो?" हे पुस्तक बरेच दिवस वाचायचं मनात होतं, ते वाचून काढलं. मनापासून आवडलं. त्याबद्दल आज लिहीणार आहे थोडंसं.
पुस्तकाचे नाव: फॊर हिअर ऒर टू गो?
लेखिका: अपर्णा वेलणकर
प्रकाशक: मेहता पब्लिकेशन
कोणतही पुस्तक वाचण्या आधी मी ते चाळतो. पुस्तकाचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ (अगदी दिवाळी अंक असेल तर त्यावरील सुहासिनीच्या चित्रासह :-) ) बघतो. पुस्तकाची प्रस्तावना बघतो, तसच शेवटी एखाद्या सूचीतून इतर पुस्तकांचे संदर्भ दिले आहेत का ते बघतो. ह्या सगळ्यांतून एक आकृती बंध तयार होतो मनात, पुस्तक सुरु करण्या आधी. लेखकाने किती मेहनत घेतलेय, किती सचोटीने लिहिलय ह्याचा थोडा अंदाज सुरुवातीला बांधता येतो. ह्या सगळ्या निकषांवर अपर्णा वेलणकरांचं हे पहिलं पुस्तक मला कसोटीला उतरल्याचं वाटलं. मुखपृष्ठावर अमेरिकन पारपत्राचं चित्र असून, nationality - Unitest states of America आणि place of birth - India हे ठळक अक्षरात दिसतं, ह्यावरुनच आत कशाचा उहापोह केला आहे ह्याची पूर्ण कल्पना येते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर पुस्तकाच्या विषयाची थोडक्यात ओळख करून दिलेय. शिवाय For here or to go? हे रोजच्या अमेरिकन व्यवहारातील वाक्य, शिर्षक म्हणुन चपखल बसलं आहे. अमेरिकेत येणाया माझ्यासारख्या अनेक अनिवासी भारतीयांपुढे आपोआप येणारा प्रश्न, इथेच बसून आस्वाद घेणार की इथले सोबत घेऊन तिकडे परत जाणार? जणू काही अमेरीकन स्वातंत्र्य देवता प्रत्येक आश्रितास अपरिहार्य प्रश्न विचारत आहे "For here or to go?" आणि "ज्याचा त्याचा प्रश्न" ह्या पठडीतल्यासारखं अगदी व्यक्तीसापेक्ष उत्तर!!
चाळीस एक वर्षे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या दिलिप चित्रे यांनी पुस्तकाची प्रस्तावना अतिशय समयोचित आणि समर्पक केली आहे. एकूण विषयाचे स्वरूप हळू हळू उलगडत असताना लेखिकेने घेतलेली मेहनत त्यांनी स्पष्ट केली आहे. अमेरिकेत राहाणाया, इकडलं जग अनुभवलेल्या व्यक्तीची प्रस्तावना असणं का आवश्यक आहे हे वाचताक्षणीच जाणवतं.
पुस्तकाविषयी लिहिण्यापूर्वी थोडं लेखिकेविषयी. अपर्णा ही व्यावसायिक पत्रकारीतेमधली. एका अमेरीका दौयात विजय तेंडुलकरांशी बोलताना तिने इथल्या अमेरिकन बोर्न मराठी मुलांविषयी अभ्यासण्यात आणि लिहीण्यात रस असल्याचे सांगताच, तेंडुलकरांनी तिला त्या आधी त्या मुलांच्या आईवडिलांच्या पिढीला समजाऊन घेण्यास सुचवले. अर्थात हा विषाय खूपसा नाजूक, कौटुंबिक असल्याने त्याविषयी पूर्ण अमेरिकेत फिरून लोकांच्या भेटी घेउन, त्यांना बोलतं करणं, सगळं मुद्देसूद लिहून काढणं, विषयानुरुप संदर्भ वेचणं, ते योग्य ठिकाणी उद्धृत करणं आणि हे सगळं करताना ते त्रयस्थ दृष्टीतून अभ्यासणं हे सगळं अपर्णाने छान पेलवलय ह्यात वाद नाही. ह्यातून तिची अभ्यासू, चिकाटी वृत्ती आणि कठोर परिश्रमच दिसून येतात.
साधारण पन्नास वर्षांपूर्वी काही धडाडीच्या तरुणांनी चाकोरी बाहेर विचार करून तसच देशद्रोहाचा शिक्का माथी मारुन घेउन अमेरीकाला येण्याचे धाडस केले. काही जणांचे परतीचे दोर कापले गेले होते म्हणून तर काही जण ह्याच परतीच्या दोरांच्या घट्ट बळावर अमेरिकेत येउन थडकले. सगळेच x = x + 1 syndrome चे बळी, आज जाऊ उद्या जाऊ म्हणत इथेच रेंगाळलेले किंवा अपरिहार्यपणे इथे राहिलेले. प्रचंड मेहनतीची तयारी, हुशारी आणि चिकाटीच्या जोरावर बयाच जणांनी व्यावसायिक यश अनुभवले, कुटुंबाची सांपत्तिक स्थिती अमेरिकेत आणि भारतातही कमालीच्या वेगात सुधरवली. त्यांच्या आयुष्यातील यशाप्रमाणेच संघर्षाचे उत्तम टिपण अपर्णाने केले आहे. ह्यापूर्वी अनेक लेखकांनी परदेश वाया केल्या पण बहुतेकांच्या मनात अमेरीका म्हणजे व्यभिचार, हव्यास हे पूर्वग्रह इतके दूषित होते की त्यापुढे त्यांना इथला मराठी माणूस आणि त्यांची मुले ही ह्याच पठडीत मोडतात असे वाटू लागले. सहाजिकच त्यांच्या साहित्यातून इथल्या मराठी पिढीविषयी असे रगेल आणि रंगेल चित्र रेखाटले गेले. ह्याचा परिणाम म्हणजे भारतातील मराठी माणूस आणि अमेरिकेतील मराठी माणूस ह्यांत एक दरी निर्माण झाली. चुकीच्या गोष्टींवर जरूर समिक्षा करावी पण आंधळेपणामुळे खोटे लिहिण्यापूर्वी विषयाचा सर्वांगीण अभ्यास करावा, इथल्या मराठी माणसास समजून घ्यावे असे कुठल्याही साहित्यिकास विशेष जमले नाही. अमेरीकेत रहाणायांचा दुस्वास म्हणून असो किंवा भारतातल्या संस्कृतीचा पोकळ अभिमान असो त्यामुळेच बहुधा असे घडले असावे. अपर्णाने ह्या सायाचा छान परामर्ष घेतला आहे.
उत्तर अमेरिकेतल्या ह्या पिढीचे व्यावसायिक यश मिळवत असताना कौटुंबिक पातळीवर होणारे झगडे वाचताना मन अचंबित होते. Internet युगा पूर्वीची अमेरिका किती दुष्कर असू शकेल ह्याची प्रचिती येते. कामातील अस्थिरता, कधी अनुभवास येणारा परकेपणा, त्यातून नोकरीत झालेले अन्याय, परिस्थिती हवामानशी जुळवणूक, माहेरवाशिणींची उलघाल, पुढच्या पिढीचा जन्म, त्यांच्यावरचे संस्कार, तिकडे मागच्या पिढीची काळजी, घराचं गाडीच mortgage, जागतिक मंदी ह्या सगळ्या आघाड्यांवर चिवटपणे झुंजणाया ह्या पिढीविषयी खूप कृतद्न्य वाटून जातं. त्यामानाने माझ्या सारख्या पाहुण्यांना अगदी red carpet मिळालं इथे यायला असं म्हणायला हरकत नाही. शिवाय इथे मराठीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, नवीन पिढीस मराठीची आवड निर्माण व्हावी म्हणून जे उपक्रम चालू केले आहेत त्यांना तोड नाही. न्यू जर्सी मधली आंबेकरांची मराठी शाळा तसेच महाराष्ट्र मंडळे त्यांची अधिवेशने, सम्मेलने, एकता त्रैमासिक, महाराष्ट्र फाउंडेशन ह्यांसारखे उपक्रम ह्यातून देशांच्या सीमा ओलांडून सामाजिक बांधिलकी जपण्याचे, वाढवण्याचे प्रयत्न पाहिले की मन थक्क होतं.
अमेरीकन असणं म्हणजे नेमकं काय आणि भारतीय असणं म्हणजे नेमकं काय ह्या नेहमी पडणाया प्रश्नावरील वाचनीय उत्तरे अपर्णाने ओघात नोंदवली आहेत. ह्याविषयी पुढच्या पिढीत असणारी विचारांची स्पष्टता केवळ सुखावह आहे. We are americans with our deep routes in India असं निर्भिडपणे सांगतना दोन्ही कडील चांगले ते भक्कम पकडल्याचे जाणवते. भारतातील संस्कृती आणि अमेरीकेची सिस्टीम ह्या दोहोंचा मिलाफ मागच्या पिढीने पुढे समर्थपणे दिल्याचे जाणवते. सतत नविन अधिक चांगलं करण्याची अमेरीकन सिस्टीमची प्रेरणा, संशोधनास कर्तुत्वास वाव, दिलेला मोकळेपणा, जात धर्म वंश रंग न मानता दिलेली समान संधी, going that extra one mile ह्यातली तडफ, पारदर्शी चुरस, दुसर्याची रेघ पुसून न टाकता आपली रेघ मोठी करण्यात आणि असण्यात आनंद मानण्याची अमेरिकन वृत्ती हे सगळं इथे अमेरीकेतच अनुभवायला मिळू शकतं म्हणून आज अमेरिका देश पहिल्या क्रमांकावर आहे आणि जगभरातील माणसांची अमेरीकन दुतावासांपुढे रीघ लागतेय.
हे पुस्तक तयार करताना लेखिकेने त्यास दिलेला वेळ पुरेपूर जाणवतो. तसेच अमेरीकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या मराठी मुलांची मानसिकता शोधण्याचा छोटा प्रयत्नही सॊनीयाद्वारे अपर्णाने केला आहे. एकंदर हे पुस्तक म्हणजे अनेक यशपयशांच्या अनुभवांचा ठेवा आहे.
एकच थोडीशी खटकलेली तांत्रिक गोष्ट अशी की हे पुस्तक वाचताना ते अनेक स्वतंत्र ललित लेखांचा संग्रह असल्यासारखे वाटते. त्यामुळे बरेच मुद्दे आणि संदर्भ पुन्हा पुन्हा येत रहातात.
अनिवासी महाराष्ट्रीयन मराठी ह्या विषयाचा अभ्यास करणाया आणि अमेरिकेची वाट चोखाळणाया अनेकांना ह्या पुस्तकाचा संदर्भ म्हणून उपयोग होऊ शकेल. एक चांगला आणि महत्वाचा विषय हाताळून वाचकांस वाचनीय आणि चिंतनीय खुराक दिल्याबद्दल अपर्णाचे आभारच मानायला हवेत. हा विषय महत्त्वाचा अशासाठी की तिकडे महाराष्ट्रात मराठीविषयी पालकांमध्ये आणि त्यान्वये पाल्यांमधील उदासीनता पाहून अमेरीकेतच मराठी जास्त टिकेल काय असे वाटू लागले आहे. त्याचाही थोडासा परामर्ष अपर्णाने शेवटी घेतला आहे.
मागे माननीय मुख्यमंत्र्यांनी बृहन महाराष्ट्र मंडळाला मुख्यमंत्री निधीतून पन्नस लाख रुपयांची देणगी (ते ही फक्त ह्यावेळेस नाही तर दर अधिवेशनाला) जाहीर केली. तिकडे महाराष्ट्रात वीज टंचाई, पाणी, शेतकर्यांच्या आत्महत्या इतके ज्वलंत प्रश्न असून तिथे पैसे खर्च करण्याची गरज असताना इथे दान देण्याची गरज काय हे कोडे आहे. इथला मराठी माणूस आर्थिक दृष्ट्या सशक्त आहे उलट महाराष्ट्र फाऊंडेशन सारख्या अनेक संस्था कोट्यावधी रुपयांची आर्थिक तसेच श्रमिक मदत करताना दिसतात. ह्याउलट चलाख मोदी सरकारने अनिवासी गुजराथी लोकांकडून बरेच पैसे वळवून गुजराथकडे पैशांची गंगाजळी निर्माण केली आहे. ह्याला म्हणतात दूरदर्शीपणा आणि समाजाभिमुखता (निदान दाखवण्यासाठीतरी)!
असो, तर तुम्ही अमेरीकेतले अनिवासी मराठी असाल किंवा निवासी महाराष्ट्रीय सगळीकडून मराठीचा, महाराष्ट्राचा (पर्यायाने भारताचा) विचार आणि उत्कर्ष होताना प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य दिसते..
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.. !!
-------------------------------------------------------------------------------------
सद्ध्या to read list वरची आणखी काही पुस्तके --
पुस्तकाचे नाव: खरेखुरे आयडॊल
लेखक: सुहास कुलकर्णी
प्रकशाक: समकालीन (युनिक फीचर्स)
पुस्तकाचे नाव: खरी खुरी टीम इंडीया
लेखक: सुहास कुलकर्णी
प्रकशाक: समकालीन (युनिक फीचर्स)
कुणाचे कुणावाचूनी अडे
काळ चालला पुढे
पहा हा काळ चालला पुढे..
चालल्या वर्षातील कडू गोड आठवणींसह येत्या वर्षाला उत्साहाने सामोरे जाऊया! जो जे वांच्छील तो ते लाहो अशी वैश्विक प्रार्थना करत २००८ चे जोरदार स्वागत करुया. आता ह्या ब्लॊगला एक वर्ष पूर्ण होतय. मनात असलेलं खूप काही लिहायला जमलं नाही ह्याची थोडी खंत वाटली तरी अनियमितपणे का होईना, हा उपक्रम चालू ठेवू शकलो ह्यात ह्या क्षणी समाधान आहे! लोक वाचतील, त्यातून प्रतिकीया मिळतील, हुरुप येईल म्हणून लिहीणं हा काही माझा पिंड नाही. स्वान्त सुखाय लिहीण्यारातले आम्ही, शिवाय जे जे आपणासी ठावे ते ते दुसयासी द्यावे ह्या हेतूने चार शब्द लिहायला आवडतात इतकंच. त्यातच मला खूप समाधान मिळतय आणि ते बयाच अंशी साध्य झालय हे सुद्धा जाणवू लागलय.
नुकताच उत्तर अमेरिकेच्या पूर्व दक्षिणी किनायावर भटकून आलो. प्रत्यक्ष तिथे नाही तरी विमान प्रवासात छान वेळ मिळाला. असे लांब विमान प्रवास मला आवडतात ते ह्या कारणासाठी. स्वतःसाठी छान वेळ मिळू शकतो आणि तो मला गाण्यांसाठी, वाचनासाठी राखून ठेवता येतो. भारतातून येताना ह्यावेळी बरीच पुस्तक आणली आहेत, त्यातलं अपर्णा वेलणकरांचं "फॊर हिअर ऒर टू गो?" हे पुस्तक बरेच दिवस वाचायचं मनात होतं, ते वाचून काढलं. मनापासून आवडलं. त्याबद्दल आज लिहीणार आहे थोडंसं.
पुस्तकाचे नाव: फॊर हिअर ऒर टू गो?
लेखिका: अपर्णा वेलणकर
प्रकाशक: मेहता पब्लिकेशन
कोणतही पुस्तक वाचण्या आधी मी ते चाळतो. पुस्तकाचे मुखपृष्ठ, मलपृष्ठ (अगदी दिवाळी अंक असेल तर त्यावरील सुहासिनीच्या चित्रासह :-) ) बघतो. पुस्तकाची प्रस्तावना बघतो, तसच शेवटी एखाद्या सूचीतून इतर पुस्तकांचे संदर्भ दिले आहेत का ते बघतो. ह्या सगळ्यांतून एक आकृती बंध तयार होतो मनात, पुस्तक सुरु करण्या आधी. लेखकाने किती मेहनत घेतलेय, किती सचोटीने लिहिलय ह्याचा थोडा अंदाज सुरुवातीला बांधता येतो. ह्या सगळ्या निकषांवर अपर्णा वेलणकरांचं हे पहिलं पुस्तक मला कसोटीला उतरल्याचं वाटलं. मुखपृष्ठावर अमेरिकन पारपत्राचं चित्र असून, nationality - Unitest states of America आणि place of birth - India हे ठळक अक्षरात दिसतं, ह्यावरुनच आत कशाचा उहापोह केला आहे ह्याची पूर्ण कल्पना येते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर पुस्तकाच्या विषयाची थोडक्यात ओळख करून दिलेय. शिवाय For here or to go? हे रोजच्या अमेरिकन व्यवहारातील वाक्य, शिर्षक म्हणुन चपखल बसलं आहे. अमेरिकेत येणाया माझ्यासारख्या अनेक अनिवासी भारतीयांपुढे आपोआप येणारा प्रश्न, इथेच बसून आस्वाद घेणार की इथले सोबत घेऊन तिकडे परत जाणार? जणू काही अमेरीकन स्वातंत्र्य देवता प्रत्येक आश्रितास अपरिहार्य प्रश्न विचारत आहे "For here or to go?" आणि "ज्याचा त्याचा प्रश्न" ह्या पठडीतल्यासारखं अगदी व्यक्तीसापेक्ष उत्तर!!
चाळीस एक वर्षे अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या दिलिप चित्रे यांनी पुस्तकाची प्रस्तावना अतिशय समयोचित आणि समर्पक केली आहे. एकूण विषयाचे स्वरूप हळू हळू उलगडत असताना लेखिकेने घेतलेली मेहनत त्यांनी स्पष्ट केली आहे. अमेरिकेत राहाणाया, इकडलं जग अनुभवलेल्या व्यक्तीची प्रस्तावना असणं का आवश्यक आहे हे वाचताक्षणीच जाणवतं.
पुस्तकाविषयी लिहिण्यापूर्वी थोडं लेखिकेविषयी. अपर्णा ही व्यावसायिक पत्रकारीतेमधली. एका अमेरीका दौयात विजय तेंडुलकरांशी बोलताना तिने इथल्या अमेरिकन बोर्न मराठी मुलांविषयी अभ्यासण्यात आणि लिहीण्यात रस असल्याचे सांगताच, तेंडुलकरांनी तिला त्या आधी त्या मुलांच्या आईवडिलांच्या पिढीला समजाऊन घेण्यास सुचवले. अर्थात हा विषाय खूपसा नाजूक, कौटुंबिक असल्याने त्याविषयी पूर्ण अमेरिकेत फिरून लोकांच्या भेटी घेउन, त्यांना बोलतं करणं, सगळं मुद्देसूद लिहून काढणं, विषयानुरुप संदर्भ वेचणं, ते योग्य ठिकाणी उद्धृत करणं आणि हे सगळं करताना ते त्रयस्थ दृष्टीतून अभ्यासणं हे सगळं अपर्णाने छान पेलवलय ह्यात वाद नाही. ह्यातून तिची अभ्यासू, चिकाटी वृत्ती आणि कठोर परिश्रमच दिसून येतात.
साधारण पन्नास वर्षांपूर्वी काही धडाडीच्या तरुणांनी चाकोरी बाहेर विचार करून तसच देशद्रोहाचा शिक्का माथी मारुन घेउन अमेरीकाला येण्याचे धाडस केले. काही जणांचे परतीचे दोर कापले गेले होते म्हणून तर काही जण ह्याच परतीच्या दोरांच्या घट्ट बळावर अमेरिकेत येउन थडकले. सगळेच x = x + 1 syndrome चे बळी, आज जाऊ उद्या जाऊ म्हणत इथेच रेंगाळलेले किंवा अपरिहार्यपणे इथे राहिलेले. प्रचंड मेहनतीची तयारी, हुशारी आणि चिकाटीच्या जोरावर बयाच जणांनी व्यावसायिक यश अनुभवले, कुटुंबाची सांपत्तिक स्थिती अमेरिकेत आणि भारतातही कमालीच्या वेगात सुधरवली. त्यांच्या आयुष्यातील यशाप्रमाणेच संघर्षाचे उत्तम टिपण अपर्णाने केले आहे. ह्यापूर्वी अनेक लेखकांनी परदेश वाया केल्या पण बहुतेकांच्या मनात अमेरीका म्हणजे व्यभिचार, हव्यास हे पूर्वग्रह इतके दूषित होते की त्यापुढे त्यांना इथला मराठी माणूस आणि त्यांची मुले ही ह्याच पठडीत मोडतात असे वाटू लागले. सहाजिकच त्यांच्या साहित्यातून इथल्या मराठी पिढीविषयी असे रगेल आणि रंगेल चित्र रेखाटले गेले. ह्याचा परिणाम म्हणजे भारतातील मराठी माणूस आणि अमेरिकेतील मराठी माणूस ह्यांत एक दरी निर्माण झाली. चुकीच्या गोष्टींवर जरूर समिक्षा करावी पण आंधळेपणामुळे खोटे लिहिण्यापूर्वी विषयाचा सर्वांगीण अभ्यास करावा, इथल्या मराठी माणसास समजून घ्यावे असे कुठल्याही साहित्यिकास विशेष जमले नाही. अमेरीकेत रहाणायांचा दुस्वास म्हणून असो किंवा भारतातल्या संस्कृतीचा पोकळ अभिमान असो त्यामुळेच बहुधा असे घडले असावे. अपर्णाने ह्या सायाचा छान परामर्ष घेतला आहे.
उत्तर अमेरिकेतल्या ह्या पिढीचे व्यावसायिक यश मिळवत असताना कौटुंबिक पातळीवर होणारे झगडे वाचताना मन अचंबित होते. Internet युगा पूर्वीची अमेरिका किती दुष्कर असू शकेल ह्याची प्रचिती येते. कामातील अस्थिरता, कधी अनुभवास येणारा परकेपणा, त्यातून नोकरीत झालेले अन्याय, परिस्थिती हवामानशी जुळवणूक, माहेरवाशिणींची उलघाल, पुढच्या पिढीचा जन्म, त्यांच्यावरचे संस्कार, तिकडे मागच्या पिढीची काळजी, घराचं गाडीच mortgage, जागतिक मंदी ह्या सगळ्या आघाड्यांवर चिवटपणे झुंजणाया ह्या पिढीविषयी खूप कृतद्न्य वाटून जातं. त्यामानाने माझ्या सारख्या पाहुण्यांना अगदी red carpet मिळालं इथे यायला असं म्हणायला हरकत नाही. शिवाय इथे मराठीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, नवीन पिढीस मराठीची आवड निर्माण व्हावी म्हणून जे उपक्रम चालू केले आहेत त्यांना तोड नाही. न्यू जर्सी मधली आंबेकरांची मराठी शाळा तसेच महाराष्ट्र मंडळे त्यांची अधिवेशने, सम्मेलने, एकता त्रैमासिक, महाराष्ट्र फाउंडेशन ह्यांसारखे उपक्रम ह्यातून देशांच्या सीमा ओलांडून सामाजिक बांधिलकी जपण्याचे, वाढवण्याचे प्रयत्न पाहिले की मन थक्क होतं.
अमेरीकन असणं म्हणजे नेमकं काय आणि भारतीय असणं म्हणजे नेमकं काय ह्या नेहमी पडणाया प्रश्नावरील वाचनीय उत्तरे अपर्णाने ओघात नोंदवली आहेत. ह्याविषयी पुढच्या पिढीत असणारी विचारांची स्पष्टता केवळ सुखावह आहे. We are americans with our deep routes in India असं निर्भिडपणे सांगतना दोन्ही कडील चांगले ते भक्कम पकडल्याचे जाणवते. भारतातील संस्कृती आणि अमेरीकेची सिस्टीम ह्या दोहोंचा मिलाफ मागच्या पिढीने पुढे समर्थपणे दिल्याचे जाणवते. सतत नविन अधिक चांगलं करण्याची अमेरीकन सिस्टीमची प्रेरणा, संशोधनास कर्तुत्वास वाव, दिलेला मोकळेपणा, जात धर्म वंश रंग न मानता दिलेली समान संधी, going that extra one mile ह्यातली तडफ, पारदर्शी चुरस, दुसर्याची रेघ पुसून न टाकता आपली रेघ मोठी करण्यात आणि असण्यात आनंद मानण्याची अमेरिकन वृत्ती हे सगळं इथे अमेरीकेतच अनुभवायला मिळू शकतं म्हणून आज अमेरिका देश पहिल्या क्रमांकावर आहे आणि जगभरातील माणसांची अमेरीकन दुतावासांपुढे रीघ लागतेय.
हे पुस्तक तयार करताना लेखिकेने त्यास दिलेला वेळ पुरेपूर जाणवतो. तसेच अमेरीकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या मराठी मुलांची मानसिकता शोधण्याचा छोटा प्रयत्नही सॊनीयाद्वारे अपर्णाने केला आहे. एकंदर हे पुस्तक म्हणजे अनेक यशपयशांच्या अनुभवांचा ठेवा आहे.
एकच थोडीशी खटकलेली तांत्रिक गोष्ट अशी की हे पुस्तक वाचताना ते अनेक स्वतंत्र ललित लेखांचा संग्रह असल्यासारखे वाटते. त्यामुळे बरेच मुद्दे आणि संदर्भ पुन्हा पुन्हा येत रहातात.
अनिवासी महाराष्ट्रीयन मराठी ह्या विषयाचा अभ्यास करणाया आणि अमेरिकेची वाट चोखाळणाया अनेकांना ह्या पुस्तकाचा संदर्भ म्हणून उपयोग होऊ शकेल. एक चांगला आणि महत्वाचा विषय हाताळून वाचकांस वाचनीय आणि चिंतनीय खुराक दिल्याबद्दल अपर्णाचे आभारच मानायला हवेत. हा विषय महत्त्वाचा अशासाठी की तिकडे महाराष्ट्रात मराठीविषयी पालकांमध्ये आणि त्यान्वये पाल्यांमधील उदासीनता पाहून अमेरीकेतच मराठी जास्त टिकेल काय असे वाटू लागले आहे. त्याचाही थोडासा परामर्ष अपर्णाने शेवटी घेतला आहे.
मागे माननीय मुख्यमंत्र्यांनी बृहन महाराष्ट्र मंडळाला मुख्यमंत्री निधीतून पन्नस लाख रुपयांची देणगी (ते ही फक्त ह्यावेळेस नाही तर दर अधिवेशनाला) जाहीर केली. तिकडे महाराष्ट्रात वीज टंचाई, पाणी, शेतकर्यांच्या आत्महत्या इतके ज्वलंत प्रश्न असून तिथे पैसे खर्च करण्याची गरज असताना इथे दान देण्याची गरज काय हे कोडे आहे. इथला मराठी माणूस आर्थिक दृष्ट्या सशक्त आहे उलट महाराष्ट्र फाऊंडेशन सारख्या अनेक संस्था कोट्यावधी रुपयांची आर्थिक तसेच श्रमिक मदत करताना दिसतात. ह्याउलट चलाख मोदी सरकारने अनिवासी गुजराथी लोकांकडून बरेच पैसे वळवून गुजराथकडे पैशांची गंगाजळी निर्माण केली आहे. ह्याला म्हणतात दूरदर्शीपणा आणि समाजाभिमुखता (निदान दाखवण्यासाठीतरी)!
असो, तर तुम्ही अमेरीकेतले अनिवासी मराठी असाल किंवा निवासी महाराष्ट्रीय सगळीकडून मराठीचा, महाराष्ट्राचा (पर्यायाने भारताचा) विचार आणि उत्कर्ष होताना प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य दिसते..
बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.. !!
-------------------------------------------------------------------------------------
सद्ध्या to read list वरची आणखी काही पुस्तके --
पुस्तकाचे नाव: खरेखुरे आयडॊल
लेखक: सुहास कुलकर्णी
प्रकशाक: समकालीन (युनिक फीचर्स)
पुस्तकाचे नाव: खरी खुरी टीम इंडीया
लेखक: सुहास कुलकर्णी
प्रकशाक: समकालीन (युनिक फीचर्स)
Monday, October 8, 2007
जे जे उत्तम
"पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून जातात. असेच काही आवडलेले उतारे, कुठल्याही भाष्याशिवाय देण्याचा हा एक उपक्रम. अर्थात मागचा-पुढचा संदर्भ जरी नसला, तरी तो तितका उतारा वाचनीय वाटावा इतपत उद्धृत करण्याचा प्रयत्न करेन. आपल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. " - नंदन
स्वातीने टॆग केलं आणि नेमकं काय निवडावं ह्यासाठी द्वंद्वच नाही तर मनात युद्धधच सुरु झालं. सुनिताबाईंचं आहे मनोहर तरी, मुग्यांची रांग बघणारा म्याड लंपन, एक शून्य मी मधले परखड पु लं. , बारोमासमधला भुकेने कासावीस शेतकरी, एक एक पान गळावया, कृष्णकिनारा, चौघीजणी, बाबसाहेंबांनी जिवंत केलेला शिवराज्याभिषेक अगदी दासबोधातली मुर्खांची लक्षणे अशी कैक लिखाणे लगेचच डोळ्यासमोर आली. माझ्या भटक्या प्रवृत्तीमुळे आणि कामाच्या स्वरुपामुळे बरीचशी असंग्रह वृत्ती बळावल्याचं जाणवतय. त्यामुळे खूप पुस्तक, कॆसेटस घेउन फिरणं अशक्यच होतं. उतारा देण्यासाठी जवळच्या पुस्तकांपैकीच काहीतरी निवडणं गरजेच झालं, शिवाय ह्या पुस्तकाचं गारूड उतरलं नाहीये अजून! ह्या पुस्तकातला अजून एक उत्तारा लिहायचं केव्हापासून डोक्यात घोळतय ते स्वतंत्रपणे लिहीनच.
-------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातले दुर्ग आणि महाराष्ट्राबाहेरचे, यांत मनस्वी अंतर आहे - उंचीच्या दृष्टीनं, अवशेषांच्या दृष्टीनं. दिल्लीला लालकिल्ला पाहात हींडत होतो. दिल्लीलाच राहाणारा एक समानशील मित्र तो किल्ला दाखवायला मज बरोबर होता, किल्ला दाखवून झाल्यावर तो क्षण थांबून म्हणाला,
"दांडेकरजी, एक सवाल पूंछू?"
"जी हां, विना संकोचसे!"
"आप दुर्गभरे देशसे आ रहे है! यह हमारा किल्ला भी आपने देखा! क्या इनकी तुलना कर सकेंगे?"
"क्यों नही?"
"तब फिर शुरु किजिये!"
"पहले आपके इए किले के बारे मे बताउं! जैसा कोई अमीर हाथों मे चमेली की मालाए पहने, आंखोमे सुरमा लगाए, तकियेसे सटकर किसी तवायफ का मदभरा गाना सुनने बैठा हो - आपका यह किला वैसा सुहावना है!"
प्रसन्न होऊन तो म्हणाला,
"क्या कही, दांडेकरजी! वाकई आप उपन्यासकार है! ही अब इसके साथ आपके किलोंके बारे मे ---"
"अजी जाने दिजीये! मेरे देशके किलोंकी तुलना इस लाल किलेके साथ नही की जा सकती!"
"भई क्यो?"
"सारे बदनमे अरंडी का तेल लगाये कोई दो तगडे मल्ल हाथमे वज्रमुष्टी लिये एक एकेक साथ झूंज रहे हो, सारा बदन लहुलूहान हो गया हो, मेरे देश के गिरीदुर्ग देखनेपर इस दृश्य का स्मरण होता है!"
उत्तरेतले बहुतेक सगळे किल्ले -- त्यातील अवशेषांवर दुर्लक्षांमुळं काळाची पावलं उमटली, ती वगळता अजून जसेच्या तसे आहेत. त्यातले कक्ष, अट्टालिका, प्रासाद, गुसलखाने, दीवान-इ-आम, दीवान-इ-खास, कारंजी, इमामखाने - सगळं सगळं अजून दाखवता येतं. आमच्या गिरिदुर्गांची मूळ बांधणीच काळ्या कुळकळीत दगडांची. उपयुक्ततेकडे लक्ष अधिक, सौंदर्याकडे कमी. त्यांत आद्न्यापत्रामध्ये मुद्दाम आदेशच देवून ठेवला आहे.
---गडाची इमारत गरजेची करू नये. गडावरी राजमंदिराविरहीत थोर इमारतीचे घर बांधो नये.
कारण कुणालाही कळू शकतं. सगळा बेभरवशाचा काळ. केव्हा किल्ला शत्रूच्या हाती जाईल, त्याचा भरवसा नाही. तेव्हा विनाकारण खर्च करून महाल उठविले, अन उद्या ते शत्रूनं जिंकून घेतले, म्हणजे?
एकतर बहुतेक सगळ्या इमारती गरजेपुरत्याच बांधलेल्या. कुण्या इंग्रज वकिलानं शिवकाळी रायगड पाहिल्यावर लिहून ठेवलं आहे, की गडावरील घरं राजवाडा वगळता सुमार बांधणीची, केवळ छपरीच आहेत.
- आणि त्यात लढायांमधून झालेला विध्वंस! मुख्यतः सन अठराशे अठरा मध्ये इंग्रज - मराठे यांचं तुंबळ युद्ध झालं. मराठ्यांचा पराभव झाला. इंग्रजी तोफखान्याची तुकडी तोफांच्या भडीमाराने सगळे किल्ले उद्ध्वस्त करत महाराष्ट्रभर हिंडत होती. एक इमारत काही त्यांनी धड राहून दिली नाही.
या किल्ल्यांच्या आंग्रेजी तोफांच्या महिन्याभराच्या काही तारखा अन त्या भडिमाराचे नायक सांगतो :
पांडवगड : एप्रिल १८१८, मेजर थॆकर
केंजळगड : २६ मार्च १८१८, कर्नल प्रिझलर
वसंतगड : १३ मे १८१८१, मनरो
जीवधन : ३ मे १८१८, मेजर एलड्रिज
चाकण : २५ फेब्रुवारी १८१८, लेफ्टनंट कर्नल डिफन
विसापूर : ४ मार्च १८१८, जनरल प्रॊथर
सिंहगड : २ मार्च १८१८, कर्नल प्रिझलर
रायगड : १० मे १८१८, मेजर प्रॊथर
येणेप्रमाणे मराठ्यांच्या किल्ल्यांची अक्षरशः धूळधाण झाली! सिंहगडाच्या भवताली कुण्या टेपावर किती
पाउंडी तोफा रोवल्या होत्या आणि त्यांचे गोळे कुठं पडणार होते, याचं मानचित्र त्यावेळी कुण्या इंग्रज इंजिनिय्रनं काढलं होतं त्याची प्रतच मजपाशी आहे!
उत्तरेत मात्र हे झालं नाही. बहुधा सगळ्या किल्ल्यांचे तट, बुरुज, दरवाजे, आतील इमारती हे जसच्या तसं आहे. काय त्यावर काळाची पावलं उठली असतील तेवढीच!
पुस्तक: दुर्गभ्रमणगाथा
लेखक: गोपाळ नीलकठण दांडेकर
प्रकाशन: मॆजेस्टीक, गिरगांव
-------------------------------------------------------------------------------------
खालील व्यक्तींना खो देईन म्हणतो :
मृदुला गोरे
रचना बर्वे
तात्या अभ्यंकर
जयश्री अंबास्कर
टॆगिंगचा दुहेरी उद्देश असा की, ह्यातून ब्लॊगर्सना लिहीण्यासाठी नवी उभारी मिळेल आणि आपण काय वाचतोय, काय आवडतय ह्याची ओळख करून देण्याची, ह्या ह्रुद्यीचे त्या ह्रुद्यी घालण्याची संधीही!
जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते...
स्वातीने टॆग केलं आणि नेमकं काय निवडावं ह्यासाठी द्वंद्वच नाही तर मनात युद्धधच सुरु झालं. सुनिताबाईंचं आहे मनोहर तरी, मुग्यांची रांग बघणारा म्याड लंपन, एक शून्य मी मधले परखड पु लं. , बारोमासमधला भुकेने कासावीस शेतकरी, एक एक पान गळावया, कृष्णकिनारा, चौघीजणी, बाबसाहेंबांनी जिवंत केलेला शिवराज्याभिषेक अगदी दासबोधातली मुर्खांची लक्षणे अशी कैक लिखाणे लगेचच डोळ्यासमोर आली. माझ्या भटक्या प्रवृत्तीमुळे आणि कामाच्या स्वरुपामुळे बरीचशी असंग्रह वृत्ती बळावल्याचं जाणवतय. त्यामुळे खूप पुस्तक, कॆसेटस घेउन फिरणं अशक्यच होतं. उतारा देण्यासाठी जवळच्या पुस्तकांपैकीच काहीतरी निवडणं गरजेच झालं, शिवाय ह्या पुस्तकाचं गारूड उतरलं नाहीये अजून! ह्या पुस्तकातला अजून एक उत्तारा लिहायचं केव्हापासून डोक्यात घोळतय ते स्वतंत्रपणे लिहीनच.
-------------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रातले दुर्ग आणि महाराष्ट्राबाहेरचे, यांत मनस्वी अंतर आहे - उंचीच्या दृष्टीनं, अवशेषांच्या दृष्टीनं. दिल्लीला लालकिल्ला पाहात हींडत होतो. दिल्लीलाच राहाणारा एक समानशील मित्र तो किल्ला दाखवायला मज बरोबर होता, किल्ला दाखवून झाल्यावर तो क्षण थांबून म्हणाला,
"दांडेकरजी, एक सवाल पूंछू?"
"जी हां, विना संकोचसे!"
"आप दुर्गभरे देशसे आ रहे है! यह हमारा किल्ला भी आपने देखा! क्या इनकी तुलना कर सकेंगे?"
"क्यों नही?"
"तब फिर शुरु किजिये!"
"पहले आपके इए किले के बारे मे बताउं! जैसा कोई अमीर हाथों मे चमेली की मालाए पहने, आंखोमे सुरमा लगाए, तकियेसे सटकर किसी तवायफ का मदभरा गाना सुनने बैठा हो - आपका यह किला वैसा सुहावना है!"
प्रसन्न होऊन तो म्हणाला,
"क्या कही, दांडेकरजी! वाकई आप उपन्यासकार है! ही अब इसके साथ आपके किलोंके बारे मे ---"
"अजी जाने दिजीये! मेरे देशके किलोंकी तुलना इस लाल किलेके साथ नही की जा सकती!"
"भई क्यो?"
"सारे बदनमे अरंडी का तेल लगाये कोई दो तगडे मल्ल हाथमे वज्रमुष्टी लिये एक एकेक साथ झूंज रहे हो, सारा बदन लहुलूहान हो गया हो, मेरे देश के गिरीदुर्ग देखनेपर इस दृश्य का स्मरण होता है!"
उत्तरेतले बहुतेक सगळे किल्ले -- त्यातील अवशेषांवर दुर्लक्षांमुळं काळाची पावलं उमटली, ती वगळता अजून जसेच्या तसे आहेत. त्यातले कक्ष, अट्टालिका, प्रासाद, गुसलखाने, दीवान-इ-आम, दीवान-इ-खास, कारंजी, इमामखाने - सगळं सगळं अजून दाखवता येतं. आमच्या गिरिदुर्गांची मूळ बांधणीच काळ्या कुळकळीत दगडांची. उपयुक्ततेकडे लक्ष अधिक, सौंदर्याकडे कमी. त्यांत आद्न्यापत्रामध्ये मुद्दाम आदेशच देवून ठेवला आहे.
---गडाची इमारत गरजेची करू नये. गडावरी राजमंदिराविरहीत थोर इमारतीचे घर बांधो नये.
कारण कुणालाही कळू शकतं. सगळा बेभरवशाचा काळ. केव्हा किल्ला शत्रूच्या हाती जाईल, त्याचा भरवसा नाही. तेव्हा विनाकारण खर्च करून महाल उठविले, अन उद्या ते शत्रूनं जिंकून घेतले, म्हणजे?
एकतर बहुतेक सगळ्या इमारती गरजेपुरत्याच बांधलेल्या. कुण्या इंग्रज वकिलानं शिवकाळी रायगड पाहिल्यावर लिहून ठेवलं आहे, की गडावरील घरं राजवाडा वगळता सुमार बांधणीची, केवळ छपरीच आहेत.
- आणि त्यात लढायांमधून झालेला विध्वंस! मुख्यतः सन अठराशे अठरा मध्ये इंग्रज - मराठे यांचं तुंबळ युद्ध झालं. मराठ्यांचा पराभव झाला. इंग्रजी तोफखान्याची तुकडी तोफांच्या भडीमाराने सगळे किल्ले उद्ध्वस्त करत महाराष्ट्रभर हिंडत होती. एक इमारत काही त्यांनी धड राहून दिली नाही.
या किल्ल्यांच्या आंग्रेजी तोफांच्या महिन्याभराच्या काही तारखा अन त्या भडिमाराचे नायक सांगतो :
पांडवगड : एप्रिल १८१८, मेजर थॆकर
केंजळगड : २६ मार्च १८१८, कर्नल प्रिझलर
वसंतगड : १३ मे १८१८१, मनरो
जीवधन : ३ मे १८१८, मेजर एलड्रिज
चाकण : २५ फेब्रुवारी १८१८, लेफ्टनंट कर्नल डिफन
विसापूर : ४ मार्च १८१८, जनरल प्रॊथर
सिंहगड : २ मार्च १८१८, कर्नल प्रिझलर
रायगड : १० मे १८१८, मेजर प्रॊथर
येणेप्रमाणे मराठ्यांच्या किल्ल्यांची अक्षरशः धूळधाण झाली! सिंहगडाच्या भवताली कुण्या टेपावर किती
पाउंडी तोफा रोवल्या होत्या आणि त्यांचे गोळे कुठं पडणार होते, याचं मानचित्र त्यावेळी कुण्या इंग्रज इंजिनिय्रनं काढलं होतं त्याची प्रतच मजपाशी आहे!
उत्तरेत मात्र हे झालं नाही. बहुधा सगळ्या किल्ल्यांचे तट, बुरुज, दरवाजे, आतील इमारती हे जसच्या तसं आहे. काय त्यावर काळाची पावलं उठली असतील तेवढीच!
पुस्तक: दुर्गभ्रमणगाथा
लेखक: गोपाळ नीलकठण दांडेकर
प्रकाशन: मॆजेस्टीक, गिरगांव
-------------------------------------------------------------------------------------
खालील व्यक्तींना खो देईन म्हणतो :
मृदुला गोरे
रचना बर्वे
तात्या अभ्यंकर
जयश्री अंबास्कर
टॆगिंगचा दुहेरी उद्देश असा की, ह्यातून ब्लॊगर्सना लिहीण्यासाठी नवी उभारी मिळेल आणि आपण काय वाचतोय, काय आवडतय ह्याची ओळख करून देण्याची, ह्या ह्रुद्यीचे त्या ह्रुद्यी घालण्याची संधीही!
जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते...
Wednesday, September 26, 2007
उत्सव - लाडक्या मुंबईतले
गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..
पारंपारिक उत्साहात विसर्जन सुखरूप पार पडले. अर्थात तो सोहळा बघता आला नाही ह्याची हुरहुर लागलीच आहे.
मायबोलीवर गणेशोत्सव पार पडला, त्यात मी लिहिलेली ही आरती..
-----------------------------------------------------------------------------------
जय देव जय देव जय जय गणराया
आरती ओवाळीतो वंदूनी तव पाया
जय देव जय देव धृ०
कार्यारंभी तुजला पूजिती जन सारे
विघ्नांतक विघ्नेश्वर प्रार्थती तुजला रे
संकट निवारोनी शुभ शांती द्या या .. १
लाडू मोदक पक्वान्ने तुजला प्यारी
तंदुल तनु मोहक उंदरावर स्वारी
गणपती बाप्पा रिद्धी सिद्धीच्या राया.. २
परशू हाती शोभे ध्यान वक्रतुंड
सिंदुरवदना सुंदर रुळताहे शुंड
अशीच स्फूर्ती राहो किर्ती तव गाया.. ३
आरती ओवाळीतो वंदूनी तव पाया
जय देव जय देव धृ०
-----------------------------------------------------------------------------------
गणेश विसर्जनाप्रमाणेच अख्खी मुंबई दुमदुमली ती धोनीच्या संघाच्या दणदणीत स्वागताने. ८३ साली मला अंधुक आठवतय गिरगावातून खूप साया मिरवणूका निघाल्या होत्या. कालचा सोहळा हा तसा आयत्यावेळी ठरवलेला पण तरीही बराचसा सुनियोजित वाटला. धोनी आणि संघ इतकं मिळून मिसळून जवळून अभिनंदन स्विकारत होते ते छानच वाटलं. तिकडे असतो तर गेलोच असतो वानखेडेवर, त्याची थोडी चुटपुट लागलीच. तरीही स्टार माझा आणि एन. डी. टीव्ही वर बघता आलं. असो, पण ट्वेंटी ट्वेंटी मध्ये धोनीच्या संघाने जो जिगरबाज खेळ केला त्याला तोड नाही. दैव साथ होतं पण त्याला कर्माची, मेहनतीची अचूक साथ मिळाली हे तितकच खरं. धोनीचं आणि भारतीय संघाच मनःपूर्वक अभिनंदन! ह्यातून बरेच प्रश्न सुटलेत आणि तितकेच नवीन उभे राहिलेत असं दिसतय. भारताच्या विश्वचषकातल्या पराभवानंतर जे क्रीकेटवर सावट आलं होतं (आणि जनता चक दे मुळे हॊकी कडे थोड्या प्रमाणात वळू पहात होती) ते सावट दूर होईल हे नक्की. २०-२० नक्कीच पुढे प्रसिद्धीस येणार ह्यात वाद नाही. एकदिवसीय सामन्याच्या गुणवत्तेत आणि डावपेचांत आता खूप फरक पडेल.
एकदिवसीय सामन्यात द्विशतक मारण्याचा दिवस आता फार दूर वाटत नाही. एक दिवसीय सामन्यांच्या गर्दीमुळे जसे पाच दिवसाच्या सामन्यात साडेतीन चारच्या गतीने धावा हौऊ लागल्या आणि सामन्यांच्या निकालाची शक्यता वाढली तसा काहीसा परिणाम २०-२० मुळे एक दिवसीय सामन्यांवर होईल असं दिसतय. नवीन तरूण खेळाडू उभे रहात आहेत ही अजून एक आनंदाची बाब. धोनी च्या रुपात चांगला कर्णधार मिळतोय ही भारतीय क्रीकेटच्या दृष्टीने खूपच आनंदाची गोष्ट.
ह्यातून प्रश्न आहेत ते निवडसमितीपुढे. अचूक संघ कसा निवडायचा, आहे त्या खेळाडुंचा पुरेपूर वापर कसा करायचा (नाहीतर आय सी ल आहेच खेळाडू उचलायला) प्रशिक्षकाचा प्रश्न कसा सोडवायचा हे सगळे निवड समितीला पहावे लागेल. क्रीकेट रसिकांनी ह्यातून शिकण्यासारखे म्हणजे आपल्या सदिच्छा संघाला द्याव्यात पण होम हवने करून आणि साकडे घालून अपेक्षांचे ओझे आपल्याच संघावर लादू नये आणि भावनेच्या भरात त्यांच्या मालमत्तेवर आणि शंकेखोर वृत्तीने स्वत्त्वावर हल्ले करु नयेत!
मधे एकदा न्युयॊर्क मूंबई प्रवास करताना शेजारच्या जागी साधारण माझ्या एवढाच मुलगा होता, सलिम. मी क्रीकेटचं काहितरी वाचत बसलो होतो लॆपटॊपवर आणि आमची तेव्हाच ओळख झाली. तर तो होता कराचीतून :-) तिथेच लहानचा मोठा झालेला. मुंबई कराची तशा सख्ख्या बहीणी. दोन्ही उत्तम बंदरे त्यामुळे पूर्वापार व्यावसयिक महत्व. दोन्ही शहरांना आपापल्या देशात विशेष सांस्कृतिक, राजकीय, चित्रपटविषयक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्व. तसच क्रीकेट हा अजून एक समान धागा. खूप भरभरून बोललो आम्ही दोघे. एखाद्या सच्च्या पाकीस्तानी क्रीकेटप्रेमीस काय वाटतं क्रीकेटबद्दल, भारतीय टीमबद्दल आणि पाकीस्तानी टीमबद्दल हे जवळून समजून घेता आलं. ते सारं मला काल आठवलं एकदम. सलिम नक्कीच रडला असेल काल!
पण त्या शोएब मलिकने खेळात धर्म आणायला नकोच होता. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे इकडे का बरं लक्ष देत नाहीत?? भारतातला मौला उठून का बरं ह्याचा निषेध करत नाही?? सगळ्या इस्लामिंनी पाकीस्तानास पाठिंबा दिला किंवा द्यायला हवा असे म्हणताना खेळाचे धर्मयुद्ध करण्याचा गाढवप्णाच नव्हे काय? इस्लामही काय पाकीस्तानची इश्टेट आहे का? आणि सगळे जगभरातले इस्लामी पाकीस्तानी आहेत का? की तसं मुद्दाम रुजवण्याचा हा कुटील डाव आहे आणि धूर्त पणे हे पसरवायची साधलेली संधी आहे? अर्थात त्याचा बोलविता धनी कोण हे स्पष्टच आहे आणि तो धनीच स्वतःच्या जाळ्यात फसत चालला आहे दिवसेंदिवस! आय सी सी ह्या विधानांवर काही आक्षेप घेईल असं वाटत नाही! पण मनापसून चीड आली ह्याची.. अशावेळी वाटतं इथे ठाकरी पाणीच हवं!
असो तर, पाच दिवसाचा कसोटी सामना म्हणजे हर हर महादेव म्हणत घेतलेले अंगत पंगत जेवण, एक दिवसीय म्हणजे झटपट उरकलेला बुफे आणि २०-२० म्हणजे एकच स्वीट डीश किंवा थोडेसेच पण रुचकर सॆलड किंवा हलकासा स्नॆक्स. उदरभरण नोहे जाणिजे यद्न्य कर्म म्हणत ताव मारायचे दिवस गेले, ये फास्ट फूड का जमाना है भाई हेच खरं! :-)
चक दे sssssssssss इंडीssssssssssया!
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..
पारंपारिक उत्साहात विसर्जन सुखरूप पार पडले. अर्थात तो सोहळा बघता आला नाही ह्याची हुरहुर लागलीच आहे.
मायबोलीवर गणेशोत्सव पार पडला, त्यात मी लिहिलेली ही आरती..
-----------------------------------------------------------------------------------
जय देव जय देव जय जय गणराया
आरती ओवाळीतो वंदूनी तव पाया
जय देव जय देव धृ०
कार्यारंभी तुजला पूजिती जन सारे
विघ्नांतक विघ्नेश्वर प्रार्थती तुजला रे
संकट निवारोनी शुभ शांती द्या या .. १
लाडू मोदक पक्वान्ने तुजला प्यारी
तंदुल तनु मोहक उंदरावर स्वारी
गणपती बाप्पा रिद्धी सिद्धीच्या राया.. २
परशू हाती शोभे ध्यान वक्रतुंड
सिंदुरवदना सुंदर रुळताहे शुंड
अशीच स्फूर्ती राहो किर्ती तव गाया.. ३
आरती ओवाळीतो वंदूनी तव पाया
जय देव जय देव धृ०
-----------------------------------------------------------------------------------
गणेश विसर्जनाप्रमाणेच अख्खी मुंबई दुमदुमली ती धोनीच्या संघाच्या दणदणीत स्वागताने. ८३ साली मला अंधुक आठवतय गिरगावातून खूप साया मिरवणूका निघाल्या होत्या. कालचा सोहळा हा तसा आयत्यावेळी ठरवलेला पण तरीही बराचसा सुनियोजित वाटला. धोनी आणि संघ इतकं मिळून मिसळून जवळून अभिनंदन स्विकारत होते ते छानच वाटलं. तिकडे असतो तर गेलोच असतो वानखेडेवर, त्याची थोडी चुटपुट लागलीच. तरीही स्टार माझा आणि एन. डी. टीव्ही वर बघता आलं. असो, पण ट्वेंटी ट्वेंटी मध्ये धोनीच्या संघाने जो जिगरबाज खेळ केला त्याला तोड नाही. दैव साथ होतं पण त्याला कर्माची, मेहनतीची अचूक साथ मिळाली हे तितकच खरं. धोनीचं आणि भारतीय संघाच मनःपूर्वक अभिनंदन! ह्यातून बरेच प्रश्न सुटलेत आणि तितकेच नवीन उभे राहिलेत असं दिसतय. भारताच्या विश्वचषकातल्या पराभवानंतर जे क्रीकेटवर सावट आलं होतं (आणि जनता चक दे मुळे हॊकी कडे थोड्या प्रमाणात वळू पहात होती) ते सावट दूर होईल हे नक्की. २०-२० नक्कीच पुढे प्रसिद्धीस येणार ह्यात वाद नाही. एकदिवसीय सामन्याच्या गुणवत्तेत आणि डावपेचांत आता खूप फरक पडेल.
एकदिवसीय सामन्यात द्विशतक मारण्याचा दिवस आता फार दूर वाटत नाही. एक दिवसीय सामन्यांच्या गर्दीमुळे जसे पाच दिवसाच्या सामन्यात साडेतीन चारच्या गतीने धावा हौऊ लागल्या आणि सामन्यांच्या निकालाची शक्यता वाढली तसा काहीसा परिणाम २०-२० मुळे एक दिवसीय सामन्यांवर होईल असं दिसतय. नवीन तरूण खेळाडू उभे रहात आहेत ही अजून एक आनंदाची बाब. धोनी च्या रुपात चांगला कर्णधार मिळतोय ही भारतीय क्रीकेटच्या दृष्टीने खूपच आनंदाची गोष्ट.
ह्यातून प्रश्न आहेत ते निवडसमितीपुढे. अचूक संघ कसा निवडायचा, आहे त्या खेळाडुंचा पुरेपूर वापर कसा करायचा (नाहीतर आय सी ल आहेच खेळाडू उचलायला) प्रशिक्षकाचा प्रश्न कसा सोडवायचा हे सगळे निवड समितीला पहावे लागेल. क्रीकेट रसिकांनी ह्यातून शिकण्यासारखे म्हणजे आपल्या सदिच्छा संघाला द्याव्यात पण होम हवने करून आणि साकडे घालून अपेक्षांचे ओझे आपल्याच संघावर लादू नये आणि भावनेच्या भरात त्यांच्या मालमत्तेवर आणि शंकेखोर वृत्तीने स्वत्त्वावर हल्ले करु नयेत!
मधे एकदा न्युयॊर्क मूंबई प्रवास करताना शेजारच्या जागी साधारण माझ्या एवढाच मुलगा होता, सलिम. मी क्रीकेटचं काहितरी वाचत बसलो होतो लॆपटॊपवर आणि आमची तेव्हाच ओळख झाली. तर तो होता कराचीतून :-) तिथेच लहानचा मोठा झालेला. मुंबई कराची तशा सख्ख्या बहीणी. दोन्ही उत्तम बंदरे त्यामुळे पूर्वापार व्यावसयिक महत्व. दोन्ही शहरांना आपापल्या देशात विशेष सांस्कृतिक, राजकीय, चित्रपटविषयक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्व. तसच क्रीकेट हा अजून एक समान धागा. खूप भरभरून बोललो आम्ही दोघे. एखाद्या सच्च्या पाकीस्तानी क्रीकेटप्रेमीस काय वाटतं क्रीकेटबद्दल, भारतीय टीमबद्दल आणि पाकीस्तानी टीमबद्दल हे जवळून समजून घेता आलं. ते सारं मला काल आठवलं एकदम. सलिम नक्कीच रडला असेल काल!
पण त्या शोएब मलिकने खेळात धर्म आणायला नकोच होता. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारे इकडे का बरं लक्ष देत नाहीत?? भारतातला मौला उठून का बरं ह्याचा निषेध करत नाही?? सगळ्या इस्लामिंनी पाकीस्तानास पाठिंबा दिला किंवा द्यायला हवा असे म्हणताना खेळाचे धर्मयुद्ध करण्याचा गाढवप्णाच नव्हे काय? इस्लामही काय पाकीस्तानची इश्टेट आहे का? आणि सगळे जगभरातले इस्लामी पाकीस्तानी आहेत का? की तसं मुद्दाम रुजवण्याचा हा कुटील डाव आहे आणि धूर्त पणे हे पसरवायची साधलेली संधी आहे? अर्थात त्याचा बोलविता धनी कोण हे स्पष्टच आहे आणि तो धनीच स्वतःच्या जाळ्यात फसत चालला आहे दिवसेंदिवस! आय सी सी ह्या विधानांवर काही आक्षेप घेईल असं वाटत नाही! पण मनापसून चीड आली ह्याची.. अशावेळी वाटतं इथे ठाकरी पाणीच हवं!
असो तर, पाच दिवसाचा कसोटी सामना म्हणजे हर हर महादेव म्हणत घेतलेले अंगत पंगत जेवण, एक दिवसीय म्हणजे झटपट उरकलेला बुफे आणि २०-२० म्हणजे एकच स्वीट डीश किंवा थोडेसेच पण रुचकर सॆलड किंवा हलकासा स्नॆक्स. उदरभरण नोहे जाणिजे यद्न्य कर्म म्हणत ताव मारायचे दिवस गेले, ये फास्ट फूड का जमाना है भाई हेच खरं! :-)
चक दे sssssssssss इंडीssssssssssया!
Friday, September 14, 2007
माझे जीवन - गाणे (ऐकणे)
कहा मैखानेका दरवाजा गालिब और कहा वाइज
पर इतना जानते है कल वो जाता था के हम निकले...
हजारो ख्वाईशे ऐसी की हर ख्वाईश पे दम निकले..
बहोत निकले मेरे अर्मान फीर भी कम निकले..
हुं हुं हुं हुं हुं हं हं हं हं..
हुं हुं हुं हुं... हं हं हं हं..
--------------------------------------------------------------
हाथ छुटे तो भी रिश्ते नही छोडा करते
हाथ छुटे तो भी रिश्ते नही छोडा करते
वक्त की शाखसे लम्हे नही तोडा करते..
-- माझ्या मनात आणि ओठात हे गाण उमटलं सुद्धा..
--------------------------------------------------------------
मैने दिलसे कहा, ए दिवाने बता
जबसे कोई मिला तू है खोया हुआ
ये कहानी है क्या, है ये क्या सिलसिला..
अरेच्चा.. आणि हे काय वेगळच गाणं सुरू झालं की.. कपाळाला बारीकशी आठी पडली आणि उठून पाहीलं तर random mode होता.. म्हटलं हं.. जवळ जवळ दोन वर्षांनी ही ऐकतोय.. आज जगजीत मूड आला, (तसा तो बरेचदा असतोही, पण आज निवांतपणा मिळाला... पूर्वीसारखं रात्रभर हळूवार गझल ऐकत बसता येतील असा) आणि माझं मन भूतकाळात रमलं.. अजूनही गाण्यांचा अनुक्रम चांगलाच लक्षात होता तर.. त्या क्रमाने गाणं उमटलं नाही म्हटल्यावर क्षणिक अस्वस्थता आली इतकच!
माझ्या बाबतीत होतं असं काही वेळा.. मला गाणी एका मूड मध्ये तसच एका गायकाच्या आवाजात सलग ऐकायला आवडतात, विशेषतः long drive करताना किंवा रात्री झोपताना! गंमत अशी की त्या गाण्यांबरोबरच त्यांचा अनुक्रम सुद्धा अगदी डोक्यात फीट्ट बसतो, बरेचदा आपल्या नकळत. मग कित्येक वर्ष तो निघत नाही तिथून.. पूर्वी जेव्हा गिरगावात मी audo cassets बनवून घ्यायचो गाण्याच्या तेव्हा 'अ' बाजूस पहिले आणि शेवटचे तसच 'ब' बाजूस पहिले आणि शेवटचे गाणे कोणते ठेवायचे ह्याकडे माझा कटाक्ष असे, जेणे करू नुसती casset ची बाजू बदलली की एका बाजूचं पहिलं आणि दुसया बाजूच शेवटचं गाणं परत परत ऐकता यावं! त्यामुळे माझ्या कित्येक आवडत्या गाण्यांनी माझ्या casset च्या संग्रहात पहिलं किंवा शेवटचं स्थान पटकवलय.
जसा हा अनुक्रम ठिय्या मारुन बसतो ना मनात, तसच काहीसं आठवणींच.. बयाच गाण्यांशी आपल्या काही आठवणी निगडीत असतात. म्हणजे ते कुठून मिळवलं किंवा काही किस्से घडलेले किंवा एखादी संबंधित व्यक्ती किंवा ते गाणे ऐकताना झालेली चूक किंवा गाण्याने भारवून गेलो ते क्षण किंवा अगदी त्याच सादरीकरण किंवा अजून बरच काही. मानवी मेंदू हा खरच कमाल आहे. हे सगळं तो त्या त्या गाण्याशी अचूक बांधून ठेवतो आणि मग वेळ पडली की मनःपटलावर उमटवून देतो, ते ही काही क्षणात. अगदी! इतकं छान auto indexing आणि quick search निर्माण करणाया ह्या शक्तीची कमालच म्हणायला हवी.
दरम्यान बरेचदा पु लंनी आणि सुनिताबाईंनी सादर केलेला बा. भ. बोरकरांचा आनंदयात्री कार्यक्रम मी ऐकतो, समाधान होत नाही कितीही ऐकलं तरी! तर, त्यात भाईंनी मध्ये मध्ये केलेल्या टिपण्या, सुनीताबाईंचा कधी गंभीर तर कधी मिश्कील आवाज ह्यातून कविता किंवा गाणे आणि त्याच्याशी जडलेल्या आठवणी अशा काही उमलतात ना की बस्स! कवितांजली मध्ये सुनीताबाईंनी असच अप्रतिम काव्यवाचन केलय. मराठी वाद्यवृंदांमध्ये तसच मैफीलींमध्ये माझे आवडते समालोचक म्हणजे भाऊ मराठे (जे भाऊचा धक्का हा कार्यक्रम सादर करतात), संजय उपाध्ये (गप्पाष्टक वाले) आणि मंगला खाडीलकर. व्वा क्या बात है! प्रत्येक गाण्याची पार्श्वभूमी, त्याला निगडीत काही प्रसंग, व्यक्ती असं सगळं अभ्यासपूर्ण समालोचन ऐकायला मिळतं आणि सादरीकरण सुद्धा प्रेक्षकांची नाडी (म्हणजे टिळक स्मारकातली गर्दी आणि गिरगावतल्या गल्लीतल्या प्रेक्षकांची रसिकता ह्यातला फरक) ओळखून हे समालोचक सादरीकरण करतात, त्याचबरोबर मार्मिकता, हजरजबाबीपणा असतो तो खासच!
अशा कैक गाण्याच्या शब्दांची, त्यांच्या माझ्याकडील अनुक्रमाची, त्यांच्याबरोबरच्या आठवणींची यादी इवल्याश्या डोक्यात साठत असते. हे असं वाढतच रहाणार, जेवढं आपण अनुभव संपन्न होऊ तेवढं. त्याचा आस्वाद घेत रहाणं तेवढं करत रहायचं..
पाडगावकरांच्या बोलगाण्यात सांगायचं तर ह्या पाखरासारखं मस्त जगाव.. हसत हसत गाणं म्हणत!माझं हे खूप आवडतं बोलगाणं..
एक पाखरू आलं
ते दाणा घेऊन गेलं
दुसरं पाखरू आलं
ते दाणा घेऊन गेलं
तिसरं पाखरू आलं
ते गात बसलं,
भारावून आपल्याच सुरात
न्हात बसलं!
तुच्छतेने बघत त्याला
चौथं पाखरू आलं
ते दाणा घेऊन गेलं
तरीही ते तिसरं पाखरू
गात बसलं,
भारावून आपल्याच सुरांत
न्हात बसलं!
(आठवली का ती Sprite ची जाहीरात! अगदी तस्संच! ) :-)
Subscribe to:
Posts (Atom)