Sunday, January 21, 2007

हम होंगे कामयाब...

आजकाल फार ऐकतो नाही आपण India Super Power होतेय, शेअर मार्केट उचंबळून येतय, प्रगतीचा दर वाढतोय आणि असं बरच काही..
पण खरच सामान्य गृहिणीसाठी स्वयंपाकाचा गॆस स्वस्त झालाय का? पेट्रोल वाढ आणि त्या अनुषंगाने येणारी महागाई थांबलेय का? रेशनवर गहू साखर रॊकेलचीही वानवा आहेच की.. म्हणजे काय तर बराच पल्ला गाठायचाय आपल्याला. पण होय आपला देश प्रगती पथावर आहे हे नक्की आणि तो तसाच रहायला हवा ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी झालेय. मोबाईल हल्ली हातोहाती पोहोचलाय, खाजगी क्षेत्रातील चढाओढीचा फायदा सामान्य ग्राहकाला मिळतोय, विदेशी कंपन्याना भारतात सुरक्षित वाटू लागल्याने नवीन तंत्रद्न्यान आणि outsourcing मुळे नोकरीच्या सुविधा प्रचंड प्रमाणात निर्माण होत आहेत,ह्या वाढत्या सुशिक्षित मनुष्य बळाच्या मागणीला आपल्याला व्यवस्थित नियोजन आणि तयारी करूनच सामोरं जायला हवय. मला बरेचदा असं वाटायचं, की स्वातंत्र्यपूर्व काळात आणि अगदी लाल बहादूर शास्त्रींपर्यंत आदर्श म्हणावे असे राजकारणी होते, ज्यांच्याकडे विश्वासाने बघत एक पिढी घडत होती. पण नंतर एकंदरच भ्रष्टाचार इतका बोकाळला की सृजनशील व्यक्ती राजकारणात औषधालाही सापडेनाशी झाली. तरुण पिढीला एकत्र आणून एखाद्या ध्येयाने प्रेरीत करेल असे नेत्रुत्व देशाला विशेष काळ लाभले नाही. पण आता परिस्थिती बद्लतेय. आपले पंत्रप्रधान, राष्ट्रपती सगळेच त्यांच्या क्षेत्रात दिग्गज तर आहेतच पण त्यांना राजकारणापेक्षा समाजकारणात विशेष रस असल्याचे जाणवते. आज जर मी कोणामुळे भारावून जात असेन, तर आपल्या आदरणीय राष्ट्रपतींचे नाव मी प्रथम घेईन.

काही महिन्यांपूर्वी आमचे सॆम साहेब भारतात आले होते तेव्हा सगळ्या IBMers बरोबर एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमास राष्ट्रपती विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच ते अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि समयोचित भाषण अजून आठवतय. तेव्हापासून त्यांच्या साईटचा मी नियमित वाचक बनलोय. कुठेही भाषण असलं की श्रोत्रृवर्गाचा आणि विषयाचा अभ्यास करुन भाषण तयार केले जाते आणि त्याचे मुद्दे साईट्वर लगेचच संदर्भासाठी तयार ठेवले जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करायला हवे असे नुसतेच उपदेश पूर्ण न सांगता ते कसे करता येईल, त्यात कोणत्या अडचणी येऊ शकतील आणि त्यावर मात कशी करता येईल ह्याचा पूर्ण उहापोह तुम्हाला त्यांच्या प्रत्येक भाषणात आढळेल.
कलाम साहेबांच्या गेल्या आठवड्यातील पुणे भेटी दरम्यान National youth Award समारंभात तरूणाई समोर मांडलेले विचार अंतर्मुख करायाला लावणारे आहेतच पण नेमक्या शब्दात त्यांनी खूप काही दाखवून दिलय. My Mission my nation ह्या शिर्षकाखाली I can do it असा आत्मविश्वास तरुणांना देताना त्यांनी सात सूत्री शपथ दिलेय युवकांना. मला माहितेय की माझ्यासारख्या असंख्य तरुणांच्या मनात देशासाठी काय आणि कसं करायचं असा प्रचंड गोंधळ आहे आणि म्हणूच ती शप्पथ मी इथे नमूद करतोय.

1. I realize, I have to set a goal in my life. To achieve the goal, I will acquire the knowledge, I will work hard, and when the problem occurs, I have to defeat the problem and succeed.

2. As a youth of my nation, I will work and work with courage to achieve success in all my tasks and enjoy the success of others.

3. I shall always keep myself, my home, my surroundings, neighbourhood and environment clean and tidy.

4. I realize righteousness in the heart leads to beauty in the character, beauty in the character brings harmony in the home, harmony in the home leads to order in the nation and order in the nation leads to peace in the world.

5. I will lead an honest life free from all corruption and will set an example for others including my home to adopt a righteous way of life.

6. I will light the lamp of knowledge in the nation and ensure that it remains lit for ever.

7. I realize, whatever work I do if I do the best, I am contributing towards realizing the vision of developed India 2020.

किती परिपूर्ण आहेत हे विचार. राष्ट्रपतींच्या साईटवर त्यांच्या प्रत्येक भाषणाची प्रत आहे, वाचून अगदी मन थक्क होते! www.presidentofindia.com ला जरुर जरुर भेट द्या!

अजून एका साईट बद्दल मी सांगणार आहे आज, ती म्हणजे www.rebuildindia.org, काही वर्षांपूर्वी अशाच ध्येयप्रेरीत तरुणांनी ही साईट बनवली आणि सांगावयास आनंद वाटतो की ह्या साईटच्या माध्यमातून आज बरेच चांगले उपक्रम सुरु आहेत. माझी एक सुपीक डोक्याची मैत्रीण स्वप्ना (स्वप्ना हवालदार, बालमोहन) हिने साईटच्या संकल्पनेत आणि मांडणीत विशेष मेहनत घेतलेय.

एकंदर काय आपल्या सगळ्यांना मिळून भारत घडवायचाय. वाट दिसतेय, वाटाड्याही आहे मुद्दा इतकाच की आपण कितपत प्रतिसाद देतो.. आशा अमर आहे.

हम होंगे कामयाब एक दिन
मन मे है विश्वास
पुरा है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन..

जय हिंद!

Saturday, January 13, 2007

अन्न हे पूर्ण ब्रह्म..

तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला..
नमस्कार,
IT Consulting च्या कामामुळे मला गेले काही महिने, वर्ष ठिकठिकाणी फिरायला मिळतय (हो फिरावं लागतय असं म्हणत नाही मी!!) आणि त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृतीमधून आलेल्या संबंधित क्षेत्रातील तद्न्यांशी अगदी जवळून ओळखी होत आहेत. त्यात जसे स्थानिक अमेरिकन्स आहेत तसे भारतातून तसेच चीनमधून येउन इथे कित्येक वर्षे स्थायिक झालेलेही आहेत. बरेचदा मग आमच्या जागतिकीकरण, राजकारण, छंद अशा कित्येक विषयांवरील चर्चा रंगतात, त्यातून बरंच शिकायला तर मिळतंच पण विशेष म्हणजे अशावेळी कधी प्रत्येक तंत्रद्न्यामधे लपलेला कलाकार हळूच डोकावून जातो तर कधी एक माणूस म्हणून त्याची वेगळीच झलक देऊन जातो.

मध्ये एकदा Thanks Giving च्या पार्टी बद्दल आमची चर्चा चालली होती आणि पार्टी म्हणजे नक्की काय केलं ते प्रत्येक जण भरभरून समजाऊन सांगत होता आणि मी ही समरसून ऐकत होतो. मेमी (माझी मागच्या प्रॊजेक्टमधील सहकारी) सांगत होती "One day I prepared food and rest of the two days I was invited at my friends for leftOvers!" ज्या उत्साहाने ती तिने बनवलेल्या जेवणाबद्दल सांगत होती त्याच उत्साहने तिच्या मैत्रिणींनी तिला त्यांच्या उरलेल्या स्वयंपाकाच्या मेजवानीला बोलावले असे सांगताना तिला आनंदच होत होता. पार्टी ची ही संकल्पना मला थोडी नवीनच होती पण अर्थात आवडली हे नक्की. इथे Office मध्ये project तर्फे बयाचवेळा लंच म्हणून pizza, paasta मागवला जातो, आणि उरलेले अन्न फेकून न देता मोकळ्या जागी व्यवस्थित मांडून ठेवले जाते आणि मग सगळ्यांना त्या बद्दल मेल पाठवले जाते. महत्वाचा मुद्दा असा की प्रत्येक जण आपले अन्न प्लेट मधून काढून घेताना अतिशय शिस्तशीरपणे काढून घेत असल्याने पदार्थ चिवडल्यासारखेही दिसत नाहीत आणि अन्न फुकट न जाता पोटी लागते.
अजून एक गोष्ट इकडे पहाण्यात येते ती म्हणजे , हॊटेलात गेल्यावर तुम्ही तुमचे खाऊन शिल्लक राहिलेले पदार्थ वेटरला बांधून बरोबर देण्यास सांगू शकता आणि तसे ते हसतमुखाने दिले जातात देखील.

आपल्या भारतातसुद्धा अशा काही चांगल्या गोष्टी सुरू करता आल्या तर किती छान होईल बरं. आपल्या ताटातली पोळी जर देणे शक्य नसेल तर निदान असे जर गरीब भुकेल्या जीवास नीट बांधून देता आले तर अन्नाचा किती छान विनियोग होईल. नुसतेच जेवताना "उदरभरण नोहे जाणीचे यद्न्य कर्म" म्हण्यापेक्षा ह्या पूर्ण ब्रह्म अन्नाची उपेक्षा न होता भुकेल्या पोटास तरी ते शांत करू शकेल. हे लिहित असतानाच मला आठवतेय ती सदाशिव पेठेतल्या सात्विक थाळी मधली पाटी आणि त्यावरचा हा सुविचार:
वदनी कवल घेता नाम घ्या मातृभूचे
सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे
कृषीवल कृषीकर्मी राबती दिन रात
श्रमीक श्रम करोनी वस्तू त्या निर्मितात
स्मरण करून त्यांचे अन्न सेवा खुशाल
उदर भरण व्हावे चित्त होण्या विशाल!!

शेवटी थोडं विषयांतर. आज मकर संक्रांत. माझा सगळ्यात आवडता सण. लहानपाणापासून गच्चीवर, कौलांवर चढून पतंग उडवण्याचं मला भारी वेड. इथे इतर सगळे सण अगदी धुमधडाक्यात साजरे होतात पण संक्रांतीची दक्षिण मुंबईतली नशाच न्यारी. सकाळी सहापासून रात्री काळोख दाटेपर्यंत पतंग उडवताना अगदी जेवायचे सुद्धा भान नसायचे. गाणी, ओरडा, मांजाने कापलेली बोटं कित्येक आठवणी दाटून येताहेत. ह्याक्षणी खूप nastalgic वाटतय! असो.. सगळ्यांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा!