Sunday, January 21, 2007

हम होंगे कामयाब...

आजकाल फार ऐकतो नाही आपण India Super Power होतेय, शेअर मार्केट उचंबळून येतय, प्रगतीचा दर वाढतोय आणि असं बरच काही..
पण खरच सामान्य गृहिणीसाठी स्वयंपाकाचा गॆस स्वस्त झालाय का? पेट्रोल वाढ आणि त्या अनुषंगाने येणारी महागाई थांबलेय का? रेशनवर गहू साखर रॊकेलचीही वानवा आहेच की.. म्हणजे काय तर बराच पल्ला गाठायचाय आपल्याला. पण होय आपला देश प्रगती पथावर आहे हे नक्की आणि तो तसाच रहायला हवा ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी झालेय. मोबाईल हल्ली हातोहाती पोहोचलाय, खाजगी क्षेत्रातील चढाओढीचा फायदा सामान्य ग्राहकाला मिळतोय, विदेशी कंपन्याना भारतात सुरक्षित वाटू लागल्याने नवीन तंत्रद्न्यान आणि outsourcing मुळे नोकरीच्या सुविधा प्रचंड प्रमाणात निर्माण होत आहेत,ह्या वाढत्या सुशिक्षित मनुष्य बळाच्या मागणीला आपल्याला व्यवस्थित नियोजन आणि तयारी करूनच सामोरं जायला हवय. मला बरेचदा असं वाटायचं, की स्वातंत्र्यपूर्व काळात आणि अगदी लाल बहादूर शास्त्रींपर्यंत आदर्श म्हणावे असे राजकारणी होते, ज्यांच्याकडे विश्वासाने बघत एक पिढी घडत होती. पण नंतर एकंदरच भ्रष्टाचार इतका बोकाळला की सृजनशील व्यक्ती राजकारणात औषधालाही सापडेनाशी झाली. तरुण पिढीला एकत्र आणून एखाद्या ध्येयाने प्रेरीत करेल असे नेत्रुत्व देशाला विशेष काळ लाभले नाही. पण आता परिस्थिती बद्लतेय. आपले पंत्रप्रधान, राष्ट्रपती सगळेच त्यांच्या क्षेत्रात दिग्गज तर आहेतच पण त्यांना राजकारणापेक्षा समाजकारणात विशेष रस असल्याचे जाणवते. आज जर मी कोणामुळे भारावून जात असेन, तर आपल्या आदरणीय राष्ट्रपतींचे नाव मी प्रथम घेईन.

काही महिन्यांपूर्वी आमचे सॆम साहेब भारतात आले होते तेव्हा सगळ्या IBMers बरोबर एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमास राष्ट्रपती विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच ते अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण आणि समयोचित भाषण अजून आठवतय. तेव्हापासून त्यांच्या साईटचा मी नियमित वाचक बनलोय. कुठेही भाषण असलं की श्रोत्रृवर्गाचा आणि विषयाचा अभ्यास करुन भाषण तयार केले जाते आणि त्याचे मुद्दे साईट्वर लगेचच संदर्भासाठी तयार ठेवले जातात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय करायला हवे असे नुसतेच उपदेश पूर्ण न सांगता ते कसे करता येईल, त्यात कोणत्या अडचणी येऊ शकतील आणि त्यावर मात कशी करता येईल ह्याचा पूर्ण उहापोह तुम्हाला त्यांच्या प्रत्येक भाषणात आढळेल.
कलाम साहेबांच्या गेल्या आठवड्यातील पुणे भेटी दरम्यान National youth Award समारंभात तरूणाई समोर मांडलेले विचार अंतर्मुख करायाला लावणारे आहेतच पण नेमक्या शब्दात त्यांनी खूप काही दाखवून दिलय. My Mission my nation ह्या शिर्षकाखाली I can do it असा आत्मविश्वास तरुणांना देताना त्यांनी सात सूत्री शपथ दिलेय युवकांना. मला माहितेय की माझ्यासारख्या असंख्य तरुणांच्या मनात देशासाठी काय आणि कसं करायचं असा प्रचंड गोंधळ आहे आणि म्हणूच ती शप्पथ मी इथे नमूद करतोय.

1. I realize, I have to set a goal in my life. To achieve the goal, I will acquire the knowledge, I will work hard, and when the problem occurs, I have to defeat the problem and succeed.

2. As a youth of my nation, I will work and work with courage to achieve success in all my tasks and enjoy the success of others.

3. I shall always keep myself, my home, my surroundings, neighbourhood and environment clean and tidy.

4. I realize righteousness in the heart leads to beauty in the character, beauty in the character brings harmony in the home, harmony in the home leads to order in the nation and order in the nation leads to peace in the world.

5. I will lead an honest life free from all corruption and will set an example for others including my home to adopt a righteous way of life.

6. I will light the lamp of knowledge in the nation and ensure that it remains lit for ever.

7. I realize, whatever work I do if I do the best, I am contributing towards realizing the vision of developed India 2020.

किती परिपूर्ण आहेत हे विचार. राष्ट्रपतींच्या साईटवर त्यांच्या प्रत्येक भाषणाची प्रत आहे, वाचून अगदी मन थक्क होते! www.presidentofindia.com ला जरुर जरुर भेट द्या!

अजून एका साईट बद्दल मी सांगणार आहे आज, ती म्हणजे www.rebuildindia.org, काही वर्षांपूर्वी अशाच ध्येयप्रेरीत तरुणांनी ही साईट बनवली आणि सांगावयास आनंद वाटतो की ह्या साईटच्या माध्यमातून आज बरेच चांगले उपक्रम सुरु आहेत. माझी एक सुपीक डोक्याची मैत्रीण स्वप्ना (स्वप्ना हवालदार, बालमोहन) हिने साईटच्या संकल्पनेत आणि मांडणीत विशेष मेहनत घेतलेय.

एकंदर काय आपल्या सगळ्यांना मिळून भारत घडवायचाय. वाट दिसतेय, वाटाड्याही आहे मुद्दा इतकाच की आपण कितपत प्रतिसाद देतो.. आशा अमर आहे.

हम होंगे कामयाब एक दिन
मन मे है विश्वास
पुरा है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन..

जय हिंद!

No comments: