<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372</id><updated>2012-01-25T11:25:13.743-05:00</updated><title type='text'>उपास, मार आणि उपासमार..</title><subtitle type='html'>सर्वेsपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखमाप्नुयात</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>44</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-6745751621704932986</id><published>2011-03-26T12:54:00.004-05:00</published><updated>2011-03-26T13:07:58.979-05:00</updated><title type='text'>एदिऒस अमेरिका..</title><content type='html'>गेले कित्येक दिवसांच्या धावपळीनंतर आज प्रवास करताना निवांतपणा मिळालाय, म्हटलं नुवार्क इंटरनॆशनल एअरपोर्टवर बसलोय शांत तर मन मोकळं करावं. काही वर्षांपूर्वी डॆलस सोडून कोलंबियाला येताना मी इथेच &lt;a href="http://upasanip.blogspot.com/2008_11_01_archive.html"&gt;’ऎदिऒस डॆलस’ &lt;/a&gt; असा ब्लॊग लिहिला होता, आज काहीसं तसच वाटतय ’ऎदिऒस अमेरिका’ म्हणताना. &lt;a href="http://upasanip.blogspot.com/2010/01/blog-post.html"&gt;’कुण्या देशांचं पाखरु.. ’&lt;/a&gt; ह्या माझ्या ब्लॊग मध्ये अमेरिकेत राहायचं की ती सोडायची ह्याचा उहापोह मी मागे केला होता, आणि त्याचीच परिणिती आज अमेरिका सोडून ’स्चेच्छेने स्वदेश’ स्विकारताना झालेय. अमेरिका सोडून भारतात परतलोय म्हणजे काही तीर मारले नाहियेत हे नक्कीच आणि अमेरिकेने व्यक्तिश: मला इतकं दिलय की ह्या देशाविषयी मला कायम आदरच आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;’या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या..’ हे कायम लक्षात होतंच, आपल्या आईवडलांच्या आयुष्यातल्या ’जाहल्या तिन्हीसांजा’ ना, कातरवेळी त्यांच्या बरोबर राहायची इच्छा हे एक महत्त्वाचं कारण असलं तरीही कुटूंबाचा विचार करता मुलाचं शिक्षण भारतात करणं, बायकोच्या करिअरचा विचार करणं ह्या ही गोष्टींचा विचार केला होताच. त्यामुळे इथलं सगळं सोडून परत जायचं हे नक्की होतंच, प्रश्न होता की परत जाण्याची योग्य वेळ कोणती.. आणि आता तो ही प्र्श्न सोडवला. ’Point of no return’ ला पोहोचण्यापूर्वी, इथल्या इमिग्रेशनच्या चक्रातून बाहेर पडलोय ह्याचं आज समाधान आहे. ह्या निर्णयाच्या दोन्ही बाजूंनी संमिश्र प्रतिक्रिया आम्हाला मित्र-मैत्रिणींकडून मिळाल्यात, त्यामुळे बघू तिकडे गेल्यावर कसं रुळतोय ते, सध्या काही विचार करत नाहीये. दोन बॆग्स घेऊन आलोय आणि दोन बॆग्स घेऊन परत जायचं हे कायम डोक्यात असल्याने आवराआवरी करताना तसं सोप्पं गेलं. गाडी विकताना, भांडीकुंडी देऊन टाकताना किंवा चक्क फेकून देताना थोडं जड झालचं पण तिकडचे वेध लागल्याने निर्मोही वृत्तीने मोकळंही होता आलं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;बरं, पण मग असं निवांत बसलो की काय दिलं अमेरिकेने इतक्या वर्षात हा विचार मनात येतोच आणि मग अगदी लहान सहान गोष्टींचा जमाखर्च मांडणारी वृत्ती डोकं वर काढते. काही महिन्यांसाठी, केवळ व्यावसायिक अनुभवासाठी इथे अमेरिकेत येण्याचं खूप वर्षांपूर्वी जे ठरवलं ते इथे आल्यावर लगेचचं पुसलं गेलं. जगाच्या दुसया टोकावर लोकं कशी राहतात, वागतात, विचार करतात हे पाहून खूप काही शिकायला मिळणार इथे, आचार - विचार बदल होणारच हे लगेच कळून चुकलं. स्वावलंबन, हिशोबी वृत्ती, पैशाची किंमत ह्यांच महत्त्व लगेच लक्षात आलं. बघता बघता आर्थिक उद्दीष्टे वाढत गेली आणि ती साध्य करण्यासाठी वेग वाढवला गेला, स्वत:त सुधारणा होत गेली, अगदी न कळतच. आपल्यातलं चांगलं बाहेर येण्यासाठी अमेरिका कशी मदत करते हे इथेच जाणवलं. अमेरिका एक पर्यटक म्हणून काना-कोपयांतून फिरुन झालीच पण अमेरिकन मित्र मैत्रिणीही झाल्या खूप आणि त्यातून सांस्कृतिक देवाण-घेवाणसुद्धा. बॆचलर तसच मॆरिड लाईफ अमेरिकेत पुरेपुर जगल्याने दोन्ही प्रकारच्या आयुष्याचा अनुभव इथे मिळाला. एकमेकाला धरुन असलेली भारतीय माणसे, महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून एकत्र जोडली गेलेली मराठी मने आणि मग  (विकेडला का होई ना) साजरे होणारे सण-वार आणि पुढच्या पिढीकडे मराठी भाषा, भारतिय संस्कृती पोहोचवण्याची धडपड सगळं सगळं जवळून अनुभवता आलं. विशेषत: न्यू जर्सी, डेलस मध्ये  दिग्गजांच्या शास्त्रिय संगिताच्या मैफिली ऐकण्याचे जे योग आले ते सगळे कौटुंबिक सोहळेच असायचे, कायम स्मरणात राहातील असे. तारुण्याचा बराच काळ अमेरिकेत आयुष्य घडवण्यात गेलाय ह्याची जाणीव आहे आणि जी संधी मिळाली तिचा सुयोग्य वापर करता आला ह्याचं समाधानही आहे. मायबोली, मिसळपाव, माझा ब्लॊग, ठिकठिकाणची महाराष्ट मंडळे, ब्रेकफास्ट क्लब्स, नेटवर्किंग इवेंट्स ह्यांच्या माध्यमातून अमेरिकेत अनेक त्रुणानुबंध जुळले. फेसबुक, लिंक्ड-इन च्या माध्यमातून संपर्क राहाणार आहेच, मी फक्त एक इ-मेल, एक फोन कॊल किंवा एक स्क्रॆप लांब आहे इतकंच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अमेरिकेत, साधारण आठ वर्षांच्या अनुभवाने मी ठाम सांगू शकेन की - सार्वजनिक स्वच्छता, प्रदूषण मुक्त शुद्ध हवा, सुरक्षा, सार्वजनिक सभ्यता, शिस्त, दुसयाच्या स्वातंत्र्याचा आदर करण्याची वृत्ती, धर्म/देश/भाषे पलिकडॆ व्यक्ती म्हणून तुमची इतरांना आणि इतरांची तुम्हाला असलेली ओळख, सामान्य माणसापर्यंत न पोहोचलेली लाचखोरी, कायद्याचा वचक आणि अमंलबजावणी, पुरेशी वेगवान न्यायव्यवस्था, तुमच्या शिक्षणाचा/ कौशल्याचा/ द्न्यानाचा सर्व स्तरांतून आदर आणि त्यातून मिळणाया संधी, 'Survival of the fittest' ह्या उक्तीला सार्थ ठरवणारी कठीण प्रसंगात तुमची लागणारी कसोटी आणि त्यातून मिळणारे जीवन-शिक्षण अशा हिरव्या नोटांमध्ये न मोजता येणाया बयाच गोष्टी मला अमेरिकेत मिळाल्य़ा. त्याचबरोबर कामाच्या वेळा आणि घरात तसेच स्वत:च्या आवडी निवडी साठी देता येणारा वेळ ह्याची सर्वसाधारणपणे उत्तम सांगड घालता आल्याने ’मला काय हवंय?’, ’मला काय करायचय?’ ह्या प्रश्नांचा विचार करत आत्मपरिक्षणास पुरेसा वेळ मिळत गेला. ह्या मिळालेल्या वेळात अतिरीक्त वाचन, लिखाण, थोडीशी आध्यात्मिक साधना करता आल्याने वेळेचा सदुपयोग केल्याचं समाधान नक्कीच आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग इथून पुढे काय? आयुष्याच्या ह्या वळणावर अमेरिकेतल्या अनुभवाची शिदोरी वापरून भारतात संधी, रोजगार निर्माण करण्याच्या दृष्टीने काही करता येईल का हे बघायचा विचार आहे. ’सुपंथ’ च्या माध्यमातून गेले दोन वर्षे सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीचं काम आम्ही करतोय त्याबाबतीत पुढे काय करता येईल हे बघायचय. एका नव्या जीवनशैलीला सुरुवात करताना मी ह्याक्षणी प्रचंड उत्सुक आहे हे नक्की.. शुभं भवतु !! :-)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-6745751621704932986?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/6745751621704932986/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=6745751621704932986' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/6745751621704932986'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/6745751621704932986'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2011/03/blog-post.html' title='एदिऒस अमेरिका..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-4967913086989911241</id><published>2011-02-06T23:00:00.016-05:00</published><updated>2011-02-06T23:41:39.374-05:00</updated><title type='text'>आठवणीतला पाऊस..</title><content type='html'>गेले चार दिवस इथे पाऊस कोसळतोय, अगदी लागूनच राहिलाय. वर्षातले फक्त नेमके चार महिने मोसमी पाऊस बघण्याची सवय असणाया माझ्यासारख्या पक्क्या मुंबईकराला इथला बारमाही पाऊस कायम औत्स्युकाचा विषय. काल थोडा निवांतपणा होता तर खिडकीसमोर खुर्ची टाकून पावसाचा तो हैदोस बघत बसलो एकटक. समोर तलाव आहे त्यावर आदळ आपट करीत झाडांशी झोंबत मस्त चिंब कोसळत होता. खिडकी उघडली पावसाचे दोन थेंब अंगावर घ्यावेत म्हणून आणि अशी काही थंड झुळूक आत आली की माझ्या सकट खुर्चीही शहारली. म्हणजे पावसासकट थंडी आणि ती सुद्धा सुसाट आहे तर, गाराच पडत असणार म्हणजे असं पुटपुटत पुन्हा खिडकी लावून घेतली. दंगा करायचाय पण आईने दटावलेलं शहाणं मुल कसं निपचित घरात बसून निरागस डोळ्यांनी लांबच्या खेळाकडे बघत राहील, तसा कित्येक वेळ बघत होतो. हेच आवडत नाही मला इथल्या पावसाचं, येतो तेव्हा अशी सणसणीत थंडी घेऊन येतो की बस्स. शिवाय फ्लू होईल, त्यात कामाचा व्याप, तब्येत सांभाळायला हवी असं काही बाही डोक्यात येतं आणि भिजण्याचा मूडच जातो यार..&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग अशावेळी करायचं काय, भज्यांचं पीठ, थालिपीठ किंवा बटाटे वडे, छे! तळणीचा कंटाळा आलाय.. मग फक्त आल्याचा फक्कड चहा केला. घोट घोट चहा घेत त्या बेभान पावसाच्या धारांबरोबर मी कधी प्रवास सुरू केला माझ्या दक्षिण मुंबईच्या पावसाच्या दिशेने कळलं सुद्धा नाही.. ’ये रे ये रे पावसा..’, ’सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?” ने सुरुवात आपल्या प्रत्येकाच्या लहानपणात हा पाऊस आलेला असतोच.. त्यातच ’थेंबा थेंबा थांब थांब, दोरी तुझी लांब लांब.. आभाळात खोचली तिथे कशी पोचली..’, ’आला आला पाऊस आला’, ’ए आई मला पावसात जाऊ दे’ अशी बालगीते पावसाशी जवळीक वाढवतातच. जगात कुठेही आणि कितीही पाऊस पाहिला तरी माझ्या मुंबईतल्या ’पावसाची सर’ कुठे नाहीच असं मला नेहमीच वाटतं. आत्तासारखं कैक वेळा त्याने मला नोस्टेल्जिक केलय. किती प्रकार ह्याचे.. कधी वळीवाचा, कधी दडी मारुन बसणारा रगेल, कधी आषाढाचा धोधाणा, कधी नुसतीच ढगांची आरडाओरडी, कधी ऊन पावसाचा श्रावणातला इंद्रधनुषी खेळ, कधी गणपतीतल्या मांडवाच्या ताडपत्र्यांवर तडातडा वाजणारा ताशा, कधी दिवाळीतले कंदिलही भिजवणारा.. किती वैविध्य.. भरंतीची वेळ साधून आला की मुंबईत पाणी साचलच समजा. ह्या साचलेल्या पाण्यात होड्या सोडण्यात, पावसात फुटबॊल, क्रीकेट, व्हॊलीबॊल खेळण्यात मजाच वेगळी, आणि हो, पाऊस पडत असताना पोहायची जी काही धमाल आहे ना ती कशात नाही राजा.. ह्या पावसाळ्यात मुंबईच्या आसपास धबधबे वाहू लागले की पावसात ट्रेक करण्याची एक निराळीच धमाल. कॊलेजमधल्या दिवसात आणि त्यानंतरही तुंगारेश्व्वर, पांडवलेणी, भीमाशंकर, माळशेज, पळसदरी असे कितीतरी पावसाळी ट्रेक आणि सहली केलेल्या आठवतायत. मुंबई-पुणे खंडाळ्याच्या घाटातून पावसात केलेला प्रवासही अजूनही सुखदच वाटतो. आपल्या ओल्या लाल मातीचा वास हे उत्तम टॊनिक आहेच जीवनरस प्रफुल्लित करायला हे खरंच!&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुंबईत असा पाऊस भरून आला की दोन खांबांच्या इथून मरिनलाइन्सला समुद्राकाठावर चालत जायच नरिमन पॊईंटच्या दिशेने.. खळाळता समुद्र, सोसाट्याचा वारा.. हातात भाजलेलं कणीस.. छत्री उघडायचा विचार सुद्धा आला अशावेळी मनात म्हणजे अरसिकतेचा कळसच, तसही वारा तुम्हाला ती मिटायला लावणारच.. अंगावर लाटा झेलत आणि पाऊस घेत मनसोक्त भिजायचं.. निसर्गाचं तांडव सुरु असेल तर ते रसरसून उपभोगायचं.. बस्स! मी काय म्हणतोय ह्याची थोडी तरी कल्पना हा खालचा विडीओ पाहून येईल.. माझं आवडतं गाणं तर आहेच पण माझी लाडकी मुंबई चिंबचिंब दाखवलेय म्हणून अजूनच :) मुंबईचा पाऊस हे असं अजब रसायन आहे..&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;iframe title="YouTube video player" width="480" height="390" src="http://www.youtube.com/embed/cmD6GfZgKX8" frameborder="0" allowfullscreen&gt;&lt;/iframe&gt;&lt;br /&gt;रिमझिम गिरे सावन.. सुलग सुलग जाये मन..&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाडगावकरानी ह्या मुंबईच्या पावसाचं यथार्थ वर्णन केलय. मला हे त्यांच्या ’तुझे गीत गाण्यासाठी’ ह्या कॆसेट मध्ये मिळालं दहा एक वर्षापूर्वी आणि कायम स्मरणात राहिलं..&lt;br /&gt;&lt;table border="1"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;br /&gt;&lt;td&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पाऊस आला..&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;/td&gt;&lt;td&gt;&lt;br /&gt;&lt;td&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;असाही पाऊस&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;/td&gt;&lt;br /&gt;&lt;/tr&gt;&lt;br /&gt;&lt;tr&gt;&lt;br /&gt;&lt;td&gt;&lt;p&gt;पाऊस आला पाऊस आला&lt;br /&gt;पाऊस आला घरांवर, पाऊस आला स्वरांवर.. पाऊस आला नाचणाया मोरांवर.. पाऊस आला.. &lt;/p&gt;&lt;p&gt;वायाच्या श्वासाचा, मातीच्या वासाचा, हिरव्या हिरव्या ध्यासाचा..&lt;br /&gt;करीत आला वेड्याचा बहाणा.. पाऊस आला आतून आतून शहाणा..&lt;br /&gt;पाऊस आला कृष्णाच्या रंगाचा.. राधेच्या उत्सुक उत्सुक अंगाचा..&lt;br /&gt;पाऊस आला गोकुळ्यातल्या माळावर.. पाऊस आला यशोदाच्या भाळावर..&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;पाऊस आला उनाडणारा सोवळा.. पाऊस आला पालवीसारखा कोवळा..&lt;br /&gt;येथै येथै पाऊस आला, तेथै तेथै पाऊस आला, ताथै ताथै पाऊस आला..&lt;br /&gt;फुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला.. झुलण्याचा उत्सव होऊन पाऊस आला..&lt;br /&gt;पावसाने ह्या जगण्याचा उत्सव केला.. आणि पावसाने ह्या मरण्याचाही उत्सव केला..&lt;br /&gt;जगणं आणि मरणं, बुडणं आणि तरणं.. ह्याच्या पल्याड कुठेतरी हा पाऊस आला..&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;पाऊस आला याद घेऊन.. ओली चिंब साद घेऊन..&lt;br /&gt;बाहेर जरी ढगातून पाऊस आला, खरं म्हणजे.. आतून आतून पाऊस आला.. पाऊस आला..&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;- मंगेश पाडगांवकर&lt;/td&gt;&lt;td&gt;&lt;br /&gt;&lt;td&gt;&lt;p&gt;बडबडत उनाडत पाऊस येतो धपाधपा कोसळत&lt;br /&gt;सामोरा, सैरावैरा, अस्ताव्यस्त.. &lt;/p&gt;&lt;p&gt;त्याला नाही मुळीच सोसत कोणीही त्याच्याखेरीज लक्ष कुठे दिलेले &lt;/p&gt;&lt;p&gt;पाऊस महासोंगाड्या.. राहतो उभा देवळापुढल्या फुटपाथवर भाविकपणे, पुटपुटत करु लागतो नाम-जप श्रद्धेने..&lt;br /&gt;आणि मग अकस्मात खो खो हसत, लगट करतो एखाद्या नाजूक रंगीत छत्रीशी.. &lt;/p&gt;&lt;p&gt;झाडांना झोंबत येतो, पारंब्याना लोंबत येतो..&lt;br /&gt;डोंगराची उशी घेतो, नदीला ढुशी देतो&lt;br /&gt;शाळेपुढल्या गल्लीत पाऊस, नव्यानेच सायकल शिकतोय तसा वाटतो&lt;br /&gt;वैतागला मिशीदार हवालदार तसा पाऊस कधी कधी घोगया सुरात डाफरतो&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;मुंबईतल्या भैय्यासारखा पाऊस कधी दूर उत्तरप्रदेशातल्या बायकोची याद होऊन उदास होतो&lt;br /&gt;एकसुरी आवाजात एकटा एकटा तुलसीचे रामायण गाऊ लागतो..&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;पाऊस माझ्या खिडकीत येतो, सपशेल नागडा.. कमीत कमी लंगोटी.. तिचा सुद्धा पत्ता नसतो&lt;br /&gt;हुडहुडी भरल्यासारखी माझी खिडकी थडाथडा वाजू लागते&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;&lt;/span&gt;&lt;/p&gt;&lt;p&gt;सपकारत खिडकीतून तो मला म्हणतो,&lt;br /&gt;"उठ यार, कपडे फेक, बाहेर पड,.. आजवर जगले ते कपडेच तुझे, एकदा तरी चुकून तू जगलास काय?&lt;br /&gt;बाहेर पड, कपडे फेकून बाहेर पड.. गोरख आया, चलो मछींदर गोरख आया.."&lt;br /&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;- मंगेश पाडगांवकर&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;गौरी-गणपती, दिवाळी, होळी, संक्रांत असे सणवार जसे दरवर्षी ठरल्याप्रमाणे, ठरल्या वेळी येतात तसाच आपल्यासाठी हा मुंबईचा पाऊस.. दरवर्षी मे च्या शेवटी येऊन उकाड्यावार उतारा देणारा.. एक वार्षिक उत्सवच.. आणि माहेरपणाला आलेल्या लेकुरवाळीसारखा चार महिने मुक्कामालाच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हा इथला कोलंबियातला कालचा पाऊस पाहाताना पाणी पाणी झालं ह्या आठवणींच्या डुबक्यांमध्ये.. आणि अशावेळी जगजीत नेहमीसारखा धीर गंभीर आर्त स्वरात धावून आलाच..&lt;br /&gt;&lt;br /&gt;ये दौलत भी लेलो.. ये शोहरत भी लेलो&lt;br /&gt;भले छीन लो मुझसे मेरी जवानी..&lt;br /&gt;मगर मुझको लौटा दो बचपन का सावन&lt;br /&gt;वो कागज की कश्ती.. &lt;strong&gt;वो बारीश का पानी.. &lt;/strong&gt;&lt;br /&gt;वो कागज की कश्ती.. &lt;strong&gt;वो बारीश का पानी.. &lt;/strong&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-4967913086989911241?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/4967913086989911241/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=4967913086989911241' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/4967913086989911241'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/4967913086989911241'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2011/02/blog-post.html' title='आठवणीतला पाऊस..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://img.youtube.com/vi/cmD6GfZgKX8/default.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-3712549112222879947</id><published>2010-12-18T00:14:00.003-05:00</published><updated>2010-12-18T11:54:40.771-05:00</updated><title type='text'>आमची शाळा, आमचे शिक्षक..</title><content type='html'>विचारांच्या तंदरीत असताना, आज एकदम काहीतरी झालं आणि शाळेचे दिवस आठवले.. आणि मग ते लहानपण, शाळा, आजी, माऊ-बाबा, शेजारच्या टिळक मामी, बंडू मामा आणि बरच काही काही... जुने दिवस आठवले की एक हुरहुर लागते, गोड नॊस्टेल्जिया सतावतोच.. मग आठवणींच्या ह्या मोहजळात किती डुबक्या मारल्या तरी समाधान होत नाहीच, दर वेळा तळाला वेगळाच मोती मिळतो. कसं अजब आहे ना हे सगळं.. कित्येक वर्षापूर्वी घडलेल्या गोष्टी बारीक तपशीलासह अशा नजरेसमोर येतात, अगदी अनलिमिटेड स्टोअरेज आणि किती जोरदार अनुक्रम लावलाय त्याचा इवल्याश्या मेंदूनं, काही क्षणात त्या मन:पटलावर येतात सुद्धा, चक्क धक्काबुक्की करत गर्दी करतात मुंबईतल्या रेल्वेच्या डब्यासारखी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;  चिकीत्सक शाळेतल्या छोट्या शिशुतल्या प्रवेशाचा हा प्रसंग. मला चांगलाच आठवतोय. रांगेत उभं राहून अगदी फॊर्म वगैरे आणला होता, तेव्हा मुलाखत की काय माहित नाही पण मला आईबरोबर एका खोलीत बोलावलं आणि बाईंनी काहीतरी प्रश्न विचारला. मी आपला औत्स्युकाने सगळ्या खोलीतल्या गोष्टी न्ह्याहाळतोय. टेबलावर एक खेळण्यातला पिंजरा आणि त्यात पोपट ठेवला होता. आठवत असेल तर बयाच ठिकाणी दारावरच्या बेलसाठी तो पूर्वी वापरायचे, म्हणजे बेल वाजवली की हा पोपट ’विठू विठू’ करणार. तर त्यावेळी तो पोपट आणि पिंजरा मला इतका आवडला की मी कुठल्याही प्रश्नाच उत्तर न देता, तो पिंजरा घेऊन तेथून बाहेर जो धुम्म पळालो की बस्स! अर्थातच आमच्या व्रात्यपणामुळे पुढे काय वाढून ठेवलय हे बाईंच्या लक्षात आलं असावं आणि साहजिकच त्यावर्षी शिशु वर्गात प्रवेश मिळाला नाही. माझं वर्ष आता वाया जाणार की काय अशा चिंतेत असतानाच, गिरगावात त्याच वर्षी जयाताईंनी (रेळेकर) शिशु वर्ग सुरु केल्याचं बाबांना कळलं आणि मग त्यांच्या शिशु निकेतनचा मी पहिला विद्यार्थी झालो. तिथून मला शाळा ह्या प्रकाराची आवड निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही (श्रेय जयाताईंनाच). थोडं असही आठवतय की त्याआधी (बहुधा घरी खूप्पच त्रास देत होतो म्हणून ) मी देवभुवन मध्येही काही दिवस डबा खायला जायचो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;  असो, तर पहिलीला पुन्हा प्रवेशासाठी अर्ज करुन (आणि मी मागच्यावेळसारखा पुन्हा गोंधळ करणार नाही असा सज्जड दम खाऊन) चिकित्सक समूहाच्या पोतदार प्राथमिक शाळेत प्रवेश करता झालो. पहिली, दुसरी दुपारचे वर्ग असायचे, एका सुरात आम्ही कविता म्हणताना, गाताना जो ताल असायचा तो अजून कानात घुमतोय. पुतळ्याच्या मागचाच वर्ग होता आमचा. अगदी तिसरी पर्यंत हा पुतळा कोणाचा हे तिथे नाव लिहिलेले असूनही (श्री. पोतदार) मला कळले नाही बहुतेक. पगडी घातलेले एकमेव पुरुष पुतळ्याच्या रुपात माहिती होते ते म्हणजे लोकमान्य टिळक. शाळेतल्या प्रत्येक वर्गात असलेल्या वीणाधारी, मोरावर बसलेल्या सरस्वतीचा फोटॊ हे त्याकाळातलं अतिशय आकर्षण. वर्ग सुरु होताना सुरुवातिला जी प्रतिद्न्या आणि मग जन-गण-मन म्हणायचो त्यातून जे भारलेलं वातावरण निर्माण व्हायचं त्याची तुलना फक्त सार्वजनिक गणेशोत्सवात गुरुजींनी केलेल्या सामूहिक मंत्रोच्चाराशीस होऊ शकेल. शाळा संपताना वंदे मातरम, अहाहा काय वर्णावा तो सोहळा पारणे फिटे कानांचे! त्यातला तो ’जाड्या’ शब्द मला आजपावेतो कळला नाही. पहिलीच्या वर्गात्तील ’फुलपाखरु छान किती दिसते’ हे तर अजून आठवतेय मला, गाण्याच्या आंतरकरबाईंनी शिकवलेल्य हावभावासहित. दुसरीत असताना आम्ही दिंडी काढली होती तेव्हा वारकयांच्या वेषभूषेतला फोटॊ जपून ठेवलाय अजून :) तेव्हा प्राथमिक शाळेच्या सहली नॆशनल पार्क, तानसा वैतरणा अशा गेलेल्या आठवतात. शाळेत शिरतानाच प्रवेशद्वाराजवळ एक फळा आहे. त्यावर सुविचार आणि मग प्रदर्शने, आंतरशालेय स्पर्धा, नाटके ह्यात बक्षिसे मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे नाव लिहिले जायचे. वर्षानुवर्षे तेच वळणदार अक्षर. फळ्यावर नाव लागणे म्हणजे अटकेपार झेंडा, अगदी अभिमानास्पद गोष्टच. तिसरीमध्ये असताना ऐन परीक्षेच्या धामधुमित म्हणजे मार्च मध्ये माझी मुंज झाल्याचे आठवतेय. बयाच जणांची त्यावर्षी मुंज झाली होती, तुळतुळीत गोटे करुन शाळेत बिचकत यायचो तेव्हा वेगळंच वाटायचं. माझा वाढदिवस मे मध्ये असल्याची मला कायम बोच होती. एकतर वाढदिवसाच्या दिवशी गणवेशा व्यतिरीक्त छान छान ड्रेस घालायची चैन, मग तुमचा वेगळा ड्रेस बघून तुम्हाला त्या दिवशी असलेला स्पेशल भाव असलं काही मिळायचं नाही मला. तसच वाढदिवसाच्या दिवशी शाळेत गिफ्टपण वाटता यायची नाहीत कधी, एकेकाचे नशीब! चौथीचं शिष्यवृत्तीचं वर्ष. जयकर बाईंनी विशेष मेहनत घेतली तेव्हा आमच्यावर. सकाळी साडेसहाला मोजक्या मुलांसाठी जास्तीचे वर्ग घ्यायच्या बाई. कष्टाचं चीज झालं आणि मिळाली स्कॊलरशीप. तेव्हा पेपरात फोटो आलेला जपून ठेवलाय, त्यावेळी आजीच्या चेहयावरचं कौतुक अजून आठवतय. &lt;br /&gt; &lt;br /&gt;  प्राथमिक शाळेतली ही वर्ष भुर्रकन उडून पाचवीत आलो आणि हुशार मुलांची ’क’ तुकडी असायची त्यावेळी शाळेत, त्यात येऊन पोहोचलो. ’क’ तुकडी साठी एन.सी.आर.टी. असल्याने तेव्हाच भौतिक आणि रसायनशास्त्राशी ओळख झाली,   तसच इंग्लिशही शिकणं सुरु झालं. पाचवी मध्ये प्राविण्य आणि प्रद्न्या ह्या गणिताच्या परीक्षा उत्तीर्ण झालॊ आणि सहावीला बालवैद्न्यानिकसुद्धा. ह्या दोन तीन वर्षात टीळक विद्यापीठाच्याही काही परिक्षा दिल्या, का दिल्या माहिती नाही! पाचवीपासून मी शाळेत दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमात (त्याला आम्ही गॆदरींग म्हणत असू) भाग घेत असे. दीड एक महिना आम्ही सराव करत असू. कधी बेडेकरांच्या गच्चीत तर कधी कुणाच्या घरी. 'डोल डोलतय वायावर बाय माझी' ह्यावर कोळी नाच, 'ए नाम रे सबसे बडा रे तेरा नाम उचे शेरोवाली' ह्यावर गरबा तसच 'डोगराचे आडून एक बाई' ह्यावर असे नाच बसवलेले आठवतायत. मयुरी पालेकर आमचे नाच बसवायची. डिसेंबर महिना आला की मग स्पोर्ट्स आणि शाळेतल्या विद्न्यान प्रदर्शनाची धामधुमही असायची. वर्गाच्या लंगडीच्या टीममध्ये मी असायचो नेहमी. माझा एखादा प्रोजेक्ट असायचाच प्रदर्शनात. बक्षिसाच्या आशेने नव्हे तर माहिती व्हावी, चौकसपणा यावा, सभाधीट पणा यावा ह्यासाठी भाग घ्यायलाच हवा असा आजीचा कटाक्ष असे. मरीन लाइन्सच्या मैदानात आमचे तीन दिवस स्पोर्ट्स असायचे. मी कधीच खेळात चमकलो नाही पण हे तीन दिवस म्हणजे धमाल असायची नुसती. एकीकडे शाळेत ही धामधुम सुरू असताना संक्रांतीचे वेध लागलेले असायचे. पतंगासाठी जीव टाकायचो अगदी.. वाईट्ट म्हणजे वाईट्ट वेड होतं (अजूनही आहे!) आणि शाळेत तिळगूळ समारंभ असायचा. मग आम्ही सगळी मुलं वर्ग सजवून तिळगूळ वाटायचॊ, खायला आणायचो, फिशपॊंड द्यायचो. मुले-मुली एकत्र असल्याने एक वेगळीच मजा असायची त्या वयांत, त्या दिवसांत..&lt;br /&gt;&lt;br /&gt;  शाळेला खाली पटांगण, मागच्या बाजूला अंगण आणि सगळ्यात वरती मोठ्ठी गच्ची. तिसया मजल्यावर वागळे सभागृह आहे. त्यात कितीतरी जणांच्या हातून बक्षिस घेण्याचा आणि कित्येकांची भाषणं ऐकायचा योग आला. पाचवी पासून वक्तृत्व स्पर्धात भाग घ्यायचो तेही आठवतेय. टिळक पुण्यतिथीनिमित्त एक ऒगस्टला स्पर्धा असायच्या. पण एकूणात वक्तृत्वात मी मागेच असायचो (आमचे उद्योग पडद्यामागचे)! सातवी पुन्हा शिष्यवृत्तीच वर्ष, त्यात गोट्या, पतंग आणि क्रीकेट मुळे पुढे काय अशी घरच्यांना काळजी असतानाच, शिष्यवृत्ती मिळाली, नंबरही बराच वरचा आला. मिळणारी रक्कम अगदी दहा-पंधरा रुपये असायची महिन्याला पण ती घ्यायला बोलावलाय खाली ऒफिसात अशी नोटीस आली वर्गात किती एकदम ढॆंट्डढॆंड वाटायचं. मग आठवीत पुन्हा प्राविण्य आणि प्रद्न्या मिळवून बालवैद्न्यानिक उत्तीर्ण झालो. तेव्हा रुपारेल मध्ये बी.टी.एस. चे वर्ग भरायचे, त्यात मात्र मी रमलोच नाही विशेष. पण दर शनिवारी रेल्वेने माटुंग्याला जायचॊ, मजाच. त्यावेळीच मुंबईतल्या हुशार विद्यार्थ्यांच्या ओळखी झाल्या (अमित पटवर्धन, जो आमच्या ९३ च्या बॆचमध्ये गुणवत्ता यादीत पहिला आला तो इथेच मित्र बनला). बालमोहन, पार्लेटिळक, चोगले हायस्कूलच्या माझ्या बॆचच्या बयाच हुशार मुलांच्या इथे ओळखी झाल्या. आठवीत आमचा वर्ग होता त्यात सांगाडा होता कपाटात कोपयात ठेवलेला. प्रयोगशाळेच्या बाजूचा हा वर्ग, सापळ्याचा वर्ग म्हणायचो त्याला. बेफाम मस्ती, इतकी की एकदा वर्गातल्या ३० मुलांपैकी २८ जणांना शाळेतून बाहेर काढले होते, कारण काय तर कागदी रॊकेट बनवून उडवणे. तरीही, पुढे एकदा कागद दुमडून ते रबरबॆंडमध्ये अडकवून जोरात मारणे आणि त्याने बेंचवर उड्यामारत युद्ध खेळणे ह्यावरुन बराच प्रसाद खाल्लेला आठवतो. आठवीत असताना आम्ही कुमार कला केंद्रातर्फे घेण्यात येणाया आंतरशालेय स्पर्धेत ’तमसो मा ज्योतिर्गमय’ नाटक बसवलं होतं, शिंदेबाई सर्वेसर्वा त्या नाटकामागे. अखिल मुंबईत प्रथम क्रमांक मिळवला, कौस्तुभ सावरकरनं त्यात जोतिबाचं काम केलं होतं. आठवीमध्ये आंतरशालेय विद्न्यान प्रदर्शनातही बक्षिस मिळालं होतं. परेश वैद्य (आमच्या मागच्या म्हणजे ९४ च्या बॆचमद्ये मुंबईत गुणवत्ता यादीत प्रथम) बरोबर ह्या प्रदर्शनात मांडलेल्या प्रकल्पावर आणि कुमार कला केंद्राच्या नाटकात कामही केल्याचं आठवतय. खूप शिकायला मिळालं ह्या काळात बरोबरीच्या मुलांकडून. माझ्याबरोबरची बहुतेक मुलं ह्यावेळी तबला, पेटी किंवा मग तालमीत व्यायाम असं काहीतरी शिकत असताना माझ्या मात्र सर्रास उनाडक्याच चालू होत्या ह्या दिवसांत, नाही म्हणायला वाचनाची गोडी लागली मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामुळे. तेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही शाळेत सकाळी सहाला बॆडमिंटन खेळत असू. आठवी आणि नववी एन.सी.सी. चं वर्ष. उंची चांगली असल्याने मी एअरविंग मध्ये निवडलो गेलो पण तासन तास परेड करण्यात आणि जड बूट पायात घेऊन उन्हात फिरण्यात मला रस नसायचा. पण तरीही कडक पॊलिश असलेले बूट, स्टार्च केलेला तो निळा ड्रेस, बिल्ला असलेली टोपी असा मोठा रुबाब असायचा. ते कपडे धुवायला सुद्धा आम्हाला वॊशिंग अलाउन्स मिळायचा. नववी मध्ये आम्ही अंबरनाथला एन.सी.सी. च्या कॆंपला गेलो होता. घरापासून दूर, फक्त मित्रांसोबत आठ दिवस राहाण्याचा माझ्या (आणि बरोबरच्या जवळजवळ प्रतेकाच्या) आयुष्यातला पहिला प्रसंग. सकाळी पाच वाजता उठून आवरून परेड ते रात्री दहा पर्यंत दंगा चालूच. इतकं असूनही घरच्यांची आठवण यायचीच. विनायक पंडितने तबलावादनाने आणि मी आंतरशालेय चेस मधे अशी दोन पदक कॆंपमध्ये शाळेला मिळवून दिल्याचं आठवतय. &lt;br /&gt;&lt;br /&gt;  पुढे दहावीच वर्ष सुरु झालं आणि शाळा, क्लास ह्यांच वेळापत्रक सांभाळताना तारांबळ व्हायला लागली. गोडबोले सरांचा दादरला व्हेकेशन क्लास असायचा तेव्हा. इतरही क्लास होतेच. शाळेत सगळ्याच शिक्षकांनी मेहनत घेतली आमच्यावर. अभ्यासाच्या नादात दहावीच वर्ष कधी गेलं कळलंच नाही. तसं सेंड ऒफच्या वेळी थोडं जड वाटलं होतच पण एकतर येऊ घातलेल्या परिक्षेचं टेंशन आणि पुढच्या कॊलेज जीवनातल्या स्वातंत्र्याची ओढ त्यामुळे तेव्हा ते विशेष जाणवलं नसावं. आता मागे वळून पाहाताना, सगळं लख्ख दिसतय. इतके कसे मोकळे झालो शाळेपासून पटकन ह्याचं आश्चर्य वाटतय.&lt;br /&gt;&lt;br /&gt;  शाळेचा फोटॊ ठेवलाय माझ्या ओर्कुटवरच्या अल्बम मधे. कुणितरी म्हटलं, हे काय किती वर्षात रंग काढला नाहीये शाळेला! अरे हो खरंच की, पण मला कसं खटकलं नाही हे, कदाचित शाळेचं अंत’रंग’, तिची माया अनुभवली असल्याने तिच्या बाहेरच्या रंगाकडे, दिखाऊपणाकडे लक्षच गेलं नसावं. खरं सांगायचं तर, जगात कुठेही गेलो तरी मनाच्या कुपीत लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत आणि एखाद्या निवांत क्षणी ज्या मोराच्या पिसांर्या सारख्या फुलून समोर येतात त्यात ह्या शाळेतल्या वर्षांच्या (की भुर्रकन उडालेल्या क्षणांचा!) मोरपिसांचा मोठ्ठा वाटा आहे. ’मज आवडते मनापासूनि शाळा, जशी माऊली लळा लाविते बाळा’ ह्याचा तंतोतंत प्रत्यय.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सहज मनात आलं की शाळेतल्या प्रत्येक इयत्तेच्या वर्गशिक्षकांची नावं आठवतायत का पहावं आणि गंमत म्हणजे ती आठवली सुद्धा.. मलाच खूप प्रसन्न वाटलं अंगावरुन आठवणीची ही मोरपिसं हलकेच फिरवताना.. &lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिली ’अ’ - फडणीस बाई&lt;br /&gt;दुसरी ’अ’ - पेवेकर बाई&lt;br /&gt;तिसरी ’अ’ - गोडबोले बाई&lt;br /&gt;चौथी ’ब’ - साने बाई&lt;br /&gt;प्राथमिक मुख्याध्यापिका - वालावलकर बाई/ जयकर बाई&lt;br /&gt;पाचवी ’क’ - राजवाडॆ बाई&lt;br /&gt;सहावी ’क’ - पाटील बाई&lt;br /&gt;सातवी ’क’ - भातखंडे बाई&lt;br /&gt;आठवी ’क’ - देशमुख बाई&lt;br /&gt;नववी ’क’ - पाटील बाई&lt;br /&gt;दहावी ’क’ - मांजरेकर बाई&lt;br /&gt;उच्च माध्यमिक मुख्याध्यापिका - केळकर बाई, पाडगावकर बाई&lt;br /&gt;शिपाई - रघू काका, गायकवाड&lt;br /&gt;ऒफीस स्टाफ - विचारे सर&lt;br /&gt;&lt;br /&gt;यांखेरीज ज्या शिक्षकांच्या मुशीतून घडलो ते श्री. घरत सर, भूगोलाचे नारखेडे सर, चित्रकलेचे जोशी सर, मराठीच्या परांजपे बाई, संस्कृतच्या गारखेडकर बाई तसेच दळवी बाई, पीटीचे नलावडे सर,  गणिताच्या पाठारे बाई, राणे बाई, इंग्लिशच्या प्रभू बाई, केणी बाई, मुलांवर जीव लावणारे पालकर सर तसेच पालकर बाई अजून कितीतरी नावे घेता येतील. लहानसहान प्रसंगातून ह्या सगळ्यांनी आमच्या संस्कारक्षम वयात पाठ्यपुस्तकाबाहेरचं किती तरी शिकवलं. पु.लं चे चितळेमास्तर वाचताना, बोकीलांचं शाळा वाचताना किंवा प्रकाश संतांच लंपन वाचताना मनातल्या मनात माझी शाळा आणि त्यातले कैक प्रसंग माझ्यासमोर आले ते ह्यातल्या कुण्या ना कुण्या शिक्षकाबरोबरच. विद्यार्थी हा परिक्षार्थी हवाच पण त्यापलिकडे एक चौफेर, चौकस व्यक्तिमत्त्व बनवण्यासाठी मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम आणि तेही एकावेळीस अनेक गोळ्यांवरुन हात फिरवण्याचं काम ह्या सगळ्यांनी केलं. शिक्षकी पेशा पलिकडे जाऊन ह्या शिक्षकांनी जे काही दिलय त्याच्या त्रुणात राहाणच परम भाग्याचं. कधी मायेने गोंजारून, कधी पाठीवर शाबासकी देऊन तर कधी घणाचे घाव घालून ह्या सायांनी वर्षामागून वर्षे विद्यार्थी ’तयार’ केले, त्यांच भविष्य अक्षरश: विणलं, घडवलं. ’शीलं परम भूषणं’ हे शाळेचं ब्रीदवाक्य आम्हाला घडवत गेलं ते अशा शिक्षकांमुळेच. आज ह्या सगळ्या शिक्षकांची आठवण यायला गुरुपौर्णिमेचं निमित्त नाही आणि हा आभारप्रदर्शनाचा कार्यक्रमही नाही. एका निवांत क्षणी, मागे वळून बघताना, शाळेतल्या क्षणांचा हा धांडॊळा आहे आणि ते क्षण उजवळवणाया ह्या शिक्षकांविषयी मनातली अपार कृतद्न्यता कागदावर उतरते आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दरम्यान इतकी वर्ष उलटली शाळेतून बाहेर पडून, तर पुन्हा एकदा जमता येतय का पहावं असा उत्साही प्रयत्न मिलिंद दामले, वैशाली दळवी, प्रिया बेडेकर, स्वप्निल जोशी यांनी एक-दोनदा केलाय. ह्या फेसबुक आणि ऒरकटच्या कृपेने आम्ही बरेच जण एकमेकांच्या संपर्कात आहोत इतकच, त्यापुढे जाऊन एकत्रित भेटण्याची शक्यता आता बहुतेक म्हातारे होऊन सांसारिक जबाबदाया संपल्यावरच. नाही म्हणायला आमचा वर्गातल्या मुलांचा खास ग्रुप अजून एकत्र जमतो, कधीतरी गिरगावतल्या व्हॊइस ऒफ इंडियाच्या इराण्याकडे चार कप चहावर शाळेतल्या दिवसांच्या रम्य आठवणी अजूनही रंगतात. असंच गप्पांच्या ओघात, आम्ही वर्गातल्या मुलांची सगळी नावं त्यांच्या हजेरीपटाच्या अनुक्रमासहित आठवायचा प्रयत्नही करतो.. धम्मालच!&lt;br /&gt;&lt;br /&gt;  आता भारतात गेलो की प्रत्येक वेळी शाळेत जातो, स्टाफ रुम मध्ये ओळखीच्या बाई भेटतायत का बघतो, भेटता क्षणीच ओळख पटतेच, कुठल्या बॆचचा वगैरे सांगावं लागत नाही. शिक्षकांच्या चेहर्यावरचा आनंद, अभिमान, कौतुक ह्याचं मिश्रण सारं सारं बघून घेतो, मनोमन सुखावतो. मग खाली तळमजल्यावर येतो, घंटा आहे मोठी तासाचे टोले रघूकाका द्यायचे, जे घरपर्यंत ऐकू येतात. तिच्या खाली उभे राहून अंगणात बेफाम धावणाया मुलांकडे बघत हातात वडापाव घेऊन उभा राहतो. ह्यातलाच कोणीतरी उद्या जगाच्या दुसया टोकावर जाईल आणि ह्याच क्षणांची त्तेव्हा अशीच उजळणी करेल काय, आठवण काढेल काय असा विचार करत भरलेल्या डोळ्यांनी, डॊळे भरुन, त्या धावणाया मुलांना मी कौतुकाने पहात रहातो.. पहातच रहतो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-3712549112222879947?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/3712549112222879947/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=3712549112222879947' title='9 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/3712549112222879947'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/3712549112222879947'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2010/12/blog-post_18.html' title='आमची शाळा, आमचे शिक्षक..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>9</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-767796981607990208</id><published>2010-12-12T22:28:00.006-05:00</published><updated>2010-12-12T23:14:02.143-05:00</updated><title type='text'>दाम करी काम येड्या दाम करी काम..</title><content type='html'>सध्या ऒफिसात बराच व्यग्र असलो तरी एकीकडे वाचन चाल्लय याचं समाधान आहे. एक महत्त्वाचं म्हणजे पूर्वी सारखं एखादं पुस्तक घ्यायचं आणि मग ते डोक्यात घोळवत चवीचवीने वाचायचं किंवा एकदम तुटून पडून संपवायचं असं हल्ली होतं नाही. नेट वरच्या मुबलक लिखाणाच्या वाचनाची आता इतकी सवय आणि चटक लागलेय की निरनिराळे ब्लॊग्स, मराठी संस्थळे, दिवाळी अंक, रोजची वर्तमानपत्रे असं बरच काही डोळ्या खालून जातच. तसंच हे वाचलस का? इथे काय आहे ते पाहिलस का? अशी इ-मेल्स येऊन पडलेली असतातच. त्यामुळेच बरेच विचार घोळतायत सद्ध्या, खूप विषयही आहेत हातावेगळे करण्यासाठी जसं जमेल तसं लिहीनच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दरम्यान, बिहारमध्ये नितीश कुमारांनी निवडणूक एक हाती जिंकली, ती सुद्धा अशी की लालूसह कॊंग्रेसचा सुकडा साफ. बिहारी जनतेचे अभिनंदन करायलाच हवे. भारतात लोकशाहीची मूळे घट्ट असल्याचे पुन्हा एकदा जाणवले हेच खरे. गुजराथ पाठोपाठ आता बिहारनेही जनतेला लागलेली विकासाची ओढ दाखवून दिलेय. ह्याचे दूरगामी परिणाम केंद्रातील राजकारणावर न झाले तरच नवल. जे आमचा विकास करत नाहीत त्यांना आम्ही हकलवणारच हे समीकरण जर लोक दाखवून देत असतील तर निदान जनभयास्तव इतर राज्यसरकारांना आणि केंद्र सरकारला विकास करुन दाखवावा लागणारच. अर्थात नितिशकुमार सरकारवर बिहारला पुढे न्यायची जबाबदारीही आहेच पण तूर्त तरी बिहारच्या विकासासाठी त्यांची अत्तापर्यंतची वाटचाल स्पृहणीयच आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जगाच्या दुसया टोकावरुन ह्या सगळ्याकडे बघताना भारतात एकाच वेळी परस्परविरोधी राजकीय, सामाजिक बदल घडताना दिसतायत. उदाहरणच द्यायची झाली तर, बिहार आणि गुजराथ विकासाच्या रथावर घौडदौड करत असताना, तिथे दक्षिणेत आंध्र आणि कर्नाटकात तसेच आपल्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या नाटकांचे दोन-तीन अंक झाले, राजकारणाला ऊत आला अगदी. एकीकडे भारताची वेगात होत असलेली आर्थिक प्रगती, शिक्षणाचा वाढलेला स्तर, वाढता शेअरबाजार आणि बाहेरच्या जगातून येणारा पैशांचा ओघ, ’तुम्ही ग्रेट आहात’ हे येऊन सांगणारा ओबामा, कॊमनवेल्थ मध्ये कमावलेली पदकं, भारतीय क्रीकेट संघाने मिळवलेले सलग विजय ह्यामुळे भारतीय म्हणून अभिमान वाटत असतानाच एकामागोमाग बाहेर पडणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे (राष्ट्रकूल स्पर्धेतला भ्रष्टाचार, ’आदर्श’ चा भ्रष्टाचार, २ जीस्पेक्ट्रम चा भ्रष्टाचार, कॊंग्रेसच्या महाअधिवेशनात झालेला भ्रष्टाचार, पेण अर्बन बॆंकेचा भ्रष्टाचार इ. इ.) राज्यस्तरीय आणि केद्रस्तरीय पातळीवर वर्षभर चालूच राहीली. म्हणजे करदात्यांचा पैसा ह्या लबाड आणि लुच्च्या, भ्रष्ट राजकाराण्यांनी खाऊन लोकांना हातोहात फसवलेय. जोपर्यंत एखाद्या भष्ट व्यक्तिला (आणि त्याच्या लाभार्थींनाही) तातडीने शिक्षा (प्रसंगी फाशीही) होत नाही, तोपर्यंत भष्टाचार करू पाहाणारे हात आणि मने तयार होत राहाणारच. शैक्षणिक संस्थांमध्ये निती मुल्ये शिकवण्याचे आणि त्यांची जपणूक करण्याचे महत्त्व ठसवण्याचे दिवस आता गेलेत असं निराश होऊन म्हणावसं वाटतं. भष्ट वागण्याविरोधातला शैक्षणिक आणि सामाजिक धाक कमी होत चाल्लाय, जिथे शैक्षणिक संस्थाच डोनेशनचा हट्ट करतात आणि भरमसाट फीया वसूल करतात तिथे त्या मुलांवर त्याविरोधात कसे संस्कार करतील हा प्रश्नच आहे. २०१० हे वर्ष भारतासाठी घोटाळ्यांचे वर्षच ठरावे इतके काळे धंदे एकामागोमाग उजेडात येत आहेत. अति झाले अन हसू आले, अशातला प्रकार होत असून आणि सगळेच राजकीय पक्ष ह्या भ्रष्टाचारात बरबटलेले असल्याने (आठवा साधनशुचितेच्या गप्पा मारणार्या भाजपाच्या अध्यक्षांनी पैसे घेतल्याची दिलेली कबुली) कुणालाही नैतिक पाया नाही भष्टाचाराविरुद्ध दोन हात करण्यासाठी उभे राहाण्याचा, आणि अधिक दुर्देवाची गोष्ट म्हणजे ’हे असंच होणार.. आपण काही करु शकत नाही’ ह्या अगतिकतेपायी, वैषम्यापायी जनता अधिकाधिक उदासीन होत चाल्लेय, ह्या दाहकतेची संवेदनशीलता गमावत चाल्लेय. एकीकडे आपण म्हणतो ’यथा राजा तथा प्रजा’ तर दुसरीकडे ’People deserves the Governance’ म्हणजे लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळते असेही परस्परविरोधी बुद्धीभेद करतो. होते काय की एक्मेकांवर ढकलण्यापलिकडे ह्यातून मार्ग निघत नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे असे विचारांचे कल्लोळ चालू असतानाच उदास वाटू लागते, आपला युद्धभूमितला अर्जुन झाल्यासारखं वाटतं आणि मग थोडं खोलात शिरल्यावर, म्हणजे, जे काही भष्टाचार उघड झालेत ह्यावर्षी ते सगळे ह्याच एका वर्षातले आहेत की वर्षानुवर्षे चालत आलेले आहेत, मग काय वेगळं घडलं ह्यावेळी.. अशा मार्गाने विचार केला तर मग जाणवतं.. किती तरी समाजसेवकांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करत, ह्यातले बरेच घोटाळे बाहेर काढलेत. माहितीच्या अधिकाराबाबतची सजगता जसजशी वाढेल आणि त्याचा धाक जसजसा निर्माण होईल तसतशी भष्टाचाराची वृत्ती कमी होईल अशी आशा करायला जागा नक्कीच आहे. शिवाय, युयुआयडी (म्हणजे प्रत्येक माणसास एक क्रमांक, अमेरिकेत एसे.एस.एन. आहे तसा..) योजना जसजशी मार्गी लागेल तस तसा समाजातल्या शेवटच्या थरापर्यंत मोजदाद (अकांऊंटिबिलिटी) वाढेल, भष्टाचारास मोठ्या प्रमाणावर आळा बसेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भारतातील पिढी आता विकासाच्या वेगाला सरावतेय. महाराष्ट्र जर २०१२ पर्यंत वीजेच्या बाबतित स्वयंपूर्ण झाला तर बराच फरक पडेल. रोटी, कपडा, मकान और बॆंडविड्थ ह्यातल्या शेवटच्या उद्देशाला आपल्याला लवकरात लवकर हात घालायला हवा, टेलिकॊमचे जाळे जितक्या लवकर आणि स्वस्त पसरेल तितकी महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या कायमस्वरुपी विकासासाठी ती लाभदायी ठरेल. आमेन! त्याचबरोबर, लवासा सारखे जागतिक पातळीवर दखल घेतलेले प्रोजेक्ट्स आणि जैतापूरचा अणूउर्जा प्रकल्प हे औद्योगिक दृष्टया स्पृहणिय वाटत असले तरी सामाजिक विषमता आणि स्थैर्य अबाधित राहील हे पहाण्यातच सरकारची परीक्षा आहे. आपल्याला ’इंडिया आणि भारत’ तसेच ’भारत आणि हिंदुस्थान’ ह्यांमधले धुमशान परवडणारे नाही त्यामुळे स्थानिक, प्रादेशिक आणि प्रांतिक अस्मिता जपत जग जिंकायचं हे लक्षात ठेवायला हवं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नुकताच काही म्युच्युअल फंड्स पाहात असताना,&lt;br /&gt;&lt;a href="http://www.valueresearchonline.com/story/h2_storyview.asp?str=15774" target="_blank"&gt;&lt;font color="FF00CC"&gt;http://www.valueresearchonline.com/story/h2_storyview.asp?str=15774&lt;/font&gt;&lt;/a&gt; हा लेख वाचनात आला. सद्ध्या, अमेरिकेने नोटा छापायला घेतल्याने डॊलरचं अवमूल्यन झालय. अर्थात हा प्रश्न माझ्या सारख्या अनिवासी भारतियांना अर्थकारणासाठी जिव्हाळ्याचा असल्याने जागतिक अर्थकारण आणि घडामोडींवर लक्ष असतेच. असो, तर प्रस्तुत लेखांत, चीनने जर त्यांच्या मालाला अंतर्गत बाजारपेठ निर्माण केली नाही (internal consumption वाढवले नाही) तर तो स्वत:सकट सगळ्या जगावर आर्थिक संकट ओढवू शकतो. तसेच भारताचा विकासाचा दर हा चीनच्या तुलनेत थोडा मागे असला तरी भारतातला विकास हा भांडवलशाही रुजत असल्याचे आणि पर्यायाने कायमस्वरुपी तसेच स्वयंपूर्ण विकास असल्याचे दिसते. मुख्य म्हणजे भारतात लोकशाही असल्याने दाखवलेले आकडे हे चीनच्या आकड्यांपेक्षा विश्वासार्हच आहेत. सांगायचा मुद्दा काय, तर चीनची भीती बाळगायचं कारण नाही, इतके कोट्यावधी रुपयांचे भष्टाचार उघडकीला येऊनही जागतिक बाजार भारतात पैसे गुंतवतोय म्हणजे आज जग भारताकडे विश्वासाने, आशेने बघतय, आपण तो विश्व्वास सार्थ ठरवायलाच हवा. चीनमध्ये मानवी मूल्यांची होणारी पायमल्ली, सरकार करत असलेली सामाजिक दडपशाही, मिडीयाला नसलेले स्वातंत्र्य, इटरेनेटवर प्रतिबंध ह्यामुळे समाजवादापुढे अपारदर्शकतेचे, स्वातंत्र्याच्या गळचेपीचे प्रश्नचिन्ह. रशिया आणि इतर ठिकाणी झालेला साम्यवादाचा पाडाव. इथे अमेरिकेत अनिर्बंध भांड्वलशाही आणि Too big to fall म्हणत नंगानाच करणाया बड्या कंपन्यांनी सरकारला वाकवूवन जनतेचे पैसे TARP (Troubled Assets Relief Program) द्वारा हडप करुन वर त्यातून बोनसही घेतल्याचे आपण पाहिले, भारतात लायसन्स राज, लाल फितीचे राजकारण संपून कॊर्पोरेट स्पर्धेतून विकास सामान्य माणसापर्यंत पोहोचतोय पण ह्या भ्रष्टाचाराची कीड पोखरतेय आणि किती खोल लागलेय वाळवी कळत नाहीये, मग काय योग्य या जगात हेच कळेनासं झालय ह्या क्षणाला, पुन्हा एकदा युद्धभूमीवरचा अर्जुन!&lt;br /&gt;&lt;br /&gt;मिसळपावर सुधीर काळे यांनी &lt;a href="http://www.misalpav.com/node/15799" target="_blank"&gt;&lt;font color="FF00CC"&gt;http://www.misalpav.com/node/15799&lt;/font&gt;&lt;/a&gt; येथे एका पुस्तकाचा अनुवाद करायला सुरुवात केलेय, "भारतीय - कसा मी? असा मी". वाचायला हवंच हवं असं हे पुस्तक, मूळ लेखक आहेत श्री. पवनकुमार वर्मा (भारताचे सद्ध्याचे भूतान येथील राजदूत). आजच्या घडीच्या भारताच्या प्रगतीचा वेग, भारताची जगाला असेलेली ओळख ह्याचा यथार्थ आणि अभ्यासपूर्ण उहापोह या पुस्तकात केलेला आहे असं कळतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एकूणच, समाजवाद की भांडवलशाही हे द्वंद्व डोक्यात सुरु झालं की लहानपणी चाळीत वासुदेव गिरक्या घेत गायचा त्याचं हटकून आठवणारं गाणं.. बाबूजींनी गायलेलं माझं अतिशय आवडतं.. लोकसंगीताचा उत्तम नमुनादेखील..&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;वासुदेवाची ऐका वानी जगात न्हाई राम रे&lt;br /&gt;दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;पैशाची जादू लयी न्यारी, तान्ह्या पोराला त्याची हाव&lt;br /&gt;आई सोडून घेतंय झेप पैशाच्या मागून धाव&lt;br /&gt;जल्मापासनं साधी मानसं ह्या पैशाची गुलाम रे..&lt;br /&gt;दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;कुनी जुगार सट्टेबाज, कुनी खेळं मुंबई मटका&lt;br /&gt;चांडाळ चौकडी जमता कुनी घेतो एकच घुटका&lt;br /&gt;शर्यत घोडा चौखूर सुटला फेकला त्याने लगाम रे&lt;br /&gt;दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;या कवडी दमडी पायी कुनी राखूस ठेवी जीव&lt;br /&gt;कुनी डाका दरोडा घाली कुनी जाळून टाकी गाव&lt;br /&gt;बगलं मंधी सुरी दुधारी, मुखी देवाचं नाम रे&lt;br /&gt;दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;नक्षत्रावानी पोरगी, बापाच्या गळाला फास&lt;br /&gt;ठरल्यालं लगिन मोडतं हुंड्याला पैसा नसं&lt;br /&gt;काळीज भरलं श्रीमंतिनं हातात नाही छदाम रे&lt;br /&gt;दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;वाड्यात पंगती बसल्या लयी अग्रव जागोजाग&lt;br /&gt;दारात भिकारी रडतो पोटात भुकंची आगं&lt;br /&gt;संसाराचं ओझं घेउन कुनी टिपावा घाम रे&lt;br /&gt;दाम करी काम येड्या, दाम करी काम ॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;नाचते नारीची अब्रू छन छुम्मक तालावरती&lt;br /&gt;पैशानं बायको खूस पैशानं बोलते पीरती&lt;br /&gt;ह्या पैशाच्या बादशहाला दुनिया करते सलाम रे&lt;br /&gt;दाम करी काम येड्या, दाम करी काम.. ॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे&lt;br /&gt;दाम करी काम येड्या, दाम करी काम..&lt;br /&gt;दाम करी काम येड्या, दाम करी काम.. ॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;आपले भ्रष्टाचारी तर हेच म्हणत नसावेत, दाम करी काम? :(&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-767796981607990208?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/767796981607990208/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=767796981607990208' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/767796981607990208'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/767796981607990208'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2010/12/blog-post.html' title='दाम करी काम येड्या दाम करी काम..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-8022842492017212836</id><published>2010-11-02T18:46:00.010-05:00</published><updated>2010-11-02T19:12:14.764-05:00</updated><title type='text'>आली माझ्या घरी ही दिवाळी..</title><content type='html'>ह्या दिवाळीला बायको आणि मुलगा ’माझ्या माहेरी’ आहेत, त्यामुळे इथे एकटाच.. अर्थात तरी दिवाळीचा उत्साह कमी नाहीच. कंदील लावला आज आणि हो फराळ केलाय, म्हणजे बनवलाय :-)) &lt;br /&gt;&lt;br /&gt;अर्थात वैदेहीने &lt;a href="http://www.chakali.blogspot.com/"&gt;http://www.chakali.blogspot.com/&lt;/a&gt; इथे दिलेल्या आधाराशिवाय हे कठीणच होतं, म्हणजे पूर्वी कधितरी मी ओगले आजींच्या पुस्तकांचे संच आणले होते वाहून अमेरिकेत, पण मायबोली, मिसळपाव आणि मुख्यत्वे चकलीवर वैदेहीच्या रेसिपीज मुळे ती पुस्तक उघडायची आताशा गरज राहीली नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/TNCljEyC0JI/AAAAAAAAAXY/h0DgLGQ2FMA/s1600/P1010004.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5535105964035985554" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 300px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/TNCljEyC0JI/AAAAAAAAAXY/h0DgLGQ2FMA/s400/P1010004.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt; शंकरपाळे करताना मैदा मस्त मळला, कणकेचा वापर कटाक्षाने टाळला.  थोडं मोहन घातलं मैदा मळत असताना, त्यावरुन आठवलं - ’मोहन’ हा शब्द कुठून आला असावा ह्या स्वयंपाकात? मला शब्दांची व्युत्पत्ती शोधायला फार आवडतं, त्यातून जुन्या संस्कृतीचं एखादं रुपडं, त्या काळातील माणसांची विचार करण्याची पद्धती चटकन उडी मारुन डोळ्यासमोर येऊ शकते. असो, तर माझ्या दोन्ही आज्या पट्टीच्या सुगरणी. दोन्हींमध्ये साम्य म्हणजे स्वयंपाक करताना त्यांचं नामस्मरण तरी चालू असे किंवा अभंग, ओव्या ह्यांचा स्त्रोत गोड गळ्यातून अखंड सुरु असे. शिवाय पदार्थ तयार झाला की आधी देवापुढे ठेवणे असेच. त्यामुळे नेहमीचा स्वयंपाक करतानाही त्यांची एकतानता, तलिन्नता बघण्यासारखी असे, आणि असे दिवाळीचे पदार्थ करायचे असले तर बघायलाच नको. एकमेकीकडे जाऊन सगळ्या बायका अतिशय उत्साहाने पदार्थ करणार दिवाळीचे. तर देवाचे चिंतन करत स्वयंपाक करताना त्या मन-मोहनाचा मोह पडल्याने, तेलाच्या फोडणीला मोहन नाव पडले असेल का? असेलही, कुणास ठाऊक!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/TNCl59DmBjI/AAAAAAAAAXg/8eZrWQqGsOg/s1600/P1010005.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5535106357099103794" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 300px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/TNCl59DmBjI/AAAAAAAAAXg/8eZrWQqGsOg/s400/P1010005.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt; लाडू करताना केवळ वासावरुन आणि रंगावरुन बेसन कसं आणि किती भाजलं गेलय ओळखण्याच काम जमून आलं आणि लाडू मनासारखे छान वळलेही गेलेत. शंकरपाळे तळतानासुद्धा तेल किती तापायला हवं, कोणत्या रंगावर ते तळून काढायला हवेत हे एकदा लक्षात आलं की काम सोप्प होतं. पूर्वी आजी करायची तेव्हा नाही म्हटलं तरी थोडी लुडबूड असायची स्वयंपाक घरात, बोलता बोलता आजीही स्वयंपाकातल्या खाचाखोचा सांगायची. मग नंतर स्वयंपाकघर जे सुटलं ते सुटलं. इथे एकटा असतानाही कधी तळणीचा विचार केला नाही (बॆचलरपणीचा सामूहीक आळस बहुधा) नंतर बायकोने लाड पुरवले, पण ह्यावेळी ओट्याशी उभं राहून फराळ करताना खरच मजा आली, बायकॊचाही टेलिफोनिक सपोर्ट होताच :) त्यामानाने चिवडा सरळ सोप्पा करायला, अर्थात तो खालून न जळून देता मिक्स करणं आणि पोहे कच्चे न राहाणं हे साधलं की झालं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/TNCnUp_jc9I/AAAAAAAAAXw/rL2ShT_Une4/s1600/P1010006.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5535107915349980114" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 400px; CURSOR: hand; HEIGHT: 300px; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/TNCnUp_jc9I/AAAAAAAAAXw/rL2ShT_Une4/s400/P1010006.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;असो, तर शंकरपाळे, पातळ पोह्याचा चिवडा आणि बेसनाचे लाडू असा फराळ दिवाळीला तय्यार, सोबत कंदील आणि तोरणं आहेतच. फटाक्यांची अनुपस्थिती अर्थातच जाणवतेय पण फटाके न लावण्याची सवय आता अंगवळ्णी पडलेय, मुलाबरोबर पुन्हा लहान होईन तेव्हा करुच धमाल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तमसो माSSSS ज्योतिर्गमय:&lt;br /&gt;सगळ्याना शुभ-दिपावली !&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-8022842492017212836?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/8022842492017212836/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=8022842492017212836' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/8022842492017212836'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/8022842492017212836'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2010/11/blog-post.html' title='आली माझ्या घरी ही दिवाळी..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/TNCljEyC0JI/AAAAAAAAAXY/h0DgLGQ2FMA/s72-c/P1010004.JPG' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-981293243882219339</id><published>2010-10-19T20:53:00.002-05:00</published><updated>2010-10-19T21:03:10.043-05:00</updated><title type='text'>आमचे साहेब..</title><content type='html'>खरं म्हणजे इतक्या दिवसांनी लिहितोय, इतका खंड पडेल लिखाणात असं वाटलं नाही, पण चलता है, गेले काही माहिने घर आणि नंतर कामात इतका व्यस्त होतो की वाचन तसं थंडावलच पण मनात असूनही कागदावर उतरवण्या इतका वेळ काढू शकलो नाही. लक्षमणचे ते लाजवाब डाव, सचिनने दिलेले दणके, कॊमनवेल्थ मधला भ्रष्टाचार आणि मग भारतियांनी लुटलेली पदक, बिहारच्या निवडणूकांतली रणधुमाळी, अयोध्याकांडाचा पुढचा अध्याय आणि असं बरच काही बघत, वाचत होतो.. बरेचदा मनात असूनही लिहायचं राहून गेलं, असो.. पण बाळासाहेबांची दसयाची डरकाळी ऐकली आणि अगदी उचंबळून आलं सगळं, म्हटलं लिहून मोकळं व्हायलाच हवं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तर, परवाच्या सेनेच्या (आता सेना म्हटली कि फक्त ’शिव’सेनाच, आता ’शिव’ हा शब्द वड्यापासून उद्योगापर्य़ंत वापरून टाकलाय तो भाग सोडा!) दसयाच्या सभेचा इतिवृत्तांत वाचला आणि जुने दिवस आठवले. गिरगावात शाखा म्हणजे संघाची नाही तर सेनेचीच असं त्यावेळी वातावरण. दसयाची सभा म्हणजे घरचं कार्य असल्यासारखी तयारी असे. म्हणजे सकाळी घरोघरी पूजा करुन, उन्हातान्हात शिवाजी पार्कात बाळासाहेबांचे विचार ऐकायला वडिल-काका आणि आजूबाजूचे सगळेच जात असू. तो भगव्याचा गजर, बाळासाहेबांचा करारी आवाज आणि मिश्कील चिमटे, परखडपणा.. त्यांच्या विचाराचं सोनं लुटत आम्ही पांगायचो एक समाधान घेऊन. एक तरी व्यक्ती आहे जी मनापासून आणि मनातलं बोलते, निर्भिडपणे आग ओकते आणि हो, मराठी माणसाचा विचार करते हे सुखावणारं होतं, निदान त्या काळात तरी. तेव्हा शिवसेना ८०% समाजकारण आणि २०% राजकारण करणारी होती म्हणून असेल पण मध्यमवर्गीय तरुणांत आणि नवतरुणांत (केवळ मराठीच नाही तर गुजराथीही) बाळासाहेबांनी एक चैतन्य निर्माण केलं होतं. शिवसेनेचा बंद म्हणजे बंद (धाकामुळे किंवा केवळ साहेबांचा शब्द म्हणून) असे मंतरलेले ते दिवस. ९२-९३ च्या दंगलीत बाळासाहेबांचा निर्भीडपणा आणि वचक आम्हा गिरगावकरांना तरी सुखावूनच गेला होता. पुढे ९५ मध्ये युतीचं सरकार आलं आणि शिवशाही येणार अशा अपेक्षांच ओझं घेऊन सेना भाजपाने कारभार सुरु केला. त्याक्षणी बाळासाहेबांनी स्वत: मुख्यमंत्री पद न घेता (रिमोट कंट्रोल हातात ठेवून अर्थत) जे शुचितेचं दर्शन घडवलं (न धरी शस्त्र करी मी, सांगेन गोष्टी युक्तीच्या चारं!) ते त्यांच्याविषयी आदर द्विगुणीत करणारं ठरलं. पण हा सगळा इतिहास झाला, केव्हा.. जेव्हा सेनेचा हा वाघ, ढाण्या वाघ, स्वत:च्या कर्तुत्वावर जंगल गाजवत होता, जीवाला जीव देणाया मराठ्यांची फौज उभी करुन भिडत होता, आपल्या निर्भीड. तर्कशुद्ध वकृत्वाने सभा गाजवत होता. पण मग निसर्गनियमाप्रमाणे उतरती कळा लागली आणि गेल्या काही वर्षात जे बघायला मिळतय त्याने वाईट, विषण्ण, उद्विग्न, असहाय्य आणि हो लाजिरवाणं ही वाटतय. ज्या बाळासाहेबांववर जीवापाड प्रेम केलं, प्रसंगी, त्यांनी पु.ल. / सचिन ह्या महाराष्ट्राच्या लाडक्या मोहयांवर केलेला शाब्दिक हल्ला सुद्धा दुर्लक्षित केला, त्या बाळासाहेबांबद्द्ल आता केवळ सहानुभूतीच वाटून राहिलेय. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तर परवाच्या भाषणाच्या अनुषंगाने..  शरद पवारांनी कोलांट्या मारल्या तर आपण स्वीकारतोच हो, पण बाळासाहेबांनी तसं करावं हे कसं पचनी पडणार? आयुष्यभर, घराणेशाहीचा आरोप करत शेवटी मुलगा कार्याध्यक्ष म्ह्णून पुढे आणून वर ही घराणेशाही नाही ही मखलाशी कशासाठी ते कळलं नाही. शिवसेनेत सगळे निर्णय बाळासाहेबच घेतात ना, मग हा निर्णय कृष्णकुंजवरुन घेतला गेला ह्याला काय अर्थ आहे, जर बाळासाहेबांना तो पटला नस्ता तर तुम्ही तेव्हाच कार्याध्यक्ष पद दुसया कुणाला तरी द्यायला हवं ना! ते जाउंदेच पण आदित्यला लॊंच करताना त्याचा भाऊ म्हणजे दुसरा नातू माझ्यासारखाच हे सांगण्याचा केविलवाणा अट्टाहास कशासाठी? त्यांना (आदित्य/ तेजस) करु दे ना त्यांच्या लढाया, घेऊ देत ना केसेस अंगावर. गेले कित्येक दिवस सामन्यात पद्धतशीर पणे आदित्यला फोकस केलं जातय, त्यामुळे त्याला लॊंच करणार हे अभिप्रेत होतच पण मग प्रश्न पडतो सामान्य शिवसैनिकाचं काय? शिवाय तुम्ही घराणेशाही विरुद्ध वाजवलेल्या फुसक्या बाराचं काय? शिवसैनिकांनीच निवडून दिलं आणि त्यांच्या इच्छेखातर असं झालं हे म्हणायचं असेल तर तसच राजीव गांधी, राहूल गांधी आणि सोनिया गांधी ह्यांच्याबाबतर्ही म्हणता येईल की. उलट त्यांनी घराणेशाही नको अशा घोषणा तरी दिल्या नाहीत. माझ्या मते घराणी शाही असण्यात खास चूकही नाहीच कारण घरात ज्या वातावरणात तुम्ही वाढता त्याचा तुम्हाला लहानपणापासून व्यावसायिक गोष्टी जवळून अनुभवता आल्याने फायदा होतोच (जसा इंदिरा गांधींना नेहरूंचा झाला), पण पुढच्या पिढीला त्यासाठी तयार करणं एकवेळ समजू शकतो, आदित्यला पुढे आणणं हा त्याचाच एक भाग असू शकतो हे ही बुद्धीला पटतं पण ’ही घराणेशाही नाही’ ही मखलाशी करणं, ती करावी लागणं आणि ते ही बाळासाहेबांना ह्याच वाईट वाचल्यावाचून राहत नाही. प्रबोधनकारांनी असं बाळासाहेबांना लॊंच केल्याचं ऐकीवात नाही आणि राज ठाकरेंना बाळासाहेबांनी लॊंच केल्याचं ऐकीवात नाही, असो कालाय तस्मै नम:!&lt;br /&gt;&lt;br /&gt;साहेबांनी भाषणात म्हटलं की ज्या मुद्द्यावर सेना उभी राहीलीत्याच जुन्या मुद्द्यावर ते (राज) लढतायत. आता साहेबांच्या ह्या विधानात अनेक अर्थ निघतात, एक म्हणजे मराठी हा मुद्दा अजून इतक्या वर्षांनतरही राजकीय होऊ शकतो ह्यात नाही म्हटलं तरी सेनेचं अपयश आहेच की. दुसरं म्हणजे, मराठीचा मुद्दा सेनेने सोडलाच, त्याशिवाय राजसाहेबांना एवढा पाठींबा मिळालाच नसता. ’दोपहर का सामना’ मुंबईत काढण्याची गरज तेव्हा सेनेला का भासली? ह्यातून कुणाचं लांगुलचालन चाल्लल होत, हे मराठी माणसाला कळत नव्हतं का? सेनेने मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आणि प्रादेशिक पक्ष म्हणून मजबूत होण्यापूर्वीच राष्ट्रीय स्तरावर पसरायचा प्रयत्न केला. झाले काय की इथले बुरुज ढासळत गेले. शिवसेनेसारखी एक संघटना उभारण्यात बाळासाहेबांचे जितके यश, कौतुक आहे तितकेच खंदे शिलेदार गमवून ती एकसंध ठेवण्यात आलेले अपयशही आहे. भुजबळ, राणे, गणेश नाईक ह्यांसारखे पुढच्या फळीचे नेते तसेच बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे, सदा सरवरणकर ह्यांसारखे तरुण रक्त शिवसेना एक संघटना म्हणून बांधून ठेवू शकली नाही, ह्यां सगळ्यांच्या महत्त्वाकांक्षांचे मेळ, एक नेता म्हणून, बाळासाहेब घालू शकले नाहीत हे महाराष्ट्राचे दुर्दैव असं वाटल्यावाचून राहात नाही. परवाच्या भाषणात त्यांनी भुजबळांचा उल्लेख केला, मला तर हसू आले. लखोबा म्हणून एके काळी सैनिकांनी ज्याला दणका दिला, ज्याने बंडखोरी म्हणजे काय हे सेनेला पहिल्यांदा दाखवून दिले एवढेच काय तर बाळासाहेबांना अटक करण्याचे मनसुबे केले, त्यांची सदिच्छा भेट! राजकारणात सगळं क्षम्य असतं मान्य, पण बाळासाहेबांना हे शोभत नाहीच, अहो त्यापेक्षा राज आणि उद्धव एकत्र यावेत यासाठी जे शिवसैनिक प्रयत्न करतायत त्यांचा तरी उल्लेख करायचा, बरं वाटलं असतं! बाळासाहेबांच्या भाषणात प्रमुख हल्ला होता राज ठाकरेंवर ह्यातच सगळं आलं. राजसाहेबांनी मराठीच्या मुद्द्यावर जे वातावरण पेटवलय त्याचे चटके सेनेला बसत आहेतच. मला खात्री आहे कुठेतरी मनाच्या कोपयात बाळासाहेब राजचं कौतुक करत असणारच. इतक्या छोट्या कालावधित मनसेने जे आक्रमक धोरण ठेवलय त्याची दखल बाळासाहेबांनी घेतली हीच पोचपावती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;दरम्यान, अयोध्येच्या निकालानंतर सामान्य जनतेने दाखवलेला समजूतदारपणा, प्रसार माध्यमांनी आणि राजकारण्यांनी दाखवलेली परिपक्वता (असन्माननीय अपवाद वगळता) पाहून खूप बरं वाटलं, समाधान वाटलं. गेल्या १७ वर्षात शिक्षण वाढलेय, जागतिकरण वाढलय, जीवनाचा वेग वाढलाय, लोकांना विकासाचं वेड लागलय. आपापसात लढ्ण्यात काहीच हशील नाही, प्रगति करायला हवी असं नवी पिढी, प्रसंगी जुन्या पिढीला सांगतेय, त्यामुळेच हे शक्य झालं असं वाटतय. उदाहरणच द्यायचं झालं, तर १७ वर्षांपूर्वी माझे अयोध्येविषयी दृष्टीकोन होते ते आमूलाग्र बदलले आहेत, तेव्हा ते चूक होते असं म्हणणार नाही, त्यावेळच्या परिस्थितीत ते योग्य असतिलही, पण आता आपण एक समाज म्हणून पुढे जायला हवं हे उमगतं आणि असं एकत्रित प्रगती करण शक्य, आवश्यक आणि अपरिहार्य आहे हे ही समजतं. तर ह्यातून सांगायचा मुद्दा हा की, जसं शिक्षणाचं प्रमाण वाढतय, माहितीचा अधिकार वापरण्याचं प्रमाण वाढतय, परकीय गंगाजळी वाढतेय, उद्योगधंदे वाढताहेत तस तस लोकांना समृद्ध जीवनाचे फायदे दिसायला लागलेत, त्याची फळं चाखायला मिळालेयत. असं असताना भावनेच्या राजकारणातून विशेष काहीही होणार नाही हे आता राजकीय पक्षांनाही जाणवू लागलेय. गुजराथचे उदाहरण पाहाता तर हे अधोरेखित होतय. नरेंद्र मोदींनी केवळ ’समतोल विकास’ ह्या एका मुद्द्यावर अगदी पंचायत समित्या आणि नगरपालिकाही निर्विवाद जिंकून आणल्या. बिहार मध्ये नितिशकुमारही विकासाच्या दृष्टीने चांगलं काम करत आहेत. दक्षिणेत चंद्राबाबूंनीही तो प्रयत्न केला पण विकासात ते समतोल साधण्यात अपयशी ठरले. केंद्रात मनमोहनसिंग सरकारही विकासाच्या मुद्द्यावर भर देऊन भारताच्या अर्यव्यवस्थेच्या वाढीच्या गतीची स्वप्ने जगाला दाखवत आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर, बाळासाहेबांच्या भाषणात, ’विकास’ हा मुद्दा अभावानेच आढळला. वीस वर्षांपूर्वीचा तरूण आणि आजचा तरूण ह्याच्या विचारात बराच फरक आहे हे समजायला हवे. केवळ अर्वाच्य शब्दात इतरांची हेटाळणी करुन मने जिंकण्याचे दिवस गेले, त्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेत इतके वर्ष सत्ता असताना सेनेने काय काय केले ह्यावर लक्ष वेधले असते तर नक्कीच छान वाटले असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अजून एक जाणवलेली गोष्ट म्हणजे, आदित्यच्या बरोबरीने आदेश बांदेकरांचे सेनेने केलेलं लॊंचिंग. गेले कित्येक दिवस त्यासाठी सामन्यात मोर्चेबांधणीसुरु होती, म्हणजे आज भाऊजींनी बाळासाहेबांची भेट घेतली, भाऊजींनी मराठी दांडीया सुरु केला वगैरे वगैरे! ज्या भाऊजींवर दादर मधून पडण्याची नामुष्की आली (कारण काहीका असेना!) त्यांना शिवसेनेत सचिवपद? म्हणजे इतके वर्ष घासलेल्या शिवसैनिकाने करायचं काय? कुठल्याही पक्षात सचिवपद म्हणजे कार्याध्यक्षाशी समन्वय साधण्यासाठी, थिंक टॆंक म्हणून तसेच लोकांकडून कामं करुन घेण्यासाठी अतिशय महत्त्वांचं, जबाबदारीचं आणि तितकच व्यस्त पद. इतर उद्योग सांभाळताना ह्या पदाला भाऊजी न्याय देऊ शकतील ? त्यांचं पहिलं ध्येय मिडीया म्हणूनच राहाणार ना मग डमी म्हणून त्यांना इथे पुढे केलय की काय अशी शंका यायला जागा आहेच, म्हणजे एखाद्या सच्चा शिवसैनिकाची ह्या पदासाठीची जागा बाहेरून आलेल्याने घेतली, हेच अगदी विधानसभा निवडणूकीत झालं दादर मतदारसंघात आणि परिणाम दिसलेच. व्यक्तिश: कुणाला विरोध नाही पण कुठेतरी चुकतय असं वाटत राहातं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;एकंदर, हे असं आहे. शिवसेनेचा प्रवास म्हणजे माझ्यासारख्या कित्येकांचा तारुण्याचा प्रवास. बाळासाहेबांचे विचार ऐकत आम्ही घडलॊ, एका दिशेने पुढे गेलो. त्यामुळे हे असं काही पाहिलं की पोटतिडकीने तितक्याच हक्काने काही सांगावसं वाटतं, चुकीचं वाटतं असलं की मन मोकळं करावसं वाटतच. असेच पुढचे दसरे मेळावे येतील, पन्नाशीही पार करतील, पिढ्यान पिढ्या वाघाची डरकाळी ऐकायला येतील पण जर आवाजातील धारचं कमी होत चालली असेल, तर न्यायालयाला डेसिबल मध्ये आवाजाची क्षमता घालायची वेळच येणार नाही हे तितकच खरं!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-981293243882219339?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/981293243882219339/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=981293243882219339' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/981293243882219339'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/981293243882219339'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2010/10/blog-post.html' title='आमचे साहेब..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-8652398654117569000</id><published>2010-07-11T22:06:00.002-05:00</published><updated>2010-07-11T22:10:52.561-05:00</updated><title type='text'>If you can..</title><content type='html'>गेले काही दिवस, कामाचा वाढलेला व्याप आणि पसारा, घरात तारक बरोबर जगत असलेलो माझं बालपण, तसेच समर मधील भटकंती ह्यामुळे इच्छा असूनही इथे लिहिता आलं नाही. अकरावीच्या प्रवेशांचा खेळखंडोबा, फुटबॊलचा विश्वचषक, राज-का-रण, बेळगावप्रश्नी केंद्र सरकारने घातले वाकडे शेपूट, वाढती महागाई, त्यातून झालेले बंद, ’डबल डीप’ रिसेशनची इथे अमेरिकेत जाणवत असलेली भीती खूप काही लिहीण्यासारखं आहे, पण सद्ध्या वेळेचं गणित काही जमत नाहीये. वाचनही थांबलय म्हणावं इतपत थंडावलय. &lt;br /&gt;स्पेन जिंकली आज.. मस्त झाली आजची मॆच. इतकी पिवळी कार्ड एका गेम मध्ये कधी बघितली नव्हती. खूप धुसमसळा झाला आजचा खेळ पण हॊलंडला त्याच्यामुळेच दहा खेळांडूंनी शेवटी बचाव करायला लागला आणि तिथेच स्पेनने संधी साधली. एकंदर विश्वचषकच मस्त झाला, कायम लक्षात राहील असाच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दरम्यान एक नितांत सुंदर कविता वाचनात आली ती इथे लिहितोय - &lt;br /&gt;एका वडिलांनी मुलाला उद्देशून लिहिलेली.. कसं जगावं, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय करावं आणि काय करु नये ह्याची परिपूर्ण जंत्रीच जणू. एकेका ओळीत विलक्षण अर्थ भरला आहे. वाचताक्षणी भारुन टाकलं, जिंकलं ह्या ओळींनी.. कवीचे मनापासून आभार.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"If" &lt;br /&gt;If you can keep your head when all about you&lt;br /&gt;Are losing theirs and blaming it on you;&lt;br /&gt;If you can trust yourself when all men doubt you,&lt;br /&gt;But make allowance for their doubting too;&lt;br /&gt;If you can wait and not be tired by waiting,&lt;br /&gt;Or, being lied about, don't deal in lies,&lt;br /&gt;Or, being hated, don't give way to hating,&lt;br /&gt;And yet don't look too good, nor talk too wise; &lt;br /&gt;&lt;br /&gt;If you can dream - and not make dreams your master;&lt;br /&gt;If you can think - and not make thoughts your aim;&lt;br /&gt;If you can meet with triumph and disaster&lt;br /&gt;And treat those two imposters just the same;&lt;br /&gt;If you can bear to hear the truth you've spoken&lt;br /&gt;Twisted by knaves to make a trap for fools,&lt;br /&gt;Or watch the things you gave your life to broken,&lt;br /&gt;And stoop and build 'em up with wornout tools; &lt;br /&gt;&lt;br /&gt;If you can make one heap of all your winnings&lt;br /&gt;And risk it on one turn of pitch-and-toss,&lt;br /&gt;And lose, and start again at your beginnings&lt;br /&gt;And never breath a word about your loss;&lt;br /&gt;If you can force your heart and nerve and sinew&lt;br /&gt;To serve your turn long after they are gone,&lt;br /&gt;And so hold on when there is nothing in you&lt;br /&gt;Except the Will which says to them: "Hold on"; &lt;br /&gt;&lt;br /&gt;If you can talk with crowds and keep your virtue,&lt;br /&gt;Or walk with kings - nor lose the common touch;&lt;br /&gt;If neither foes nor loving friends can hurt you;&lt;br /&gt;If all men count with you, but none too much;&lt;br /&gt;If you can fill the unforgiving minute&lt;br /&gt;With sixty seconds' worth of distance run -&lt;br /&gt;Yours is the Earth and everything that's in it,&lt;br /&gt;And - which is more - you'll be a Man my son!&lt;br /&gt;&lt;br /&gt;--Rudyard Kipling&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-8652398654117569000?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/8652398654117569000/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=8652398654117569000' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/8652398654117569000'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/8652398654117569000'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2010/07/if-you-can.html' title='If you can..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-5848904879279612203</id><published>2010-03-15T22:01:00.007-05:00</published><updated>2010-03-15T22:17:13.113-05:00</updated><title type='text'>विंदा</title><content type='html'>विं.दा. गेल्याची बातमी आली. वाईट वाटलं, पण एक समृद्ध आणि यशस्वी जीवन जगलेल्या मनस्वी माणसाला दीर्घायुष्याचं वरदान लाभलं हे समाधान होतं. पाडगांवकरांइतक्या सहजतेने मला विं.दां.च्या खूप काही कविता ऐकायला मिळाल्या नाहीत पण ज्या ऐकल्या त्यांनी अशी पकड घेतली की बस्स.. ’शुभ्र फुलांची ज्वाळा’ ही कॆसेट मला भेट मिळाली होती, त्यातल्या सगळ्याच गझला आम्हाला दोघांनाही इतक्या आवडल्या की मागच्या भारत भेटीत सीडी आणली. पद्मजा फेणाणीचा आवाज तर मस्तच, पिळवटून टाकणारा..अप्रतिम.. गझल आवडणाया व्यक्तिकडे संग्राह्य असायलाच हवी ही सीडी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;राज्यसभेत महिला विधेयक पारित झालेलं ऐकलं तेव्हा खरं तर विंदांचेच शब्द ओठावर आले आणि मागोमाग ते गेल्याची बातमी. त्यांच्याच ह्या दोन्ही गझल इथे लिहून विंदांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.&lt;br /&gt;&lt;table border="2"&gt;&lt;br /&gt;&lt;tr&gt;&lt;br /&gt;&lt;td&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;सर्वस्व तुजला वाहूनी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;/td&gt;&lt;br /&gt;&lt;td&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मागू नको सख्या रे&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;/td&gt;&lt;br /&gt;&lt;/tr&gt;&lt;br /&gt;&lt;tr&gt;&lt;br /&gt;&lt;td&gt;&lt;br /&gt;सर्वस्व तुजला वाहूनी, माझ्या घरी मी पाहुणी&lt;br /&gt;सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहूनी ॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया&lt;br /&gt;अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतूनी ॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी&lt;br /&gt;ठरते परी ती कांच रे, दिसतोस मजला त्यांतूनी ॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;संसार मी करीते मुका, दाबून माझा हुंदका&lt;br /&gt;दररोज मी जाते सती, आद्न्या तुझी ती मानूनी ॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे&lt;br /&gt;अन प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानूनी ॥&lt;br /&gt;&lt;br /&gt;- विं. दा. करंदीकर&lt;br /&gt;&lt;/td&gt;&lt;br /&gt;&lt;td&gt;&lt;br /&gt;मागू नको सख्या रे, माझे न राहिलेले&lt;br /&gt;ते एक स्वप्न होते, स्वप्नात पाहिलेले ।।&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वप्नांतल्या करांनी, स्वप्नातल्या तुला मी&lt;br /&gt;होते न सांग का रे, सर्वस्व वाहिलेले ।।&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वप्नातल्या कळीला, स्वप्नात फक्त पंख&lt;br /&gt;दिवसास पाय पंगू, अन हात शापिलेले ।।&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्वप्नात पाहिलेले, म्हणूनी कसे असत्य&lt;br /&gt;स्वप्नास सत्य सते, सामिल जाहलेले ।।&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्व्प्नातल्या कळीला, स्वप्नात ठेवूनी जा&lt;br /&gt;हे नेत्र घेउनी जा, स्वप्नांत नाहलेले ।।&lt;br /&gt;&lt;br /&gt;जा नेर घेउनी जा, स्वप्नांध पांगळीचे&lt;br /&gt;आता पहावयाचे, काही न राहिलेले ।।&lt;br /&gt;&lt;br /&gt;- विं. दा. करंदीकर&lt;br /&gt;&lt;/td&gt;&lt;br /&gt;&lt;/tr&gt;&lt;br /&gt;&lt;/table&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-5848904879279612203?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/5848904879279612203/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=5848904879279612203' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/5848904879279612203'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/5848904879279612203'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2010/03/blog-post.html' title='विंदा'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-2505716564736501286</id><published>2010-02-25T20:54:00.008-05:00</published><updated>2010-02-25T21:23:05.576-05:00</updated><title type='text'>विठठला....</title><content type='html'>&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/S4cvLAYmA_I/AAAAAAAAATg/DYm6288WI7I/s1600-h/114673.jpg"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 400px; height: 297px;" src="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/S4cvLAYmA_I/AAAAAAAAATg/DYm6288WI7I/s400/114673.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5442370540828754930" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रिय सचिन, काल तू द्विशतक काढलंस आणि आपल्या घरातला कोणी बोर्डात आल्यावर जसा आनंद होईल तसं झालं अगदी, अटकेपार झेंडा लावल्यावर तेव्हा मराठ्यांना वाटलं असेल ना तस्सच.. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची आणि ’सचिनने आता निवृत्त’ व्हायला हवं’ म्हणणाया ढुढ्ढाचार्यांची एकाच वेळी पिसं काढत ज्या कमालीच्या एकाग्रतेने तू २०० काढलेस नतमस्तक तुझ्यापुढे राजा. तुझी ती नजर, बॊलवर तुटून पडणं, रनिंग बिट्विन विकेट्स, फूटवर्क, टायमिंग, इम्प्रोव्हायझेशन म्या पामराने काय बोलावं ह्या सगळ्याबद्दल. काल पुन्हा पुन्हा हायलाईट्स पाहिले आणि डोळ्यांचं पारणं फिटलं अगदी कडा ओलावल्या सुद्धा. कालचा दिवस तुझा होता असं म्हणून मी अन्याय करणार नाही तुझ्यावर, तू म्हणशील तो दिवस तुझा हे सगळ्यांनाच माहित झालय आता. २४ तारीख काल (तुझी जन्म तारीखही २४ च, संख्याशास्त्रीय अनुकूलता असणार म्हणजे :) आणि आज नुकतच वाचलं की, विनोद बरोबर शारदाश्रम मध्ये बरोबर २२ वर्षापूर्वी, म्हणजे २४ फेब्रु. १९८८ रोजी ६६४ धावांची जगप्रसिद्ध भागीदारी केली होतीस. असो, मागे ऒस्ट्रेलियाविरुद्ध १७५* काढताना तू रीटायर्ड हर्ट झालास, न्यूझीलंड विरुद्ध १८६* पेक्षा जास्त करायची संधीच मिळाली नाही पण मला माहितेय तू त्या दोन्ही खेळीतून बरच शिकलास (आणि तू असं अनुभवातून शिकत खेळाची पातळी उंचवू शकतोस म्हणून तू तू आहेस). त्यागोष्टींची तू पुनरावृत्ती होऊन दिली नाहीस हे लगेच जाणवलं. सईद अन्वरने काढलेले ते १९४ आठवतायत.. मे महिना होता आणि खोटं कशाला बोला सॊलिड जळली होती, निम्म्याहून अधिक डाव तर रनर घेऊन खेळला तो. असो, पण स्टॆमिना काय असतो हे तू काल दाखवून दिलस. तुझ्या पहिल्या शभर धावात एकही षटकार नसावा ह्यात संयम म्हणजे काय ते दाखवलस आणि इतकं करुन स्ट्राईक रेट आठ आणि नऊ? तुला महान हे विशेषणसुद्धा तोकडं पडावं. अगदी दक्षिण आफ्रिकेचे क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज सुद्धा तुझ्या वादळापुढे काल नतमस्तक झाले असतील. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तुझं कौतुक काय करावं महाराजा, स्टेनची बॊलिंग बघितली मी, कॆलिस सुद्धा जीव तोडून टाकत होता. अशा बॊलिंगची लिलया पिसं काढणं आणि समोरच्या कार्तिक, पठाण, धोनीला प्रोत्साहन देत राहाणं तुलाच जमणार. बॊलरच्या डोक्यावरुन उलट टोलवलेला चेंडू, दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून बायसेक्ट करत जाणारा चेंडू खासा मेजवानी होती काल. स्टेनचा ऒफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तू ऒफला शफल होत फ्लिक करुन लेग ला टोलवलास, कसं काय जमतं तुला इतकं अतर्क्य टायमिंग, स्टेन सारख्या फास्ट बॊलरपासून निघालेला चेंडू तुझ्या पर्यंत पोहोचेपर्यंत हे सगळं करायला वेळ आणतोस कुठून? इतकं पदलालित्य, ठेका तुला जमतं कस? आणि ते ही ह्या वयात?? १९९* वर असताना धोनीने तुला नॊन स्ट्रायकींग एन्ड वरुन परत पाठवलं ना तेव्हा सांगतो, ठोका चुकला होता.. अंग ठणकत असणार ना इतक्या झटपट हालचाली करत असताना.. पण २०० च्या सिंहासनावर तुलाच विराजमान झालेलं बघायचं होतं.. तू ’छ्त्रपती’ आहेस, दुसया कोणी तिथे जाण्याआधी तू तिथे जाणंच आम्ही स्विकारु शकतो. २०० हा जॆकपॊट असूच शकत नाही तो फक्त एक क्लास आहे. काल रात्री भारतातला प्रत्येक गरिब श्रीमंत ज्याची क्रिकेटवर श्रद्धा आहे, तो तृप्त झाला असेल, दोन घास जास्तीचे जेवला असेल. दिवाळी, गणपती दरवर्षी येतात पण तुझं असं येण आणि बरसणं त्यात न्हाऊन चिंब होणं ह्यासाठी जन्मोजन्मीचं पुण्य लागतं बाबा. कमोदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगितसे!! तसं आहे हे.. &lt;br /&gt;असाच खेळत राहा, मनमुराद! गावस्करने घेतलेली ती १०००० वी धाव आणि तुझी २०० वी, भारत काय करु शकतो हे जगाला दिलेलं एक सणसणीत उत्तर.. आमचं भाग्य की आम्ही तुझ्या पिढीत जन्मलो आणि तू भारतात, तुझ्याबरोबर मोठं होत तुझा प्रत्येक चौकार, षटकार उपभोगण्याचा निर्भेळ आनंद दिलास, त्या आनंदाने कित्येक दु:ख, प्रसंगी एकाकीपण विसरायला लावलय.. तुझ्या आणि तुझ्या खेळाच्या त्रृणात राहाण्यातच धन्यता बाबा.. आज तुझ्या खेळाचं वर्णन इथे अमेरिकन, पाकिस्तानी आणि जमैकाच्या मित्रांमध्ये बसून करताना कसं वाटतय काय सांगणार, माझीच कॊलर ताठ. भारतीय आणि मुंबईकर असल्याचा यथार्थ अभिमान वाटतोय आणि तू.... मॆच नंतर तुझं नेहमीचच, dinesh, pathan &amp; Dhoni played well, ball was coming on to the bat.. वगैरे वगैरे.. किती हा विनम्रपणा, बाबा रे, बॊल सगळ्यांच्या बॆटवर येत होते पण त्यांना अचूक दिशा देणं, टायमिंग साधणं, क्षेत्ररक्षकांच्या मधून किंवा डोक्यावरुन भिरकावणं आणि २०० धावा जमवणं, हे फक्त तुझ्या बॆटला आणि थंड डोक्याने खेळणाया तुलाच जमणार ना! कसे रे राहातात तुझे पाय इतके घट्ट जमिनीवर, कोणती वीट पायी घेतलेयस.. विठ्ठला.. ’तुझाच झेंडा माझ्या हाती...........’&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;एक साठवण:&lt;/strong&gt;&lt;br /&gt;पंधराव्यावर्षी मुंबईतल्या आझाद मैदानावर टॊम अल्टरने घेतलेली सच्च्याची कटींग पिताना घेतलेली अनौपचारीक मुलाखत..&lt;br /&gt;http://www.youtube.com/watch?v=oez4TSdZvJI&lt;br /&gt;&lt;br /&gt;- गेल्या २८ वर्षांपासूनचा तुझा भक्त&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-2505716564736501286?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/2505716564736501286/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=2505716564736501286' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/2505716564736501286'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/2505716564736501286'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2010/02/blog-post.html' title='विठठला....'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/S4cvLAYmA_I/AAAAAAAAATg/DYm6288WI7I/s72-c/114673.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-4366779087320836553</id><published>2010-01-22T17:55:00.005-05:00</published><updated>2010-01-23T13:10:09.660-05:00</updated><title type='text'>कुण्या देशांचं पाखरू...</title><content type='html'>बयाच दिवसांनी लिहितोय, घरात लहान मूल असलं की वेळ कसा जातो कळत नाही, ह्याचा प्रत्यय घेतोय, ’बाप’ होण्याचा सुखद अनुभव आणि वाढत्या जबाबदायाही.. :-) &lt;br /&gt;&lt;br /&gt;  तसे बरेच विषय डोक्यात आहेत लिहिण्यासाठी पण सद्ध्या सगळ्यात जोरात विचार चाल्लेत ते "For here or to go?" चे :-) अपर्णा वेलणकर च्या ह्या पुस्तकाबद्दल मी पूर्वी ह्या ब्लॊगवर लिहिलं होतं आणि त्यातलं नेमकं पुढे कुठे जायचं त्या दृष्टीने पावलं टाकायची वेळ आता आली आहे असं वाटायला लागलय, आम्हाला सगळ्यांनाच. योगायोगाने हे डोक्यात घोळत असतानाच मायबोलीवर रैनाने ’परतोनि पाहे’ हा बीबी सुरु केला आणि मग ह्या प्रत्येक भारतीय इमिग्रेंट्सच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सखोल लिहावसं वाटलं. ह्या अनुषंगाने येणारे मुद्दे, उपमुद्दे ह्यांची सविस्तर चर्चा घरातील सगळ्यांबरोबर बरेचदा झालेय शिवाय समकालीन, समवयीन आणि समस्थितीतिल मित्रमंडळींमध्येही झालेय. प्रत्येकाने आपापल्या परिने "For here or to go?" ह्या प्रश्नाचं उत्तर शोधलय, शोधायला घेतलय किंवा नंतर बघू म्हणून चक्क पुढे ढकल्लय. तर ह्या ब्लॊग मध्ये माझ्या मायबोलीवरच्या लेखातले मुद्दे उचलून ’अमेरिकेत थांबायचं कि भारतात परतायचं?’ ह्याचं उत्तर शोधताना एखाद्यास कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो आणि कशी तयारी करावी लागते ह्याबद्दल लिहीणार आहे. हे वाचणायास अमेरिकेतल्या आयुष्याची कल्पना नसेल तर थोडी माहिती मिळेल पण माझ्यासारख्याच X = X + 1 सिंड्रोम (ह्या बद्दल पुढे लिहीलय) मधल्या कुटुंबास मुद्देसूद विचार करण्यास चालना मिळेल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;हे लिहिताना माझी थोडक्यात पार्श्वभूमी अशी की मी सध्या अमेरिकेत आयटी मध्ये आहे, व्यावसायिक आयुष्याला भारतात सुरुवात केली मग दोन वर्षे भारतीय कंपनीतर्फे अमेरिकेत काम केले, पुन्हा भारतात जाऊन भारतीय़ कंपनीत वर्षभर काम केले. त्यानंतर पुन्हा अमेरिकेत येऊन गेले पाच वर्ष इथे काम करतोय. हे सगळं सांगायचा उद्देश असा की, भारतात तसेच अमेरिकेत (प्रॊग्रेमर लेव्हलपासून प्रॊजेक्ट मॆनेजर, आर्कीटेक्ट लेव्हलवर) काम करण्याची आणि करुन घेण्याची पद्धत, दोन्हीकडचे बदलते जीवनमान, राहाणीमान, सामाजिक प्रश्न अशा संक्रमणातून एकापेक्षा अधिक वेळा गेल्यामुळे काही गोष्टी खूप जवळून अनुभवल्यात. एक महत्त्वाचे म्हणजे माझे व्यावसायिक अनुभव अमेरिका आणि भारत ह्या दोन देशांपर्यंतच आणि सांसारिक अनुभव फक्त अमेरिकेपुरतेच मर्यादीत आहेत. तसेच सुदैवाने भाषा हया महत्वाच्या माध्यमाचा मोठा प्रश्न (जो जपान, चायना मध्ये काम करणायांना अपरिहार्यपणे येतो) आपोआपच नाहीये.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मूळातून विचार करण्यासाठी ’जाओनी किंवा राहोनी पाहे’ या अनुषंगाने आधी मुद्दे माडतोय म्हणजे परतण्याचा विचार त्या त्या गटात वेगळा कसा हे लक्षात येईल. आपले प्रश्न त्याची उत्तर वैयक्तीक पातळीवर बदलतात पण मग जी कारण असतात निर्णय प्रक्रीयेमागे (परतण्याच्या किंवा न परतण्याच्या) ती कोणती ह्यांच्या अभ्यासाचा (analysis) जेव्हा विचार होतो तेव्हा ज्या मुद्द्यांवर एखादा निर्णय घेतला जाईल ते मुद्दे कोणते, प्रत्येक मुद्द्याचं (त्या व्यक्ती/कुटुंबसापेक्ष) महत्त्व काय [म्हणजे तो मुद्दा घडेल ह्याची शक्यता (probability) किती आणि त्याचा परिणाम (impact) किती] ह्या सगळ्यांचा आपल्या अनुभव आणि सदसदविवेकबुद्धीला अनुसरून एकत्रित विचार केला गेला पाहिजे. हे एकदा समजलं की मग उकल काढण्याच्या प्रक्रियेला शास्त्रीय बैठक मिळू शकते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो, तर अमेरिकेत येणारा प्रत्येक जण एकाच सारख्या मार्गाने येत नाही, शिवाय येणाया प्रत्येकाचे उद्दीष्ट ’अमेरीकन ड्रीम’ हेच असते, असेही नाही उलट बरेचदा ते बदलत असते मृगजळासारखे, तर ढोबळमानाने इथे भारतातून आलेल्यांपैकी काही महत्त्वाचे गट -&lt;br /&gt;१. अमरिकेत एम एस किंवा एम बी ए किंवा पीएचडी करू म्हणून उच्च शिक्षणासाठी आलेले लोक&lt;br /&gt;२. भारतात शिकून अमेरिकेत नोकरीसाठी म्हणजे पैसा कमवण्यासाठी आलेले लोक&lt;br /&gt;२.अ. एल १ म्हणजे कंपनी ट्रान्सफर वर आलेले जे इथे नोकरी बदलू शकत नाहीत आणि कंपनीच्या इशायावर केव्हाही परत जावे लागू शकते&lt;br /&gt;२.ब. एच १ म्हणजे जे इथे नोकरी बदलू शकतात आणि नोकरी सुटल्यास व दुसरी न मिळाल्यास काही एक दिवसात परत जावे लागण्याची शक्यता असते&lt;br /&gt;३. भारतातून येनकेनप्रकारेण नातेसंबंधातून इथे ग्रीनकार्ड घेऊन आलेले लोक (उदा. बरेचसे पटेल आपण बघतो..)&lt;br /&gt;४. अमेरिकेत असणाया वरील पहिल्या दोन प्रकारच्या भारतीयांबरोबर लग्न करून आलेले डीपेंन्ड्ट व्हिसावरचे लोक&lt;br /&gt;५. इमिग्रेशनची अडथळा शर्यत पार करून आलेले लोक - जीसी किंवा सिटीझनशिप असलेले&lt;br /&gt;&lt;br /&gt;आता ह्या गटांच्या ढोबळ आर्थिक स्थैर्य आणि साधारण अपेक्षांचा आणि त्याचा वैयक्तिक पातळीवर (कौटुंबिक पातळीवर थोडं नंतर पाहू) परतीच्या शक्यतेवर होणाया परिणामाचा थोडक्यात विचार करु -&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;गट १. &lt;/strong&gt;&lt;br /&gt;ह्यातील बयाचशा लोकांनी इथे येऊन शिकण्यासाठी पदरमोड केलेय अगदी स्कॊलरशिपवर आला असाल तरी किमान दोन वर्षे वेळेची गुंतवणूक केलेय. शिवाय, स्टुडंट लाईफ मधे कॊलेज फुटबॊलपासून एक वेगळी अमेरिका अनुभवलेय, त्यांची अमेरिकेशी थोडी वेगळीच नाळ जुळलेय. शिवाय, वैयक्तीक पातळीवर व्यावसायिक आयुष्यात त्यांना अमेरिकेत शिकल्याने प्रचंड संधी आहे, मागणी आहे. त्यामुळे रीटर्न ऒन इन्व्हेस्ट्मेंट तसेच ऒनर ऒफ टेलेंट ह्या दोन्हीवर विचार करता अशी लोक अमेरिकेत पटकन स्थिरावू शकतात, बरेचदा ह्याच गटातला जोडीदार ते निवडतात. आर्थिक प्रॊब्लेम सुटलेले असतील तर परतण्याचे विचार मनात येऊ शकतात किंवा अमेरिकन ड्रीमच्या दिशेने वेगात वाटचाल तरी करू शकतात. अर्थात, इथे शिकूनही नोकरी मिळत नसेल, ओपीटी नंतर एच वन आणि एच वन नंतर जीसी होत नसेल तर शिक्षणावरचा खर्च, लग्नाचे वय ह्यातून बरीच ओढाताण होऊन परतीच्या शक्यता सक्तीच्या होऊ शकतात. अर्थात ह्या गटातील लोकही गट २ बच्या माध्यमातूनच इमिग्रेशन मधून जात असल्याने त्यांना बयाच सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;गट २.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;ह्यातील २.अ. लोकांना अमेरिकेत कायम राहाणे तसे फार शक्य नसल्याने त्यांना कधी ना कधी परतायचेच आहे हे लक्षात ठेवावेच लागते.&lt;br /&gt;२.ब. अमेरिकेतले मार्केट, तुमच्या व्यावसायिक निपुतणतेला इथे असलेली मागणी, तुमचा अनुभव आणि मुख्य म्हणजे इमिग्रेशनचे नियम ह्या सगळ्या कचाट्यात ही लोक व्यवस्थित भरडून निघत आहेत. लग्नाची समस्या होऊ नये किंवा नक्की काय करायचे हे ठरत नाही किंवा कंपनी तयार होत नाही अशा विविध कारणांनी जीसी लांबणीवर पडले की मग एक चक्र सुरु होते. वर्षानुवर्षे जीसीची वाट पहाणे आणि त्याअनुषंगाने येणारे निर्वासिताचे जीवन चालू होते. बद्लती प्रोजेक्ट्स, जीसी फाईल केलेल्या कंपनीकडून होणारी अडवणूक, ऒनसाईट ऒफशोअर मॊडेल असेल तर कामाचे विचित्र तास ह्याबाबींमुळे अस्थिर जीवनमान सुरु होते. प्रोजेक्ट एकाच ठिकाणी असेल ह्याची खात्री बहुधा नस्तेच शिवाय एच वन वर असल्याने घर घेऊन राहाणे ही मोठीच रीस्क बनते. ह्या मंदी मध्ये होत्याचे नव्हते झालेल्या फॆमिली आपण पाहिल्या असतीलच. शिवाय जीसी येईपर्यंत तांत्रिक दृष्ट्या तुम्ही वर्षानुवर्षे तुमचा कामाचा प्रोफाईल वाढवू शकत नाही त्यामुळे प्रसंगी व्यावसायिक हतबलताही येऊ शकते. समजा एखाद्याला वयाच्या पस्तीशी पर्यंत जरी जीसी मिळाले तरी त्यानंतर वीस वर्षांचे होमलोन, इतका वेळ नोकरी टिकवून ठेवणे आणि संसार उभा करणे म्हणजे मोठी जबाबदारी होऊ शकते. ह्याचा एकत्रित विचार करता ग्रीनकार्ड हा एक जुगार झाला आहे. मुख्य म्हणजे अमेरिकेतल्या नियमांप्रमाणे ग्रीनकार्ड मिळूनही सीटीझन शीप मिळेपर्यंत ह्यातून सुटका नाहीच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;गट ३.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;ह्यांचा इथे येऊन राहाणे हा एकच उद्देश असल्याने परतीचा काही प्रश्न येत नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;गट ४.&lt;/strong&gt;&lt;br /&gt;हा एक महत्त्वाचा घटक आहे. ह्यात आपण बहुसंख्य शिकलेल्या मुली निव्वळ एच ४ वर नोकरी करणे शक्य नाही म्हणून घरी बसलेल्या बघतो. ह्यात त्यांचे करीअरचे वैयक्तिक नुकसान झाल्याची बोच असतेच पण जर अशा व्यक्तीने ड्राइव्हीग, सोशल नेटवर्कींग, इथे वेळेचा स्वत:साठी कसा सदुपयोग करता येईल ह्याचा विचार केला नसेल तर अमेरिकेचा कंटाळा येऊ शकतो आणि मग भारतात परत जाऊया असा दबाव त्यांच्याकडून येऊ शकतो किंवा उलटपक्षी इथले सांसारिक स्वातंत्र्य आवडायला लागून भारतात जायलाच नको असाही सूर आळवला जाऊ शकतो. थोडक्यात, परत जायचं का ह्या मुद्द्यावर ह्या गटाचा प्रभाव अपरिहार्यपणे असतोच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;गट ५&lt;/strong&gt;&lt;br /&gt;ह्या गटातली माणसं बहुतांश इथे पोहोचेपर्यंत आर्थिक दृष्ट्या यशस्वी, स्थिरावलेली असतात. इतके वर्ष जीसी/सिटिझनशीप साठी लढलॊ त्याचे फळं खाण्याचे दिवस असं मनात येतं असतं. कुटब सुद्धा बरच स्थिरावलेलं असतं. अशावेळी आई वडिलांसाठी इथली बसलेली घडी मोडायची असेल तर कुटुंबाला खूप विश्व्वासात घेणं गरजेच वाटतं. परत जाण्यासाठी ह्यांना थोडं जास्तच धैर्य दाखवावं लागतं., इतके वर्षात इथे चांगला जम बसला असेल तर ह्यावर्षी जाऊ पुढच्या वर्षी जाऊ म्हणत (क्ष + १ सिंड्रोम) इथेच राहातात लोकं असं बरेचदा दिसतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक कुटुंब परततं म्हणजे त्यात साधारणपणे कमावणारी (एक वा क्वचित अधिक)व्यक्ति आणि अवलंबित व्यक्ती (जी इथे कमवू शकत नाही पण कमवण्याची पात्रता आहे किंवा जी शिकतेय किंवा शिकण्यायोग्य होतेय). आता परतणाया कुटुंबप्रमुखास तीन पिढ्यांचा विचार करायचाय, आधीची (म्हणजे आई वडील..), स्वत:ची म्हणजे स्वत: तसेच बायको कसा परतीचा बदल मानवू शकेल आणि पुढची पिढी म्हणजे मुलं. हल्ली बयाच वेळा ’मागच्या पिढीसाठी परत जायचं’ ह्याला सरसकट टाळ्या वाजवल्या जातात, पण ते एका चौकटीतच खरं आहे. म्हणजे वृद्ध आई वडिलांसाठी परत जात असाल पण मुलांचे नुकसान होतेय तिथे गेल्याने किंवा अमेरिकेतल्या शिक्षणाची त्यांची संधी हुकली अशी बोच असेल तर मागच्या पिढीसाठी पुढच्या पिढीचे नुकसान केले असं म्हणायला वाव आहे. ह्याउलट पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी इथे थांबलं तर मागच्या पिढीवर अन्याय होण्याची शक्यताही आहेच. सगळ्यांना पटेल असं ह्याचं उत्तर काढण म्हणूनच शक्य नाही हा असा वैयक्तीक प्रश्न आहे की जिथे तुम्हाला काय हवय आणि काय नकोय हे नीट माहिती असायला हवं आणि जो निर्ण्य घेऊ तो ठामपणे तडीस नेऊन जीवनाची अपरिहार्यता समंजसपणे स्वीकारता यायला हवी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;-- ’मी इथे का आलो?’ ह्याचं उत्तर अमेरिकेत जगायला, अमेरिकन ड्रीम पूर्ण करायला असं असेल तर तुमची दिशा अमेरिकेत राहाण्याकडे झुकतेय त्यामुळे गणिताची उकल सोप्पि हॊइल. जर फक्त पैसे कमवायला, जगाच्या दुसया टोकावर काय चाल्लय पहायला हे उत्तर असेल तर अजूनही परतीची धुकधुकी व्यवस्थित आहे. तुमची आर्थिक उद्दीष्ट जेवढी सुस्पष्ट असतिल तेवढं परतीच गणित सोप्प होईल. &lt;br /&gt;-- इथल्या इमिग्रेशन सिस्टीमच्या कचाट्यात २ब गटामधील बहुसंख्य लोकं मोडतात. जीसी फाईल करण्याचा उपयोग फार तर एच वन सहा वर्षांपलिकडे वाढवायला होईल पण जीसी मिळायला (इबी२ किंवा इबी३ असेल) तरी अंदाजे दहा एक वर्षे लागतील. एवढे वर्ष निर्वासितासारखे (आपण आणि कुटुम्बियांनी) आयुष्य जगायचे का हे ज्याचे त्याने ठरवायचे. स्थैर्य हे तुमचे प्रमुख उद्दीष्ट असेल तर अशा स्थितीत नोकरीत, घर खरेदी, मुलांच्या शाळा, त्यांचा कौटुंबिक सहवास ह्या सगळ्या प्रकारांत स्थैर्य मिळणे दुरापास्त आहे. ह्याचं मुख्य कारण म्हणजे इमिग्रेशन लॊज. ह्या गटातील लोकांना नोकरीच्या ठिकाणी सगळ्यांना समान न्याय नाही (तसं अपेक्षित आहे असं नाही, पण नाहीये हे महत्त्वाचं) कारण ग्रीन कार्ड -सिटीझन आणि एच वन ह्यांना कामाचे स्वरुप, मर्यादा, संध्या ह्यात फरक आहे. &lt;br /&gt;-- जोडीदार जर नोकरी करु शकत नसेल (उदा. एच ४ किंवा मुलांना द्यावा लागणारा पूर्ण वेळ किंवा नोकरीची संधी नसणे) आणि महत्वाकांक्षी असेल तर इथे घालवलेला प्रत्येक दिवस त्याच्या व्यावसायिक आयुष्यास त्रासदायक ठरु शकतो आणि कुटुंब अस्थिर करु शकतो. &lt;br /&gt;-- इथली प्राथमिक शिक्षणसंस्था एका मर्यादेपर्यंतच चांगली आहे असे वाटते. म्हणजे लॆब, हुशारीप्रमाणे शिक्षण, व्यावसायानुषंगिक शिक्षण हे सगळ छान आहेच पण इथल्या शालेय वातावरणात मुल वाढवायला तुमच्या मनाची तयारी असायला हवी. तसच तुम्ही जितक्या लवकर अमेरिकन कल्चर आत्मसात कराल तितकं मुलांना सोप्प जाईल. तिथे शिकले तर आपल्यातले पुष्कळ जण आले तसे उच्चशिक्षणासाठी मूल इथे येऊही शकेल मोठे झाल्यावर. भारताल्या प्राथमिक शिक्षणपद्धतीत मुलांवर बोजा खूप आहे, मान्य पण आता तिथेही शाळा अभ्यासक्रमांत हा मुद्दा विचारात घेत आहेत आणि घरी स्पर्धेतून मुलाचा कोंडमारा होत नाही ना ही काळजी आपण घेतली तर बराच फायदा होऊ शकतो. &lt;br /&gt;-- इथे ठरलेले सणवार (बयाचदा) सोयीस्कर विकेंडला करायचे, दोन वर्षातून एकदा भारतात तीन आठवडे जाऊन ’जी ले तेरी जिंदगी’ करायचं आणि त्यावर समाधान मानायचं हे तात्पुरतं जमेल पण कायमस्वरूपी जमेल का ह्याचा नक्की विचार करायला हवा. अमेरिकेत म्हातारपण घालवायची तयारी आहे का ह्याचाही विचार करायला हवा.&lt;br /&gt;--एक पालक म्हणून, मुलांमध्ये मराठीची आवड निर्माण व्हावी असं मनापासून तुम्हाला किती वाटतं आणि ते किती गरजेचं वाटतं? वाटत असेल तर इथे राहून ते अजिबात सोप्प नाही. तुम्हाला वाटेल  ते पुण्यातही शक्य नाही पण ते पटत नाही. अजूनतरी पुण्यामुंबईत मराठी मेलेली नाही उलट ’राज’कीय कारणांमुळे तिला पुन्हा बळ येतय. नुसती भाषा नाही तर मराठी संस्कृतीशी पुढच्या पिढीची (ती त्याच्या पुढच्या पिढीत्त तशीच जुळलेली राहावी असा हट्ट नाही) नाळ जुळावी असं वाटत असेल तर नीट विचार होणं आवश्यक आहे. उदा. ’पु.लं. चा नारायण’ मी मुलाला समजावू शकलो पाहिजे, ’चाफ्याच्या फुला’ त्याच्याबरोबर बसून समरसून ऐकू शकलो पाहिजे साहित्याची, वाद्मयाची गोडी त्याला लावता आली पाहिजे अशी इच्छा असेल तर ते इथून वर्षाकाठी काही पुस्तक मागवून पूर्ण होण कठीण वाटतं. शिवाय, ते तिथे (हो बदलत असले तरीही) वातावरणामुळे आपोआप घडून येईल इथे राहिलो तर मात्र नाही म्हटलं तरी मुलांवर मराठी लादावं लागेल आणि जे मराठी भाषेचं आहे तेच अभिजात हिदुस्थानी संगीताच. तिथे सवाई गंधर्व, वसंतोत्सवासारखे उत्सव आणि जर त्याला आवड असेल तर दिग्गज संगीत तन्द्न्य गुरुस्थानी मिळू शकतील, इथून ती आवडं निर्माण करणं थोडं आडवळणाच हॊईल असं वाटतं. अर्थात उदा. इथे राहून व्हायोलिन शिकता येईल तिथे जाऊन हिंदुस्थानी संगीत मुलाने शिकायलाच हवे असे नाही असे एखाद्यास वाटत असेल तर ते वावगे नाही. पालकत्व हा शेवटी वैयक्तिक प्रश्न आहे. हा फक्त मराठीचा मुद्दा झाला पण जर पुढे संस्कृत, उर्दू शेरो शायरी असं काही वेगळं शिकण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्यायचं असेल तर ते भारतातच जास्त सोप्प आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt; ’जगी सर्व सुखी असा कोण आहे?’, प्रत्येकाला इथे राहा किंवा तिथे राहा समस्या आहेत. आपण जगतोय म्हणजेच चांगले वाईट असे भोग भोगतोय. त्यामुळे आपल्याला येणाया समस्यांवर आणि त्यांच्या निवारण्यावर आपलं किती नियंत्रण आहे हे महत्त्वाचं. भारतात तुमच्याकडे पैसा असेल तर बयाच प्रश्नांवर चांगले नियंत्रण येऊ शकते असे म्हणतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;कौटुंबिक पातळीवर -&lt;/strong&gt;&lt;br /&gt;इथे जोडपं काम करत असेल तर विकेंड घरकामात, पुढच्या आठवड्याच्या पूर्वतयारीत जातात, रोज सकाळ संध्याकाळ ताजं जेवण मिळतच असं नाही, मुलांना डेकेअर मध्ये ठेवणं अपरिहार्य असतं. ह्याउलट भारतात मनुष्यबळाचा अभाव नाही. तुमचं आर्थिक नियोजन नीट असेल आणि विश्व्वासू माणसं तुम्ही निवडू आणि टिकवू शकलात तर बरीच काम आऊटसोर्स करता येऊ शकतात. शिवाय, आइ वडिलांचा तसेच शेजार्यापासून इतर नातेवाईकांचा आधार मिळवू शकता, धोबी, इस्त्री, पोळ्याला बाई, स्वयंपाकाला बाई, केरवारं करायला बाई अशा अनेक पातळ्यांवर आपण आपली काम करवून घेऊ शकता आणि वेळ वाचवू शकता. नातेवाईकांबरोबर येणार्या लग्न मुंजी बारशी डोहाळेजेवणं अशा कार्यांना पैठण्या नेसून दागिने घालून मिरवणे अशा मजांबरोबरच कुत्सितपणा, भोचकपणा, चोमडेपणा अशा अवगुंणांचाही आपल्याला सामना करावा लागतो पण ते कसं परतून लावायचं की त्याचा ताण घ्यायचा हे पूर्णत: तुमच्यावर आहे. एकूणात दहीहंडी, संक्रांत, गणपती, दिवाळी, पाडवा आणि प्रत्येक सणच जोरदार उत्साहात साजया होणाया ठिकाणी (उदा. गिरगाव, दादर, ठाणे) तुमचं आयुष्य गेलं असेल तर एका उत्सवी जीवनाच आकर्षण आपल्याला असतं, अमेरिकेतलं जीवनमान त्यामुळेच कित्येकदा तेच ते आणि चाकोरीबद्ध वाटू शकतं.&lt;br /&gt;भारतात परतल्यावर तुमचे तसेच जोडीदाराचे आई वडील जवळ असतील, त्यांनाही बरं वाटेल, सहवासाचं प्रेम वाढेल, त्यांच्या तब्येतीची इथे राहुन जी काळजी असेल तर ती उरणार नाही. त्यांनाही मुला-नातवाबरोबर जीव रमवता येईल, नातवालाही डेकेअरची गरज भासणार नाही असं सगळं जूळून आलं तर तुमचं काम सोप्पच होईल खूप.&lt;br /&gt;तिथले गड किल्ले, धार्मिक स्थळे किंवा डोंगर दया, गावं, शेतं तुम्हाला खुणावत असतील तर भारतात असाल तर निदान काही महिन्यातून रजा टाकून ह्यातलं थोडं थोडं तुम्ही नक्कीच उपभोगू शकता. प्राजक्त, रातराणी, सोनटक्का, चाफा, मोगरा, बकुळी अशा नानाविध फूलांचे सुगंध तुम्हाला नॊस्टेल्जिक करत असतील किंवा देवगड हापूस तुम्हाला इथे अमेरिकेत कोरडे उसासे टाकायला लावत असेल तर भारतात हे सगळं तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना भरभरून आहे हे लक्षात असलं पाहिजे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;व्यावसायिक पातळीवर-&lt;/strong&gt;&lt;br /&gt;भारताच्या विकासाचा वेग अमेरिकेच्या विकासाच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त आहे. मान्य आहे भारतात भ्रष्टाचार आहे पण त्यामुळे अब्दुल कलाम आणि नारायण मुर्थी घडायचे थांबत नाहीत. भ्रष्टाचारामुळे, राजकारण्यांमुळे वेग कमी होत असेल पण जागतिक रेट्यामुळे, माहितीच्या स्त्रोतांमुळे बरेच फायदे होत आहेत. कोणी सांगावे. अशाच वेगात धावत राहिला तर भारत येत्या पंचवीस वर्षात अमेरिकेच्या आसपास येईलही, हे स्वप्नरंजन मुळीच नाही. शिवाय, भारत विकसनशील असल्याने आणि आपल्यासारख्यांनी विकसित देश म्हणजे काय हे अनुभवले असल्याने भारतात लघु उद्योगाच्या (विशेषत: आय टी क्षेत्रात) प्र चं ड संधी आहेत.  एस एस एन सारखी सिस्टीम भारतातही येतेय. आर्थिक क्षेत्रातही सेबीने बरीच शिस्त आणलेय, आयसीआयसीआय डीरेक्ट सारखी पोर्टल्स व्यवस्थित काम करताहेत. लोकसंख्येचा बोजा भारतावर आहे हे मान्य पण हीच लोकसंख्या शिकतेय, ह्यात सुशिक्षित तरुणांचे प्रमाण वाढतेय आणि त्यांना संधी उत्पन्न करुन दिली तर खूप काही करता येईल (जे टाटा, अंबानीने केलं..). त्यामुळे परत गेल्यावर काय असा प्रश्न तूर्त तरी पडत नाही, थोडक्यात इथल्या अनुभवाला भारत बयापैकी न्याय देऊ शकेल असा विश्वास वाढतोय.&lt;br /&gt;कामाच्या बाबतीत अमेरिकेतल्या लोकांना जरा जास्त सहानुभूती मिळतेय असं वाटतं. एन जे (जर्सी सिटी नव्हे) मधे राहून न्यू यॊर्कला अपडाऊन करणारे मित्र सकाळी सहाला जाणार ते रात्री आठ्ला घरी, अगदी कडाक्याच्या थंडीतही. याउलट पुण्यात बाईक वरुन मी १५ मिनिटात ऒफीसला जायचो. मला एवढच म्हणायचं की तुम्ही योग्य ठिकाणी असाल आणि तुमचा व्यावसायिक अनुभव पाठीशी असेल तर घराच्या जवळ किंवा वर्क फ्रॊम होम असा जॊब तुम्ही कुठेही मिळवू शकता नाहीतर कार पुलिंग सारखा उपाय आहेच. इथे अमेरिकेत आयबीएम मधे काम करताना आठवड्यातून चार दिवस क्लायंट कडे आणि एक दिवस घरुन काम अशी कन्स्ल्टींग जॊब मधे जबाबदारी पेलणारे पाहिलेत, त्यांच्या घरच्यांना खरच सलाम. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;सामाजिक पातळीवर-&lt;/strong&gt;&lt;br /&gt;भारतातलं जीवनमान नक्की सुधारतय. प्रत्येक भारतवारीत ते प्रकर्षाने जाणवतय. आज इंटरेनेटवरुन पुण्याच्या जागेचं विजेचं बील मी भरू शकतोय. रस्ते, वाहतूक ह्या समस्या आहेत मान्य पण त्यांना कसं टाळायच हे तुमच्यावर आहे. मुंबईतल्या गर्दीला घाबरून तुम्ही मुंबईत गेलाच नाहीत तर तुम्हाला मुंबईची नशा कशी कळणार.. आणि गर्दी शिवाय मुंबई हा तुमचा हट्ट असेल तर ते शक्य नाही हे स्वीकारता यायला हवंच, कुरबूर करुन काहीच साध्य होणार नाही. एकंदर भारतातही सुविधा येत आहेत. वीज, पाणी अशा समस्या जरूर आहेत, लोकसंख्येचा बोजा आहे पण भारताने शिक्षणाबरोबर दिलेल्या इतर अनेक चांगल्या गोष्टीबरोबर ही कडू गोळीही गिळायला हवी ना. तिथेही माणसं राहात आहेत आपण नक्की ऎडजस्ट करू असा विश्वास आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;मग करायचं काय?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;एक मात्र नक्की, भारतात जाणार असाल तर व्यवस्थित आर्थिक नियोजन करुनच (त्यात बॆंक बॆलन्स बरोबर योग्यवेळी घर घेणे आलेच) जायला हव असं मनापासून वाटतं. दुसरं म्हणजे तुम्ही योग्यवेळी निर्ण्य घेतला नाहीत किंवा तो लांबवणीवर टाकत राहिलात तर तुम्ही वेळेचा अपव्यय करण्याची शक्यता बळावते. जेथे तुम्हाला आयुष्यातील जास्त काळ राहायचे तिथे कौटुबिक जीवनास लवकर सुरुवात करणे (होमलोन, स्कूलिंग वगैरे च्या दृष्टीने) कधीही सयुक्तिक आहे. म्हणूनच मुलांना थोडे इथले आणि थोडे तिथले असे प्राथमिक शिक्शण द्यायला लागणार नाही ह्याचा जरूर विचार करायला हवा. अशावेळी मुलांना मित्रमैत्रिणी जोडणे, सोशल एक्सेप्टन्स ह्या पातळ्यांवर ताण सहन करायला लागण्याची शक्यता आहे. मुलांचे व्यक्तिमत्त्व ज्या काळात घडते त्याकाळात अस्थैर्यामुळे किंवा बदलांमुळे त्यांच्यात कुठलाही न्यूनगंड निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. पूर्ण अमिरेकेतले की पूर्ण भारतातले शिक्षण द्यायचे हा निर्णय मुलाच्या पाचव्या वर्षापर्यंत घेता आला तर केव्हाही उत्तमच अर्थात तुमचा ’पॊईंट ऒफ नो रीटर्न’ तुम्ही ठरवायचा.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परतीची वा न परतीची एका पेक्षा अधिक कारणं असू शकतात, ती किती सबळ आहेत हे ठरवता येण्यासाठी अशा चर्चेचा अंशत: तरी उपयोग होऊ शकेल असं वाटतं. तशी ती पुरेशी सबळ असतील तर घेतलेला निर्णय हा जाणीवपूर्वक असल्याने कुठलीही (इथे राहिलात तर इथे किंवा तिथे गेलात तर तिथे) एडजेस्टमेंट होऊ शकतेच. तर आपल्यापुरतं ती कारणं शोधणं आणि त्यांची सबळता ठरवणं महत्त्वाचं. &lt;br /&gt;&lt;br /&gt;शुभं भवतु!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-4366779087320836553?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/4366779087320836553/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=4366779087320836553' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/4366779087320836553'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/4366779087320836553'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2010/01/blog-post.html' title='कुण्या देशांचं पाखरू...'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-4834009125725991888</id><published>2009-11-29T14:43:00.014-05:00</published><updated>2009-11-29T15:32:23.078-05:00</updated><title type='text'>कोण मेले? कुणासाठी? रक्त ओकून..</title><content type='html'>२६ नोव्हेंबर च्या मुंबईवरच्या भ्याड हल्ल्याला एक वर्ष झालं. अशा प्रसंगी हुतात्म्यांची आठवण काढायची आणि भरत आलेल्या जखमांवरच्या खपल्याही काढायच्या. होय! असं मुद्दाम म्हणतोय कारण एकूणच प्रशासन मुर्दाड झालय़ आणि लोकांचं आयुष्य इतकं वेगवान झालय की काळाचं औषध बेमालूम वठतं आणि लोक विसरतात, पचवतात आघात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एका वर्षापूर्वी ह्याच ब्लॊगवर लिहीलेल्या उतायाची ही लिंक.. &lt;a href="http://upasanip.blogspot.com/2008/12/sssssssss.html"&gt;सरणार कधी रण..प्रभोsssssssss.&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;काय झालं एका वर्षात --&lt;br /&gt;१. पाकिस्तानने अतिरेकी हे पाकिस्तानी आहेत हे आधी जाहीर नाकबूल केलं पण काही दिवसांनी ते तेथलेच आहेत हे कबूलही केलं. तोयबाच्या नेत्यांना अटक करण्याची नाटकं केली आणि मग सोडूनही दिलं. भारतीय राजकारणी आणि प्रशासन, अमेरिका आणि जगाला पुरावे देऊन आणि पाकिस्तानला पोकळ धमक्या देऊन हातावर हात ठेवून गप्प राहिलं.&lt;br /&gt;२. करकरेंचं बुलेटप्रूफ जॆकेट हरवलं म्हणून देशाच्या ग्रृहमंत्र्यांनी वीरपत्निची जाहीर माफी मागितली. ते जॆकेट निकृष्ट दर्जाचं होतं म्हणे! :( &lt;br /&gt;३. कसाबचा खटला कोर्टात उभा करून त्याच्या सुरक्षेवर अत्तापर्यंत कोट्यावधी रुपये खर्चे करावे लागलेत, आणि एकीकडे आपदग्रस्तांना पूर्ण मदत मिळू शकली नाही सरकारकडून. त्याचा खटला अजून किती दिवस चालेल प्रश्नचिन्हच आहे आणि एवढं करुन दयेचा अर्ज राष्ट्रपतींना करुन तो अफझल गुरू सारखी फाशी रद्द करवून घेतो की काय बघायचे, सगळाच पोरखेळ.&lt;br /&gt;४. महाराष्ट्र पोलिसदलातले वाद चव्हाट्यावर आलेत आणि गफूर, रॊय, मारीया आणि वरिष्ठ पोलिस अधिकायांतली वादावादी जनतेपुढे उघड झाली. २६ नोव्हेंबरला दुसरा कसा बेजबाबदार वागला हे सांगण्याची सगळ्य़ांतच अहमहमिका लागलेय.&lt;br /&gt;5. राम प्रधान समितीचा अहवाल नेमके काय सांगतो कळू शकेल काय? त्यात मांडलेल्या त्रुटी काय आहेत आणि त्या कश्या दुरूस्त केल्या गेल्या ह्याचे नि:पक्षपाती उत्तर मिळेल काय?&lt;br /&gt;६. अतिरेक्यांचे मृतदेह रासायनिक प्रक्रीयेने सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. पाकिस्तानने ते घेण्यास इन्कार केलाय आणि भारत सरकारही त्यांची विल्हेवाट लावण्यास उत्सुक दिसत नाही.&lt;br /&gt;७. भारताच्या सागरी सीमा खरचं सुरक्षित आहेत काय याचे अजूनही ’होय’ असे ठाम उत्तर देता येत नाही. समुद्रमार्गे पूर्वी आलेले आरडीएक्स. अत्ता आलेले अतिरेकी आणि त्यानंतरही गस्त नौकांमधल्या त्रूटी, समन्वयाचा अभाव हीच त्याची मुख्य कारणे.&lt;br /&gt;८. महाराष्ट्र सरकारने अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी कमांडॊंचे एक खास पथक तयार केले आहे, ही एक खरोखरच चांगली बाब. तसेच सरकारने काही अद्ययावत शस्त्रे खरेदी करुन पोलिस खाते अधिक शस्त्र सज्ज केले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुढे काय? काही प्रश्न..&lt;br /&gt;१. आजही माझ्यासारख्या एखाद्या सामान्य नागरीकास आपत्कालीन परिस्थितीत कसे तोंड द्यायचे, काय करायचे आणि काय करायचे नाही ह्याचे प्रशिक्षण देणारा उपक्रम आहे का? असे उपक्रम राबवून सुजाण नागरिकांची फळी निर्माण करता येणे का शक्य नाही? सरकार नाही तर निदान एखादी सेवाभावी संस्था यात लक्ष घालु शकेल का?&lt;br /&gt;२. मिडीया ही आज एक अतिशय संवेदनशील बाब झाली आहे आणि वेगवान माहिती स्त्रोतांमुळे ती अधिक जबाबदार असणे आवश्यक आहे. हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि ८०% मोबाईल्स मधे दृक-श्राव्य रेकॊर्डींगची सुविधा असतेच. शिवाय एसेमेस मुळे बातम्या (खया किंवा खोट्या) भराभर पसरतात. एकूणच ह्या मोबाईल नेटवर्क्सवर ल्क्ष ठेवणे, अतिरेक्यांनी मोबाईल वापरले तसे कोणाला वापरता येऊ नयेत ह्याची अंमलबजावणी करणे आवश्यक नाही का? सरकारने ह्यासाठी काय पाऊले उचलली आहेत ते कळायलाच हवे.&lt;br /&gt;३. वरच्याच मुद्द्याला अनुसरून पीत पत्रकारीते पासून लांब राहून आपला टी.आर.पी वाढावा म्हणून कुठल्याही थराला न जाता, लोकांच्या संवेदनशील भावनांना भडकवण्याचे साधन होऊ न देण्याची जबाबदारी हे सत्राशे साठ चॆनेल्स घेतील का? ते स्वत:च अशी एखादी आचारसंहीता तयार करतील का किंवा तसा त्यांच्यावर दबाव आणता येईल का?&lt;br /&gt;४. दुर्दैवी रीत्या अशा किंवा दुसया कुठलाही प्रकारचा हल्ला पाकिस्तानकडून झालाच तर भारत सरकारची भूमिका काय असेल? ते असेच गप्प राहाणार का? शिवाय, मुंबईतल्या जनतेच्या सुरक्षितेविषयी महाराष्ट्र सरकारची, भारत सरकारची नेमकी जबाबदारी विषद होईल काय, जेणे करुन एकमेकांकडे बोटे दाखवली जाणार नाहीत.&lt;br /&gt;५. आपली गुप्तहेर यंत्रणा ह्या हल्ल्याची आधीच माहिती काढण्यात अपयशी ठरली, असे का झाले आणि ही जबाबदारी कोणाची हे कळू शकेल का, आणि पुन्हा असे कूचकाम गुप्तहेर यंत्रणेकदून होणार नाही याची हमी भारत सरकार देईल काय? तसेच ह्या यंत्रणेतील पोकळ्या भरण्यासाठी सरकारने गेल्या वर्षभरात काय केले ते कळू शकेल का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;एका वर्षानंतर मुंबईकरांच्या मनातली भीती अजूनही डोळ्यांत तशीच दिसतेय, सकाळी घराबाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरी येईल ह्याची खरच शाश्वती उरलेली नाही. प्रचंड वाढलेली गर्दी आणि सोयी सुविधा, प्रशासनावर त्यामुळे पडणारा ताण ह्यात सामान्य मुंबईकर पूर्वीसारखाच होरपळून निघतोय आणि अपरीहार्यपणे व अगतिकपणे (मुंबई स्पिरीट हे त्याचं गोंडस नाव) ट्रेनला लोंबकाळत खस्ता खातोच आहे, दुसरा इलाजच काय म्हणा.. !!&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्यावेळी २६-नोव्हेंबरला रक्तदान शिबीरे आणि वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहाण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ह्या ब्लॊग मार्फत माझ्या भावनांना वाट देऊन माझीही श्रद्धांजली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;"पब्लिक मेमरी इज शॊर्ट" म्ह्णणणायांना तसेच येणाया पिढ्यांना हा हल्ला नेमका कसा होता त्याची दाहकता, विषण्णता कळत राहाण आवश्यक आहे. नाहीतर संयुक्त महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचे विस्मरण जसे आमच्या पिढीला होतेय तसे कैक वर्षांनी ओंबाळे, साळसकर, कामटे, शिंदे विसरले जातील.. "कोण मेले कुणासाठी रक्त ओकून.." असंच दुर्दैवाने म्हणावं लागेल.&lt;br /&gt;म्हणूनच २६-नोव्हेंबर-०८ च्या थराराचे हे फोटो इथे देत आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;विशेष सूचना&lt;/strong&gt;&lt;br /&gt;ह्या फोटॊतील काही फोटॊ खूप्पच अंगावर येणारे, मन, बुद्धी आणि संवेदना बधीर करुन सोडणारे आहेत त्यामुळे ही खालची लिंक आपल्या जबाबदारी वर उघडावी.  &lt;br /&gt;&lt;a href="http://www.boston.com/bigpicture/2008/11/mumbai_under_attack.html"&gt;२६-नोव्हें. २००८ चा थरार पहाण्यासाठी इथे क्लिक करा..&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जय हिंद!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-4834009125725991888?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/4834009125725991888/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=4834009125725991888' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/4834009125725991888'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/4834009125725991888'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2009/11/blog-post_29.html' title='कोण मेले? कुणासाठी? रक्त ओकून..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-2946805146818950128</id><published>2009-11-22T09:49:00.003-05:00</published><updated>2009-11-22T09:52:28.150-05:00</updated><title type='text'>मराठी बाणा..</title><content type='html'>बरेच दिवसांत खूप काही घडून गेलं आणि काळ एकदम पुढे गेल्यासारखं वाटलं, वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरांवर सगळीकडेच. वेगात घटना घडत आहेत आणि त्या त्यावेळी मनात असलेलं बोलायचं, लिहायचं राहून जातय असं वाटू लागलं. थोडं लिहिलं किंबहुना लिहू म्हटलं तरी विचारांत सुसंगती येते (आल्यासारखी वाटते) शिवाय जाता जाता आपल्या मताची नुसती पिंक टाकण्यापेक्षा एखाद्या प्रश्नाचा, मुद्द्याचा अधिक सखोल विचार केला जातो. दुसरा मुद्दा म्हणजे माझ्या मनातले विचार इतरांपर्यंत पुन: पुन्हा पोहोचू शकतात त्याचं समाधान मिळतं ते वेगळच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;असो, तर मराठीच्या मुद्द्यावर मराठी मतांची व्यवस्थित फोडाफोडी करुन आघाडीचे सरकार सत्तेवर आले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढच्या निवडणूकीपर्यंत सुखाने पादा पण नांदा म्हणून शुभेच्छा! मनसेने जी मुसुंडी मारलेय त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. उद्धव साहेबांनी कॊर्पोरेट कल्चर आणण्याचा प्रयत्न केला जरुर, पण निकाल पहाता त्यांच्या बयाचश्या खेळी चुक्या म्हणजे खूप्पच चुक्याच! सदा सरवणकराची वासलात लावून, काल पक्षात आलेल्या आदेश बांदेकरला उद्धव साहेबांनी उमेदवारी दिली आणि दोघेही (आदेशराव आणि शिवसेना) दादरसारख्या ठिकाणी तोंडावर आपटले, त्यातही सदा सरवणकर कॊग्रेसला जाऊन उमेदवारी मिळवता झाला (तेथल्या स्थानिक कॊग्रेसच्या कार्यकर्त्यांवर अन्यायच तो!) आणि त्यात फायदा मात्र झाला मनसेचा. जय हो! एकूण निकाल पाहाता, मराठी मतदारला चुचकारण्यात राजसाहेबांना यश येतेय यात वाद नाही आणि मला व्यक्तिश: ह्याचा आनंदच वाटतो. निदान कोणीतरी मराठी बाणा (आठवा डोंबिवली फास्ट) दाखवतो आणि मी मराठी आहे असे अभिमानाने सांगतोय (मतांसाठी का होईना!), हे ही नसे थोडके. खरं सांगायचं म्हणजे, माझ्या लहानपणी पाहिलेली शिवसेना मला आज मनसेमध्ये दिसतेय आणि माझाच कुठलातरी इगो सुखावतोय. शिवसेनेची राज्यस्तरीय पक्ष म्हणून वाढ होत असताना भाजपासारख्या राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षाबरोबर युती असल्याने शिवसेनेची वैचारीक दमछाक आणि कोंडी होतेय. आजही ठाकरेंना सामन्यात अग्रेलेखातून आगपाखड करावी लागतेय, कारण शिवसेनेची अशी ठसठशीत भूमिकाच राहिलेली नाही. निवडणूकीतल्या पराभवानंतर सुद्धा बाळासाहेबांची उद्विग्नता, हतबलता, नैराश्य सामन्याच्या अग्रलेखांतून दिसले पण एक नेता म्हणून उद्धव साहेब पत्रकारांना सामोरे गेलेत, जबाबदरी स्विकारलेय असं चित्र कुठेच दिसलं नाही. तरुणांचा ओढा शिवसेनेकडे पूर्वी इतका राहिला नाही, एक तर राहूल गांधीनी कॊंग्रेसमध्ये युवा कॊंग्रेसच्या माध्यमातून सुशिक्षित तरूण उमेद्वार देऊन तरूण फळी उभारलेय त्यामुळे तरूण मुले तिथे तरी जात आहेत किंवा राजच्या आंदोलनातल्या ग्लॆमर मुळे मनसेकडे तरी. त्यामुळे शिवसेनेचे पुढे काय होणार हा प्रश्नही विषण्ण करतोच. बाळासाहेबांच्या विचारांच्या ठिंणग्यांतून उभारलेली शिवसेना, जिने बरंच काही दिलय महाराष्ट्राला, मुंबईला आणि मराठी माणसाला तिचा भाऊबंदकीमुळे कडेलोट होत असेल तर त्याचं वाईट वाटतच. मनसे आणि शिवसेना एकत्र यावेत आणि बाळासाहेबांनी शिवसेनेचं सुकाणू आपणहून राजच्या हाती द्यावं असं गोड स्वप्न माझ्यासारख्या कित्येकांना पडत असावं पण बाळासाहेबांचा ह्याबतीत तरी धृतराष्ट्र झालाय असं दिसतं. मराठी माणसाचं दुर्दैव, दुसरं काय, मराठीच्या भल्यासाठी इतकं करू शकाल तुम्ही बाळासाहेब? &lt;br /&gt;&lt;br /&gt;विधानसभेत मस्तवाल अबू आझमीला चोपला तेव्हा मनात कुठेतरी बरं वाटलंच. विधानसभेसारख्या पवित्र ठिकाणी असं व्हायला नको होतं असे नक्राश्रूही कित्येकांनी ढाळले, पण चोर देवळात लपल्याने साधू होत नाही त्याला प्रसंगी मंदिरात घुसून चोपावे लागते, त्यामुळे झाले ते बरेच झाले. त्या एकंदर प्रकरणाबाबत वृत्तपत्रांत वेगवेगळ्या दृष्टीकोनातून आलेल्या बातम्या वाचल्या आणि काही मूलभूत प्रश्न पडले त्यांची उत्तरे शोधायचा प्रामाणिक प्रयत्न सुरु केलाय. मुळात मी संकुचित दृष्टीचा मुळ्ळीच नाही आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती, देश, भाषा ह्यांच्याशी माझं नातं वेगळं आहे, असायलाच हवं. त्यामुळे प्रांतियता, भाषा एका प्रतलात, चौकटीत जपायलाच हवी असं मला मनापासून वाटतं. तसच डावा हात श्रेष्ठ की ऊजवा अशा फालतू वादातही मला अर्थ वाटत नाही त्यामुळे हिंदी भाषा मोठी कि मराठी, भारत जवळचा कि महाराष्ट्र असे प्रश्नच मला अस्थानी वाटतात, दोघेही एकमेकांस पूरक आहेत एवढंच म्हणता येईल. &lt;br /&gt;मी मराठी आहे म्हणजे माझ्यापुरतं नेमकं काय?&lt;br /&gt;१. माझी मातृभाषा मराठी आहे. मी मराठी बोलू, वाचू आणि लिहू शकतो. मला मराठीतून विचार व्यक्त करायला आवडतात. मला मराठी वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंक वाचायला आवडतात.&lt;br /&gt;२. मी मराठी साहित्य वाचण्याचा आणि ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मी तुकाराम, रामदास, द्न्यानेश्वर, अत्रे, पुल, जीए, ग्रेस, पाडगावकर, कुसुमाग्रज, सावरकर तसेच इतर कैक मराठी साहित्यकांचा वारसा सांगतो. &lt;br /&gt;३. मराठी रंगभूमी (व्यावसायिक तसेच प्रायोगिक) तसेच मराठी चित्रपटसृष्टीबद्दल मला प्रेम आहे.&lt;br /&gt;४. मी मराठी माणसाशी मराठीतूनच बोलतो.&lt;br /&gt;५. मी शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो. त्यांनी आम्हाला स्वाभिमान, धाडस, शौर्य दिले हे अभिमानाने सांगतो. शिवाजी महाराज झाले नसते तर कदाचित ही भाषा, धर्म, संस्कृती मला मिळालीही नसती ह्याची मला जाणीव आहे (न होता शिवराय, तो सुंता सबकी होती, असे कविवर्यांचे बोल आहेत!).&lt;br /&gt;६. महाराष्ट्राने भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात दिलेल्या योगदानाचा मला अभिमान असून, टिळक, तात्याराव सावरकरांसारख्या अनेक राष्ट्रीय नेत्यांनी वेचलेल्या आयुष्याची आणि भोगलेल्या कष्टांची मला जाणीव आहे.&lt;br /&gt;७. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ काय होती, ती कशी आणि का झाली ह्याची माहिती मी घेतली आहे शिवाय माझ्या बरोबरीच्या तसेच पुढील पिढीपर्यंत ती माहिती पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे (ह्यावेळच्या मायबोलीच्या दिवाळी अंकात केदार जोशी यांनी ह्यासंबधी विस्तृत लेख लिहिला आहे.) मुंबई ही महाराष्ट्रात राहावी आणि ती मराठी भाषिकांची व्हावी म्हणून ज्या हुतात्म्यांनी रक्त सांडले त्यांसाठी मी सदैव कृतद्न्य आहे. आज केवळ त्यांच्यामुळेच मी माझ्या महाराष्ट्राचा वारसा सांगू शकतो. &lt;br /&gt;८. चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजे गुढीपाडव्याला नविन वर्ष सुरू होत असून गणपती, गोविंदा, दसरा, दिवाळी असे मराठी मनाच्या जवळचे सण मी उत्साहाने साजरे करतो.&lt;br /&gt;९. महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांवर आणि वनसंपत्तीवर माझा जीव आहे.महाराष्ट्रात राहाणाया मग तो कुठूनही येवो, प्रत्येकाने इथल्या मातीवर, भाषेवर आणि संस्कृतीवर भरभरून प्रेम करावे, इथे समरसून जावे असे मला मनापासून वाटते. &lt;br /&gt;१०. पुरणपोळी, कांद्याचे थालिपीठ, झुणका भाकर, भरले वांगे असे अस्सल मराठी पदार्थ मला मनापासून आवडतात.&lt;br /&gt;११. महाराष्ट्र राज्यापुढचे प्रश्न तसेच बेळगाव सीमा प्रश्न ह्याबद्दल मी जागरुकतेने माहिती करुन घेतो. तसेच महाराष्ट्रात काम करणाया विविध सामाजिक संस्था, त्यांची कामे आणि समाजसेवक (गाडगेबाबा, फुले, आमटे, लहाने, बावीस्कर इ.) ह्यांविषयी मी सदैव कृतद्न्य आहे.&lt;br /&gt;१२. भारतीय स्तरावर किंवा इतर राज्यातील मित्रांशी बोलताना मी महाराष्ट्राची बाजू मांडतो. मेहनती, स्वयंसिद्ध, हुशार, प्रामाणिक, शूर, पापभिरू, साहित्यप्रेमी अशी मराठी माणसाची प्रतिमा मी इतरांपुढे मांडतो. मराठा रेजिमेंट आणि त्यांच्या पराक्रमाबद्दल अभिमानाने सांगतो. आत्ममग्न, कूपमंडूक, एकीचा अभाव, भाऊबंदकी, व्यापार तसेच खूप पैसे कमाण्याविषयी अनास्था असे मराठी माणसाचे दुर्गुणही मी मान्य करतो :)&lt;br /&gt;&lt;br /&gt;मुख्य म्हणजे माझी मातृभाषा मराठी असणं आणि मी महाराष्ट्रीय असणं हे मी भारतीय असण्याच्या कुठेही आड येत नाही. जसे की मी एकाचवेळी कोणाचा तरी नवरा आहे, मुलगा आहे, भाऊ आहे आणि बापही. त्यांच्याशी माझी नाती ही परस्परपूरक राहातील अशी ठेवणे मला महत्त्वाचे. तसच भाषेचं. घटनेने आपल्याला भाषावार प्रांतरचना दिली आहे. घटनात्मक लढा देऊन मुंबई महाराष्ट्राने मिळवली आहे. मुंबईचं मराठीपण टिकवण्याची जबाबदारी आपली. हिंदीचा, इंग्रजीचा दुस्वास न करताही मराठी आपली आहे. मुंबई ही सगळ्या भारतियांचीही नक्कीच आहे, पण इथे येऊन दादागिरी करणाया उपयांची नक्कीच नाही. ती महाराष्ट्राची आहे आणि तिची अधिकृत भाषा मराठी आहे हे मान्य करा आणि मग इथे राहा. मराठी माणूस सहिष्णु आहे ह्याचा अर्थ तो षंढ आहे असा काढू नका. चवताळून उठला तर मदांध तख्त फोडण्याचे सामर्थ्य मराठी भाषेत तसेच माणसांत नक्कीच आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने ते सप्रमाण सिद्ध केलय. दुर्दैवाचा भाग असा की, पूर्वापार महाराष्ट्राला दुही ने स्वकीयांचा जेवढा त्रास झालाय तितका त्रास इतर राज्यांना झाला नसावा. अबू आझमी सारखा उपरा मराठी अस्मितेचा अपमान महाराष्ट्राच्या विधानसभेत करतो आणि मनसे सोडली तर इतर मराठी भाषिक आमदार गप्प राहातात साधा निषेध सुद्धा करत नाहीत हे मराठीचेच दुर्दैव, मला खरच त्या सगळ्या आमदारांची लाज वाटते.. आज अत्रे असायला हवे होते, मराठात एक सणसणीत अग्रलेख वाचायला मिळाला असता असं वाटल्यावाचून राहावत नाही. स्वत:ला छत्रपती म्हणवून ताठ मानेने उभे राहाणारे शिवराय एकच, बाकी मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले असं आपण म्हटलं तरी बयाच मराठी सरदारांनी दिल्लीच्या तख्तापुढे झुकण्यातच समाधान मानलं आणि त्यांची गादी पुढे ह्या महाराष्ट्रातल्या कॊंग्रेजी नेत्यांनी चालवली, यशवंतराव, शंकररावांपासून अगदी अंतुले, देशमुख, अशोकरावांपर्यंत. इतकेच काय जेव्हा वरळीच्या पूलाचे उद्घाटन झाले तेव्हा शरद पवारांनी पूलास राजीव गांधींचे नाव द्यावे असे भाषणात सांगून सोनियाजींना खूष करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी उभ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान त्या सागरी सेतूवर टांगला. ह्याच साठी राष्ट्रवादीची स्थापना झाली होती का हा प्रश्न त्यांना कोण विचारणार? मराठी माणूस कितीही कर्तुत्ववान म्हटला तरी असा दिल्लीपुढे नतमस्तक होण्यात धन्यता मानतो हेच महाराष्ट्रचं दुर्दैव. &lt;br /&gt;&lt;br /&gt;तर यातून पुढे काय? राजसाहेबांनी सुरुवात तर चांगली केलेय. त्यांचे ४ आमदार गेले पण त्यांनी बरच काही कमवलय. पुढच्या निवडणूकांत ह्याचा मनसेला फायदा नक्की होणार. बसेस जाळणे, तोडफोड असले प्रकार थांबवून काही विधेयक कामे राजसाहेब करतात का हे पहायचे. सचिनला मुद्दाम अस्थायी प्रश्न विचारून हिंदी माध्यमांनी पुन्हा एकदा मराठी माणूस फोडायचा प्रयत्न केलाय आणि सचिनच्या वक्तव्यावर टीका करून बाळासाहेबांनी पुन्हा आफत ओढवून घेतलेय.(आठवा पूर्वी महाराष्ट्रभूषण पु. लं वर बाळासाहेबांनी अशीच आगपाखड करुन मराठी मनाला नख लावलं होतं), तर उद्धवसाहेब गप्प! (सेनेचे असं सगळंच चुकत चाल्लय का?) सगळ्यात म्हणजे मराठी माणूस फक्त प्रांतिक आणि संकुचित विचार करतो असं गरळ ओकून हिंदी मिडीया धूळफेक करू पाहात आहे. राष्ट्रीयत्वाचा हिरीरेने पुरस्कार करणाया आणि त्यासाठी सर्वस्वाची होळी करणाया टिळक, आगरकर, फडके, सावरकर ह्यापासून अगदी कामटे, ओंबाळे, करकरे आणि साळसकर सगळ्यांच्याच कर्तव्यदक्षतेचा, राष्ट्रभक्तीचा हा अपमान आहे. ह्यापासून आपण वेळीच सावध व्हायला हवं.  ह्यासाठी मी काय करू शकतो --&lt;br /&gt;१. मराठी बाणा आणि राष्ट्रभक्ती ह्या परस्पर पूरक गोष्टी आहेत हे ठणकावून सांगायला हवं. &lt;br /&gt;२. मुंबईत काम करणाया परप्रांतियांना सामावून घेताना ते इथल्या संस्कृतीत सामावले जातील हे बघायला हवं. घटनेने दिलेले स्थानिकांचे हक्क डावलून बाहेरून आलेल्यांचे फाजील लाड होणार नाहीत हे पहायला हवं&lt;br /&gt;३. स्थानिकांना कामात, नोकयांत प्राधान्य मिळेल (उदा. स्थानियलोकाधिकार समिती) ह्याचा पाठपुरावा करायला हवा&lt;br /&gt;४. पुढची पिढी जागतिक स्पर्धेसाठी तयार करताना (इंग्रजी माध्यमात शिकण्यात काहीच गैर नाही, उलट आवश्यकच आहे) त्यांना मराठी भाषा आणि संस्कृतीची ओळख आणि आवड राहील ह्याची जबाबदारी घ्यायला हवी.&lt;br /&gt;अजून बरंच काही करता येण्यासारखं आहे पण मराठीच्या मुद्द्यावरुन सजग राहाण हे तूर्त महत्त्वाचं. &lt;br /&gt;जय हिंद! जय महाराष्ट्र! (होय, महाराष्टाच्या जयजयकारा आधी भारताचा जयजयकार होतोच नेहमी, त्यामुळे मराठ्यांच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेण्याची गरज नाही!)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-2946805146818950128?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/2946805146818950128/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=2946805146818950128' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/2946805146818950128'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/2946805146818950128'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2009/11/blog-post.html' title='मराठी बाणा..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-1107509549923947277</id><published>2009-09-20T21:18:00.010-05:00</published><updated>2009-09-20T21:33:54.560-05:00</updated><title type='text'>भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग ५ (अंतिम भाग)</title><content type='html'>&lt;strong&gt;दिवस सातवा (एमट्रॆक - ऒकलंड ते लॊस एंजिल्स)&lt;/strong&gt;&lt;br /&gt;ह्या पश्चिम किनायावरच्या प्रवासाचे नियोजन करताना, सॆन फ्रान्सिस्कोमधून खाली लॊस एंजिल्स मधे कसे यायचे याबाबत बरेच पर्याय होते. गाडी भाड्याने घेऊन सुकोया नॆशनल पार्क मधे जायचे, तिथे एक रात्र थांबून लॊस एंजिल्स मधे पोहोचायचे असाही विचार होता. पण सरतेशेवटी ऎमट्रॆक ह्या रेल्वेने येण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि तो किती योग्य होता हे लग्गेच जाणवलं. &lt;br /&gt;सकाळी लवकर उठून आम्ही फोस्टर सिटीवरून पुन्हा सॆन फ्रान्सिस्कोच्या डाऊनटाऊन मध्ये गेलो. टॆक्सी करून पिअर २ वर एमट्रॆकच्या प्रवेशद्वारी पोहोचलो. हवेत छान गारवा होता, तिथेच कॊफी घेऊन सकाळी जॊगिंग ट्रॆक वर धावणारी माणसे, आसपासच्या शहरातून फेरीने(बोटीने) डाऊनटाऊनला कामासाठी रोज येणाया माणसांची लगबग, जगप्रसिद्ध ऒकलंड पूलावरून अव्याहत सुरू असणारी वाहनांची रहदारी बघत अर्धा तास पटकन गेला. आम्हाला घेऊन ऒकलंड स्थानकावर जाणारी बस आली आणि आम्ही तिथेच बॆग चेक इन करून बस मध्ये बसलो. त्याच भल्या मोठ्या ऒकलंड ब्रिजवरून आमची बस गेली आणि ह्या पुलावरुन प्रवास करण्याचा काही मिनिटे का होईना आनंद लुटता आला. ऒकलंड रेल्वे स्थानकावर फार थांबायला लागलं नाही, पंधरा वीस मिनिटांत गाडी आली. यापूर्वी एमट्रॆकने प्रवास करण्याचा योग आला नव्हता त्यामुळे उत्सुकता होतीच. आम्ही ट्रेनमध्ये स्वतंत्र खोली आरक्षित केली होती त्यामधेच सकाळची न्याहारी, डेकवर दोन्ही वेळचे जेवण अंतर्भूत होते. गाडी सुटली तेव्हा लगेचच ब्रेकफास्टची वेळ झाली होती आणि गाडीतल्या डेकवर जाऊन आम्ही कॊफी फळे घेऊन ब्रेकफास्ट केला. &lt;br /&gt;थोडं ह्या ट्रेनविषयी. अमेरिकेतला सगळ्यात निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेला असा हा रेल्वे रुट. वॊशिंग्टन स्टेटमधल्या सिऎटल मध्ये सुरु होऊन ही ट्रेन ऒरेगॊन राज्य ओलांडून कॆलिफॊर्नियात येते आणि खाली सॆन डिएगो पर्यंत जाते. साधारण ३५ तासांचा एकूण प्रवास. वाटेत कॆलिफॊर्नियातल्या सॆक्रोमेंटो, ओकलंड (जिथे आम्ही चढलो), सॆन होझे, सॆंटा बार्बरा, लॊस एंजिल्स (जिथे आम्ही उतरलो) ते सॆन डियॆगो अशा अनेक निसर्गसंपन्न ठिकाणांना जोडत,कधी पॆसिफीक समुद्राला खेटून तर कधी हिरव्यागार शेतांमधून ही ट्रेन जाते. &lt;br /&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Srbj8owm2NI/AAAAAAAAAKA/eR0sJ6QODew/s1600-h/P1010075.JPG"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 240px;" src="http://1.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Srbj8owm2NI/AAAAAAAAAKA/eR0sJ6QODew/s320/P1010075.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5383741035440953554" /&gt;&lt;/a&gt;रेल्वेच्या मधल्या एका बोगीत सगळ्याच लोकांना केवळ निसर्गसौंदर्य न्याहाळता यावं म्हणून काचेच्या मोठ्या खिडक्यांची सोय केली होती. आमची आरक्षित बसायची जागा म्हणजे छोटेखानी रुमच. त्यातच दोन मोठ्या काचांची खिडकी, जेणेकरुन तेथेच बसून बाहेरील निसर्गाचा आस्वाद घेता येईल अशी सोय केली असल्याने आम्हाला जागा रिकामी होण्याची वाट बघायची गरज नव्हती. मस्त हातपाय पसरुन गप्पा मारत आम्ही प्रशांत महासागराचा पसारा, लाटांची खळखळ अनुभवत होतो आणि ते ही तासंन तास. आपण जेव्हा कुठेही समुद्रकिनारी जातो तेव्हा ते समुद्रकिनारे माणसांनी जाऊन जाऊन थोडेफार का होईना पूर्ण नैसर्गिक स्वरुपात दिसू शकत नाही, त्यांच्या काठचं वन्यजीवन पण आपल्याला दिसतं ते फक्त डिस्कव्हरीवरच. पण ह्या प्रवासात असे कितीतरी किनारे जिथे जायचे रस्ते आणि वाटाच नाही ते जस्सेच्या तसे त्यांच्या रांगड्या स्वरुपात गाडीत बसून बघता आले. पश्चिम किनारपट्टी असल्याने एक सुंदर सूर्यास्त बघता आला. गाडीत लॆपटॊपवर जुनी गाणी ऐकत मधेच पु ल/ व पु ऐकत(खोलीत इलेक्ट्रीसिटीची सोय होती) आणि बाहेरचं विश्व बघत दिवसभराचा प्रवास कसा संपला कळलं नाही. सरु नये ही वाट असं सारखं वाटत होतं, विशेषत: सॆंटा बार्बरा येथले बीचेस बघताना, विस्तीर्ण शेते बघताना. निसर्गाने किती मुक्त हस्ते उधळण केलेय आणि मुख्य म्हणजे माणसाने सुनियोजनाने निसर्गाचं देणं कसं छान जपलय, वाढवलय हे जवळून बघता आलं. मनात आलं,  कोकणातली आपली जमिन, हवामानही असंच, मग आपल्यालाही जमेल का इतकं सुजलां सुफलां करायला कोकणाला. कोकणच कॆलिफॊर्निया करायचा म्हणजे नेमकं काय हे तेव्हा लक्षात आलं! रात्री नऊच्या दरम्यान आम्ही लॊस एंजिल्सला पोहोचलो आणि मुक्कामी गेलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;दिवस आठवा (लोस एंजिल्स हॊलीवूड, बेव्हरली हिल्स)&lt;/strong&gt;&lt;br /&gt;लॊस एंजिल्सचं हॊलीवूड बघायला आम्ही सकाळीच बाहेर पडलो. कॊडॆक थिएटर जिथे ऒस्कर ऎवॊर्ड होतात तिथे पोहोचलो तर बाहेर रस्त्यावर बाजूच्या चायनीज थिएटरबाहेर वेगवेगळ्या वेषभूषेत कलाकार, खूप सारे प्रवासी आणि त्यांच्याबरोबर फोटो काढून (पैसे देऊन) घेण्याची झुंबड. &lt;a href="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SrblAxyzP1I/AAAAAAAAAKI/ba0ggSWVXAw/s1600-h/P1010064.JPG"&gt;&lt;img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 240px;" src="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SrblAxyzP1I/AAAAAAAAAKI/ba0ggSWVXAw/s320/P1010064.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5383742206097178450" /&gt;&lt;/a&gt; तेथे फूटपाथ वरच्या लाद्यांवर हॊलीवूडच्या कित्येक कलाकारांचे ठसे असलेल्या चांदण्या कोरल्या आहेत. तेथूनच आम्ही स्टारलाईनची ऒपन टॊप सिटी टूर बस पकडली &lt;br /&gt;आणि हॊलीवूड्ची फेरी मारली. चायनिस थिएटर्वरून निघून गिटार सेंटर, द कॊमेडी स्टोर, बेव्हरली हिल्स, सॆंटा मोनिका, फार्मर्स मार्केट, सी बी एस, सायलंट मूव्ही थिएटर, पॆरामाऊंट पिक्चर्स स्टुडिओ आणि ती जगप्रसिद्ध हॊलीवूड असं मोठ्ठ्या अक्षरात लिहीलेली डोंगरावरची खूण असं बघत शेवटी कोडॆक थिएटरपाशी उतरलो. वाटेत बसमध्ये आम्हाला लॊस एंजिल्स शहर, तिथे राहाणारी माणसे, हॊलीवूड व्यवसाय, नटनट्यांची आवडती रेस्टॊरंट्स, एखाद्या नशीब अजमवायला इथे आल्याने सामान्य कलाकाराने घेतलेली असामान्य झेप, त्यांचे अनुभव आणि एकंदर हॊलीवूडचा, इथल्या श्रीमंतीचा कॆलिफॊर्निया राज्यावर आणि पर्यायाने अमेरिकेवर असलेला ठसा तसेच प्रभाव ह्यांची सुंदर ओळख करुन दिली. थोडावेळ कोडॆक थिएटरमध्ये फिरून आम्ही पुन्हा मुक्कामी परतलो. संध्याकाळी मित्रांबरोबर फिरुन दुसया दिवशीच्या सॆन डिऎगोच्या तयारीस लागलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;दिवस नववा (सॆन डिऎगो)&lt;/strong&gt;&lt;br /&gt;सकाळी गाडी भाड्याने घेऊन आम्ही लॊस एंजिल्सवरून सॆन डिएगोला निघालो. इथल्या रस्त्यांविषयी, बंपर टू बंपर वाहतूकी विषयी आणि तिच्या वेगाविषयी बरंच ऐकलं होतं. तो थरार, हो थरारच म्हणायला हवा, अनुभवता आला. सहा ते आठ पदरी रस्ते क्षणात बदलाव्या लागणाया लेन्स आणि डाव्या, उजव्या कुठल्याही बाजूने पुढे जाऊ पहाणाया उधाण गाड्या सगळं थोडं नवं होतं पण लवकरच त्याचा सराव झाला आणि सुसाट वेगाने सॆन डिएगो झू पाशी येऊन पोहोचलो. लॊंग विकेंड असल्याने गर्दीही खूप होती. आम्ही पोहोचेपर्यंत पार्क सुरु झाले होते आणि नेहमीचे पार्किंग संपले होते पण सुदैवाने जवळच जास्तीच्या पार्किंगची सोय केली होती. गंमतीची गोष्ट म्हणजे तेथेच बाजूला आम्हाला ’उपास’ स्ट्रीट दिसला :-)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SrbltYx2ptI/AAAAAAAAAKQ/Ljdb-jHfhXw/s1600-h/P1010117.JPG"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 240px;" src="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SrbltYx2ptI/AAAAAAAAAKQ/Ljdb-jHfhXw/s320/P1010117.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5383742972476434130" /&gt;&lt;/a&gt;सॆन डिएगो वाइल्ड लाईफ आणि झू ह्या पैकी एकच बघणे शक्य असल्याने आम्ही झू बघणे पसंत केले. ह्यापूर्वी ओमाहाचा आणि डॆलस मधला झू पाहिला असल्याने तसं विशेष नाविन्य नव्हतं तरीही पोलार बेअर, सिंह, वाघ, पांण्डा अगदी जवळून बघता आले. दिवसभर तेथे फिरून संध्याकाळी त्याच वेगवान बाहतूकीमधून आम्ही लॊस एंजिल्सला आर्टॆशियावर पोहोचलो. तेथे भारतीय हॊटेलात स्नॆक्स आणि मग जेवण करून आम्ही रात्री मुक्कामी पोहोचलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;दिवस दहावा (कोलंबिया परत..)&lt;/strong&gt;&lt;br /&gt;सकाळीच आम्ही लॊस एंजिल्स विमानतळावर पोहोचलो. पश्चिम किनायावरून पूर्व किनायावर यायचं म्हणजे वेळेचा फरक भरून काढता प्रवासास खूप वेळ लागतो. संध्याकाळपर्यंत कोलंबियात पोहोचून नविन आठवड्यासाठी सज्ज झालो. ह्या पश्चिम किनायावरच्या प्रवासाच्या सुरम्य आठवणीं मात्र कायम स्मरणात राहतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;- समाप्त&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-1107509549923947277?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/1107509549923947277/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=1107509549923947277' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/1107509549923947277'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/1107509549923947277'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2009/09/blog-post.html' title='भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग ५ (अंतिम भाग)'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Srbj8owm2NI/AAAAAAAAAKA/eR0sJ6QODew/s72-c/P1010075.JPG' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-5116823173644667502</id><published>2009-08-09T17:28:00.027-05:00</published><updated>2009-09-20T21:40:11.071-05:00</updated><title type='text'>भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग ४</title><content type='html'>&lt;strong&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;दिवस सहावा (सॆनफ्रान्सिस्को डाऊनटाऊन, पिअर ३९, मूर वूड्स, ससॆलिटो, गोल्डन गेट ब्रिज)&lt;br /&gt;&lt;/strong&gt;सकाळी थोडं लवकर उठून आम्ही फोस्टर सिटीवरुन सॆनफ्रान्सिस्को डाऊनटाऊन मधे जाणारी बस पकडली. पूर्व किनायावरच्या न्यूयॊर्कला तोडीस तोड असं हे पश्चिम किनायावरच सॆनफ्रासिस्को. बरचं वाचलं आणि ऐकलं होतं ह्या शहराबद्दल. दोघांचा मुंबईचा पिंड असल्याने अशा शहरांच्या डाऊनटाऊन मध्ये बिझनेस डे मध्ये फिरण्याची ईच्छा आणि उत्सुकता आम्हाला नेहमीच असते. साधारण पाऊण तास प्रवास करून आम्ही डाऊनटाऊन मध्ये पोहोचलो. आमच्या बरोबरचे सगळेच जण फोस्टर सिटी मध्ये राहून रोज सॆन फ्रान्सिस्कोमध्ये कामासाठी अपडाऊन करणारे चाकरमानी असल्याच दिसून आलं. उतरल्यावर पहिलं काही जाणवलं असेल तर चढ उतार असलेले रस्ते. इतके की त्यावर सलग चालण कठीण व्हावं. आम्ही सिटी टूरच्या ऒफीस पर्यंत टॆक्सी केली आणि बरोबर ९ च्या दरम्यान आमची मिनी बस गोल्डन गेट च्या व्हिस्टा पॊईंटच्या दिशेने निघाली. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि हलकीशी थंडी अशी सुंदर हवा पसरली होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-I9aCwWJI/AAAAAAAAAH8/mxHXfmqIWdU/s1600-h/P1010009.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368159869393197202" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 240px; CURSOR: hand; HEIGHT: 320px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-I9aCwWJI/AAAAAAAAAH8/mxHXfmqIWdU/s320/P1010009.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;व्हिस्टा पॊईंटवर पंधरा मिनिटं थांबून आम्ही तो प्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज पाहिला, वेगवेगळ्या कोनातून त्याचे फोटो घेतले. सोन्याच्या शोधार्थ जेव्हा धंदेवाईक लोकं आणि खाण कामगार, कॆलिफोर्नियामध्ये आले तेव्हा फेरीचा म्हणजे बोटींचा वापर बंदरात ये-जा करण्यासाठी होत असे. कडाक्याची थंडी, खाया पाण्याच्या प्रवाहाचा, वायाचा तसेच लाटांचा प्रचंड जोर, मिलीटरीचा सुरक्षिततेच्या कारणाने विरोध, त्यातच आलेली सगळ्यात मोठी आर्थिक मंदी ह्यांना तोंड देत १९३२ ते १९३७ दरम्यान हा ब्रिज बांधला गेला. त्याचा रंग कोणता ठेवायचा ह्याविषयी सुद्धा खूप वाद झाले आणि शेवटी आंतरराष्ट्रीय मान्यता असलेला लाल रंग ठरवण्यात आला. अनेकानेक चित्रकारांना, छायाचित्रकारांना आणि सिनेमावाल्यांना खुणावया ह्या गोल्डन गेट ची नजाकत, अदा नजरेत साठवत आम्ही मूर वूड्स च्या दिशेने निघालो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-JmDZmpPI/AAAAAAAAAIE/d-LKbbUNgIs/s1600-h/P1010031.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368160567689651442" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 240px; CURSOR: hand; HEIGHT: 320px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-JmDZmpPI/AAAAAAAAAIE/d-LKbbUNgIs/s320/P1010031.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-KNrl7eYI/AAAAAAAAAIU/PiiLjFGP_WI/s1600-h/P1010050.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368161248493664642" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 240px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-KNrl7eYI/AAAAAAAAAIU/PiiLjFGP_WI/s320/P1010050.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;साधारण अर्धा तास वळवळण्याच्या घाटातून जात आम्ही मूर वूड्स मध्ये पोहोचलो. प्रसिद्ध पर्यावरणवादी जॊन मूर ह्याच्या स्मृती प्रित्यर्थ ह्या संरक्षित जंगलांना मूर वूड्स नाव देण्यात आले. १९०८ मध्ये तत्कालिन अध्यक्ष रुझवेल्ट ह्यांनी जुनी जंगले जपण्यासंबंधिचा कायदा करुन आणि मूर वूड्स ना राष्ट्रीय मालमत्ता जाहीर करून अधिकृत संरक्षण दिले. आज कोस्टल रेडवूड्स बघण्याचे मूर वूड्स हे एकमेव ठिकाण उरले आहे. अतिशय जाणीवपूर्वक नवनवीन तंत्रद्न्यानाचा वापर करून ह्या जंगलांची काळजी घेतली गेली आहे. आत शिरल्यावर सुमारे दीड तास गर्द जंगलातून रेड वूड्स झाडे, वेगवेगळे पक्षी, ढोली, ओहोळ बघत आम्ही भटकत होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-K55m9uaI/AAAAAAAAAIc/X0yt68WnbdA/s1600-h/P1010057.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368162008170346914" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 240px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-K55m9uaI/AAAAAAAAAIc/X0yt68WnbdA/s320/P1010057.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;तिथून परतून आम्ही मिनी व्हॆनमधून सॊसेलिटॊ ह्या छोटेखानी समुद्र किनायावरच्या आखीव रेखीव शहरात आलो. समोर पसरलेला शांत समुद्र, बंदराला उभी असलेली गलबत, लाटांचा खळाळता बारीकसा आवाज अतिशय प्रसन्न वातावरण. आपलं वेगळेपण ह्या ठिकाणाने जपलेलं लग्गेच जाणवत. खास सी फूडसाठी जमलेली खव्वयांची गर्दि, एखाद्या पर्यटन स्थळी असावं असं उत्सवी वातावरण आणि रस्त्याने निवांत फिरत विंडो शॊपिंग करणारी माणसं, भान हरपून जातं बघताना. ह्या शहराच्या परिसरात कुठल्याही वॊलमार्ट, केमार्ट, मॆक डी, स्टार बक्स सारख्या ब्रॆंडेड आणि साखळी दुकानांना, हॊटेलांना परवानगी नाही. जे काही असेल ते छोटेखानी स्थानिक दुकान. तिथेच साधारण अर्धा तास फिरून आम्ही पिअर ३९ वर नेणारी ओपन रुफ बस पकडली. येताना बसमध्ये सॊसेलिटो शहराची तसेच सॆनफ्रान्सिस्कोची बरीच माहिती मिळाली. ’पर्सूट ऒफ हॆप्पीनेस’ ह्या सिनेमामधून ह्या शहराची पूर्वी ओळख झाली होतीच. गेली तीन शतक लोकांना आकर्षित करणाया, कामाची कधीही कमी नसलेल्या ह्या शहराबद्दल, तिथली म्युझियम्स, संशोधन केंद्रे तसेच शहरावर असलेली आर्थिक उलाढालींची जबाबदारी, वाढणारी लोकसंख्या त्यातून निर्माण होत असलेल्या समस्या सगळ्यांच उहापोह त्या थोड्यावेळात बसमधील समालोचकाने केला. थोड्याच वेळात आमची बस गोल्डन गेट ब्रिजवर आली आणि घोंघावणारा वारा कापत गोल्डन गेट ब्रिजवरून जातानाचा आनंद उपभोगता आला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-LP4PeEfI/AAAAAAAAAIk/LV1KPd6Cl-8/s1600-h/P1010092.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368162385760489970" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 483px; CURSOR: hand; HEIGHT: 240px; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-LP4PeEfI/AAAAAAAAAIk/LV1KPd6Cl-8/s320/P1010092.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;तेथूनच समुद्रात दिसणारं अल्कार्टाझ चं बेटही आम्ही पाहिलं, कैद्यांना डांबण्याचं हे ठिकाण. इथून अत्तापर्यंत झालेले कैद्यांचे पलायनाचे कित्येक प्रयत्न फसले आहेत त्ते ह्याच्या भौगोलिक स्थानामुळे. कडाक्याची थंडी आणि बर्फासारखे थंड पाणी पोहून बेटापासून समुद्र किनारी येणे अगदी उन्हाळ्यात सुद्धा अशक्य , थंडीत आणि धुक्यात तर शक्यच नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-LhANupHI/AAAAAAAAAIs/vWhJDqtB96A/s1600-h/P1010085.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368162679958447218" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 240px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-LhANupHI/AAAAAAAAAIs/vWhJDqtB96A/s320/P1010085.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;पिअर ३९ जवळ आम्ही बस मधून उतरलो आणि चालत समुद्र किनायावर फिरू लागलो. पर्यटकांनी सदाबहार असा हा परिसर. सॆन फ्रान्सिस्को शहरात येणारा प्रत्येक जण इथे येतोच येतो. समुद्रकिनार्यालगतच्या हॊटेलांमध्ये सी फूड खाणायांची तर चंगळच पण उत्तम प्रतिची कॊफी तसेच आईस्क्रीमही येते मिळते. प्रत्यक्ष पिअर ३९ वर इकडून तिकडे रमत गमत जाणारी माणसे, मुले, जोडपी, जथ्थे सगळे कसे निवांत सुट्टी उपभोगायच्या मूड मध्ये. बाजूला एखादा रस्त्यावर स्टॊल लावून सूर आळवतोय, बॆंड वाजवतोय आपल्या सिडीज विकतोय तर कुठे फ्ळवाले थेट शेतातून आणलेली फ्ळे विकत आहेत, काही जण फोटोच्या नेमक्या जागा शोधत क्षण कॆमेयात पकडत आहेत तर काही नुसते उडते समुद्रपक्षी पहात उभे आहेत असं निर्मळ आणि निवांत दृश्य. हवेत खारेपणा थोडासा पण थंडावाही त्यामुळे थकवा जाणवत नव्हता. तिथेच थोडं खाऊन आम्हीही थोडं विंडो शॊपिंग केलं, पिअर ३९ चा तो प्रसिद्ध, शिंपल्यातला मोती उघडून विकत घेतला. अजून एक चांगलं ठिकाण बघायला मिळालं ह्याच्या आनंदात बस पकडून आम्ही फॊस्टर सिटी गाठली.&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-L0A6xPfI/AAAAAAAAAI0/CbcO78JsTTk/s1600-h/P1010089.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368163006564875762" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 240px; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-L0A6xPfI/AAAAAAAAAI0/CbcO78JsTTk/s320/P1010089.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;दिवस सातवा (सॆन होजे, अल कमिनो रीअल, कारामेल बीच, १७ माईल्स ड्राईव्ह)&lt;br /&gt;&lt;/strong&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-Rt6yXnOI/AAAAAAAAAI8/capX-5SWvHY/s1600-h/P1010007.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368169498909580514" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 240px; TEXT-ALIGN: center" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-Rt6yXnOI/AAAAAAAAAI8/capX-5SWvHY/s320/P1010007.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;आज सकाळी थोडं निवांत उठून आम्ही सॆंताक्रूझ बीच च्या दिशेने निघालो. फॊस्टर सिटीवरुन इथे जाताना बे एरियातून जावयाचे असल्याने गूगल, सिस्को, एप्पल, इ बे अशा मोठमोठ्या कंपन्यांच्या हेड क्वार्टर्स असलेल्या सॆन ओझे मधून जावयाचे असल्याने ट्रॆफीक टाळण्यासाठी आम्ही थोडे उशिरानेच निघणे पसंद केले. साधारण दीड दोन तास प्रवास करून आम्ही १७ माईल्स ड्राईव्ह पाशी पोहोचलो. १७ मैलांचा हा ड्राईव्ह कॆलिफॊर्नियातला सगळ्यात विहंगम दृश्य असलेल्या रस्त्यांमध्ये गणला जातो. पाच ठिकाणांवरुन ह्या दोन लेनच्या १७ मैलांच्या रस्त्याला प्रवेश ठेवला आहे. ह्या ड्राईव्ह वर पोहोचतानाच गेट वर पूर्ण ड्राईव्हचा एक मॆप दिला जातो. त्यावर प्रत्येक पॊईटची सविस्तर माहिती लिहीलेली असते. एखाद्या अद्न्यात बेटावर साईन्स शोधत तुम्ही ड्राइव्ह करतानाची मजा इथे अनुभवायला मिळते. पूर्ण रूटवर २० स्टॊप्स असून प्रत्येक ठिकाणी रस्त्यालगतच्या पार्किंगची सोय आहे. इथला सूर्यास्त उत्तम आहेच पण प्रत्येक पॊईंटवरून दिसणारं निसर्ग सौंदर्य केवळ अप्रतिम आहे. मधेच डॊंगराला वळसा तर मधेच सळाळता समुद्र असं बघत बघत एकेक पॊईंट आपण पुढे सरकतो. मुख्य म्हणजे इथली टिपलेली दृश्ये तुम्ही कुठेही व्यावसायिक लाभासाठी वापरु शकत नाही. हा १७ मैलांचा पूर्ण रस्ता आणि आजूबाजूचा परिसर पेबल बीच ह्या कंपनीच्या मालकीचा असून आपण इथे फक्त गेस्ट म्हणून बघायला येतोय असं आधीच प्रवेशद्वाराजवळ फोर्ममध्ये भरून घेतलं जातं. लोन सायप्रस हे ह्या ड्राईव्हवरचं ठिकाण कॆलिफॊर्नियातल्या आघाडीच्या रोमॆंटीक ठिकाणांपैकी एक. शेफर्डस नॊल, पोईंट जो, बर्ड रॊक, फॆनशेल ओव्हरलुक, द घोस्ट ट्री, रेस्ट्लेस सी हे ह्या ड्राईव्हरचे काही ठळक पॊईंट्स. आम्ही जवळ जवळ प्रत्येक पॊईंटवर उतरून निसर्गसौंदर्याचा डॊळे भरून आणि मनसोक्त आस्वाद घेतला. एक दोन ठिकाणी तर समुद्रकिनायावरच्या खडकांत पाण्यात पाय बुडवून फेसाळत्या लाटा पायावर झेलल्या तेव्हा बॆंड्स्टॆंडची आठवण आल्यावाचून राहिली नाही, फरक इतकाच की समुद्र अतिशय स्वच्छ, आजूबाजूला झाडी आणि थोडीशी वाळू, कुठल्याही प्रकारचा कचरा नाही आणि निरव शांतता. अगदी कुणी म्हणजे कुणी माणूस नाही त्यामुळ लाटांची आणि झाडाच्या पानांची सळसळ तेवढी ऐकू येत होती. जवळ जवळ दोन तास फिरून आणि ड्राईव्हचा आनंद लुटून आम्ही कारामेल बीच च्या एक्झिट ने बाहेर पडलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-SHh3GsAI/AAAAAAAAAJE/ehbbYahO-kI/s1600-h/P1010018.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5368169938895155202" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 240px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-SHh3GsAI/AAAAAAAAAJE/ehbbYahO-kI/s320/P1010018.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;मे महिन्यातली भर दुपार असली तरी हवेत बराच गारवा होता. बीच वर गर्दी अशी नव्हतीच. पाणीही तसे थंडच असल्याने आत जाण्याचा प्रश्नच नव्हता. थोडावेळ बीच वर फिरून आम्ही सॆन ओझे मधे जाण्यासाठी परतीच्या प्रवासाला लागलो. दोन तास ड्राईव्ह करुन आम्ही सॆन ओझे मधे माझ्या आवडत्या कोमला विलास मध्ये खाऊन, अलकमिनो रीअल वर थोडं फिरून (येथेच आम्हाला पी एन गाडगीळांचे सोन्या चांदीच्या दागिन्याचे दुकानही दिसले) फॊस्टर सिटी मध्ये परतलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;- क्रमश:&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-5116823173644667502?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/5116823173644667502/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=5116823173644667502' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/5116823173644667502'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/5116823173644667502'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2009/08/blog-post.html' title='भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग ४'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sn-I9aCwWJI/AAAAAAAAAH8/mxHXfmqIWdU/s72-c/P1010009.JPG' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-7039860892572005058</id><published>2009-07-11T22:26:00.015-05:00</published><updated>2009-07-12T19:55:36.243-05:00</updated><title type='text'>भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग 3</title><content type='html'>&lt;strong&gt;दिवस चौथा (ग्रॆंड कॆनियन / लास व्हेगास)&lt;/strong&gt;&lt;br /&gt;जगातल्या सात निसर्गनिर्मित आश्चर्यांपैकी एक - ग्रॆंड कॆनियन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;u&gt;साऊथ रीम की वेस्ट रीम? &lt;/u&gt;&lt;br /&gt;एका दिवसात ग्रॆंड कॆनियन पहाणायांना पडणारा हा नेहमीचा प्रश्न. काय बघावं साऊथ रीम की वेस्ट? खूप शोधाशोध केली इंटरनेटवर, मित्रमैत्रिणींकडे आणि मग आम्ही वेस्ट रीम निश्चित केलं. ह्यामागची आमची कारणं अशी -&lt;br /&gt;१. तुम्हाला ट्रेक करत खाली ग्रॆंड कॆनियन मध्ये उतरायचं असेल तर साऊथ रीम केव्हाही उत्तम. ह्या ट्रेकला एक दिवसाहून अधिक कालावधी लागतो आणि तुमची खाली दरीत उतरण्याची आणि मग वर चढण्याची चांगलीच तयारी असावी लागते. आमच्या कडे काही तास असल्याने साऊथ रीम मधून खाली उतरणे शक्यच नव्हते. हॆलिकॊप्टरने खाली उतरायची सोय साऊथ रीम मध्ये नव्हती.&lt;br /&gt;२. ग्रॆंड कॆनियन बघायचा, त्याची भव्यता आणि दिव्यता पहायची तर लांबून बघून समाधान होणं शक्यच नव्हतं. इतक्या लांब आलो आहोत ते केवळ अमाप नैसर्गिक सौंदर्य लुटायला त्यामुळे दरीमध्ये उतरायचं होतच. वेस्ट रीम मध्ये हेलिकॊप्टरने खाली उतरायची सोय होती. शिवाय आत दरीमधल्या कोलोरॆडॊ नदीवर बोटींगही करता येणार होतं.&lt;br /&gt;३. नैसर्गिक चमत्कारांबरोबर आम्हाला वेस्ट रीममध्ये एक मानव निर्मित वास्तुशिल्प बघता येणार होतं, ते म्हणजे ’स्काय वॊक’. आमच्या मित्रांपैकी कोणीही तिथे गेलं नव्हतं त्यामुळे तिथे कसं वाटेल ह्याविषयी प्रचंड उत्सुकता होती. नेटवर बरचं काही वाचलं होतं पण काहीतरी वेगळं पहायला मिळणार होतं ते वेस्ट रीम मध्येच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सकाळी नाश्त्याला बाहेर पडलो आणि साडे सहावाजता बाजूच्या कॆसिनोखाली असलेल्या मॆकडेनॊल्ड्सच्या दिशेने चालू लागतो, तर चक्क अंगातून घामाच्या धारा. :-) इतक्या वर्षात मुंबई, पुणे, डॆलस, कोलंबिया, कॆंसस सगळीकडचे उन्हाळे अनुभवले पण पहाटे उकडायला लागण्याचीही पहिलीच वेळ. लास व्हेगास मध्ये सकाळी ही स्थिती, तर दिवसा काय होत असेल! उन्हाळ्यात तर दिवसा रस्त्यावर चालणेही मुश्कील. बहुसंख्य लोक अशावेळी कॆसिनोमध्ये खेळत नाहीतर रात्रभर जागरण करुन दिवसा हॊटेलात ताणून देतात. लास व्हेगासवरुन ग्रॆंड कॆनियनच्या एका दिवसाच्या ट्रीप्सची पॆकेजेस जवळ जवळ प्रत्येक हॊटेलमधून मिळतात. आमची ग्रॆंड कॆनियनची टूर गो टू बसच्या पेकेजबरोबरच होती. लास व्हेगास पासून वेस्ट रीम जवळ असल्याने आम्ही थोडे उशीरा म्हणजे आठ वाजता निघालो. आमच्या बरोबरचे काही जण जे साऊथ रीम वर जाणार होते ते दुसया बसने सकाळी साडे सहालाच निघाले. रात्री उशीरा झोपल्याने डोळ्यावर थोडीशी पेंग होती. साधारण तासाभरात आमची बस हूवर डॆम जवळ आली आणि तिथल्या निरीक्षण केंद्रावर आम्ही थांबलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Slnb7XvUhzI/AAAAAAAAAF8/UFEG5pYJQkY/s1600-h/P1010017.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5357555044765173554" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 240px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Slnb7XvUhzI/AAAAAAAAAF8/UFEG5pYJQkY/s320/P1010017.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;एरीझोना आणि नेवाडा राज्यांच्या सीमा रेषेवर कोलोरॆडो नदीवर बांधलेले हे कॊंक्रीटचे अमेरीकेतील सगळ्यात उंच कमानिकृती (आर्च) धरण. अमेरीकन मंदीच्या काळात ह्या धरणाचे काम प्रेसिडेंट हूवर ह्यांच्या पुढाकाराने जोरात सुरू होते, १९३६ साली त्याचे बांधकाम पूर्ण झाले. पूर्ण लास व्हेगासला पाणी पुरवठा आणि जलविद्युत पुरवठा हूवर डॆम मधून होतो. तिथल्या निरीक्षण केंद्रातून तो डॆम, त्याचं टनेल, त्याच्यावरचे पूल बघताना अचंबित व्हायला होतं. अभ्यासपूर्ण, साहसपूर्ण चिकाटीने मानवाने निसर्गावर मिळवलेला विधायक विजय म्हणून हूवर डॆमची इतिहासात नोंद झाली आहे. हूवर डॆमवर वेगवेगळ्या कोनातून मानवनिर्मित आणि नैसर्गिक आश्चर्यांची पाठवशिवणी बघण्यात अर्धा तास कसा गेला कळलच नाही आणि आम्ही ग्रॆंड कॆनियनच्या दिशेने पुढे निघालो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ग्रॆंड कॆनियन साऊथ आणि नॊर्थ सारखा ग्रॆंड कॆनियन वेस्ट हा ग्रॆंड कॆनियन नॆशनल पार्कचा भाग नाही. हा पूर्ण भाग हुलापिया आदिवासींच्या मालकीचा असून बराच अविकसित आहे. त्यामुळे ग्रॆंड कॆनियन अगदी मूळ स्वरुपात बघता येतो. लास व्हेगास पासून ही बाजू सगळ्यात जवळ (साधारण १२० मैल म्हणजे अडीच तास). साधारण साडे दहा च्या जवळपास आमची बस एके ठिकाणी थांबवण्यात आली. मार्गावर जवळपास ना पेट्रोल पंप ना दुकाने ना हॊटेल्स, अगदी कशाकशाचा मागमूस नव्हता. नुकतच कुठे इथ पर्यंत पर्यटक इतक्या प्रमाणात येऊ लागलेयत ह्या भागात हे जाणवत होतं. तिथली प्रसाधनगृह सुद्धा तात्पुरत्या स्वरुपाच्या शेडस मध्ये बांधलेली. तेथून बस बदलून कच्च्या रस्त्यावरुन आम्ही पुढे निघालो. साधारण १५-२० मैलांचे वळणावळणांचे हे अंतर, बरासचा रस्ता कच्चा, अजून तयार होतोय. आजूबाजूला फॊरेस्ट हाऊससारखी तुरळक घरे. त्यामुळे ह्या रस्त्यावरुन वेस्ट रीमच्या मुख्य मुक्कामी जायला वेस्ट रीम व्यवस्थापनाच्याच गाड्या होत्या. शिवाय रस्ता खराब असल्याने आपली गाडी नेली तर पंक्चर होण्याची शक्यता जास्त. हा वेस्ट रीमचा सगळा भाग वैयक्तिक मालकीचा असल्याने सगळं थोडं महागच पण व्यवस्थापनला मिळणाया पैशातून बराचसा पैसा हुलायपाय जमातीस जातो असं समजलं. बाहेर ऊन पडलेलं असलं तरी ते न जाणवण्याइतपत गारवा होता हवेत. ग्रॆंड कॆनियनच्या दया दिसत होत्याच जवळ. आम्ही बसमधून उतरून वेस्टरीमच्या माहिती केंद्रात गेलो. दिवसभरात आपण काय करणार आहोत ह्याची साधारण माहिती आमचा गो टू बसचा टूर गाईड विलियमने गाडीतच दिली होती. आम्ही चौघेजण हॆलिकॊप्टर राईड घेणार होतो. आम्हा सगळ्यांची वजने घेऊन त्याप्रमाणे हॆलिकॊप्टर मध्ये बसण्याच्या जागा ठरवण्यात आल्या आणि आम्ही हॆलिपॆडच्या दिशेने निघालो. दोनच मिनिटांत आमच्यासाठी एक हॆलिकॊप्टर आले आणि आम्ही आपापल्या जागा घेतल्या. मागे नायगारा बघतानाही मी अशीच राईड घेतली होती पण कौमुदीची ही पहिलीच वेळ आणि गंमत म्हणजे तिला पायलटच्या बाजूची एकमेव सीट मिळाली होती. पंख्याचा प्रचंड खडखडाट चालू होता, आम्ही सीट बेल्ट्स आवळले आणि हॆलिकॊप्टरने झेप घेतली. अहाहा, ह्याच साठी केला सारा अट्टाहास, असा विचार मनात येत होता आणि अतिशय नयनरम्य, विलोभनीय सौंदर्याची खाण, हो खाणच की ही, दोन्ही बाजूंनी उलगडत हॆलिकॊप्टर प्रचंड मोठ्या घळीत उतरत होते. डोळ्यांत आणि कॆमेयात आम्ही दृष्ये साठवत होतो. खालती आता कॊलेरेडो नदी दिसू लागली होती. साधारण १५-२० मिनिटे वेगवेगळ्या अंगानी ग्रॆंड कॆनियनच्या घळीतील सृष्टी आणि पाषाण सौंदर्य पहात आम्ही कॊलेरेडो नदीच्या किनारी उतरलो. आम्हाला उतरवून हॆलिकॊप्टर पुन्हा मागे उडून गेले. हा सगळा भाग वैयक्तिक मालकीचा असल्याने इथे इतर कुणाचीही वाहतूक नाही आणि त्यामुळे मानवी आक्रमणांपासून खूप उत्तमरीत्या जपला गेलाय. थोडं चालत आम्ही नदीच्या काठाशी पोहोचलो तर एक नाविक बोट घेऊन आमची वाटच पाहात होता.&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SlncTltI26I/AAAAAAAAAGE/-c7DRK2aHPc/s1600-h/P1010046.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5357555460830976930" style="WIDTH: 555px; CURSOR: hand; HEIGHT: 240px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SlncTltI26I/AAAAAAAAAGE/-c7DRK2aHPc/s320/P1010046.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;कॊलेरेडो नदीवर बोटींग करण्यासाठी आम्ही मोटर बोटीत बसलो आणि बोट संथ पाण्यावर हळूच हेलकावे घेत पुढे निघाली. नाविक संपूर्ण ग्रॆंड कॆनियनची आणि वेस्ट रीमची माहिती पुरवित होता. कॊलेरेडो नदीच्या पाण्याची पातळी गेले काही वर्ष सातत्याने कमी होतेय, ग्लोबल वॊर्मिंगचे हे उत्तम उदाहरण असून, ग्लेशियर म्हणजे बर्फ वितळण्याचे प्रमाण कमी झाल्याने असे होत असावे. ह्या बाजूस म्हणजे वेस्ट रीम वर ग्रॆंड कॆनियनच्या घळीची रुंदी साउथ रीमपेक्षा कमी आहे. ग्रॆंड कॆनियनची दरी ही साधारण पावणे तिनशे मैल लांब असून रुंदी कमीत कमी ४ आणि जास्तीत जास्त १८ मैल आहे. तिची खोली साधारण २ किमी असून करोडो वर्षांपासून पृथ्वीच्या भूगर्भात तसेच भूस्तरावर होणाया हालचालींची ही दरी साक्षीदार आहे. जगातली हि सगळ्यात खोल दरी. कॊलोरेडो नदीत अक्षरश: दरी कापत जाते तेव्हा दुतर्फा आपल्याला दरीमध्ये दगडांचे पट्टे च्या पट्टे किंवा थर दिसतात. आइस एजच्या दरम्यान जे बर्फ इथून वाहिलं त्यावेळी ही दरी निर्माण झाली. इथले दरीतले दगड तर कोट्यावधी वर्षांचे असून रीमवरचे म्हणजे वरचे काही दशलक्ष वर्षे जुने आहेत. तसेच काही दशलक्ष वर्षांपूर्वी इथे ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लाव्हा रसामुळे व्हॊल्केनो दगडांची निर्मिती झाली. हे त्यातल्या त्यात इथले सगळ्यात तरुण दगड म्हणायचे ;) हात बुडवून बघता, नदीचे पाणी तसे गारच होते, बोटींग करत असताना दोन्ही बाजूला ग्रॆंड कॆनियनच्या दगडातले पट्टे, रंग पाहाताना अर्धा पाऊणतास कधी गेला कळलं सुद्धा नाही. पाचच मिनिटांत हॆलिकॊप्टर आले आणि आम्ही माहिती केंद्राच्या दिशेने परत उडालो. पुन्हा एकदा दरीतली दृष्ये डॊळ्यात साठवत पंधरा वीस मिनिटांत माहिती केंद्रावर पोहोचलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यांचीच बस पकडून आम्ही स्कायवॊक ह्या पुढच्या मुक्कामी निघालो. कच्च्या रस्त्यावरून दोन्ही कडे ग्रॆंड कॆनियनच्या डोंगरदया पहात अर्ध्या तासात आम्ही स्कायवॊकवर जाऊन पोहोचलो. बसमधून जातानाच आम्हाला ड्रायव्हरने इगल पॊईंटची माहिती दिली आणि दूरवरून तो दाखवलाही, येताना बघू म्हणून आम्ही तिथल्या माहिती केंद्रावर पुन्हा स्कायवॊकबद्दल माहिती घेतली आणि आमच्या कडच्या बॆगा, कॆमेरे लॊकर मध्ये ठेवून स्कायवॊकच्या रांगेत उभे राहीलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;u&gt;स्कायवॊक आहे तरी काय? &lt;/u&gt;&lt;br /&gt;ज्यांना ग्रॆंड कॆनियन उतरण शक्य नाही किंवा उडत्या पक्षाला कशी दिसत असेल ही घळी हे बघायचं झालं तर काय करावं लागेल असा एक विचार ग्रॆंड कॆनियनच्या नियमित पर्यटकाच्या मनात आला आणि त्यातून स्कायवॊक संकल्पनेचा उदय झाला. घोड्याच्या नालेच्या आकाराचा संपूर्ण काचेतून बनवलेला हा स्कायवॊक कॆंटीलिव्हर सारखा उभ्या सुळक्यातून साधारण २० मीटर बाहेर काढलाय. इगल पॊइंटच्या जवळच त्याची जागा निवडलेय. दरीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर बांधलेला असून त्याच्या किनायांवर काचेवर थोडी काजळी दिलेय, उद्देश हा की इतक्या खोल बघून कुणाला चक्कर आली तर आधार मिळावा :-) खालचा बेस तसेच बाजूच बांधकाम काचेचं असून बेस दोन इंच जाडीच्या काचेचा आहे आणि खाली आपल्या पायाशी पाहिलं तर दिसते खोल दरी, आरपार. अगदी जसं आपण दरीत उभे आहोत आणि आकाशात चालतोय. स्कायवॊक बांधायला तीन वर्ष लागली. २८ मार्च २००७ मध्ये तो लोकांसाठी खुला करण्यात आला. त्याच्या उद्घाटनाच्यावेळी त्यावर चालणाया पहिल्या माणसात होता सुप्रसिद्ध अंतराळवीर एड्विन ऒड्रीन (हाच मानव, ज्याने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं). त्यापूर्वी स्कायवॊकवर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. आठ रिष्टर स्केलचा भूकंप स्कायवॊक सहन करु शकतो. वेगवेगळ्या दिशेने येणारे १०० मैल वेगांचे वारे सुद्धा स्कायवॊक झेलू शकतो. ७० टन म्हणजे साधारण आठशे लोकांच वजन स्कायवॊक घेऊ शकतो (प्रत्यक्षात एकावेळी २०० पेक्शा जास्त लोकांना स्कायवॊकवर प्रवेश दिला जात नाही.) पर्यटकांकडून काचेवर ओरखडे येऊ नयेत म्हणून अतिशय काळजी घेण्यात येते, त्यांना स्कायवॊकवर जाताना बुटांवर चढवायला प्लास्टीक कव्हर देण्यात येते जेणेकरुन काचेवर पाय घसरणार नाही. स्कायवॊक बांधायला ३१ दशलक्ष डॊलर्स खर्च आला असून आता तो पर्यटकांसाठी अप्रूप बनला नसेल तरच नवल. स्कायवॊक बांधल्यापासून वेस्ट रीमला भेट देणाया पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढलेय आणि हुलायपानसाठी ते उत्तम मिळकतीच साधन ठरतय, त्याचा त्यांना वेस्ट रीमच्या इतर व्यवपस्थापनासाठी फायदा होतोय. पर्यावरणवाद्यांचा मात्र असं म्हणणं आहे की संपूर्ण नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या ह्या भागात आता मानवनिर्मित स्कायवॊकमुळे माणसांची वर्दळ प्रमाणाबाहेर वाढलेय आणि अर्थातच त्याचा परिणाम इथल्या निसर्गावर झाल्यावाचून रहाणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SlndKHfojdI/AAAAAAAAAGM/lSEHDvQMuvs/s1600-h/P1010088.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5357556397614075346" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 240px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SlndKHfojdI/AAAAAAAAAGM/lSEHDvQMuvs/s320/P1010088.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;स्कायवॊकच्या रांगेत त्यांनी दिलेली कव्हर्स आम्ही बूटांवर चढवली आणि स्कायवॊकवर गेलो. आत प्रवेश करताच वरती खुले आकाश, आणि खाली काच. काचेवरून चालत पुढे जातोय तोच पायाखालची जमिन सरकणे म्हणजे काय ह्याचा अनुभव आला :-) पावलांखाली खोल दरी, आज मैं उप्पर आसमा निचे अशी स्थिती. वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे दगडांचे पट्टॆ घळीत सगळ्याच बाजूना दिसत होते. वाराही चांगला सुटला होता इथे. पंधरा वीस मिनिटे वेगवेगळ्या कोनांतून ग्रॆंड कॆनियन बघून आम्ही स्कायवॊकवरुन बाहेर पडलो. स्कायवॊकवर कॆमेरा न्यायला परवानगी नसली तरी व्यवस्थापनाचे फोटोग्राफर तुमचा फोटॊ काढून देतात. अर्थात तुम्ही नीट पोझिशन देणे आवश्यक आहे, आजूबाजूस काचच असल्याने वेडेवाकडे रीफ्लेक्शन येऊन मजेशीर फोटो येतात, तुम्ही हवेत तरंगत आहात असे :-) &lt;a href="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SlndsTwibfI/AAAAAAAAAGU/--vhOgu8qZk/s1600-h/P1010089.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5357556985021754866" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 240px" alt="" src="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SlndsTwibfI/AAAAAAAAAGU/--vhOgu8qZk/s320/P1010089.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt; बाहेर पडून आम्ही बाजूलाच इगल पॊईंट कडे गेलो.&lt;br /&gt;डोंगरात दगडांनी पंख पसरलेल्या गरुडाचा आकार घेतल्याने ह्या पॊईंटला असं नाव पडलं, त्याचे तसेच तिथून दिसणाया स्कायवॊकचे फोटॊ काढून आम्ही जेवणासाठी उपहारगृहात गेलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;थोडी विश्रांती घेऊन आम्ही वेस्ट रीमच्या शेवटच्या पॊईंटवर जाण्यासाठी बस पकडली. हुलायपीयन संस्कृतीची ओळख होण्याच्या दृष्टीने त्यांनी तिथे एक पॊईंट बांधलाय. तिथूनही ग्रॆंड केनियनच विहंगम दृष्य दिसतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Slnd6juSbEI/AAAAAAAAAGc/xtlnGHclMSE/s1600-h/P1010110.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5357557229825453122" style="WIDTH: 554px; CURSOR: hand; HEIGHT: 240px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Slnd6juSbEI/AAAAAAAAAGc/xtlnGHclMSE/s320/P1010110.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;पुन्हा एकदा आम्ही ग्रॆंड कॆनियनच्या दगडांत फेरफटका मारला, ऊन तर होतच आणि परतिसाठी वेस्ट रीमच्या मुख्य माहिती केंद्रावर जाणारी बस पकडली. पंधरा वीस मिनिटांत मुख्य माहिती केंद्रावर पोहोचलो आणि तिथून वेस्ट रीमच्या व्यवस्थापनाची आम्हाला हमरस्त्यावरील आमच्या बसपाशी सोडणारी बस पकडली. पुन्हा त्या कच्च्या रस्त्यावरून साधारण १८ मैल, २५-३० मिनिटे प्रवास करुन आम्ही आमच्या बस पर्यंत पोहोचे पर्यंत संध्याकाळचे सहा वाजले. ह्या पूर्ण वेस्ट रीममध्ये वेगवेगळ्या पॊईंट्स वर काम करणारी माणसे, सुविधा ह्या सगळ्यांचा खर्च पर्यटकांकडून मिळणाया पैशातूनच करावा लागतो. इथपर्यंत पाईपलाईन वगैरे नसल्याने पाणी सुद्धा जपूनच वापरावे लागते. इतक्या लांबपर्यंत वीज, बांधकामाचा माल, खाण्याचे सामान, कच्चा-पक्का माल पोहोचवणे ह्या प्रत्येकासाठी खर्च येतोच. ह्या सगळ्याचा एकत्रित विचार केला तर वेस्ट रीम इतके महाग का आहे, ह्याचा अंदाज येतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;u&gt;पुन्हा लास व्हेगास रात्र -- &lt;/u&gt;&lt;br /&gt;समर असल्याने अगदी आठ-साडेआठ वाजेपर्यंत्न स्चच्छ उजेड. त्यामुळे ग्रॆंड कॆनियनच्या परतीच्या प्रवासात पुन्हा एकदा हूवर डॆम नीट पहायला मिळाला आणि नऊ वाजेपर्यंत आम्ही सर्कस सर्कस मध्ये आमच्या मुक्कामी पोहोचलो. हॊटेलवर तासभर विश्रांती घेऊन लास व्हेगासच्या रात्रीचा जल्लोष अनुभवायला पुन्हा बाहेर पडलो. लास व्हेगास स्ट्रीपच्या मुख्या रस्त्यावर चालत आम्ही दोन्हीकडचा झगमगाट अनुभवत होतो. बॆलिज होटेल मध्ये आज आम्ही ’ज्युबिली’ शो ची तिकीट काढली होती. वाटेवरच आम्हाला रीयोज हॊटेलबाहेर चाल्लेला चकटफू शोज थोडा पहायला मिळाला, तिथला रस्ता खच्चून भरला होता, वाट काढणे मुश्किल. हवेत जाणवण्या इतपत उष्मा होता. त्या झगमगाटातून वाट काढत दहा वाजेपर्यंत आम्ही बेलिज कॆसिनोमध्ये पोहोचलो. कॆसिनोजमध्ये थोडा फेरफटका मारला, थोड्या स्लॊट मशिन्सवर हरण्याचा आनंद घेऊन :-) आम्ही तिथल्या थिएटर मध्ये जाऊन बसलो. ठरल्यावेळी म्हणजे बरोब्बर साडेदहाला शो सुरु झाला, सभागृह जवळ जवळ भरले होतं. पडदा वर करताक्षणी वासलेला आ जवळजवळ पुढचा दिड तास उघडाच होता. जागतिक दर्जाचं म्हणजे नेमकं काय हे प्रकर्षाने जाणवलं. एकमेवाद्वितीय शो. कॊरीओग्राफी, कलाकारांच टायमिंग, अचाट कसरती पुन्हा पुन्हा चकित करत होत्या. त्यात डॊयलॊग असे नव्हतेच. पूर्ण म्युझिकल ट्रीट. अप्रतिम डान्स, लुक्स, कलाकारांचा आत्मविश्वास, त्यांचा मेळ, ताकदीचे अचाट प्रयोग, वेशभूषा, केशभूषा, सेट्सची भव्यता आणि दिव्यता, प्रकाशाचा चपखल वापर आणि प्रत्येक प्रवेशाच्या सादरीकरणातलं नाविन्य, वेगळेवपण उत्कंठा वाढवत होतं. कधी संपूच नये हे अस वाटत होतं. ज्युबिलीच्या या संचात साधारण ७५ कलाकार आहेत, लास व्हेगाज मधल्या त्यावेळच्या टॊप थ्री पैकी हा एक शो, आमच्या सुदैवाने आम्हाला अनुभवता आला. बाहेर पडलो आणि टॆक्सी करायच्या ऐवजी लास व्हेगाज स्ट्रीप चालावी असा उत्साह होता. रात्रीचे साडेबारा होऊनही बयापैकी गर्दी होती रस्त्यावर. लास व्हेगास शहर रात्रीच जागते आणि दिवसा पेंगते हे खरच अगदी. तेथे रात्री दीड वाजता डेनिस मध्ये जेवून आम्ही लास व्हेगास स्ट्रीपवर तासभर चालत हॊटेल सर्कस सर्कस मध्ये पोहोचलो तर तिथे कॆसिनोमध्य बयाच गर्दीत गेमिंग चालू होते. निरनिराळी स्लॊट मशिन्स, पत्त्यांचे, फिरत्या चाकांचे, फाशांचे खेळ आणि ते खेळणारे/खेळवणारे/पाहाणारे हवशे, नवशे आणि गवशे, एकदम जल्लोषाचं वातावरण! रात्री दोन वाजता वरती रुम वर जाऊन झोपलो आणि सकाळी ७ ला परत सॆन फ्रान्सिस्कोकडे निघायचे असल्याने, ६ वाजताच उठलो. गेले तीन दिवस नुसते धावपळीत गेल्याने मनसोक्त कॆसिनोमध्ये खेळणं झालच नव्हतं. फिरत्या चाकावरती देशी नशीबाला आकार ही उक्ती सार्थ ठरवणाया टेबलवर तेवढ्या अर्धा पाऊण तासात खेळून आलो. चांगली गोष्ट अशी की कुठलाही खेळ तुम्हाला माहित नसेल तर समजावून सांगितला जातो, त्यात फसवणूक अशी होत नाही. लोकांना खेळण्याचा मनमुराद आनंद लुटू दिला जातो. गमतीची बाब अशी जे थोडं काही खेळलो त्यात शेवटी प्लस मध्येच राहीलो, आता लास व्हेगासची आठवण म्हणून हे कायम लक्षात राहील :-)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;दिवस पाचवा (पुन्हा सॆन फ्रान्सिस्को)&lt;br /&gt;&lt;/strong&gt;सकाळी सात वाजता आम्ही सॆन फ्रान्सिस्कोच्या दिशेने निघालो. दोन रात्री सगळ्यांनाच लास व्हेगास मध्ये जागरण झाल्याने सगळेच पटापट झोपी गेलो, दरम्यान अकराच्या आसपास, ड्रायव्हरने बस टेंजर ह्या एका मोठ्या मॊल मध्ये थांबवली. वेस्ट कोस्टच्या ह्या टेंजर मॊल मध्ये रीबॊक, गॆप, नायकी, नॊटीका अशी बरीच फॆक्टरी आऊटलेट्स होती. बरोब्बर दोन आठवड्यांपूर्वीच आम्ही दुसया टोकाच्या म्हणजे ईस्ट कोस्टच्या टेंजर मॊल मध्ये होतो त्याची आठवण झाली. दिवसभर प्रवास करून संध्याकाळी सात पर्यंत आम्ही सॆन मटिओ ह्या आमच्या फोस्टर सीटीजवळच्या मुक्कामी येऊन पोहोचलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;संध्याकाळी माऊंटन व्ह्यू मध्ये ड्राईव्ह करुन माझ्या आवडत्या बनाना लिफ मध्ये डिनर साठी गेलो आणि तिथूनच जवळ राहात असणाया मित्रमैत्रिणींना भेटून रात्री मुक्कामी परतलो. डोक्यात दुसया दिवशीचा सॆन फ्रान्सिस्कोचा प्लान तयार होताच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;- क्रमश:&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-7039860892572005058?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/7039860892572005058/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=7039860892572005058' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/7039860892572005058'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/7039860892572005058'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2009/07/3.html' title='भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग 3'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://1.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Slnb7XvUhzI/AAAAAAAAAF8/UFEG5pYJQkY/s72-c/P1010017.JPG' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-736889718260354249</id><published>2009-07-04T14:20:00.013-05:00</published><updated>2009-07-04T17:00:48.536-05:00</updated><title type='text'>भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग 2</title><content type='html'>&lt;strong&gt;दिवस तिसरा (लास व्हेगास)&lt;/strong&gt;&lt;br /&gt;फ्रेस्नोहून लास व्हेगास ला पोहोचण्यासाठी आज २६० मैल अंतर कापायचे असल्याने सकाळी आठ वाजता आमची बस सुटली. आज आम्ही कॆलिफॊर्निया राज्याची (गोल्डन स्टेट) हद्द ओलांडून नेवाडा (सिल्व्हर स्टेट) राज्यात प्रवेश केला. आदल्या दिवशीचा थकवा असल्याने आणि पुढचे दोन्ही रात्र आणि दिवस धावपळच असल्याने बसमध्ये सगळेच गाढ झोपी गेलो. काही तासांनी डोळे उघडले तेव्हा आम्ही रेताड आणि रुक्श वाळवंटातून जात असल्याचे जाणवले. दरम्यान हॆंस मधेमधे वेगवेगळी ठिकाणे, त्यांचे भौगोलिक, ऐतिहासिक महत्त्व ह्यांची सखोल माहिती पुरवीत होताच. मे च्या तिसया आठवड्यातच एवढं रणरणतं ऊन अनुभवताना सॆन फ्रन्सिस्कोची थंडी आठवली आणि घेतलेल्या जॆकेटचे निदान इथे तरी नक्की ओझेच होणार ह्याची खात्री पटली. दुपारी जेवण उरकून आम्ही लास व्हेगास च्या दिशेने आजच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यासाठी निघालो आणि संध्याकाळी तीनच्या दरम्यान लास व्हेगास शहराजवळ पोहोचलो. लास व्हेगास जवळ आलय ह्याच्या खुणा बाहेर दिसू लागल्या होत्या, बरच काही ऐकलय, वाचलय आणि टीव्हीवर पाहिलेल्या ह्या शहराबद्दल प्रचंड अप्रूप होतं. जसजसे आम्ही शहरात आलो तसतशा खूप मोठ्या आणि भव्य इमारती दुतर्फा दिसू लागल्या. प्रत्येकीचा नखरा वेगळा, ढब वेगळी. जगातील वास्तूशिल्पांचे वैविध्यपूर्ण नमुने इथे पहायला मिळतात. आता लास व्हेगास विषयी थोडसं. लास व्हेगास ला सिन सिटी म्हणूनही ओळखलं जात. साधारण १९३१ च्या दरम्यान म्हणजे मंदी नंतर लग्गेच लास व्हेगास ला जुगार हा अधिकृत करण्यात आला. २००५ मध्ये ह्या शहराला शंभर वर्ष पूर्ण झाली. काही गंमतीशीर गोष्टी लास व्हेगास आणि तिथल्या कॆसिनोजविषयी - &lt;br /&gt;१. Whatever happens in Las Vegas stays in Las Vegas असं म्हणतात. त्यामुळे कॆसिनोतून मिळू शकणारा झटपट पैसा, लफडी ह्यासाठी इथे येणायांचे प्रमाण लक्षणीय. दरवर्षी साधारण ४० दशलक्ष लोक लास व्हेगासला भेट देतात. येणारा जवळ जवळ प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कॆसिनोमध्ये खेळतोच खेळतो. इथे जॆकपॊट लागून कोट्याधीश झालेलेही कितीतरी आहेत पण ’आपल्यालाही लागेल असा जॆकपॊट’ अशा अति-आशावादी दृष्टीकोनाने कितीतरी लोकं निव्वळ जुगार खेळून नशीब अजमवण्यासाठी इथे येतात. मोठमोठ्या कंपन्यांच्या अधिकायांच्या मिटींग्ज, कॊन्फरन्सेस इतकेच काय तर कोर्पोरेट्स ट्रेनिंग्स सुद्धा लास व्हेगास मध्ये चालतात. ह्या इतक्या प्रचंड संख्येने येणाया लोकांमुळे कॆसिनोजमध्ये रोज कोट्यावधी डॊलर्सची उलाढाल चालते, बहुसंख्य कमाई ही कॆसिनोच्या मालकांचीच होते हे आलेच. &lt;br /&gt;२. कोणत्याही कॆसिनो मध्ये न दिसणाया गोष्टी म्हणजे - खिडकी (म्हणजे बाहेरचा प्रकाश दिसणार नाही, उद्देश हा की खेळणायास दिवस रात्रीचे भान राहू नये), भिंतीवरील घड्याळ (पुन्हा तेच,खेळणायास वेळेचे भान राहू नये ), लहान मुले (लहान मुलांना जवळ जवळ सगळ्याच ठिकाणी बंदी आहे) खेळणायांना अधिकाधिक जुगार खेळावा म्हणून टेबलवर स्वस्तात ड्रींक्स, खाणे ह्यांची सर्विस दिली जाते. &lt;br /&gt;३. लास व्हेगास मध्ये लग्न करणे हे इथल्या तरूण तरुणींच एक मोठ्ठ स्वप्न. संपूर्ण अमेरिकेतील जनता इथे लग्नकार्यासाठी येते. तशा झटपट लग्नाच्या सोयीही कॆसिनोजमध्ये आहेत. (आठवलं का रचेल आणि रॊसने तसेच मोनिका आणि शॆंडलरने उडवलेली लास व्हेगास मधली धमाल!). लास व्हेगासमध्ये लग्नापूर्वी रक्त तपासणी करण्याची गरज नाही, प्रतिक्षा यादी पण नाही आणि अगदी मामुली फी, शिवाय वातावरणही तारुण्याच्या धुंदीत ह्यामुळेच लग्नाळूंची इथे गर्दी होत असावी. &lt;br /&gt;४. लास व्हेगास स्ट्रीप हा इथला मुख्य रस्ता. साधारण तास दीड तास लागावा चालायला इतका मोठा. बरेचदा एका कॆसिनोतून दुसयात जायला टॆक्सी वापरावी लागते. अशावेळी टॆक्सी वाल्यास टीप देणे, हॊटेल वाल्यांना व्यवस्थित टीप देणे इथे अतिशय अगत्याचे आहे. &lt;br /&gt;५. लास व्हेगास मधले कॆसिनोज १२ महिने २४ तास चालू असतात. करण्यासारखे काही नाही असं इथे कधी होतच नाही. केनडींची हत्या झाली तेव्हा एकदाच काही मिनिटांसाठी कॆसिनोजची झगमग थांबवण्यात आली होती, अन्यथा शंभराहून अधिक वर्षे हा जुगाराचा पसारा अव्याहत चालू आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;लास व्हेगास शोज बद्दल - &lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sk-sodV9nBI/AAAAAAAAAFs/qt-ss2_p51Q/s1600-h/P1010086.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5354688293038300178" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 240px" alt="" src="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sk-sodV9nBI/AAAAAAAAAFs/qt-ss2_p51Q/s320/P1010086.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;ह्याबद्दल खूप काही ऐकले आणि वाचले होते. मागे न्यूयॊर्कमध्ये गेलो होतो तेव्हा इच्छा असूनही ब्रॊड वे वरचे शोज पहाणे शक्य झालं नाही त्यामुळे ह्यावेळी लास व्हेगासचे शोज पहायचेच असे ठरवले होते. ब्रॊडवेज चे आणि लास व्हेगास चे शोज ह्यात तसा फरक आहे. ब्रॊडवेजच्या शोज मधून मुख्यत्त्वे त्यातील नाट्य, आर्तता, दिग्दर्शन, पटकथा, म्युझिकल्स आणि सादरीकरण ह्याचा अनुभव मिळतो तर लास व्हेगासच्या शोज मधून मुख्यत्त्वे थरार, भव्यता, शारिरीक क्षमतेचे खेळ, कोरिओग्राफी, ड्रेसडिझायनिंग, अचाट सादरीकरण ह्यांचा अनुभव मिळतो. दोन्ही प्रकारचे शोज हे जागतिक दर्जाचेच असतात. लास व्हेगासच्या शोजमध्ये आपली कला सादर करणे हे जगातल्या कुठल्याही कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी इथे येऊन कितीही मेहनत घेण्याची त्यांची तयारी असते. लास व्हेगासमध्ये वेगवेगळ्या कॆसिनोज मध्ये असे शोज अव्याहत चालूच असतात. लास व्हेगासवर प्रेम करणायांपैकी केवळ ह्यां शोजचा आनंद लुटण्यासाठी प्रामुख्याने येणारेही कितीतरी जण आहेत. काही शोज हे खेळण्यासाठी लोकांना आकर्षित करण्याच्या उद्देश्शाने असतात ते थोड्यावेळासाठी असून चकटफु असतात, हे शोज उभ्या उभ्याच बघायचे असतात आणि दहा पंधरा मिनिटांत संपतात. मुख्य शोज हे साधारण दिड ते दोन तासाचे असून त्यांची तिकीटे शंभर डॊलर्सपासून हजारो डॊलर्स पर्यंत असतात. असे शोज कॆसिनोमधल्या स्वतंत्र थिएटर्स मध्ये होत असून कॆमेरा नेण्याची आणि मोबाईल किंवा कुठल्याही साधनाने फोटो काढण्याची तिथे परवानगी नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sk-tT56kayI/AAAAAAAAAF0/n86oEs2ztnc/s1600-h/P1010080.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5354689039442406178" style="FLOAT: right; MARGIN: 0px 0px 10px 10px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 240px" alt="" src="http://1.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sk-tT56kayI/AAAAAAAAAF0/n86oEs2ztnc/s320/P1010080.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt; लास व्हेगास मध्ये बहुसंख्य ठिकाणी तळात प्रशस्त कॆसिनॊज असून वरती ४०-५० मजले राहाण्याची हॊटेल्स आहेत. आम्ही सर्कस सर्कस ह्या प्रसिद्ध कॆसिनो मध्ये उतरलो होतो. इथे बसमधून येताना लास व्हेगासची झलक पहायला मिळाली होती पण बाहेर ऊन असल्याने उकाडाही होताच आणि दिव्यांचा झगमगाट सुरु झाला नव्हता. हॊटेलमध्ये फ्रेश होऊन लास व्हेगास फिरण्यासाठी आम्ही लगेचच बाहेर पडलो. सुदैवाने गो टू बसने आमची काही लास व्हेगास कॆसिनो फिरण्याची आणि काही चकटफु शोज बघण्याची सोय केली होती. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sk-sX9nhEzI/AAAAAAAAAFk/tJWWCp5iqEg/s1600-h/P1010079.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5354688009644086066" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 240px; CURSOR: hand; HEIGHT: 320px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sk-sX9nhEzI/AAAAAAAAAFk/tJWWCp5iqEg/s320/P1010079.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;पलॆशियो मधला सायंकाळचा देखावा, तिथलाच व्हिनस शो, सीझर्स मधला अटलांटीसचा शो, बाहेरचा डोकं नसलेला पुतळा, पॆरीसच्या आयफेल टॊवरची प्रतिकृती बघत आम्ही पुढे निघालो. बलॆशियो बाहेरचा पाण्याच्या कारंज्यांचा म्युझिकल शो म्हणजे श्रवणीय आणि प्रेक्षणीय आनंद होता. आमच्या दोन रात्रीच्या वास्तव्यात लास व्हेगास मध्ये असणारे सर्वोत्तम शोज कोणते ते आम्ही शोधले आणि त्याप्रमाणे ’आईस’ आणि ’ज्युबली’ ह्या दोन दिवसांच्या शोजची तिकीटे खरेदी करून ठेवली. आठ वाजता आम्ही रीव्हीयेरा ह्या कॆसिनोमध्ये ’आईस’ ह्या शोसाठी त्यातल्या थिएटरवर जाऊन पोहोचलो. पुढचे दोन तास कमनीय आणि वेगवान हालचालींच्या अत्युच्च दर्जाचे प्रदर्शन अविरत चालू होते. बर्फाच्या लादीच्या स्टेजवर स्केटींग करत कसरतपटू रशियन सर्कस सारखे प्रयोग दाखवत होते. वेग, आवेग, तोल ह्यांचा वापर थक्क करणारा होता. वर्ल्ड क्लास म्हणजे काय ह्याचा प्रत्यय आल्यावाचून राहिला नाही. निव्वळ अफलातून कसरतीं शिवाय एकूण कॊरिओग्राफी, ड्रेस डिझायनिंग, प्रयोगाचे दिग्दर्शन, सिक्वेन्सिंग, कला/ मिमिक्री सादर करणायांचे टायमिंग, स्टेज सगळेच अत्युच्च! थिएटर मधून भारावून बाहेर आलो आणि कॆसिनोमधून चालत रस्त्यावर बाहेर पडलो तर डोळे दिपवणारा झगमगाट लास व्हेगास स्ट्रीपवर सुरु झाला होता. निऒन लाईट्स नी आणि मोठमोठ्या जाहिरातींच्या हॊर्डींग्जनी, झळकत्या दिव्यांनी टाईम स्क्वेअरच्या धुंदीची आठवण झाली. ’अभी तो रात जवा है’ अशा उत्साहात लोकांचे जथ्थे लास व्हेगास स्ट्रीपच्या रस्त्याने फिरत होते. तेथेच थोडं फार फिरून आणि कॆसिनोज मध्ये टाईमपास करत दुसया दिवशी ग्रॆंट कॆनियनला जायचे असल्याने रात्री साडे बारा पर्यंत आम्ही हॊटेलवर परतलो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;- क्रमश:&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-736889718260354249?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/736889718260354249/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=736889718260354249' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/736889718260354249'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/736889718260354249'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2009/07/2.html' title='भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग 2'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sk-sodV9nBI/AAAAAAAAAFs/qt-ss2_p51Q/s72-c/P1010086.JPG' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-7112346846028388383</id><published>2009-06-25T22:17:00.011-05:00</published><updated>2009-06-27T00:30:34.831-05:00</updated><title type='text'>भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग १</title><content type='html'>&lt;div&gt;ईस्ट कोस्टवरच्या मर्टल बीच वरून परतेपर्यंत एकीकडे पश्चिम किनायावरच्या सुट्टीचे आणि भटकंतीचे प्लान्स तयार होत होते. २५ च्या लॊंग विकेंडला धरुन साधारण दहा दिवसांची ट्रीप आम्ही आखत होतो. आमच्या बयाच मित्रमैत्रिणींनी ह्या ट्रीपविषयी आणि प्लानिंग विषयी विचारल्याने त्याबद्दल थोडं इथे लिहीण्याचं ठरवलय. कुठेही फिरायला जाण्याचा विचार करण्यापूर्वी तिथे नेमकं आपण कशासाठी जात आहोत हा विचार आधी करण आवश्यक आहे (पु,ल. नी ’म्हैस मध्ये कोकणाच्या प्रवासात मी इथे का आलो असा विचार करत हळहळ व्यक्त केलेय म्हणून म्हटलं आपण सुधारावं! ;) ). कधी कोणाला फक्त भेटायला म्हणून तर कधी धार्मिक स्थळास भेट म्हणून, कधी निव्वळ विश्रांती किंवा हवापालट म्हणून तर कधी इथल्या पार्कांमध्ये मानवनिर्मित अचाट प्रयोग अनुभवण्यासाठी तर कधी निसर्गाची भव्य आणि दिव्य रुपे बघत अचंबित होण्यासाठी आपण फिरतो. मीना प्रभूंसारखं भेट देणाया भागाबद्दल विस्तृत वाचन करणं जरी शक्य नसलं तरी इंटरनेटच्या कृपेने बरीच माहिती मिळू शकते. ही माहिती वाचून आपल्याला त्यातलं काय बघायचंय, कसं बघायचय, किती प्रवास स्वतः करायचाय, कुणाला भेटायचय हे सगळं नोंदवलं आणि सुसंगत केलं की झालं प्लानिंग. प्रवास जास्तीत जास्त आरामदायी आणि आनंददायी असण्याकडे आमचा कल होताच. पश्चिम किनायावर राहाणाया बयाच मित्रमैत्रिणींकडून मूलभूत माहिती मिळाली होती त्याचा फायदा झाला. लॊंग विकेंड असूनही तीन महिने आधी बुकींग केल्याने सुदैवाने आम्हाला विमानाची तसेच इतर सोयीची तिकीटे मिळाली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पूर्वतयारी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;१. फ्लाईट टिकीट्स -&lt;/strong&gt;मागच्यावर्षी ईस्ट कोस्ट फिरायला जाताना डॆलास वरून व्हर्जिनियाला विमानाने गेलो होतो आणि परतलो न्यू जर्सीवरुन. ही अशी वन वे फ्लाईट्स थोडी महाग पडली तरी वेळेच्या बचतीच्या दृष्टीने आणि प्रवास सुकर होण्याच्या दृष्टीने खूप उपयोगी पडतात, दगदगही कमी होते. ह्यावेळी सुद्धा कोलंबिया ते सॆन फ्रान्सिस्को आणि लॊस एंजिल्स ते कोलंबिया अशी वन वे टिकीट्स काढली होती.&lt;br /&gt;&lt;strong&gt;२. प्रवासी कंपनी टीकीट्स -&lt;/strong&gt;&lt;br /&gt;बरीच शोधाशोध केल्यावर आम्ही’ ’गो टू बस’ ह्या प्रवासी कंपनीची निवड केली. प्रवासी कंपनीचा विचार करण्याची कारणे म्हणजे&lt;br /&gt;अ. कमी वेळात अधिक ठिकाणे पहाता येणे&lt;br /&gt;ब. सोबत असलेल्या गाईड द्वारे अधिक आणि अचूक माहिती मिळणे&lt;br /&gt;क. ह्या स्थळांना भेट देणे हे मुख्य प्रयोजन (तिथे काही दिवस/रात्र राहून एखादे ठिकाण एक्स्प्लोअर करावयाचे असा विचार नव्हता)&lt;br /&gt;ड. प्रवास आरामदायी व्हावा आणि दगदग होऊ नये, जेणे करून वेळेची आणि श्रमांची बचत होईल&lt;br /&gt;इ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लास व्हेगाज ला सगळी मजा रात्रीच अनुभवायची असल्याने दिवसा गाडीत विश्रांती होईल आणि रात्री कॆसिनोज मध्ये फिरायला उत्साह राहील असा विचारही त्या मागे होता. तसेच नेवाडाच्या रुक्ष वाळवंटातून उन्हातून गाडी हाकताना होणारी दमछाक, नको तितका डोळ्यांवर येणारा आणि वाळूकणांवरून परावर्तित होणारा प्रखर सूर्यप्रकाश हे टाळायचं असेल तर बसचा प्रवास हा मार्ग सगळ्यात उत्तम होता.&lt;br /&gt;त्यांच्या साईट वर विविध प्रकारची पॆकेजेस गोटू बस ने दिली आहेत, त्यांविषयी माहिती http://www.gotobus.com इथे पहाता येईल. आम्ही सॆन फ्रान्सिस्को, योसेमिटी, लास वेगास, ग्रॆंड कॆनियन (वेस्ट रीम) असं चार दिवसांच प्रवासी पॆकेज निश्चित केलं होतं.&lt;br /&gt;&lt;strong&gt;३. एमट्रॆक टिकीट्स -&lt;/strong&gt;&lt;br /&gt;सॆन फ्रान्सिस्कोवरुन लॊस एंजल्सला येण्यासाठी ’स्टार लाईट’ ह्या निसर्गसौंदर्याने परिपूर्ण अशा कोस्टल रेल्वे लाईनची आम्ही निवड केली. एक महिना आधीच बुकिंग केल्याने आम्हाला एक स्वतंत्र केबिन वाजवी दरात बुक करता आली.&lt;br /&gt;&lt;strong&gt;४. स्थानिक आकर्षणांची टिकीट्स -&lt;/strong&gt;&lt;br /&gt;सॆन फ्रन्सिस्को सिटी टुर्स तसेच स्थानिक फिरणाया ठिकाणांची तिकीटे आधीच काढल्यास पुष्कळदा स्वस्त पडतातच शिवाय वेळही वाचतो.&lt;br /&gt;&lt;strong&gt;५. कार रेंटल आणि हॊटेल रेंटल -&lt;/strong&gt;&lt;br /&gt;तुमचं वेळापत्रक ठरलं की हे सुद्धा वेळेवर करण महत्त्वाचं आहेच. (तुमच्याकडे AAA चे सभासदत्व असेल तर दरांत थोडी फार सूट नक्कीच मिळते.)&lt;br /&gt;&lt;br /&gt;विमान, रेल्वे आणि वर म्हटलेल्या सर्व प्रकारच्या तिकीटांची एक फाईल करून बरोबर ठेवली होती. त्याच फाईल मध्ये संपूर्ण दहा दिवसांचे ढोबळ वेळापत्रक, ज्या ठिकाणी जायचय त्यांचे पत्ते, फोन नंबर एकत्र करून ठेवले. तसेच वेगवेगळ्या ठिकाणांना जोडणारे मॆप्सही मॆपक्वेस्ट वरुन घेऊन फाईलमध्ये ठेवले होते. जीपीएस जवळ असला तरी न जाणॊ ऐनवेळी गडबड नको. शिवाय अनोळखी ठिकाणी प्रवासापूर्वी रस्त्याचा साधारण अंदाज असलेला केव्हाही चांगला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;दिवस पहिला (कोलंबिया ते सॆनफ्रान्सिस्को):&lt;/strong&gt;&lt;br /&gt;शुक्रवारी संध्याकाळी कोलंबिया एअरपोर्टवरून आम्ही निघालो आणि अटलांटाला कनेक्टींग फ्लाईट पकडून रात्री सॆन फ्रान्सिस्कोला पोहोचलो. प्रवास जरी सहा सात तासांचा असला तरी वेळेच्या फरकामुळे पोहोचेपर्यंत रात्रीचे साडे नऊच झाले होते. एअरपोर्टवरून बाहेर रस्त्यावर येताच पहिल्यांदा जाणवलं ती सॆन फ्रान्सिस्कोची थंड आणि प्रसन्न हवा :)&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;दिवस दुसरा (योसेमिटी नॆशनल पार्क):&lt;/strong&gt;शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजता सॆन मटीओ येथून गो टू बस कंपनीच्या बसने आम्हाला घेतले. बस (व्होल्वोसारखी) चांगली ऐसपैस आणि वातानुकूलित होती. शिवाय त्यात मागे रेस्ट रूमही होती. बसच्या काचा मोठ्या असल्याने बाहेरच्या गोष्टी बघणे सहज शक्य होते. आमच्या बरोबर प्रवास करणायांपैकी बहुतेक जण अमेरीका फिरायला आलेले एशियन होते. त्यात बरेचसे चायनीज आणि थोडेफार भारतीयही होते. सॆन मटिओ वरुन बसने माऊंटन व्ह्य़ू मधून चक्कर मारून सिस्को, ऎप्पल ह्या अव्वल दर्जाच्या कंपन्यांच्या मुख्यालयातून फिरवून फ्री मॊंटच्या दिशेने कूच केले. तिथून काही प्रवाशांना घेऊन आम्ही योसेमिटीच्या दिशेने निघालो. योसेमिटीला पोहोचायला आम्हाला साधारण दोनशे माईल्स अंतर कापायचे होते. दोन्हीबाजूस शेते, फळबागांमधून बस पळत होती. कॆलिफॊर्नियाचा हा शेतीसमृद्ध भाग, लांबपर्यंत पसरलेली आधुनिक तंत्रद्न्यानानी नटलेली शेते, त्यावर थुईथुई नाचणारे स्प्रिंकलर्स, अवजड यंत्रे सगळं बघत बघत आम्ही पुढे सरकत होतो. आमचा गाईड (त्याचं नाव हॆंस) प्रत्येक ठिकाणाची माहिती चायनीज आणि इंग्रजीतून देत होता. दुपारी वाटेवरच जेवण उरकून आम्ही आमचा प्रवास पुढे सुरू केला आणि योसेमिटीला साधारण दोनच्या आसपास पोहोचलो. साधारण १२२० चौ. मैल पसरलेले योसेमिटी १८९० मध्ये ’राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित झाले. अमेरिकेत एकूण अशी ६२ राष्ट्रीय उद्याने आहेत. दरसाल जास्तीत जास्त पर्यटक येणारे योसेमिटी हे तिसया क्रमाकांचे राष्ट्रीय उद्यान. स्मोकी माऊंटन नॆशनल पार्क हे नॊर्थ कॆरोलिना मधले प्रथम क्रमांकाचे असून ग्रॆंड कॆनियनचा दुसरा क्रमांक लागतो. लक्षात घेण्यासारखा फरक असा की स्मोकी माऊंटन येथे बाराही महिने चांगले हवामान उपलब्ध असल्याने, पर्यटक वर्षभरात कधीही येऊ शकतात परंतु भरपूर स्नो, खूप थंड किंवा खूप उष्ण अशा हवामानांमुळे योसेमिटी तसेच ग्रॆंड केनियन मध्ये पर्यटक वर्षातील विशिष्ट काळीच येणे पसंत करतात. प्रत्येक नॆशनल पार्कमध्ये साधारण वीस ते चाळीस डॊलर प्रवेश फी भरावी लागते. पण सिनियर्स सिटीझन्स ना अगदी मामुली दरात कुठल्याही नॆशनल पार्क मधे प्रवेश मिळतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SkWVE4PIsyI/AAAAAAAAAFE/UMpRHuDfIHk/s1600-h/HorseTail+waterfall.JPG"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 240px; height: 320px;" src="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SkWVE4PIsyI/AAAAAAAAAFE/UMpRHuDfIHk/s320/HorseTail+waterfall.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5351847643247588130" /&gt;&lt;/a&gt;मे च्या दरम्यान योसेमिटीला येण्याचा आम्ही विचार केला ह्याचं अजून एक कारण म्हणजे वरच्या डोंगरांवरचा बर्फ वितळून ठिकठिकाणी कोसळणारे विलोभनीय धबधबे ह्या वेळे दरम्यान (केवळ चार ते सहा आठवडेच) पहावयास मिळतात. त्यानंतर हा भाग वाढत्या उन्हाळ्यामुळे शुष्क होऊ लागतो. योसेमिटी दरी ही सात मैल लांब आणि एक मैल रूंद असून उंची समुद्रसपाटीपासून साधारण ४००० फूट आहे. एल कॆप्टन शिखर, हाफ डोम अशा ठिकाणी ती ८००० फूटांपर्यंत जाते. बसमधून जाताना हंस आम्हाला व्हॆलीविषयी माहिती देत होता, शिवाय मधूनच डोकावणारे धबधबे, त्यांची पर्यटकांनी दिलेली नावे, दूर दिसणारी एल कॆप्टन, हाफ डोम ची पर्वत शिखरे, त्यांवर चमकणारे बर्फ (ग्लेशियर), अगदी ’पहाता किती पाहशील दोन नयने’ होत होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;बस ठिकठिकाणी थांबून आम्ही हजारो फूटांवरुन कोसळणारे धबधबे दोन्ही बाजूस पहात होतो. घोड्याच्या शेपटी सारखा दिसणारा हॊर्श टेल वॊटरफॊल खूप्पच छान दिसत होता. न संपणाया पर्वतरांगांमधून वळणावळणाचा रस्ता घेताना अगदी मुंबईतून देशावर किंवा कोकणात जाताना लागणाया घाटांची आठवण येत होती. मध्येच थांबून आम्ही जवळच असलेल्या ब्रिडल व्हील फॊल (Bridal Veil Fall) पर्यंत थोडं चालत गेलो आणि उभ्या सुळक्यामधून कोसळणारा धबधबा पाहिला. तेथेच बाजूला वहात असलेली मर्सिड रीव्हरही पाहिली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SkWVt5jcy5I/AAAAAAAAAFU/eeSkx-3n-Fg/s1600-h/Yosemite+falls.JPG"&gt;&lt;img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;width: 240px; height: 320px;" src="http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SkWVt5jcy5I/AAAAAAAAAFU/eeSkx-3n-Fg/s320/Yosemite+falls.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5351848347975863186" /&gt;&lt;/a&gt; रेस्ट एरियामध्ये बस थांबली आणि आम्ही जथ्थ्याने पायी फिरायला बाहेर पडलो. जवळच असलेल्या लोअर योसेमिटी फॊलपर्यंत थोडं चालत गेलो. प्रत्यक्ष धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिथे लाकडी ट्रेल बनवला आहे. तापमान साधारण ७५ फॆ च्या आसपास असावे. वळणावळणाने ट्रेलवरुन जात पाण्याच्या आवाजाच्या दिशेने सरकत आम्ही थेट धबधब्यापाशी जाऊन पोहोचलो. पाण्याचा स्त्रोत इतका प्रचंड आणि वेगात होता की मान वरुन करुन पाहाणेही शक्य नव्हते. पांढया शुभ्र पाण्याचा धबधबा जोरदार आवाज करत कोसळत होता. सगळे वातावरण मिस्टी आणि दुधाळ झाले होते. प्रत्यक्ष धबधब्याजवळ पाण्याचे थंडगार तुषार झेलत भिजण्यात (विशेषत: बाहेर इतकं जास्त तापमान असताना) विशेष मजा येत होती. थंड हवेच्या ठिकाणी असल्यासारखेच तिथे वाटत असल्याने ह्या लोअर योसेमिटी धबधब्यात भिजण्याचा हा अगदी चिंब आल्हाद दायक अनुभव! त्याच वाटेवरुन एल कॆप्टनच पर्वत शिखर दिसतं. हा म्हणजे साधारण ३००० फूटांचा अतिप्रचंड सुळका. पूर्ण ग्रॆनाईटचा बनलेला हा पर्वत सर करणे जगातील प्रत्येक रॊक क्लायंबर्सचे स्वप्न. सरासरी एवढी उंची रॊक क्लायंबिंग करून गाठायला तरबेज क्लायंबरला सुद्धा चार ते पाच दिवस लागतात. ह्या अतिविशाल दगडावर सुद्धा स्पीड क्लायंबिंग करून काही तासात जाणारे महाभाग आहेत. :-)&lt;br /&gt;&lt;br /&gt;योसेमिटीशी माझी पहिल्यांदा ओळख झाली जेव्हा मी एका पुस्तकात हाफ डोमविषयी वाचलं. हाफ डॊमने मग कुतुहूल इतक जागृत केलं की आम्ही दोघं हाफ डोमवर ट्रेकींग करता येईल का असा विचार करू लागलो. त्या अनुषंगाने करी व्हिलेज मध्ये राहायची व्यवस्था (जवळ जवळ सहा महिने आधी बुकिंग करावे लागते), शरीराला सवय होण्यासाठी नियमित व्यायाम वगैरे तयारी करणं आवश्यक होत, One Best Hike: Yosemite's Half Dome हे Rick Deutsch चं पुस्तकही विकत घेतलं. पण मग वेळेअभावी हा विचार सोडून द्यावा लागला. ह्यामुळे दुरून का होईना पण हाफ डोम पाहाता येणार म्हणून आम्ही दोघेही उत्सुक होतो. ८८४२ फूट उंच असलेला हाफ डोम ग्रेनाईटचा बनलेला आहे. हा मुळत: पूर्ण डोंगर असून आईस एज दरम्यान बर्फाने दुभंगला गेल्याने ह्याचा अर्धा भाग कोसळला असे म्हणतात. हाफ डोम वर जाणारी हाईक साधारण १७ मैलांची असून साधारण १० ते १२ तास लागतात. प्रचंड हिमवर्षाव, पाऊस होत असल्याने ही हाईक वर्षातील चार ते सहा महिनेच शक्य होते. तसेच हाईक एकाच दिवसात पूर्ण करावी लागते त्यामुळे पहाटे लवकर निघून दुपार पर्यंत हाफ डोमवर पोहोचावे लागते. हाईकचा शेवटचा टप्पा विशेष कठीण असून केबलच्या तारांवरून जवळ जवळ ८०-९० अंशातून शरीरावर ओढून अरूंद मार्गावरून पुढे सरकावे लागते. अर्थात वर पोहोचल्यावरचे दृश्य विहंगम असणारच ह्यात शंका नाही. जगातील कुठल्याही कसलेल्या गिर्यारोहकाला सर करण्यात अभिमान वाटेल असा हा हाफ डोम. निव्वळ हाफ डोम सर करण्यासाठी वेगवेगळ्या देशातील गिर्यारोहक अमेरिकेत आणि योसेमिटीमध्ये येतात. तर असा हा हाफ डोम डोळे भरून पाहून घेतला आणि आम्ही बसने टनेल व्ह्यू च्या दिशेने निघालो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SkWVeW8LunI/AAAAAAAAAFM/QB9sY9j0lQk/s1600-h/Tunnel+view.JPG"&gt;&lt;img style="display:block; margin:0px auto 10px; text-align:center;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 240px;" src="http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SkWVeW8LunI/AAAAAAAAAFM/QB9sY9j0lQk/s320/Tunnel+view.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5351848080986323570" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;योसेमिटीच्या पार्कच्या कुठल्याही माहितीत सगळ्यात जास्तीवेळा वापरण्यात येणारा कुठला फोटॊ असेल तर ह्या टनेल व्ह्यू स्पॊट वरुन घेतलेला. सगळं योसेमिटी पार्क सौंदर्य उघडून उभं राहतं समोर.योसेमिटीत येणाया प्रत्येकाने आलच पाहिजे असं हे ठिकाण. डाव्या बाजूस एल कॆप्टन, समोर क्लाऊड्स रेस्ट आणि हाफ डोम हे सुळके, त्याच्या उजव्या बाजूस सेंटिनेल डोम, सगळ्यां उजवीकडे कॆटेड्रेल स्पायरस हा सुळका आणि त्याच्या मधून कोसळणारा ब्रिडल व्हील फॊल्स. त्यातून भर म्हणजे डोंगर माथ्यावर पांढया जावळा सारखं दिसणारं आणि उन्हात चमकणारं ग्लेशियर (बर्फ). अगदी पंचपक्वान्नाची मेजवानीच निसर्गाने मांडून ठेवलेय. आयुष्यभरात इतक नयनरम्य दृश्य आपण क्वचितच पाहिलं असेल असं वाटल्यावाचून राहात नाही आणि वेगवेगळ्या कोनांतून कितीही फोटॊ काढले तरी मन भरत नाही. तृप्त मनाने आम्ही योसेमिटीतून बाहेर पडलो आणि रात्रीच्या मुक्कामी फ्रेस्नो शहराकडे निघालो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;- क्रमश:&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-7112346846028388383?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/7112346846028388383/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=7112346846028388383' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/7112346846028388383'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/7112346846028388383'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2009/06/blog-post_25.html' title='भटकंती, अमेरीकेच्या पश्चिम किनायावरची - भाग १'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/SkWVE4PIsyI/AAAAAAAAAFE/UMpRHuDfIHk/s72-c/HorseTail+waterfall.JPG' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-5707191549539023377</id><published>2009-06-03T21:52:00.011-05:00</published><updated>2009-06-03T22:09:14.217-05:00</updated><title type='text'>यह शाम मस्तानी..</title><content type='html'>&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;स्प्रिंग सुरु झाला आणि गेले दोन महिने भटकंती सुरु झालेय. म्हटलं ऊन मी म्हणायच्या आत बाहेर पडावं, मोकळेपणे भटकून घ्यावं. ’लेक मरे’ आणि जवळपासच्या ठिकाणांवर भटकतानाच पटकन व्हर्जिनिया टेक वरुन वरती वॊशिंग्टन डीसी पर्यंत ड्राईव्ह करुन आलो, ते चेरी ब्लॊसमची धुंदी अनुभवण्यासाठी.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;मे मधल्या दहा तारखेच्या विकेंडला आम्ही मर्टल बीच आणि आसपास फिरून आलो. पूर्वी साधारण २००२ मध्ये लिंचबर्ग मध्ये असताना आम्ही सगळे बॆचलर्स आलो होतो इथे. माझा हा एक अतिशय आवडता बीच ईस्ट कोस्ट वरचा. आता पुन्हा तो नव्यानेच सामोरा आला.&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;मर्टल बीच हे खरं म्हणजे ’फॆमिली व्हेकेशन’ म्हणून वसवण्यात आलेलं ठिकाण. सगळ्या वयांच्या माणसांना हरखून टाकतील असे त्या त्या वयातील उद्योग इथे आहेत, इतके छान की केवळ प्रत्येकासाठी तरी इथे यावच. लहान मुलांसाठी उत्तम वॊटर पार्क आहे, इतर खेळ/ पार्कही आहेतच. पूर्व किनायावरची अतिशय उत्तम शॊपिंग आऊटलेट्स इथे आहेत. नायकी, रीबॊक, हॆगर, व्हॆन हुसेन, नॊटीका, पोलो, गॆप तसेच इतर अनेक नामांकीत ब्रॆंडसची दुकानं इथे टॆंजर मॊल मधे आहेत. आम्हाला दोघांना अशी आऊटलेट आवडण्याच कारण म्हणजे चांगल्या ब्रॆंड मध्ये खूप चांगली विविधता पहायला मिळते शिवाय किंमतही बरीच वाजवी असते. मर्टल बीच परिसरात नुसतं रस्त्यानं फिरलं तरी हार्ले डेव्हीडसन घेऊन बायकींगची नशा अनुभवणारे बघितले की मस्त वाटतं. ह्या बाईकांचे (बायकांसारखेच) नखरे तरी किती, उंच हॆंडल वाली, मागे रेलणारी, लांब दांड्याची काय न काय. त्यावर बसणायांचा थाट तर विचारू नका. असं सुसाट तरुणाईने भारलेलं वातावरण बीच च्या आसपास. ह्याशिवाय इथे उत्तम गोल्फ कोर्सेसही आहेत. साऊथ कॆरोलिना हे राज्य गोल्फ साठी अतिशय सुप्रसिद्ध आहेच, इथे ऒगस्टा मध्ये अतिशय प्रतिष्टेच्या गोल्फ स्पर्धा दरवर्षी होतात. केवळ गोल्फ खेळण्यासाठी मर्टल बीचला येणारा (बयाचश्या निवृत्त) धनदांडग्यांचा अजून एक वर्ग आहे. अजून एक इथली आवडलेली बाब म्हणजे, समुद्रकिनायाला खेटूनच हॊटेल्स आहेत. हॊटेलच्या आवारात गाडी पार्क केली तर पार्कींगचा मोठा प्रश्न सुटतो. हॊटेल मधून बीच वर जायला हॊटेलच्या आतूनच रस्ता असल्याने समुद्रकिनायावर कितीही धुमाकूळ घालायला आपण मोकळेच. तिथल्या लांबच लांब समुद्रकिनायाच्या ओल्या वाळूत फिरण्यात विलक्षण मजा आहे. इथे पूर्व किनायावर अटलांटीक सीटी, न्यू जर्सीचं पॊईंट प्लेजर ते अगदी खाली मियामीचा साऊथ बीच, की वेस्ट अशा बयाच समुद्रकिनायांवर अत्तापर्यंत भटकंती झालेय. आम्हाला दोघांनाही सूर्यास्त पहाण्याचं वेड आहे. त्यावेळची ती बदलती रुपं, लाल पिवळा तेजोनिधी लोहगोल, त्याचं ते मावळतीचं तेज, संध्येच्या रंगाची उधळण आणि बघता बघता मावळणारा सूर्य, ती कातरवेळ, ते ’मावळत्या दिनकर’ चे मनात उमटणारे स्वर. दररोजचा सोहळा पण प्रत्येक वेळा नवीन रुपात, अगदी नव्या कोर्या उत्साहाने निसर्गाने मांडलेला. हे सगळं वेगवेगळ्या किनायांवरून बघायला आवडतच, इतकच काय तर एखाद्या निवांत संध्याकाळी घराबाहेरच्या तळ्याशेजारुनही सूर्यास्त खुणावतोच. ’की वेस्ट’ चा सूर्यास्ताने असंच वेडं केलय पूर्वी (त्याचा फोटॊ मी ऒरकूटवर लाईफ टाईम मोमेंट्स मध्ये ठेवलाय), बाकी ह्या इतर ठिकाणी पूर्व किनारा असल्याने समुद्रातून ’सूर्योदय’ होतो आणि ’सूर्यास्त’ किनायावर. मियामीला मुद्दाम मी असा समुद्रातून होणारा सूर्योदय टिपला होता. माझ्यासारख्या (पश्चिम किनारी) मुंबईत वाढलेल्याला हे एक अप्रूपच! (त्याच्या आदल्याच दिवशी सूर्यास्ताच्यावेळी मियामीच्या साऊथ बीच वर समुद्रावर निरभ्र विस्तीर्ण आकाशात एकावेळी दोन इंद्र्धनुष्य पाहाण्याचाही योग आला होता).&lt;br /&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic5A7TZUiI/AAAAAAAAAEs/zY3YCQ0khR0/s1600-h/P1010026.JPG"&gt;&lt;img id="BLOGGER_PHOTO_ID_5343302170980209186" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 322px; CURSOR: hand; HEIGHT: 191px" alt="" src="http://2.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic5A7TZUiI/AAAAAAAAAEs/zY3YCQ0khR0/s320/P1010026.JPG" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;बरेच दिवस खोल समुद्रात जाऊन सूर्यास्त पहाण्याचं मनात होतं आणि मग तसं ठरवून मर्टल बीच पासून एका तासावर असलेल्या जॊर्ज टाऊन हया छोटेखानी शहरात आम्ही एक प्रायव्हेट यॆच (शिडाची होडी) बुक केली. संध्याकाळी साडेसात चा सूर्यास्त होता. साधारण साडेपाच च्या आसपास आम्ही तिथे पोह्चलो. जॊर्ज टाऊन हे इथल्या टीपीकल जुन्या, छोट्या शहरांसारखं एक मेन स्ट्रीट आणि कोर्ट स्ट्रीट सारखे एक दोन मोजके रस्ते आणि छॊटी दुकानं/ जुन्या वळणाची घरं असलेलं गाव. पटकन कुठल्यातरी गल्लीतून टांग्यात बसून साहेब येईल असं वाटावं इतकं सुबक आणि नेटकं. तिथे थोडं भटकून आम्ही लगेच बोटींचा ताफा असलेल्या किनायावर आलो. आमचा नाविक डेव्ह वाट बघत होताच. साधारण साडेसहाच्या सुमारास आम्ही तिथून एका छोट्याश्या कनू मधून किनायापासून लांब उभ्या असलेल्या शिडाच्या बोटीकडे (यॆच) निघालो. कनूवरुन त्या बोटीवर पोहोचलो आणि निवांत पसरलेलं ते अटलांटीक समुद्राचं पाणी पहाताक्षणी वेगळ्या विश्वात घेऊन गेलं. डेव्ह हा रीटायर्ड मरीन ऒफीसर. ही बोट हेच त्याचं घर. त्याच्या बायकोने आम्हाला त्या बोटीची आतून सफर करवून आणली. खाली उतरून आत जायला जिना होता, बोटीतल्या त्या तळघरात अद्ययावत सोयी होत्या. दोन बेड, किचन अगदी व्यवस्थित आणि इंटरनेटही. ही बोट हेच ह्यांच आयुष्य आणि उपजीविकेचं साधन देखील. सोबतीला एक गलेलठ्ठ बोकाही. पुन्हा वरती डेक वर येऊन आम्ही जागा घेतली आणि वायाचा अंदाज घेत डेव्ह ने शिड सोडलं. पूर्वी कीवेस्ट ला स्नॊर्कल्रिंग करताना एकदा आम्ही शिडाच्या बोटीत बसलो होतो पण आज फक्त आम्हीच बोटीवर असल्याने वेगळीच मजा होती. समुद्राचं वारं पित आणि बोटीवर आदळणाया लाटांचा मंजूळ आवाज ऐकत आमची बोट जसजशी पुढे जाऊ लागली तसतसा किनारा हळू हळू दिसेनासा झाला. बदलणारी हवा आणि त्याचा वेग ह्याचं व्यवस्थित द्न्यान असल्याने डेव्हने बोटीचा वेग आणि दिशा अचूक पकडली होती. अशा छोट्या शिडाच्या बोटींचा फायदा असा की वायावर बोट हाकली जाते त्यामुळे इंधनाची बचत, शिवाय डीझेल वापरले जात नसल्याने त्या दुर्गंधीने मळमळीचा त्रासही नाही. जसजसं सूर्यास्त जवळ येत होता तशा आमच्या गप्पा अबोल झाल्या. दिड्मुख होऊन ते क्षण आम्ही अनुभवत होतो. &lt;br /&gt;&lt;a href="http://1.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic509xEb4I/AAAAAAAAAE0/o05hln0U8P8/s1600-h/P1010030.JPG"&gt;&lt;img style="float:right; margin:0 0 10px 10px;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 240px;" src="http://1.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic509xEb4I/AAAAAAAAAE0/o05hln0U8P8/s320/P1010030.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5343303064994738050" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;लांब दिसणाया डोंगरा आड बघता बघता तो लाल गोळा खाली जात होता. असंख्य रंगाची उधाळण एव्हाना सुरु झाली होती. ते सूर्याला लपवणारे लांबचे डोंगर सोडले तर पाणीच पाणी चहूकडे असल्याने ही रंगांची उधळण कुठल्याही अडथळ्याविना अनुभवता येत होती. ’सूरमयी शाम’, ’वो शाम कुछ अजीब थी’, ’ये शाम मस्तानी’, ’संधिकाली या अशा’ अशी काय न काय गाणी आम्हाला आठवायला लागली. किती उपकार करुन ठेवलेत नाही ह्या गीतकारांनी, संगीतकारांनी आणि गायकांनी. त्या संध्याकाळचे अगदी कातरवेळेत रुपांतर होऊन संध्याछाया भिवविती हृदया अशी मनाची स्थिती होईपर्यंत आम्ही त्तो सोहळा अनुभवला, उपभोगला आणि साठवला. मावळत्या दिनकरास दोन्ही करांनी वंदन केलं तेव्हा समुद्राच्या लाटांवर अवखळपणे पसरलेल्या त्या पौर्णिमेच्या चंद्राच्या चांदण्याने आम्हाला कधी वेढलं कळलही नाही. आम्ही सगळेच अगदी निश:ब्द झालो होतो. मग डेव्हने परतीच्या प्रवासासाठी शिडाची दिशा बदलली आणि किनायाच्या ओढीने आमची बोट सरकू लागली. इथे येताना खारा वारा कितीही प्यायला तरी तृप्त वाटत नव्हत, पण जाताना तेच आता शांत, संयत आणि गंभीर वाटत होतं. त्या पिठूळ चांदण्याच्या प्रकाशातच पाण्यातच आम्ही बोटीवरून केनूवर उतरलो आणि समुद्रकिनायाकडे परतलो. तिथून पुन्हा गाडीने तासभर प्रवास करून मर्टल बीचवर. हॊटेलवर येताना लक्षात होतंच अनायसे पौर्णिमा आहे. &lt;br /&gt;&lt;a href="http://2.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic6EbhbtsI/AAAAAAAAAE8/0W9jyTEvhMY/s1600-h/P1010045.JPG"&gt;&lt;img style="float:left; margin:0 10px 10px 0;cursor:pointer; cursor:hand;width: 320px; height: 240px;" src="http://2.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic6EbhbtsI/AAAAAAAAAE8/0W9jyTEvhMY/s320/P1010045.JPG" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5343303330680256194" /&gt;&lt;/a&gt; अतिशय शांत समुद्र आणि चमचमणारी वाळू, पिठूळ चांदण्यात आपलं सौंदर्य उघडून बसलेला तो समुद्रकिनारा अगदी हॊटेलमधून सुद्धा प्रसन्न दिसत होता. ह्यावेळचा वाढदिवस अशा भारलेल्या वातावरणात साजरा करता आल्याने हे असं कायम लक्षात राहील.&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;इथून परततोय तोच लग्गेचच्याच शुक्रवारी आमची पश्चिम किनायाची सफर ठरली होती. त्याच्या आखणीविषयी लिहिण्याचं बयाचं मित्रमंडळींनी सांगितलय, वेळ झाला की इथेच हातावेगळं करेन. तोपर्यंत च्याव!&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-5707191549539023377?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/5707191549539023377/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=5707191549539023377' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/5707191549539023377'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/5707191549539023377'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2009/06/blog-post.html' title='यह शाम मस्तानी..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://2.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic5A7TZUiI/AAAAAAAAAEs/zY3YCQ0khR0/s72-c/P1010026.JPG' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-1941052501944930932</id><published>2009-03-30T20:41:00.012-05:00</published><updated>2009-03-30T21:27:35.352-05:00</updated><title type='text'>Netflix rocks!!</title><content type='html'>बर्‍याच दिवसांनी लिहितोय. थंडी बरोबर तिने आणलेला थोडासा आळसही निघून गेलाय. झाडांचं रुप पालटताना बघण हा विलक्षण सुंदर अनुभव जाणवतोय इथे. थंडी ओसरतेय तसा बर्‍याच झाडांवर पांढर्‍या फुलांचा मोहोर येतोय आणि आठवड्याभरात तो गळून पडून नवीन हिरवी कंच पालवी फुटतेय. त्यात पाऊस पडला की सगळी झाडं न्हालेल्या गृहिणी सारखी तेजःपुंज आणि प्रसन्न दिसतात. एकंदर निसर्गाने अगदी उधळून बरसात केलेय इथे. आता वेळ मिळेल तशी आणि तितकी भटकंती सुरु..&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;कोलंबिया डायरी:&lt;/strong&gt;&lt;br /&gt;नवीन ठिकाणं, नवीन काम, नवीन माणसं ह्यात आता आम्ही छान रुळलोय. थंडी बरीचशी ओसरून आता&lt;br /&gt;हवा छान झालेय. चेरी ब्लॉसम बघण्याचे तसेच भटकंतीला बाहेर पडण्याचे कार्यक्रम ठरू लागलेत.&lt;br /&gt;कामाचा जोर (सुदैवाने) खूप आहे इथे आल्यापासून, वाचन बरच मंदावलय. दरम्यान नेटफ्लीक्सची व्हिडीओ लायब्ररी लावलेय (Yes! Netflix rocks!), त्यामुळे खूप चांगले चित्रपट पाहून होत आहेत सद्ध्या. काही जुने पिक्चर्स त्याच्या साईटच्या माध्यमातून चकटफु पाहाण्याचीही सोय केली आहे त्यांनी, हा त्यांचा अतिशय स्पृहणीय उपक्रम. थँक्स गिव्हींगच्या वेळी सोनी ब्रॅव्हियो घेतला (३२ इंच फ्लॅट स्क्रीन) त्यामुळे असे चित्रपट पहायला खूप मजा येतेय. तर गेल्या दोन महिन्यात पाहिलेल्या इंग्रजी चित्रपटांची ही यादी :-&lt;br /&gt;Beatiful Mind&lt;br /&gt;Big Daddy&lt;br /&gt;Life is beautiful&lt;br /&gt;Father of the bride - 1&lt;br /&gt;Father of the bride - 2&lt;br /&gt;Forest Gump&lt;br /&gt;Finding Nemo&lt;br /&gt;Ice Age&lt;br /&gt;Miss Congeniality - 1&lt;br /&gt;Miss Congeniality - 2&lt;br /&gt;Cast Away&lt;br /&gt;Honey I shrunk the kids&lt;br /&gt;Not without my daughter&lt;br /&gt;Phone booth&lt;br /&gt;Eagle eye&lt;br /&gt;The mask&lt;br /&gt;&lt;br /&gt;डिस्ने चे चित्रपट आम्हाला दोघांनाही खूप आवडतात. ते पहाणे आहेच शिवाय फ्रेंड्स च्या सगळ्या सिझन्सची पारायणे झाली आहेत, एव्हरी बडी लव्हस रेमण्ड्स सुद्धा बघतोय आम्ही. त्यातले निख्खळ विनोद, परिस्थितीजन्य विनोद नकळत दाद घेऊन जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शिवाय बावर्ची, रंगबीरंगी, रब ने बना दी जोडी असे काही हिंदी चित्रपटही पाहिले गेल्या महिन्याभरात. स्लम डॉग मिलिनेअर तर चक्क इथे थिएटरला लागला होता जवळच तर तिथे जाऊन पाहिला. माझ्या लाडक्या मुंबईला पहाताना अगदी भरून आलं (तसच काहीसं 'तारे जमीन पर' मधल्या गाण्यातली दक्षिण मुंबई डॅलसला थिएटर मध्ये बघताना झालं होतं). हो पण स्लम डॉग मिलिनेअर अंगावर आला पण पहाताना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पाहिलेल्या ह्या प्रत्येक चित्रपटाबद्दल लिहिण्यासारखं खूप काही आहे, पण वेळेअभावी ते शक्य नाही तरीही&lt;br /&gt;प्रत्येक पिक्चर आम्ही अगदी छान उपभोगलाय. कधीतरी वेळ झाला, मूड लागला तर अवश्य लिहीन कुठल्या ना कुठल्या चित्रपटाविषयी, त्यातलं काय अपील झालं, रुचलं, आवडलं नाही त्याविषयी. शिवाय पिक्चर पाहून झाला की त्याचा एक हँग ओव्हर चढतो. कधी डोक्यात जातो तर कधी तरंगायला लावतो. मग आमची घरात त्याविषयी चर्चा चालते. पिक्चर पहाण्याबरोबरच अशी नंतरची चर्चा विशेष आनंददायी असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार सोहळा संपूर्ण पाहिला. भारतीय चित्रपटाला मिळालेले पुरस्कार पाहून ऊर अभिमानाने भरून आला. ए आर रहमान ला ऐकत आमची पिढी मोठी झालेय, त्याच्या रंगीला, बॉम्बे, दिल से वर थिरकत आम्ही शाळा कॉलेजात इतकच काय गणपतीतही नाचलोय. तो खरा जिनियस आहे, त्याला ऑस्करने मिळालेली दाद हा त्या पुरस्काराचा सन्मान आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गुढीपाडव्याला ह्यावर्षीही गुढी उभारली, श्रिखंड पुरीचा बेत होता, त्यामुळे एकंदर मज्जाच..!&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुम्हा आम्हा सगळ्यांना हे नवीन वर्ष सुखा समाधानाचे, सुरक्षिततेचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-1941052501944930932?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/1941052501944930932/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=1941052501944930932' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/1941052501944930932'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/1941052501944930932'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2009/03/netflix-rocks.html' title='Netflix rocks!!'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-6928753011176732533</id><published>2008-12-26T12:35:00.006-05:00</published><updated>2008-12-26T12:44:50.403-05:00</updated><title type='text'>सरणार कधी रण... प्रभोsssssssss</title><content type='html'>बयाच गोष्टी खूप वेळ मनात असूनही लिहायला वेळ मिळत नव्हता आणि शांतपणाही. मुंबईत अतिरेक्यांनी घडवलेलं हत्याकांड, मिडीयाचा नंगा नाच आणि राजकारण्यांचे बळी, अगदी काही दिवसात खूप उलथापालथ झाली. खूप काही वाचायला, ऐकायला मिळालं ह्या दरम्यान. आता नक्की काय झालं, का झालं ह्याचा अंदाज आल्याने लिहायच ठरवलं आज..&lt;br /&gt;&lt;br /&gt;  वयाची २२ वर्ष दक्षिण मुंबईत गेल्याने गेट वे, ताज, सी.एस.टी. सगळ्याच ठिकाणांशी माझं अतूट नातं आहे. आजही चर्चगेट, व्ही.टी., महानगरपालिका, फ़ाउंटन च्या इमारती, राजाबाई टॊवर पाहिला की माझं उर भरून येत. त्या दगडी इमारतींचा गारवा आणि भक्कमपणा अगदी नवख्या माणसास सुद्ध रोमांचित करेल. सरकारी तसेच खाजगी कंपन्यांचे कर्मचारी, रस्त्यावरचे विक्रेते, मार्केट मधे काम करणारे कामगार, मुंबई बघायला तसच तिची झिंग अनुभवायला आलेले जगप्रवासी सगळ्यांची इथे रेलचेल. अगदी सळसळत्या तारूण्यापासून वाकलेल्या काठीपर्यंत प्रत्येकाची ही मुंबई. दहा पोरसवदा माणसं बोटीने येतात काय आणि मुंबईला ओरबडतात काय, सगळं अविश्वसनीय होतं. तिथे त्यारात्री फायरींग सुरु झालं आणि दुसया मिनिटाला याहू वर बातमी आली. ही बातमी इथे सी एन एन, फॊक्स न्यूज वर पुढचे दोन दिवस ब्रेकींग न्यूज म्हणून कव्हर करत होते. बयाच अमेरीकन लोकांशी ह्यावेळी बोलताना जाणवलं की एकूणच इथल्या जनमानसात भारताविषयी आणि भारतीयांविषयी आपुलकी निर्माण होतेय. दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर तुमचा आणि आमचा शत्रू एकच असं काहीसं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;  साळसकरांसारखा पोलिस अधिकारी ज्याने मुंबईतलं गॆंगवॊर मोडून काढलं, कामठे, करकरेंसारखे अधिकारी मिसरूड सुद्ध न फुटलेल्या टिनपाट पोरांच्या अंदाधुंद गोळ्यांना बळी पडले हे पचवण अजूनही जड जातय. दहशतवादी हल्ला, त्यातून घडलेले राजकीय नाट्य तसेच पुढे काय ह्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडलेत, त्यांची उत्तरे मिळतील किंवा नाही पण प्रश्न विचारून तरी चिडचिड, विषण्णता, असहाय्यता बाहेर पडेल म्हणून हे लिहायच झालं --&lt;br /&gt;&lt;br /&gt;१. अतिरेक्यांचा हल्ला होताक्षणी ’दक्षिण मुजाहीदीन’ कडून एका चॆनेलला मेल गेलं असं म्हटलं गेलं. प्रत्यक्षात असा ग्रूप आहे का? नसल्यास त्याचं नाव कोणी पुढे आणलं? पाकिस्तानने आपला हात झाकण्यासाठी हे खोटं पिल्लू सोडलं नसेल ना? हा धागा पोलिस खणून काढतील?&lt;br /&gt;&lt;br /&gt;२. गुप्तचर यंत्रणा नावाचा काही प्रकार असतो हे सांगाव लागेल असा अश्लाघ्य प्रकार घडलाय. आपल्या देशाच्या सागरी सीमा सुरक्षित नसल्याने शत्रूची हिम्मत झाली आतपर्यंत पोहोचायची. गुप्तचर यंत्रणा आणि गस्तपथकाने त्यांच्या कामात कसूर केल्याने कर्तबगार अधिकायांना प्राण गमवावे लागलेत ह्याची किंमत कधीच भरून येणार नाही. हे असे पुन्हा घडू नये म्हणून सरकारने काय खबरदारी घेतली आहे? दुसरं म्हणजे गुप्तचर यंत्रणांचा हल्ली राजकीय वापर होतोय असं जाणवू लागलय. राजकारणी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी, दुसयास कोंडीत पकडण्याची संधी साधण्यासाठी किंवा आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यास कोण कुठे भेटला ह्याची इत्यंभूत माहिती ठेवण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा वापरत असल्याचे दिसते. शिवाय पोलिस तपासातही राजकीय दबाव आणला जातोय. पोलिसांच्या सगळ्या नाड्या प्रशासनाच्या हाती असल्याने कर्तव्यपूर्ती म्हणजे पुढायांची हाजी हाजी असं समीकरण बनलय. जर एखादा पोलिस अधिकारी खरच प्रवाहाविरुद्ध पोहायचं धाडस दाखवू लागला तर त्याची बदली कर किंवा त्याच्या मागे विभागीय चौकशी लाव असं केल जातय. सारांश हा की पोलिस खात्यातला राजकीय हस्तक्षेप काढायला किंवा निदान कमी करायला हवा. पोलिसांना न्यायव्यवस्थेसारखी थोडी स्वायत्तता असायला हवी. हे सोप्प नाही हे मान्य पण त्यादृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहेत, असं काही करता येऊ शकेल?&lt;br /&gt;&lt;br /&gt;३. पोलिस अपुया शस्त्रांनी लढतोय. एके-४७ शी लढायला तो प्रशिक्षितही नाही आणि शस्त्रसिद्धही. तरीही केवळ धाडस आणि शौर्याच्या बळावर तो अतिरेक्यांशी भिडला. सी.एस.टी स्थानकात पिस्तुलानिशी शिंदेनी केलेला सामना आणि चौपाटीवर ओंबाळेंनी अतिरेक्याच्या गोळ्या अंगावर झेलत स्वीकारलेलं हौतात्म्य. एखादा जीवावर उदार झालेला जिहादी अतिरेकी जिवंत पकडण्याच धाडस जे जगात कोणी करू शकलेलं नाही ते मुंबई पोलिसांनी केलं ते ओंबाळेंसारख्या शूरवीरामुळेच शक्य झालं. एफ. बी. आय., मोसाद चे अधिकारी कसबच्या जबानीतून खूप सारी नवीन माहिती मिळवत आहेत. पोलिसांना पुरेश्या शस्त्रांनी, शिक्षणाने कधी सुसज्ज करणार? आम्हाला नुसती आश्वासन नको, कृती आणि अमंलबजावणीचं वेळापत्रक हवय. दुसरं म्हणजे दहशतवादाशी मुकाबला करणारी स्वतंत्र शाखा हवी. त्यांना वेगळ्याप्रकारंच प्रशिक्षण तसेच अधिकार हवेत. दुसया विभागतल्या पोलिसांच्या इथे तात्पुरत्या बदल्या करून काम साधणार नाही. ह्या विशेष पथकातील पोलिसांकडे खास क्षमता असायला हवी. हे सगळ करायचं असेल तर राजकीय इच्छाशक्तीची आज गरज आहे. सरकार ह्याकडे प्राधान्याने लक्ष देईल का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;४. अतिरेक्यांनी गुगल अर्थ वापरून नकाशे अभ्यासले, व्ही. ओ. आय. पी. तंत्रद्न्यान वापरून फोन कॊल्स केले. आपले पोलिस दल, गुप्तहेर खाते ह्या आधुनिक तंत्रद्न्याने सुसज्ज करायलाच हवे. त्यासाठी संगणकीय तसेच आधुनिक तंत्रद्न्यान अवगत असलेले किंवा ते आत्मसात करु शकतील असे तुलनेने तरूण पोलिस तयार करावे लागतील, ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने शासनाची योजना काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;५. सामान्य नागरीकांनी दक्ष राहावं तसंच अशा काळात कसं वागावं ह्यासाठी त्यांच्यासाठी काही ड्रील्स (इथे अमेरिकेत जसे फायर ड्रील्स/ टॊर्नेडॊ ड्रील्स असतात त्यासारखे), छोटे अभ्यासक्रम ठेवता येतील का? अफवा पसरवू नयेत, तसच त्या पसरवणायांवर कडक कारवाई केली जावी म्हणून काही निश्चित उपाय योजना आवश्यक आहे. १९९३ च्या दंगली नंतर जशी मोहल्ला कमिटी बनवण्यात आली त्याचा पुढे बराच फायदा झालाय तसच काहिसं करता येणं शक्य आहे का? राज्यस्तरावर प्रशिक्षित कमांडॊजच पथक तयार ठेवण्याचा विचार स्तुत्य आहेच पण त्याही पुढे जाऊन सामान्य लोकांना प्रशिक्षित करणं आवश्यक ठरेल. रेड क्रॊस सारखेच काही प्रथमोपचार करणारे प्रशिक्षित नागरीक आपण तयार ठेवायला हवेत. आपत्कालीन परिस्थितीत धाव घेऊन ते देवदूतासारखे काम करू शकतील. शासनाच्या, स्वयंसेवी संस्थांच्या ह्यासंदर्भात काय योजना आहेत?&lt;br /&gt;&lt;br /&gt;६. अशा प्रकारच्या ह्ल्ल्यानंतर करण्याच्या उपाययोजना पुढे येत आहेत पण असं होऊच नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करण्यावर भर देणं अधिक महत्त्वाच आहे. आपल्या आजूबाजूस कॊण रहातय,काही संशयास्पद चालू आहे का हे सामान्य नागरीकास पोलिसांना पटकन कळवता यायला हवं. त्याला पोलिसाचा धाक किंवा कटकट न वाटता तो मित्र वाटायला हवा. नागरीक आणि पोलिसात सौहार्दाच नात निर्माण करायला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शासन काय करतय त्यादृष्टीने?&lt;br /&gt;&lt;br /&gt;७. हल्ल्याचा एकंदर वृत्तांत पहात असताना एक लक्षात आलं की पोलिसांच्या कंट्रोल रुमला हल्ल्याचा अंदाज यायला वेळ लागला. त्यामुळेच नेमके किती अतिरेकी आहेत आणि त्यांच्याकडे शस्त्रे काय आहेत ह्याचा सखोल विचार न करता तीन मोठे अधिकारी एकाच गाडीतून कामा होस्पीटल जवळ गेले. क्लोज सर्किट टिव्हीवरून टेहळंणी करणारी खूप सारी पथके अविरत तयार असायला हवीत. हे सोप्प नाही ह्याची जाणीव आहे पण आवश्यक मात्र आहेच. जिथे शक्य होईल तिथे हीडन कॆमेरे लावले गेलेच पाहीजेत. सरकारी यंत्रणा यद्ययावत करण्यासाठी शासन काय पावले उचलत आहे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;८. मला आठवतय की पाच सहा महिन्यांपूर्वी सामना आणि सकाळमध्ये मुख्य बातमी होती की मुंबईला सागरी मार्गाने धोका संभवतॊ असा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. असे बरेच इशारे गुप्तचर यंत्रणा देत असेलही पण (राज्य आणि केंद्र) शासनाने दुर्लक्ष का केले ह्याचं उत्तर कोण देणार? ज्यांनी आपल्या कामात बेजबाबदारपणा दाखवला त्यांना उघडं कधी पाडणार?&lt;br /&gt;&lt;br /&gt;९. करकरे युद्धाला निघाले, त्यांनी चिलखत घातलय, हॆल्मेट घालत आहेत असं सगळं मिडीयावाले कव्हर करत होते. त्यातून नेमकं काय साधलं त्यांनी? समस्त मिडीया एक शुद्ध आचारसंहिता बनवू शकत नाही का? किंवा प्रसारभारती सारखी शासकीय संस्था बातम्या सेंसॊर करू शकत नाही का? तशी वेळ आता आलेय असं वाटतं. ब्रेकींग न्यूज मिळवण्यासाठी आणि टी आर पी वाढवण्यासाठी ह्या वाहीन्या कुठल्याही थराला जातील. ह्याच वाहिन्या सामान्य माणसाच्या बुद्धीभेदास आणि अफवा प्रसूत करण्यात आघाडीवर असल्याचं वाटतं. त्यांच्यावर चाप बसायलाच हवा ना? दुसरी धक्कादायक बाब म्हणजे वृत्तपत्रातील बातम्या. ’करकरेंची हत्या दहशतवाद्यांनी केली नाहीच?’ किंवा ’पाकिस्तानी सैन्याची सीमेवर जमवाजमव?’ अशा प्रक्षोभक बातम्या पुढे प्रश्नचिन्ह टाकून पेपरात दिल्या जातात. ह्या प्रकाराची मनस्वी चीड येते. उगाच काहीतरी पिल्लू सोडायचं आणि मग ’पेपरात आलय’ म्हणजे खरच असणार असं धरून चालणारा जो वर्ग आहे समाजात त्याची दिशाभूल करायची. बरीचशी वर्तमानपत्रे अशा बेजबाबदारीने वागताना दिसतात आणि मन अधिक विषण्ण होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;१०. दहशतवादी हा अतिरेकीच आहे, कुठल्याही धर्माचा का असेना. अशावेळी तो मुस्लिम असेल तर मुस्लिम संस्थानी पुढे येऊन त्याचा धिक्कार करायला हवा. हा जिहाद, ही नाहक निरपराध माणसं मारणं ही इस्लामची शिकवण नाही हे सगळ्या मुस्लिम धर्मगुरुंनी ठणकावून सांगायला हवय. तरच हे अतिरेकी एकटे पडतील. मेलेल्या अतिरेक्यांना इस्लाम धर्माप्रमाणे संस्कारीत न करता त्यांची बेवारस म्हणून विल्हेवाट लावण्यात आली तर इतरांना चांगलीच चपराक बसेल. त्यातूनच सामान्य हिंदू मुस्लिम जास्त जवळ येऊन दहशतवादी विरुद्ध भारतीय हे नवीन समीकरण तयार होईल. मुस्लिम धर्मगुरू ह्या दहशतवाद्यांना काफीर ठरवून मुस्लिम धर्मातून पदच्युत करतील काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;११. संसदेवरील हल्ल्याला इतकी वर्षे झाली, तिथेही आपल्या प्राणांची बाजी लावून आर.एस.पी च्या जवानांनी आपल्या संसदेची लाज राखली. न्यायालयाने अफजल गुरुला दोषी ठरवून फाशी सुनावूनदेखील केवळ राजकारणाने त्याला अजून जिवंत ठेवलाय. उद्या असच कोणीतरी कंदाहारप्रमाणे विमान हायजॆक करून त्याला सोडवून नेतील आणि आपण बघत बसू. ह्याची विलक्षण चीड येतेय. पिचक्या कणाच्या ह्या राजकारणी लोकांनी देशाची सुरक्षा सुद्धा विकलेय का असं वाटायला लागतं. ह्याबातीत कितीही नाही म्हटलं तरी शिवसेनाप्रमुखांना आपण मानायलाच हवं. जिवंत पकडलेल्या कसबला त्याच सी. एस. टी. समोर किंवा ताज समोर हजार वेळा फाशी द्या अशी जरब बसवा की पुन्हा कोणी वाकडी नजर करून मुंबईकडे बघू शकणार नाही. पण मतांसाठी लाचार असलेल्या सरकारला हे जमेल काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;१२. पाकिस्तानने फार फार कोलांट्या उड्या मारल्या आहेत ह्या संदर्भात. पुरावे नाहीत म्हणून गळे काढण्यापलिकडे ते काहीच करत नाहित. मागे पाकिस्तानची क्रीकेट टीम भारतात आली होती तेव्हा वानखेडेची खेळपट्टी उखडली होती शिवसैनिकांनी. तेव्हा शिवसेनेचं असं आंदोलन माझ्यासह सगळ्यांनाच खटकलं असलं तरी आता पाकिस्तानचा दौरा भारत सरकारने रद्द करायला लावला त्यात आपल्याला तथ्य वाटतय. शिवसेना प्रमुखांचं मोठेपण कशात असेल तर अशा द्रष्टेपणात आहे हे जाणवतं. माझही मत आधी; राजकारण, संगीत, क्रीडा ह्यात देश, धर्म आणू नये असं होतं पण आता डोक्यावरून पाणी जातय. सरकारने कडक धोरण अवलंबलच पाहिजे. राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक सगल्याच पातळींवर आपण असहकार पुकारायला हवा. आपण वेळ पडलीच तर किंवा वेळ पाडूनच अतिरेक्यांचे अड्डॆ पाकिस्तानात घुसून उखडलेच पाहिजेत. भारत पाक सीमांवर तणाव निर्माण करून अफगाण तालिबान च्या सीमांवरच पाकिस्तानी सैन्य भारताच्या सीमांकडे वळवण्याचा तालिबान्यांचा प्रयत्न असेलही पण आपण केवळ राजकीय मुत्सद्दीचे, टीप्पण्यांचे कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कृतीवर भर द्यायला हवा. पाकिस्तान हे राष्ट्र दहशतवाद्यांना पोसून जागतिक भय निर्माण करत आहे हे आपण सगळ्या जगाला पटवून द्यायला हवय. तिकडे कराची चा शेअर बाजार पार ढासळलाय. पाकिस्तानातली अर्थव्यवस्था कोलमलडतेय. सामान्य लोकांची अन्नान्न दशा होण्याचा दिवस दूर नाही. सद्ध्या अमेरिका जो पैसा त्यांना पुरवतेय त्याचा त्यांना खूप आधार आहे. अजून डबघाईला गेल्यास कुरापती काढून युद्ध करण्याशिवाय पाकिस्तानकडे पर्याय दिसत नाही. युद्ध न करता त्यांची कोंडी करता आली तर आपल्याला तेही हवच आहे. संसदेवरचा हल्ला, बॆंगलोर तसेच इतर शहरांमध्ये झालेले हल्ले ह्यातून सरकारने काहीच बोध घेतलेला जाणवला नाही, आता तरी सरकार काही करेल अशी अपेक्षा करावी काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;  अशा अनेक प्रश्नांनी मी, माझ्यासारखे तरूण जर्जर आहोत. माहितीचा अधिकार असला तरी तो वापरण्याचे द्न्यान, उत्साह आणि पुढाकार घेण्याची कोणाची इच्छा नाही. पूर्वी सारखी तत्वद्न्यांनींची भाषण ऐकायला कदाचित मिळणार नाहीत पण ह्याविषयांवर लिहीणारे राजकीय मुत्सुद्यांचे, विश्लेषकांचे ब्लॊग्स मिळतील का ह्याचा शोध सुरु आहे. नुकतेच यु ट्युब वर अविनाश धर्माधिकारी यांनी केलेल्या भाषणांच्या, आवाहनाच्या चित्रफिती पहाण्यात आल्या. मनापासून आवडल्या, कोणतरी चांगलं करतोय, तळमळीने करतोय हे पाहून बरं वाटलं. रेडीफ वरचे अनेक विचारवंतांचे लेखही आवडले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;  बातम्या पहाताना मला जाणवत होतं की ताज जिंकलं, ट्रायडेन मिळवलं अशा बातम्या येत होत्या. सखेद आश्चर्य वाटलं ते ह्या गोष्टीचं की आपल्या इथे घुसून अतिरेक्यांनी आपलीच वित्तहानी, जिवितहानी केली. त्यांच्याकडून आपण आपलाच भूभाग शूरवीर पोलिसांच्या बदल्यात मिळवला म्हणून जल्लोष करायचा? आपण त्यांना इतक्या सहज घुसू दिलं ह्याची आधी लाज वाटायला हवी. एखाद्या फितूरामुळे मुघलांना मिळालेला किल्ला परत मिळवताना तानाजी गेला तेव्हा राजे कसे हळहळले असतील ह्याची कल्पना येऊ शकते. अंगावर गोळ्या झेलत दोन्ही हातांनी दांडपट्टा चालवत शत्रूला एक इंचही पुढे येऊ न देणारे बाजी.. ’सरणार कधी रण..’ म्हणत तोफांचे आवाज येईपर्यंत यमाला सुद्धा थांबवणारे बाजी... आणि अतिरेक्याची बंदूक हातात पकडून ठेवून देहाची चाळण झाली तरी न कोलमडणारे ओंबाळे ह्यांच्या शौर्यात काहीच फरक नाही. असे आदर्श इतिहासाच्या पुस्तकातून तरुण पिढी पुढे यायला हवेत. ह्या पोलिसांच्या शौर्यावर प्रतिभावंतांनी पोवाडे लिहायला हवेत आणि प्रभातफेर्यांमध्ये किंवा जाहीर कार्यक्रमांमध्ये ते गौरवाने गायले जायला हवेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;  आपल्या प्राणांची आहुती देऊन मुंबईचे रक्षण करणाया पोलिसांना/ सैनिकांना तसेच हॊटेलमधील, कामा रुग्णालयातील कर्मचारी ज्यांनी इतरांची सुटका केली त्या सगळ्यांना मानाचा मुजरा. पोलिसांनी अतिरेक्यांना तिथेच रोखलं म्हणून पुढचा अनर्थ टळला ह्याची सगळ्यांना जाणीव आहेच. "भारतीय नागरीकाचा घास रोज अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी...." हे आज एकदिलानं मुंबई पोलिसांना, कमांडोज ना आपण सांगूया.&lt;br /&gt;&lt;br /&gt;  स्वतःच्या प्रांणांची पर्वा न करता सदरक्षणाय खलनिर्दालनाय सरसावणाया सगळ्या द्न्यात, अद्न्यात वीरांसाठी बोरकरांच्या शब्दात ही आदरांजली --&lt;br /&gt;&lt;br /&gt;दिव्यत्वाची जेथ प्रचिती&lt;br /&gt;तेथे कर माझे जुळती........&lt;br /&gt;&lt;br /&gt;यद्न्यी ज्यांनी देऊन निजशिर&lt;br /&gt;घडले मानवतेचे मंदिर&lt;br /&gt;परी जयांच्या दहनभूमीवर&lt;br /&gt;नाही चिरा नाही पणती..&lt;br /&gt;तेथे कर माझे जुळती.. !!&lt;br /&gt;&lt;br /&gt;मध्यरात्री नभ घुमटाखाली&lt;br /&gt;शांतिशिरी सम चवया ढाळी&lt;br /&gt;त्यक्त, बहिष्कृत मी ज्या काळी&lt;br /&gt;एकांती डोळे भरती..&lt;br /&gt;तेथे कर माझे जुळती.. !!&lt;br /&gt;&lt;br /&gt;-------------------------------------------------------------------------------------&lt;br /&gt;&lt;strong&gt;कोलंबिया डायरी:&lt;/strong&gt;&lt;br /&gt;  कोलंबियामध्ये येऊन महिना उलटला, दोघेही स्थिरावलोय आता बयापैकी. थंडीच प्रमाण त्यामानाने कमीच दिसतय इथे, तसच अजूनही इथे हिरवी कंच झाडी आहेत, पूर्ण पानझड अजून तरी दिसत नाहीये. सकाळी बरच कुंद वातावरण असतं, अशावेळी दोन्ही बाजूंनी फांद्या झुकलेल्या दाट झाडीतून नाजूक थंडीने झाकोळलेल्या सूर्याचे कवडसे झेलत आणि कॆसेटप्लेअरवर कुमार सानू किंवा किशोरदाची गाणी किंवा मग परवीन सुलतानाची ठुमरी ऐकत जाण्यात एक वेगळीच मजा अनुभवायला मिळतेय. ऒफीस तसं १० मिनिटांच्या ड्राईव्हवरच आहे आणि वाहतूकही तुरळक त्यामुळे गाडी चालवताना वेळ कसा जातो कळतच नाही. रानडे रोड, मुंबई २८ आणि लक्ष्मी रोड, पुणे ३० इथे मिळत नाही (पु. लं. नी म्हटलय) तसच टू नॊच रोड, कोलंबिया, साउथ कॆरोलिना-२९२२३ इथे मिळत नाही असं काही नाही असं म्हणता येईल. वॊलमार्ट, टार्गेट, पोस्ट ऒफीस, सगळ्या प्रकारची हॊटेल्स, इंडियन ग्रोसरी स्टोअर सगळं सगळं इथे आहे, हाच इथला एक मुख्य रोड असल्यामुळेही असेल कदाचित, त्यामुळे एकाच फेरीत सगळी कामं होऊन जातात. एकंदर इथे जम बसायला लागलाय नवीन ओळखीही होत आहेत. शिवाय इथे अपार्टमेंट घेताना ते लेक फेसिंग (विंड्सर लेक) घेतलय त्यामुळे बाल्कनी मध्ये उभ राहून किंवा खुर्च्या टाकून तळं, त्यातली बदक, बगळे, होड्या, झाडं सगळं काही वेगळ्याच विश्वात घेऊन जातं, उन्हाळ्यात खूपच छान असेल इथे असं दिसतय.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-6928753011176732533?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/6928753011176732533/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=6928753011176732533' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/6928753011176732533'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/6928753011176732533'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2008/12/sssssssss.html' title='सरणार कधी रण... प्रभोsssssssss'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-8380027934743798185</id><published>2008-11-03T12:06:00.020-05:00</published><updated>2008-11-07T09:28:17.786-05:00</updated><title type='text'>एदिऒस डेलस..</title><content type='html'>तसं बघायला गेलं तर आम्ही कन्सल्टींग मधले सॊफ्टवेअर इंजिनिअर्स म्हणजे मुशाफ़ीरीत वाकबगारच. एके ठीकाणच काम संपलं किंवा अधिक चांगलं काम मिळालं की दुसरीकडे मुक्काम वळवणारे. त्यातूनच नविन माणसे, नविन ठिकाण, नविन अनुभव यांनी संपन्न होत जाणारं हे आयुष्य मला खूपच आवडतं. घराबाहेर पडलोच आहोत तर जग बघून घ्यावं हा हेतू कायम मनात असतोच त्यामुळे जिथे आपल्या बुद्धी आणि कष्टांच अधिक चीज होईल तेथे जाण्याकडे कल अधिकच असतो. ह्याचबरोबर आर्थिक जगतातील बद्लांचे आडाखे बांधत कामात सुरक्षितता, स्थैर्य, मोबदला ह्यात समन्वय साधायला जमणं हे देखील व्यक्तिगत आणि तितकच महत्त्वाचं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या अवाढव्य अमेरीकेत एकूण सहा टाईम झोन आहेत आणि सगळीकडे भाषा एकच असली तरी हवामान, वाहातूक ह्यांच्याशी जुळवून घेताना दरवेळी वेगवेगळे अनुभव येतात. तरीही स्टारबक्स, डंकीन डोनट्स, वॊलमार्ट, सॆम्स क्लब, पिज्जा हट, सब वे सगळं प्रत्येक ठिकाणी असल्याने अमेरीकेतल्या कुठल्याही कोपयात गेलो तरीही एक साचेबंद जीवनमान आढळते. भारताशी तुलना केली तर हे विशेषत्त्वाने जाणवते. मुंबईच्या माणसाला पुण्याला राहायला जायचे असेल तरीही खाण्यापिण्याच्या, राहाण्याच्या आणि किराणामालाच्या खरेदी पासून सगळ्या गोष्टी नव्याने समजून घ्याव्या लागतात हा माझा स्वानुभव आहे. भारतात एका राज्यातून दुसया राज्यात जाऊन स्थायिक व्हायचे तर भाषेपासून अनंत अडथळ्यांवर मात करावी लागते (कॊस्मोपॊलिटन मुंबई पुण्यात येणारे बाहेरील लोक त्यातल्या त्यात नशीबवान म्हणायचे!). त्यामानाने इथे सगळंच सोप्प आणि साचेबद्ध आहे, आमच्यासारख्या फिरण्याची हौस असणाया जोडप्यांना खूप्पच सोप्प पडतय त्यामुळे. मर्यादित सांसारीक जबाबदयांमुळे ते सहज शक्य होतय हे ही तितकच खरं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अमेरिकेतल्या माझ्या आयुष्याची सुरुवात लिंचबर्ग ह्या व्हर्जिनियातल्या लहानशा गावातून झाली. खूप सारे समवयीन तसेच शांतेश, अनिरुद्ध सारखे जीवाभावाचे मित्र, वॊल्डन पॊड सारखं सुंदर अपार्टमेंट कॊंप्लेक्स, शांत आणि प्रसन्न गाव. शिवाय डोंगरांच्या जवळ. काम खूप असलं तरी खूप फ़िरता आलं तिथे असताना. महाराष्ट्र मंडळाचे कार्यक्रम सगळे लांब होत असले तरी मी ३-३ तास ड्राईव्ह करून जात असे. अगदी मंतरलेले दिवस होते ते. पुढचा टप्पा कॆसस मधल्या ऒव्हरलॆंड पार्कातला. सुदैवाने मुकुंद-वैशाली, उदय-गौरी ह्यांसारखे मित्र शिवाय शांतेश-सोनालीही तिथे असल्याने खूप आनंदात गेले दिवस. आमच्या कंपनीतल्या मित्रांचा खूप छान ग्रूप झाला होता, एक छोटस कुटुंबच. ह्या भागात सगळं सपाट, डोंगर दर्या समुद्र असलं काही नसलं तरी शेतं खूप. बरेच मित्र एकत्र असल्याने आणि सगळ्यांना भटकायची आवड असल्याने चिक्कार फिरलॊ. इथलं महाराष्ट्र मंडळ बर्यापैकी कार्यरत असल्याने बर्याच कार्यक्रमाना उपस्थिती लावता आली. नंतर मग न्यू जर्सी मध्ये होतो बराच काळ. तिथे ट्रफिक खूप असलं तरी एडीसनच्या जवळ राहाण्याची मजाच निराळी. कॆंसस मधे आणि मग इथे कडाक्याची थंडी म्हणजे काय ते अनुभवता आलं. मराठी विश्वच मनोहर सभागृह अगदी जवळच असल्यानं सगळ्याच कार्यक्रमाना माझी उपस्थिती असायची. शिवाय त्यांनी सुरु केलेल्या मराठी वाचनालयाचा मी पहिला सभासद होतो, ती भूकही छान भागवता आली. सेअरव्हिल्ली मधल्या तळ्याभोवतीचा दोन अडीच मैलाचा फेरफटका ही माझी विशेष आवडाती गोष्ट त्या दिवसातली. तळ्याकाठी तासंतास बसून वाचत किंवा सूर्यास्ताच्या रंगाची उधळण बघत किंवा पक्षी, फुलपाखरं पहात बसण्याची गोडी निराळीच.. मधे जेव्हा कौमुदी आणि मी न्यूजर्सी/ न्यूयॊर्क फिरायला गेलो तेव्हा मुद्दाम ह्या तळ्यापाशी घेऊन गेलो होतो तिला, असो! तर आता हे गेले सोळा सतरा महिने डेलस मधे कसे गेले खरच कळ्लं नाही. आशीष, सारीका सारखे जवळचे मित्र आणि किरण, कालिंदी सारख्या रसिक जोडप्याचा सहवास मिळाला हे आमचं अहोभाग्यच. इथून लांब गेल्यावर त्याची खरी किंमत अजून जाणवेल हे निश्चित. किरण कडची मराठी पुस्तके तसेच इथले कोजागिरी, गणपती सारखे घरगुती कार्यक्रम, क्रिकेट ह्यामुळे इथले सगळेच वीकेन्ड्स कुठे ना कुठे लागलेले असायचे. डेलास महाराष्ट्र मंडळ तसेच डेलास मेहफील ह्यांचे विशेष आभार मानायला हवेत. मेहफील ग्रुपने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे आम्हाला खूप साया शास्त्रीय गायकांना जवळून ऐकता आलं, ते क्षण कधीच विसरता येणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सगळ्या ठिकाणांचा उल्लेख करताना अजून एक गोष्ट आठवते म्हणजे प्रत्येक ठिकाणची देवळे. ’जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविशी हाती धरोनिया’ ह्या उक्तीवर दृढ विश्वास असल्याने प्रत्येक ठिकाणची देवळे हा आमच्या रोजच्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनलाय. तेथे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, मेळावे ह्यातून अतिशय ह्रुदय तसेच निस्पृह संबंध जोडले गेलेत. अनेक सदविचारी, सदविवेकी, विद्वान तसेच अभ्यासू माणंस मला इथूनच भेटलीत. पार्सिपेनितील इस्कॊनचे देऊळ तसेच डॆलस मधील इस्कॊनचे कालाचंदजी देऊळ मला विशेषत्वाने आवडते. न्यू जर्सी मधील ब्रिजवॊटर टॆंपल सुरेख आहेच पण तिथले उपहारगृह विशेष चवदार आहे! :-) डेलास मधल्या एकता मंदीरातले कार्यक्रम पण विशेष उल्लेखनीय आहेत. मागे म्हटल्याप्रमाणे सरिता गायतोंडे यांनी घेतलेले आमचे योगाभ्यासाचे वर्ग ही इथली अजून एक उल्लेखनीय बाब. तसेच देवळात वरच्या मजल्यावर एक मेडीटेशन हॊल बांधलाय. तेथे मृगांक जोशी ह्या प्रसिद्ध चित्रक्रारांनी दोन वर्षे मुक्काम करून भारतातील संत महात्म्यांची आठ आठ फूटी चित्रे रेखाटली आहेत. अक्कलकोट स्वामी, संत रामदास, संत द्न्यानेश्वर तसेच मीराबाई, जलाराम बापा, कबीर अशा बयाच संतांचा मेळाच तिथे भरलाय. अवश्य भेट देण्याचे हे ठिकाण. विठठल रखमाईची मूर्ती तसेच दत्तात्रयप्रभूंची मूर्ती हा अजून एक सुखद धक्का देवळातला. अनल आपटेंचं उत्कृष्ट जेवण ही अजून एक तिथली आवडती गोष्ट.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुरुवातीला मला लोकं प्रश्न विचारायचे काय मग, ’अमेरिका बरी वाटतेय की भारत?’ जसजसा काळ बदलला मी इथे फिरलो, रुळलो तसा प्रश्न बदलला आता. ’अमेरिकेतल काय आवड्त मग वर्जिनिया, कॆसस, न्य़ू जर्सी की डेलस?’ असं आता विचारलं जातं. गूळही गोड, साखरही गोड, मधही गोड. मेनका, रंभा सगळ्याच अप्सरा. तुलना करून मन संकुचित करणं मला तरी अवघड जातं, अयोग्य वाटतं. जे आहे ते तसं तिथल्या निसर्गासह, माणसांसह मला आवडलं, त्यांनीच माझं आयुष्य इतकं समृद्ध केलय असं मी आज आत्मविश्वासाने म्हणू शकतोय!&lt;br /&gt;&lt;br /&gt;’चालणायाचे भाग्य चालते’ असं म्हणतात, पुढे जायलाच हवं.. नव्याच्या शोधात, जुन्या आठवणी सुगंधी कुपित ठेवून.. मग एखाद्या निवांत संध्याकाळी त्या सुगंधी आठवणींनी उजळून जायचं.. जुन्या डायरीच्या पानासारखं.. नविन माणसं, नवीन ठिकाणं, नवीन अनुभव आयुष्याच्या कुठल्यातरी पुढच्या अद्न्यात टप्प्यावर मग तेही जुनं ठरवित अजून पुढे, अधिक नवीन.. अधिकाधिक नवीन..&lt;br /&gt;&lt;br /&gt;असं मनमोकळं, नाविन्याला आसुसलेल आयुष्य जगण्यात विलक्षण नशा आहे, मजा आहे! जोपर्यंत साचेबद्ध आयुष्याची अपरिहार्यता समोर येत नाहीये.. निदान तोपर्यंत तरी, पुढे जायलाच हवं, आनंदाने, उत्साहाने आणि समाधानाने!&lt;br /&gt;&lt;br /&gt;एक राह रुक गयी तो और जुड गयी&lt;br /&gt;मै मुडा तो साथ साथ राह मुड गयी&lt;br /&gt;हवा के परों पे मेरा आशियाना...&lt;br /&gt;मुसाफीर हू यारो, न घर है ना ठिकाना&lt;br /&gt;मुझे चलते जाना है.. बस्स चलते जाना..&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-8380027934743798185?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/8380027934743798185/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=8380027934743798185' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/8380027934743798185'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/8380027934743798185'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2008/11/blog-post.html' title='एदिऒस डेलस..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-4915982406446017255</id><published>2008-10-20T16:25:00.005-05:00</published><updated>2008-11-07T09:29:02.942-05:00</updated><title type='text'>तुझे नाम नाही असा श्वास नाही..</title><content type='html'>श्री स्वामी समर्थ &lt;br /&gt;अक्कलकोटच्या स्वामींसाठी लिहिलेला हा गझलेच्या अंगाने जाणारा स्तुतिपाठ 'मायबोली गझल कार्यशाळा -२' मध्ये सामील करण्यात आला होता. 'नाही' असा रदीफ घेऊन कोणत्याही वृत्तात गझल लिहिण्याचा कार्यशाळेचा उपक्रम होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वृत्त - भुजंगप्रयात&lt;br /&gt;गण - ल गा गा  ल गा गा  ल गा गा  ल गा गा &lt;br /&gt;उदा. : गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुझे नाम नाही असा श्वास नाही&lt;br /&gt;तुम्हावीण स्वामी दुजा ध्यास नाही&lt;br /&gt;&lt;br /&gt;असे केशरी दूध नी गोड पोळी&lt;br /&gt;दिल्यावीण त्वा या मुखी घास नाही&lt;br /&gt;&lt;br /&gt;नको वेदशास्त्रे, नको कर्मकांडे&lt;br /&gt;नको ध्येय ज्याला तुझी कास नाही&lt;br /&gt;&lt;br /&gt;अणू आणि रेणू तुवा व्यापलेला&lt;br /&gt;न ब्रह्मांड जेथे तुझा वास नाही&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुझ्या पादुकांच्या वरी डोइ माझी&lt;br /&gt;कुठे पाप ज्याला तिथे नास नाही&lt;br /&gt;&lt;br /&gt;तुझा हात पाठी भिऊ मी कुणाला&lt;br /&gt;भवाच्या भयाचा मला त्रास नाही&lt;br /&gt;&lt;br /&gt;गुरु मार्ग दावी घडे मोक्षप्राप्ती&lt;br /&gt;प्रशांताप्रमाणे दुजा दास नाही&lt;br /&gt;&lt;br /&gt;- प्रशांत&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-4915982406446017255?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/4915982406446017255/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=4915982406446017255' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/4915982406446017255'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/4915982406446017255'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2008/10/blog-post_20.html' title='तुझे नाम नाही असा श्वास नाही..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-1404967791437309310</id><published>2008-10-15T13:40:00.007-05:00</published><updated>2008-11-06T10:45:29.900-05:00</updated><title type='text'>आर्थिक अस्थैर्याचे दिवस..</title><content type='html'>यावज्जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत्&lt;br /&gt;भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:?&lt;br /&gt;अर्थः जोपर्यंत जगताय सुखात जगा, कर्ज घ्या, तूप प्या.. एकदा हे शरीर गेलं (म्हणजे मृत्यू नंतर) ते पुन्हा कुठं येणार आहे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर एकंदर अमेरिकेचा हलणारा आर्थिक डोलारा पहाता हे त्यांच्या इन्वेस्ट्मेंट बँक्सचे तसेच ताकदीपेक्षा जास्त कर्ज घेणार्‍यांचे ब्रिदवाक्य असायला हरकत नाही. गेल्या काही दिवसात अमेरिकेत जो आर्थिक पेचप्रसंग उभा राहिलाय तो जवळून बघता आला, समजून घेता आला. त्यावर घडणार्‍या चर्चा, विवाद, बेल आउट प्रकरण, त्याला झालेला उशीर आणि त्यादरम्यान वाढलेले नुकसान, आकस्मिक तळ गाठणारा वॉलस्ट्रीटचा बाजार आणि मग मागोमाग कोसळणारे जगभरातले बाजार असं बरच काही घडत गेलं. अचानक आयुष्याचा वेग वाढल्यासारखं झालं. इथे अमेरिकेत सामान्य माणूस सुद्धा शेअर, म्युच्युअल फंड्स यामधे गुंतवणूक करतो. बर्‍याच निवृत्ती योजना (ज्यांना इथे ४०१के म्हणतात) त्या म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक करतात. त्यामुळे ज्यांच्या मुलांची शिक्षण आहेत किंवा जी निवृत्तीच्या जवळ आली आहेत त्यांचे ४०१के प्लान्स अक्षरश: वितळत आहेत त्यामुळे ते अतिशय चिंतातूर आहेत. तसच सामान्य माणूस आर्थिक मंदीच्या चाहूलीने हबकलाय. ह्या सगळ्याचे मूळ जो सबप्राइम घोटाळा झाला त्यात तसेच भरमसाठ नफा कमवण्याच्या हावरटपणातून झाल्याचं दिसून येतय. एकामागून एक बँका कोसळण्याच कारण हेच की लघुकालीन अमाप फायदा डोळ्यासमोर ठेवून अनेकांना वाजवी पेक्षा खूप जास्त तात्पुरती सवलत देऊन, पत न बघता घरांसाठी कर्जे दिली गेली आणि ती फेडता न आल्याने कर्जे घेणार्यांनी हात वर केले, हळूहळू वसुली करणे अशक्य झाले आणि कर्जे देणार्‍या बँका स्वत: आर्थिक चणचणीत सापडल्या. ही गुंतागुंत प्रचंड मोठी होत गेली तसेच सरकारचे ह्यावर काडीचेही नियमन नसल्याने सगळीकडेच लिक्विडीटी क्रंच निर्माण झाला. क्रेडीटवर चालणार्‍या अमेरिकन अर्थव्यवस्थेला तरण्यासाठी पैंशांचा तातडीने पुरवठा करण्याशिवाय सरकारकडे पर्याय नव्हता. खूप खोलवर जाऊन विचार केला तर अमेरिकी समाजाच्या चैनी वृत्तीत तसेच क्रेडीट वर आधारीत जीवनपद्धतीत ह्याच अजून एक मूळ लपलय हे दिसून येतय. ह्यावर वेंकटेश यांनी स्व्देशी जागरण मंचाच्या सभेत बोलताना केलेला &lt;a href="http://video.google.com/videosearch?q=Lecture+by+CA+M.R.+Venkatesh&amp;amp;emb=0&amp;amp;aq=f#"&gt;*हा अभ्यासपूर्ण उहापोह*&lt;/a&gt; खूपच आवडला. भारततील एकत्र कुटुंबपद्धती तसेच जबाबदारीने वागण्याची सामाजिक समज ह्यामुळे आपल्या इथे जी सेव्हींग्ज बेस्ड आर्थिक जिवनपध्दती आहे त्यामुळे भारतात इथल्या इतकीत बिकट समस्या होण्याची शक्यता कंमी आहे असे दिसते, अर्थात भारतापुढे गरिबी, लोकसंख्या, भ्रष्टाचार असे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेतच. एकंदर काय की भांडवलशाहीची शेखी मिरवणार्‍या अमेरिकेला आज त्यांच्या तत्वाविरुद्ध जावं लागतय. सरकारला हस्तक्षेप करावा लागतोय बँकांना पैसा पुरवण्यासाठी. दुर्दैवाची गोष्ट अशी की येउ घातलेल्या निवडणुकातील दोन्ही उमेदवारांमध्ये ह्याविषयी तितकी समज आणि दूरदृष्टी दिसत नाही. आमच्या शेजारीच इथे, मेरी म्हणून एक अमेरिकन बाई राहाते. तिला आशियाई संस्कृतीचे आकर्षण आहे आणि आम्हालाही इथल्या अमेरिकन सामान्य माणसाच्या आयुष्याबद्दल बरच कळत राहात तिच्याशी बोलताना, त्यामुळे आमच्या गप्पा नेहमीच रंगतात. अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सांगताना ती म्हणते की अमेरिकन आर्थिक जीवन म्हणजे मोठा ब्रॉड वे शो आहे. पुढे सगळं छान, आकर्षक तुम्ही अगदी ज्याला वर्ल्ड क्लास म्हणाल असं, पण मागे तो एक मोठ्ठा घोळ आहे जो निस्तरायची कोणाचीच इच्छा नाही आणि आता तर ताकदही नाही.&lt;br /&gt;ह्या सार्‍यांतून एक गोष्ट निश्चित दिसतेय. येत्या काही वर्षात नोकरकपात, बेरोजगारी वाढेल. त्याला तोंड द्यायचे असेल तर सगळ्यांनीच आपली सेव्हिंग्ज क्षमता वाढवायला हवी, अनावश्यक खर्च टाळायला हवेत. इथे महागाई जाणवण्याइतपत वाढतेय. भारताच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या इथे बाहेरच्या संस्थानी पैसा काढून घेतल्याने बाजार कोसळलाय. स्वतःच्या पायावर उभ रहायला शिकायला हवं भारताने आता. अणुकरार झाला ही भारताची जमेची बाजू. पंतप्रधान तसेच सरकारी ज्येष्ठांनी दाखवलेल्या मुत्सुदेगिरीमुळेच हे शक्य झालं ह्यात वाद नाही. तसच गुंतवणूकदारांनी बाजारातल्या सगळ्या चढ उतारांकडे बारकाईने पहायला हवं. खाली आलेला बाजार ही गुंतवणूकीची उत्तम संधी असू शकतेही. माझ्या सारखे तरूण ज्यांचे भारत आणि अमेरिका ह्या दोन्ही दगडांवर पाय आहेत त्यांच्यासाठी येता काळ विशेष कसरतीचा आहे. ह्या जागतिकरणाच्या लाटेवर स्वार होणार्‍यात आम्हीही आहोतच. लहान वयात जग बघण्याची संधी, तौलनिक आर्थिक संपन्नता, विशाल दृष्टीकोन ह्या जमेच्या गोष्टींबरोबरच वैयक्तिक, कौटुंबिक पातळ्यांवर अस्थिरता, अपरिहार्य बदल, स्थित्यंतरे ह्यातून कमालिचे वेगवान आयुष्य, रॅट रेस मधे धावण्याची वृत्ती असं बरच काही वाट्याला येतय. त्यातूनच शिकायलाही मिळतय.&lt;br /&gt;&lt;br /&gt;डॅलस डायरी:&lt;br /&gt;महाराष्ट्र मंडळाचा गणपती उत्सव छान झाला. दोन छोटी नाटकं बसवली होती स्थानिक कलाकारांनी. शिवाय जेवणही उत्तम होते अनल आपटे यांचे. इथे बर्‍याच मित्रांकडे घरगुती गणपतीला जाण्याचाही योग आला ह्यावेळी. नवरात्रात देवळात नऊ दिवस गरबा होता. काही जणांच्या घरी घट बसले होते तिथे जाऊन आरत्या, जोगवे म्हणता आले. किरण आणि कालिंदी साठये यांच्याकडे कोजागिरीचा छान कार्यक्रम झाला. पु. लं ची 'एक शून्य मी' हा त्यांनी ७४ सालच्या म. टा. दिवाळी अंकात लिहिलेला लेख मी तेव्हा वाचला. भेळ, मसाले भात, मसाला दूध, गप्पा गाणी खूपच खास झाली कोजागिरी ह्यावेळची.&lt;br /&gt;आता दिवाळीची तयारी सुरु आहे. इंडीयन असोशिएशनचा, महाराष्ट्र मंडळाचा असे दिवाळीचे भरघोस कार्यक्रम आहेत.&lt;br /&gt;दरम्यान येथे विजय कोपरकर यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. खूप आवडला. त्यांनी वसंतराव देशपांडेंच 'सावरे अज्जय्यो' हे गाणं म्हटलं ते केवळ अप्रतिम. मुलतानी, राजहंस हे सायंकाळचे राग त्यांनि आळवले. ठुमरीही खास झाली. वियज कोपरकरांच्या गायन मैफलित व्हायोलिन, पेटी, तबला ह्यावर साथ देणारे कलाकार होते ते सगळे पुण्याचे. त्यांचा पूर्ण चमूच मला वाटतं 'सीओईपी' चा. ह्याच चमूचा 'भैरव ते भैरवी' हा अजून एक कार्यक्रम इथे झाला.&lt;br /&gt;दरम्यान बरेच दिवस मनात असलेली गोष्ट अचानक जमून यावी असं घडलं, ज्याला आपण योग येणं असही म्हणतो. तर इथे सौ. सरिता गायतोंडे यानी प्राणायम, योगासने ह्यांचे अभ्यासवर्ग सुरु केलेत. सुदैवाने मला तिथे सामिल होण्याची संधी मिळाली. स्वत: सरिता काकू गेले दहाहून अधिक वर्ष योग शिकत आहेत. कैवल्यधाम येथे दरवर्षी जाऊन त्या पूर्ण योगाभ्यास शिकल्या आहेत. त्यांचा पातांजली योगाचा अभ्यास आणि ते शिकवण्याच कसब वादातीत आहे. दहा सप्ताहांतांच्या ह्या वर्गाचा आम्ही पंचवीस विद्यार्थी लाभ घेतो आहोत. श्वसनमार्गशुद्धी, कपालभाती ह्या शुद्धीक्रिया, पवनमुक्तासन, मार्जारासन, व्याघ्रासन, पवनमुक्तासन, वज्रासन, चक्रासन्, भुजंगासन ही आसने, त्राटक प्राणायामाचे प्रकार आणि प्रत्येकाचे फायदे हे सगळं छान समजून घेता येतय. मुख्य म्हणजे आम्हाला प्रत्येकाला सरिताकाकूंच वैयक्तिक मार्गदर्शन मिळतय. योग्य वयात काहितरी चांगलं शिकत असल्याच खूप समाधान मिळतय.&lt;br /&gt;&lt;br /&gt;योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलम शरिरस्यच वैद्यकेन&lt;br /&gt;योपाकरोत्तम प्रवरम मुनिनाम, पाताजलिं प्रांजलिरानतोस्मि&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-1404967791437309310?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/1404967791437309310/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=1404967791437309310' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/1404967791437309310'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/1404967791437309310'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2008/10/blog-post_15.html' title='आर्थिक अस्थैर्याचे दिवस..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-9208433903831414822</id><published>2008-09-08T13:22:00.006-05:00</published><updated>2008-09-08T14:45:58.737-05:00</updated><title type='text'>गणपती बाप्पा मोरया..</title><content type='html'>दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी मायबोलीवरील गणेशोत्सवात मी लिहिलेली आरती -&lt;br /&gt;&lt;br /&gt;ओवाळू आरती देवा गणपती&lt;br /&gt;माझी मति राहो दृढ तुझ्याप्रती..&lt;br /&gt;ओवाळू आरती देवा गणपती.. ||धृ||&lt;br /&gt;&lt;br /&gt;बुद्धिचा दाता तू, कलेचा प्रेमी&lt;br /&gt;विघ्नांचा हर्ता, रिद्धि-सिद्धिंचा स्वामी&lt;br /&gt;तुझ्या भक्तिने तुष्ट, शंकर पार्वती..&lt;br /&gt;ओवाळू आरती देवा गणपती.. ||१||&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझी पूजा रत, तुझे चरणी&lt;br /&gt;तूचि एक नित्य, नामस्मरणी&lt;br /&gt;गोड घे मानुनि सेवा, मंगलमूर्ती..&lt;br /&gt;ओवाळू आरती देवा गणपती.. ||२||&lt;br /&gt;&lt;br /&gt;सर्वा सद्बुद्धी दे, ठेव समाधानी&lt;br /&gt;मन रंगूनी जावो, गोड तुझ्या नामी&lt;br /&gt;निरामय आरोग्य नि राहो सुख शांती..&lt;br /&gt;ओवाळू आरती देवा गणपती.. ||३||&lt;br /&gt;&lt;br /&gt;चालः ओवाळू आरती मदनगोपाळा किंवा ओवाळू आरती माता कलावती..&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-9208433903831414822?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/9208433903831414822/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=9208433903831414822' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/9208433903831414822'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/9208433903831414822'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2008/09/blog-post.html' title='गणपती बाप्पा मोरया..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-4615487669857984295</id><published>2008-08-28T16:36:00.018-05:00</published><updated>2008-08-31T16:17:44.392-05:00</updated><title type='text'>कवितांच्या गावा..</title><content type='html'>&lt;a href="http://samvedg.blogspot.com/"&gt;&lt;strong&gt;संवेदने&lt;/strong&gt;&lt;/a&gt; दिलेला खो पुढे &lt;a href="http://majhyaathavani.blogspot.com/2008/08/blog-post.html"&gt;&lt;strong&gt;मिनोतीने&lt;/strong&gt;&lt;/a&gt; मला आणि &lt;a href="http://paarijaat1.blogspot.com/"&gt;&lt;strong&gt;स्वातीला&lt;/strong&gt;&lt;/a&gt; दिला (ह्या ऒलिंपिकच्या वातावरणात अगदी पेटती मशाल दिल्यासारखा.. घे आणि धाव म्हणत) तेव्हा खरं तर दोन प्रश्न होते खो नेमका कुणाला द्यायचा आणि माझ्या इतक्या आवडत्या कवितांमधून नेमक्या कोणत्या लिहायच्या.. संदीप, पाडगावकर, बोरकर, गदिमा, शांताबाई, सुरेश भट, कुसुमाग्रज, केशवसूत, आरती प्रभू, ग्रेस, सुधीर मोघे कितीतरी..&lt;br /&gt;&lt;br /&gt;मला आवडलेल्या दोन कविता ज्या मी केव्हाना केव्हातरी माझ्या ब्लॉग वर टाकल्या असत्याच त्याला हे निमित्त मिळालं इतकच :-)आणि हो असा उपक्रम चालवायचा अजून एक फायदा म्हणजे आपल्या ज्या मित्रांचे ब्लॉग्स ह्या ना त्या कारणाने सुप्तावस्थेत गेले आहेत त्यांना पुनर्जागृती..&lt;br /&gt;&lt;br /&gt;पहिली कविता बोरकरांची - यशस्वी जीवन म्हणजे काय हे अलगद आणि समर्थपणे उलगडवून दाखवणारी. ह्या कवितेशी माझी पहिली ओळख झाली ती पु. लं. च्या एका लेखामध्ये आणि आता जितकेवेळा वाचतो ऐकतो ती अधिक आवडत जातेय.. सुनीताबाई आणि पु.लं जो बोरकरांवर कार्यक्रम करायचे त्यात ही असायची नेहमीच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुसरी कविता पाडगावकरांची, इतकी चपखल लिहिलेय की वाटाव पाडगावकर नक्की एकदा प्रेमभंगातून गेले असावेत. ह्या कवितेशी माझी ओळख करून दिली &lt;a href="http://www.kshiprasuniverse.blogspot.com/"&gt;&lt;strong&gt;क्षिप्राने&lt;/strong&gt;&lt;/a&gt;, जिने मला कवितांच्या गावातल्या अशा कित्येक मातब्बर धुरणींशी खूप जवळून ओळख करून दिलेय, कवितांविषयी मला बहुश्रुत व्हायला मोलाची मदत केलेय.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://arun-sahaj.blogspot.com/"&gt;&lt;strong&gt;अरुण&lt;/strong&gt; &lt;/a&gt;आणि &lt;a href="http://pkparagkan.blogspot.com/"&gt;&lt;strong&gt;परागकणास्&lt;/strong&gt;&lt;/a&gt;&lt;strong&gt; &lt;/strong&gt;ही कवितावली पुढे चालवायला देतोय..&lt;br /&gt;&lt;br /&gt;ह्या खॊ चे काही नियम &lt;a href="http://samved.blogspot.com/"&gt;&lt;strong&gt;संवेदने&lt;/strong&gt;&lt;/a&gt; ठरवलेले त्याच्या ब्लॊगवरून उदधृत करतोय..&lt;br /&gt;१. कविता आवडते पण पुर्ण आठवत नाही आणि हाताशी पुस्तकही नाही? हरकत नाही, आठवतं तेव्हढं लिहा. कवीचं नाव मात्र आवश्य लिहा&lt;br /&gt;२. एक से मेरा क्या होगा सिन्ड्रोम? या वेळी तुम्ही तुमच्या सध्या आवडणारया टॉप २ कविता लिहु शकता आणि कवितांच्या प्रमाणात खो देखील देऊ शकता. जेव्हढ्या कविता तेव्हढे खो (जास्तीजास्त अर्थात २)&lt;br /&gt;३. खो खो नीट चालवण्याची जबाबदारी अर्थात सारयांचीच. त्यामुळे तुमच्या पोस्ट मधे तुम्ही ज्या/जिला खो देताय, त्या/तीचं नाव तर लिहाच, शिवाय त्या/तिच्या ब्लॉगवर ही खो दिल्याची नोंद आवश्य करा&lt;br /&gt;४. कविता का आवडली किंवा कवितेचा अर्थ किंवा काहीच स्पष्टीकरण आपेक्षित नाही&lt;br /&gt;५. अजून नियम नाहीत :)&lt;br /&gt;----------------------------------------------------------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;जीवन त्यांना कळले हो&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;जीवन त्यांना कळले हो&lt;br /&gt;मी पण ज्यांचे पक्व फळापरी&lt;br /&gt;सहजपणाने गळले हो..&lt;br /&gt;&lt;br /&gt;जळापरी मन निर्मळ ज्यांचे&lt;br /&gt;गेले तेथे मिळले हो&lt;br /&gt;चराचरांचे होऊनी जीवन&lt;br /&gt;स्नेहासम पाजळले हो..&lt;br /&gt;&lt;br /&gt;सिंधुसम हृद्यात जयांच्या&lt;br /&gt;रस सगळे आकळले हो&lt;br /&gt;आपत्काली अन दीनांवर&lt;br /&gt;घन होऊनी जे वळले हो..&lt;br /&gt;&lt;br /&gt;दुरित जयांच्या दर्शनमात्रे&lt;br /&gt;मोहित होऊनी जळले हो&lt;br /&gt;पुण्य जयांच्या उजवडाने&lt;br /&gt;फुलले अन परिमळले हो..&lt;br /&gt;&lt;br /&gt;आत्मदळाने नक्षत्रांचे&lt;br /&gt;वैभव ज्यांनी तुळले हो&lt;br /&gt;सायासाविण ब्रह्म सनातन&lt;br /&gt;घरीच जयां आढळले हो,&lt;br /&gt;उरीच जयां आढळले हो,&lt;br /&gt;जीवन त्यांना क्ळले हो....&lt;br /&gt;&lt;br /&gt;-- बा. भ. बोरकर&lt;br /&gt;----------------------------------------------------------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;तेव्हांची ती फुलं..&lt;/strong&gt;&lt;br /&gt;सगळं संपलं असं समजून उभे होतो&lt;br /&gt;एकमेकांसमोरः आणि एकमेकांपलिकडे&lt;br /&gt;पानगळतीच्या ओंजळीत होती साठवलेली&lt;br /&gt;आपण एकमेकांना दिलेली तेव्हांची ती फुलं..&lt;br /&gt;&lt;br /&gt;फुलणं ही जशी फुलाची भाषा असते&lt;br /&gt;तशीच असते कोमेजणं ही फुलांचीच भाषा&lt;br /&gt;कितीही कोमेजलेली फुलं जरी असली तरी&lt;br /&gt;एकदा ती फुलली होती हे नाही विसरता येत..&lt;br /&gt;&lt;br /&gt;न बोलता उभे होतो एकमेकांसमोर&lt;br /&gt;यापुढे भेटलो तरी आपण परके असणार&lt;br /&gt;कोमेजलेली फुलं पुन्हा फुलत नाहीत&lt;br /&gt;हे ज्यांना क्ळलं ते फुलणंसुद्धा सोसतात..&lt;br /&gt;&lt;br /&gt;- मंगेश पाडगांवकर&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-4615487669857984295?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/4615487669857984295/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=4615487669857984295' title='3 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/4615487669857984295'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/4615487669857984295'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2008/08/blog-post_28.html' title='कवितांच्या गावा..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>3</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-3588046082897025435</id><published>2008-08-28T15:13:00.007-05:00</published><updated>2008-08-28T16:21:43.934-05:00</updated><title type='text'>डेलसचा ऒगष्ट..</title><content type='html'>डेलास डायरी:&lt;br /&gt; हा ऒगष्ट तसा खूपच उन्हाळ्याचा होता इथे, तापमान बरेचदा दिवसा १०० फॆ च्या वर जायच (म्हणजे ३४ सें.) आणि भाजून काढणारं ऊन नको वाटायचं. पण महिना व्यस्त गेला खेळ आणि भटकणं अशी उत्तम चंगळ झाल्याने.&lt;br /&gt;&lt;br /&gt; ऒलिंपिक्सच्या बयाच स्पर्धा बघता आल्या त्या केवळ एन.बी.सी च्या कृपेने. मायकल फ्लेप्स एक शतांश सेकंदाने जिंकला हे पहाताना डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कुठे पोहोचलय तंत्रशास्त्र की इतका सूक्षम फरक सुद्धा पकडता यावा!  मायबोलीवर मुकुंदने ऒलिंपिक विषयी, त्यातले संभाव्य विजेते खेळाडू, वेगवेगळ्या स्पर्धा ह्यांची माहिती दिली होती त्याचा बराच फायदा झाला खेळ बघताना. बोल्ट्चा वेगही एकदम सुसाटच. ऒलिंपिक मध्ये पात्र ठरून देशाचे प्रतिनिधित्व करणार्या प्रत्येकाला माझा मनःपूर्वक सलाम.  दुसरं आवडलं ह्यावेळी ते म्हणजे चीनची जिद्द. गेले कैक वर्ष अनेक दबावांना सामोरे जात चीनने ऒलिंपीकची तयारी चालवली होती. उद्घाटनाच्या आणि समारोपाच्या कार्यक्रमाने चीनने साया जगास तोंडात बोटे घालावयास लावली, शिवाय त्याबाबतीत त्यांनी एक नवीन मैलाचा दगड बनवून ठेवलाय. तसच नुसते सुनियोजनच नव्हे तर जास्तीत जास्त सुवर्ण घेऊन अमेरीकेच्या खेळातील वर्चस्वाला सरळ आव्हानच दिलेय. अभिनव बिंद्राला सुवर्णपदक देताना लावलेले भारताचे राष्ट्रगीत ऐकताना पुन्हा एकदा रोमांच उभे राहीले. भारताच्या दृष्टिने हे ऒलिंपिक चांगलेच गेले. हेच पथक ऒलिंपीकला जायच्या आधी कलमाडीनी मुलाखतीत स्पष्ट सांगितले होते की आम्ही जातोय पण पदकाच्या अपेक्षा ठेवू नका, आणि ही बातमी पेपरात वाचून धक्काच बसला होता. जर एवढ्या जबाबदार पदावरच्या व्यक्तीमध्ये जर इतका कमी आत्मविश्वास असेल तर कसचे काय. ऒलिंपिक हा शारिरीक तर आहेच पण मानसिक कणखरपणाचा खेळ आहे. तुम्ही त्या क्षणाला दबाव कसा झेलता आणि कशी कामगिरी करता हे महत्त्वाचे. म्हणून ह्या पार्श्वभूमीवर भारतीय चमूने विशेषतः बॊक्सिंगपटूंनी केलेली कामगिरी स्पृहणीय वाटते. खूप काही शिकायला मिळालय भारताला यातून हे नक्की.&lt;br /&gt;&lt;br /&gt; इतर कार्यक्रमांबरोबरच आठ दिवस सुट्टी टाकून अमेरीकेच्या पूर्व किनायावर फिरायला गेलो होतो.  वॊशिंग्ट्न डीसी, न्यू जर्सी, न्यू यॊर्क मनसोक्त फिरून झाले. न्यू जर्सी मध्ये ओक ट्री रोड वर फिरलो, ब्रिजवॊटरच्या देवळात गेलो होतो आणि पॊईंट प्लेजर ह्या बीच वर. न्यूयॊर्क म़धे तर एक दिवस डाऊन टाऊन, एक दिवस अप टाऊन आणि एक दिवस मिड टाऊन अस खूप फिरणं झालं. आम्ही दोघही पक्के मुंबईकर असल्याने न्यू यॊर्क विशेषच आवडलं. प्रचंड महाग असलं तरी तितकच प्रेमळ शहर. न्यूयॊर्क म्युझियम मधून शहराचा पूर्ण इतिहास तसेच टाईम स्क्वेअर, युनियन स्क्वेअर, ब्रॊड वे वरचे शोज (ब्रॊड वे, ऒफ ब्रॊड वे, ऒफ ऒफ ब्रॊड वे) ह्यांची इत्यंभूत माहिती मिळाली. मोमा ह्या आर्ट गॆलरी मधेही पिकासो तसेच इतर जगद्विख्यात चित्रकारांच्या तसेच शिल्पकरांच्या कलाकृती बघता आल्या. अत्तापर्यंत कैक वेळा गेलोय न्यू यॊर्क मधे पण बरेचदा मित्रांना फिरवायलाच आणि मग इंपिरीयल टॊवर, स्वातंत्र्यदेवीचा पुतळा, टाईम स्केवर, ट्वीन टॊवर्सचा ग्राउंड झीरो, सेंट्रल पार्क ह्याच गोष्टी मुख्यत्वे बघून व्हायच्या. पण ह्यावेळी ह्या गोष्टींव्यतिरीक्त बरंच काही बघता आलं, एखाद शहर समजून घेण्याचा आनंद मिळाला. काहीतरी जागतिक (वल्र्ड क्लास) बघितल्याच समाधान मिळतच मिळतं न्यूयॊर्क फिरताना. शिवाय बस टूर घेतली होती आम्ही त्यामुळे बर्याच गोष्टी समजण्यास मदत झाली. एक अचानक मिळालेलं आणि अतिशय आवडलेल हे नाचो सॆंडविच - &lt;a href="http://midtownlunch.com/blog/2008/07/07/off-the-menu-blimpie-sandwich/" target="_blank" rel="nofollow"&gt;http://midtownlunch.com/blog/2008/07/07/off-the-menu-blimpie-sandwich/&lt;/a&gt; &lt;br /&gt;एक दिवस संध्याकाळी ब्रुकलीन ब्रिजवर गेलो होतो, अर्ध्याहून पुढपर्यंत चालत गेलॊ आणि अचानक पाऊस आल. मग काय मस्त पैकी मनसोक्त भिजलो. ह्या अशा ठिकणी भिजणं अगदी कायम लक्षात राहील असच.पुन्हा कधीही असं न्यूयॊर्क मधे भटकायला आम्ही दोघेही तयार आहोत बघू कधी संधी मिळतेय का..&lt;br /&gt;&lt;br /&gt;सद्ध्या थोडा निवांत झाल्याने पुन्हा वाचनाकडे वळतोय, शिवराज गोर्लेंच ’मजेत जगावं कसं’ हातात घेतलय. पुस्तक वाचायच्या आधीच मला प्रश्न पडला होता की, काय असेल इतकं ह्या पुस्तकात, आणि मजेत जगा हे सांगण्यासाठी आणि कसं ते सांगण्यासाठी पुस्तक कशाला वेगळं, दासबोधात सांगितलय की रामदासांनी, जे बरचस कालातीत आहे म्हणजे इतक्या वर्षांनंतरही समाजाला लागू आहे. पण पहिली काही पाने वाचल्यावर आवडायला लागलय. ह्या माणसाच वाचन चांगलं आहे आणि वेगवेगळ्या घटना, पाश्चात्य लेखकांचे लेखन तसेच पौराणिक दाख्ले उधृत करून बयाच गोष्टी समजावून दिल्यात. पाश्चात्य जग हे भोगवादी आहे तर आपली संस्कृती त्यागवादी. ह्या दोहोंमधे मेळ कसा घालता येईल ह्याचा अभ्यासपूर्ण उहापोह आहे, आवडतय.. &lt;br /&gt;&lt;br /&gt;आणि हो, मुंबईत पाट्या लागत आहेत बरं का मराठीत असं ऐकलं.. कोणी काही म्हणा हा विषय ढवळून काढायच बरंच श्रेय जातय राजला आणि सरकार सुद्धा ते तसं होऊन देतय थोड्या प्रमाणात कारण मूळ शिवसेनेचा हा मुद्दा नवनिर्माणाने ओढून घेतलाय. एकंदर काय कोणी कितीही भांडा श्रेयासाठी पण काम करा म्हणजे झालं आणि हो आता थोडी विधायक काम सुद्धा येउंदेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ठाण्यात ९ थरांचा गोविंदा लावला माजगाव वाल्यांनी असं ऐकलं. कौतुक वाटलं खूप. मी गिरगावतल्या अखिल खोताची वाडीबरोबर जायचो. व्यायामशाळेतली मुल असायचॊ सगळी. २ महिने कचून तयारी करायचो, वजनाचा तसाच तोलाचा सराव चालायचा. दमून भागून ऒफीसमधून आलो की रात्री १० वाजता सराव सुरु. आता बरच व्यावसायिक झालय पण. शिट्टीवर व्यवस्थित थर लावतात, उतरतानाही सांभाळून उतरतात. शिवाय गोविंदांचा विमा उतरवला जातोय. चांगलं वाटलं हे वाचून. माझ्या २००१ च्या गोविंदाच्या व्ही. सी. डी. करून ठेवल्यात त्या रविवारी बघून समाधान मानलं. दहीकाल्याचा आणि काकडीच्या कोशींबीरीचा प्रसाद केला होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;अजूनही संक्रात, गोकुळाष्टमी आणि गणपती आले की कालवाकालव होते. गणपतीची तयारी सुरु झाली असेल आता, मांडव घातले गेले असतील. मग मांडवातले खेळ, लंगडी, टे टे, वगैरे. शिवाय आरत्या, आवर्तने, प्रसाद, फुले, आरास सगळ्याची तयारी. अगदी उत्सवी वातावरण असेल. दादर, लालबाग तर फुलून गेले असतील गर्दीने. खूपच नॊस्टेलजिक आणि भकास वाटतं इधे ह्यादिवसात.. तरीही इथे मित्रांकडे ग्णपती आहेत आणि महाराष्ट्र मंडळात देखील कायक्रम आहेत म्हणून बरं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;नवलाख विजेचे दीप तळपती येथ&lt;br /&gt;तारकादळे उतरली जणू नगरात&lt;br /&gt;परि स्मरते आणिक व्याकूळ करते केव्हा&lt;br /&gt;ती माजघरातील मंद दिव्याची वात...&lt;br /&gt;(- कुसुमाग्रज)&lt;br /&gt;&lt;br /&gt;मिनोतीने नुकतच टॆग केलय, आवडीच्या कविता लिही म्हणून.. त्यामुळे पुढच्या पोष्टमधे ते..&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/7612250072386823372-3588046082897025435?l=upasanip.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://upasanip.blogspot.com/feeds/3588046082897025435/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=7612250072386823372&amp;postID=3588046082897025435' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/3588046082897025435'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/7612250072386823372/posts/default/3588046082897025435'/><link rel='alternate' type='text/html' href='http://upasanip.blogspot.com/2008/08/blog-post.html' title='डेलसचा ऒगष्ट..'/><author><name>Prashant Upasani</name><uri>http://www.blogger.com/profile/17137059893571658358</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://4.bp.blogspot.com/_erAMMRPkbXg/Sic1Z-dL-pI/AAAAAAAAAEM/szCvp7Y7bVk/S220/P1010076.JPG'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-7612250072386823372.post-1740492532863403633</id><published>2008-07-18T16:58:00.015-05:00</published><updated>2008-07-24T23:21:02.534-05:00</updated><title type='text'>सिंग इज किंग..</title><content type='html'>सद्ध्या भारतात अणुकरार आणि महागाई ह्या दोन 
